Shuru
Apke Nagar Ki App…
भोकरदन शहरातील अतिक्रमण धारकांनी तीन दिवसात अतिक्रमण काढण्याचे आवाहन
AKBAR SHAHA REPORTER
भोकरदन शहरातील अतिक्रमण धारकांनी तीन दिवसात अतिक्रमण काढण्याचे आवाहन
More news from महाराष्ट्र and nearby areas
- कुणबी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांची फरफट; वैजापूरमध्ये शैक्षणिक नुकसानाची भीती वैजापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना कुणबी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रमाणपत्राअभावी प्रवेश, शिष्यवृत्ती व आरक्षणाच्या लाभापासून विद्यार्थी वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. जात प्रमाणपत्राबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दाखला रद्द झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिल्याने प्रशासनासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.1
- भोकरदन शहरातील अतिक्रमण धारकांनी तीन दिवसात अतिक्रमण काढण्याचे आवाहन1
- सिल्लोड शहरात रक्षाबंधन निमित्त आमदार जो सत्कार यांच्या जनसंपर्क कार्यालयावर.... सिल्लोड (प्रतिनिधी) : शहरातील आमदार अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला भगिनींनी आमदार अब्दुल सत्तार यांना राखी बांधल्या. रक्षाबंधनानिमित्त आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित महिला भगिनींना साडी भेट देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी बोलताना आमदार सत्तार म्हणाले की, “भावाचा आधार आणि बहिणीची माया हे अतूट नाते रक्षाबंधनाच्या माध्यमातून अधिक दृढ होते. या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ आपल्या बहिणीच्या संरक्षणाचे वचन देतो. हे नाते प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे प्रतीक आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थित महिला भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये उत्साह राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळत असून, महिलांच्या खात्यात दरमहा १ हजार ५०० रुपयांचे अनुदान जमा होत आहे. त्यामुळे यंदाच्या राखी पौर्णिमेनिमित्त महिलांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले. लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने क्रांतिकारी पाऊल “आम्ही यापूर्वीच सांगितले होते की, शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजना केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय नसून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने घेतलेला क्रांतिकारी निर्णय आहे,” असे आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी स्पष्ट केले. महिला आता केवळ ‘चूल आणि मूल’ यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नसून आयएएस, आयपीएस, इंजिनीअरिंगसह विविध क्षेत्रांत महिला अत्यंत जबाबदारीने आपले कर्तव्य बजावत आहेत. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. “मी जरी आपला सख्खा भाऊ नसलो, तरी माझ्या लाडक्या बहिणींच्या सुख-दुःखात सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहून, त्यांच्या मदतीसाठी आयुष्यभर कटिबद्ध राहीन,” अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. या कार्यक्रमास शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, राजश्री निकम, शकुंतलाबाई बनसोड, मेघा शाह, नगरसेविका वैशाली पाटील, रेखा गायकवाड, पर्वताबाई दुधे, तसेच सुमनबाई तांगडे, शांताबाई कावले, कमलबाई जैस्वाल यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.3
- संभाजीनगर -९०३ शाळा स्वच्छतागृहाविना,मुलींसाठी ८७५ स्वतंत्र शौचालयांची गरज छ संभाजीनगर ९०३ शाळा स्वच्छतागृहाविना,मुलींसाठी ८७५ स्वतंत्र शौचालयांची गरज ANC - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या तब्बल ९०३ शाळांमध्ये पुरेशा स्वच्छतागृहांचा अभाव असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुलांसाठी ८०२, तर विद्यार्थिनींसाठी तब्बल ८७५ स्वतंत्र स्वच्छतागृहांची गरज आहे. अनेक शाळांमधील उपलब्ध स्वच्छतागृहे दुरवस्थेत असून पाण्याअभावी वापरात नसल्याचे चित्र आहे. विशेषत,विद्यार्थिनींची मोठी कुचंबणा होत असून, सुरक्षित स्वच्छतागृहांच्या अभावामुळे शाळा गळतीचा धोका वाढला आहे. जिल्हा नियोजन समिती, सीएसआर आणि सेसमधून निधी उपलब्ध करून देऊन नवीन स्वच्छतागृहे उभारण्याचे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांनी दिले आहे.1
- पहिल्या राज्यस्तरीय परिवर्तनवादी साहित्य संमेलनाची उत्साहपूर्ण आणि वैचारिक वातावरणात बैठक संपन्न1
- *बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी* *बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी* बदनापूर येथील जलसंपदा विभागाच्या (पाटबंधारे विभाग) उपविभागीय कार्यालयाची आणि वसाहतीची इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. वर्षानुवर्षे या इमारतींची योग्य डागडुजी न झाल्यामुळे या शासकीय कार्यालयाची अवस्था एखाद्या पडक्या वाड्यासारखी झाली असून, येथे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी तातडीने लक्ष देऊन शासन पातळीवरून नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व निवासस्थाने मंजूर करून आणावीत, अशी तीव्र मागणी बदनापूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमधून केली जात आहे.इमारतींवर झाडीझुडपांचे साम्राज्य, भिंतींना तडेसध्या या कार्यालयाची आणि निवासस्थानांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. देखभालीअभावी छतांवर आणि भिंतींवर मोठ्या प्रमाणावर गवत आणि झाडीझुडपे उगवली आहेत. झाडांची मुळे भिंतींमध्ये खोलवर गेल्याने इमारतीला मोठे तडे गेले असून संपूर्ण सिमेंटचे बांधकाम कमकुवत झाले आहे.ताडपत्रीचा आधार; राहणाऱ्यांच्या जीवितास मोठा धोकाकार्यालयाच्या व निवासस्थानांच्या छताचे प्लास्टर आणि सिमेंटचे भाग सतत निखळून पडत आहेत. पावसाळ्यात छतातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळत असल्याने, छताचे रक्षण करण्यासाठी त्यावर चक्क प्लास्टिक आणि ताडपत्री टाकण्याची वेळ आली आहे. ही ताडपत्री तात्पुरता आडोसा देत असली, तरी मूळ इमारत कधीही कोसळू शकते अशी भयानक स्थिती आहे. अशा धोकादायक छताखाली दिवस-रात्र राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या निष्पाप कुटुंबाच्या जीवितास यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी एखादी भिंत किंवा छत कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शासकीय दप्तर आणि रेकॉर्ड धोक्यातछताच्या सततच्या गळतीमुळे केवळ माणसांचाच जीव धोक्यात आहे असे नाही, तर तालुक्यातील जलप्रकल्प, कालवे आणि शेतजमिनींच्या नोंदी असलेले अत्यंत महत्त्वाचे शासकीय दप्तर, नकाशे व मोलाच्या फाईल्स भिजून कायमच्या नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेकदा कर्मचाऱ्यांना फाईल्स वाचवण्यासाठी प्लास्टिकचा वापर करावा लागत आहे.परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुळसुळाटया आवारात राहणारे कर्मचारी, अधिकारी आणि कामानिमित्त येणारे शेतकरी यांच्या जीवाला इमारतीसोबतच आणखी एका संकटाचा सामना करावा लागत आहे. परिसरामध्ये वाढलेल्या अस्ताव्यस्त झाडीझुडपांमुळे साप, विंचू व इतर सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. यामुळे कर्मचारी व त्यांच्या मुलांना नेहमीच भीतीचा सामना करावा लागत आहे.आमदार नारायण कुचे यांच्याकडून निधीची अपेक्षाबदनापूर तालुक्यातील सिंचन व्यवस्थापनाच्या आणि शेतकर्यांच्या दृष्टीने हे कार्यालय अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीने या जागेची पाहणी करावी, तसेच शासन पातळीवर ताकदीने पाठपुरावा करून या धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि येथे नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी विशेष निधी मंजूर करून आणावा, अशी आग्रही मागणी आता लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.2
- कन्नड पिशोर खांडित भीषण अपघात झाला असून दोन्ही गाडीचे चालक किनर गंभीर जखमी आहे. कन्नड :- पिशोर खांडित चंदन नाल्याजवळ दोन वाहनाचा समोरासमोर अपघात झाला असून चालक आणि किनर गंभीर जखमी झाले आहे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पण स्थानिक पोलीस प्रशासन/ वन विभाग तातडीने लक्ष घालून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.1
- आंदोलनापूर्वीच अंतरवाली सराटीत मराठा समाजाचा मोठा जमाव ! मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी जमू लागली आहे. उद्यापासून होणाऱ्या आंदोलनासाठी राज्याच्या विविध भागांतून मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे दाखल होत आहेत.1