Shuru
Apke Nagar Ki App…
संभाजीनगर -९०३ शाळा स्वच्छतागृहाविना,मुलींसाठी ८७५ स्वतंत्र शौचालयांची गरज छ संभाजीनगर ९०३ शाळा स्वच्छतागृहाविना,मुलींसाठी ८७५ स्वतंत्र शौचालयांची गरज ANC - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या तब्बल ९०३ शाळांमध्ये पुरेशा स्वच्छतागृहांचा अभाव असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुलांसाठी ८०२, तर विद्यार्थिनींसाठी तब्बल ८७५ स्वतंत्र स्वच्छतागृहांची गरज आहे. अनेक शाळांमधील उपलब्ध स्वच्छतागृहे दुरवस्थेत असून पाण्याअभावी वापरात नसल्याचे चित्र आहे. विशेषत,विद्यार्थिनींची मोठी कुचंबणा होत असून, सुरक्षित स्वच्छतागृहांच्या अभावामुळे शाळा गळतीचा धोका वाढला आहे. जिल्हा नियोजन समिती, सीएसआर आणि सेसमधून निधी उपलब्ध करून देऊन नवीन स्वच्छतागृहे उभारण्याचे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांनी दिले आहे.
रविंद्र सुरडकर गुरव
संभाजीनगर -९०३ शाळा स्वच्छतागृहाविना,मुलींसाठी ८७५ स्वतंत्र शौचालयांची गरज छ संभाजीनगर ९०३ शाळा स्वच्छतागृहाविना,मुलींसाठी ८७५ स्वतंत्र शौचालयांची गरज ANC - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या तब्बल ९०३ शाळांमध्ये पुरेशा स्वच्छतागृहांचा अभाव असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुलांसाठी ८०२, तर विद्यार्थिनींसाठी तब्बल ८७५ स्वतंत्र स्वच्छतागृहांची गरज आहे. अनेक शाळांमधील उपलब्ध स्वच्छतागृहे दुरवस्थेत असून पाण्याअभावी वापरात नसल्याचे चित्र आहे. विशेषत,विद्यार्थिनींची मोठी कुचंबणा होत असून, सुरक्षित स्वच्छतागृहांच्या अभावामुळे शाळा गळतीचा धोका वाढला आहे. जिल्हा नियोजन समिती, सीएसआर आणि सेसमधून निधी उपलब्ध करून देऊन नवीन स्वच्छतागृहे उभारण्याचे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांनी दिले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- आमदार अंबादास दानवे यांचा दामिनी पथकातील पोलीस भगिनींसोबत रक्षाबंधन छत्रपती संभाजीनगर येथील दामिनी पथकातील कर्तव्यदक्ष महिला पोलिसांसोबत यंदाही रक्षाबंधनाचा सण आपुलकीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील माता-भगिनींच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस भगिनींच्या हस्ते राखी बांधून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला आणि समर्पणाला सलाम करण्यात आला. महिला सुरक्षेसाठी दामिनी पथकाची भूमिका महत्त्वाची असून, संकटाच्या वेळी तत्परतेने मदत करण्याचे काम या महिला पोलीस कर्मचारी करतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोलीस भगिनींमध्येही उत्साहाचे वातावरण होते. समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम ठरला.1
- संभाजीनगर -९०३ शाळा स्वच्छतागृहाविना,मुलींसाठी ८७५ स्वतंत्र शौचालयांची गरज छ संभाजीनगर ९०३ शाळा स्वच्छतागृहाविना,मुलींसाठी ८७५ स्वतंत्र शौचालयांची गरज ANC - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या तब्बल ९०३ शाळांमध्ये पुरेशा स्वच्छतागृहांचा अभाव असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुलांसाठी ८०२, तर विद्यार्थिनींसाठी तब्बल ८७५ स्वतंत्र स्वच्छतागृहांची गरज आहे. अनेक शाळांमधील उपलब्ध स्वच्छतागृहे दुरवस्थेत असून पाण्याअभावी वापरात नसल्याचे चित्र आहे. विशेषत,विद्यार्थिनींची मोठी कुचंबणा होत असून, सुरक्षित स्वच्छतागृहांच्या अभावामुळे शाळा गळतीचा धोका वाढला आहे. जिल्हा नियोजन समिती, सीएसआर आणि सेसमधून निधी उपलब्ध करून देऊन नवीन स्वच्छतागृहे उभारण्याचे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांनी दिले आहे.1
- पहिल्या राज्यस्तरीय परिवर्तनवादी साहित्य संमेलनाची उत्साहपूर्ण आणि वैचारिक वातावरणात बैठक संपन्न1
- *बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी* *बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी* बदनापूर येथील जलसंपदा विभागाच्या (पाटबंधारे विभाग) उपविभागीय कार्यालयाची आणि वसाहतीची इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. वर्षानुवर्षे या इमारतींची योग्य डागडुजी न झाल्यामुळे या शासकीय कार्यालयाची अवस्था एखाद्या पडक्या वाड्यासारखी झाली असून, येथे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी तातडीने लक्ष देऊन शासन पातळीवरून नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व निवासस्थाने मंजूर करून आणावीत, अशी तीव्र मागणी बदनापूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमधून केली जात आहे.इमारतींवर झाडीझुडपांचे साम्राज्य, भिंतींना तडेसध्या या कार्यालयाची आणि निवासस्थानांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. देखभालीअभावी छतांवर आणि भिंतींवर मोठ्या प्रमाणावर गवत आणि झाडीझुडपे उगवली आहेत. झाडांची मुळे भिंतींमध्ये खोलवर गेल्याने इमारतीला मोठे तडे गेले असून संपूर्ण सिमेंटचे बांधकाम कमकुवत झाले आहे.ताडपत्रीचा आधार; राहणाऱ्यांच्या जीवितास मोठा धोकाकार्यालयाच्या व निवासस्थानांच्या छताचे प्लास्टर आणि सिमेंटचे भाग सतत निखळून पडत आहेत. पावसाळ्यात छतातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळत असल्याने, छताचे रक्षण करण्यासाठी त्यावर चक्क प्लास्टिक आणि ताडपत्री टाकण्याची वेळ आली आहे. ही ताडपत्री तात्पुरता आडोसा देत असली, तरी मूळ इमारत कधीही कोसळू शकते अशी भयानक स्थिती आहे. अशा धोकादायक छताखाली दिवस-रात्र राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या निष्पाप कुटुंबाच्या जीवितास यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी एखादी भिंत किंवा छत कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शासकीय दप्तर आणि रेकॉर्ड धोक्यातछताच्या सततच्या गळतीमुळे केवळ माणसांचाच जीव धोक्यात आहे असे नाही, तर तालुक्यातील जलप्रकल्प, कालवे आणि शेतजमिनींच्या नोंदी असलेले अत्यंत महत्त्वाचे शासकीय दप्तर, नकाशे व मोलाच्या फाईल्स भिजून कायमच्या नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेकदा कर्मचाऱ्यांना फाईल्स वाचवण्यासाठी प्लास्टिकचा वापर करावा लागत आहे.परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुळसुळाटया आवारात राहणारे कर्मचारी, अधिकारी आणि कामानिमित्त येणारे शेतकरी यांच्या जीवाला इमारतीसोबतच आणखी एका संकटाचा सामना करावा लागत आहे. परिसरामध्ये वाढलेल्या अस्ताव्यस्त झाडीझुडपांमुळे साप, विंचू व इतर सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. यामुळे कर्मचारी व त्यांच्या मुलांना नेहमीच भीतीचा सामना करावा लागत आहे.आमदार नारायण कुचे यांच्याकडून निधीची अपेक्षाबदनापूर तालुक्यातील सिंचन व्यवस्थापनाच्या आणि शेतकर्यांच्या दृष्टीने हे कार्यालय अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीने या जागेची पाहणी करावी, तसेच शासन पातळीवर ताकदीने पाठपुरावा करून या धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि येथे नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी विशेष निधी मंजूर करून आणावा, अशी आग्रही मागणी आता लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.2
- कन्नड पिशोर खांडित भीषण अपघात झाला असून दोन्ही गाडीचे चालक किनर गंभीर जखमी आहे. कन्नड :- पिशोर खांडित चंदन नाल्याजवळ दोन वाहनाचा समोरासमोर अपघात झाला असून चालक आणि किनर गंभीर जखमी झाले आहे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पण स्थानिक पोलीस प्रशासन/ वन विभाग तातडीने लक्ष घालून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.1
- सिंचन विहिरीसाठी ३० ते ४० हजार आणि घरकुलासाठी ५ ते १० हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप सिंचन विहिरीसाठी ३० ते ४० हजार आणि घरकुलासाठी ५ ते १० हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप; ग्रामसभेत लाभार्थ्यांना समोर आणल्याने उडाला खडाजंगी. आरडा तोलाजी ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या कारभारावरून ग्रामस्थ आक्रमक! प्रश्नांचा भडिमार... पोलिस बंदोबस्तात पार पडलेली ग्रामसभा अखेर तहकूब!1
- लाडक्या बहिणींचे भाजप नेत्यांसोबत विशेष रक्षाबंधन; नेत्यांच्या हातावर राख्यांनी सजली बंधुभावाची नाती छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या विभागीय कार्यालयात लाडक्या बहिणींसोबत विशेष रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंत्री अतुल सावे, आमदार सुहास शिरसाठ, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी आमदार संजय केनेकर आणि शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांना बहिणींनी राख्या बांधल्या. राखी बांधल्यानंतर नेत्यांनीही बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी भाजप कार्यालयातील नेत्यांच्या हातावर विविध रंगांच्या राख्यांनी गच्च भरल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळाले. या विशेष रक्षाबंधनाचा आढावा आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी घेतला.1
- वैजापूर-खंडाळा महामार्गावर भीषण अपघात! अपघातात तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून, घटनेची अधिक माहिती लवकरच...1