Shuru
Apke Nagar Ki App…
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा (भाले अंजन) शिवारात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका शेतातील विहिरीत एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून जळगाव जामोद हादरले आहे. मृतांमध्ये ३५ वर्षीय विजय मुसा किराडिया आणि त्यांच्या चार चिमुकल्या मुलांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादानंतर ही दुर्दैवी घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
RahimKhan Pathan
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा (भाले अंजन) शिवारात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका शेतातील विहिरीत एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून जळगाव जामोद हादरले आहे. मृतांमध्ये ३५ वर्षीय विजय मुसा किराडिया आणि त्यांच्या चार चिमुकल्या मुलांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादानंतर ही दुर्दैवी घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा (भाले अंजन) शिवारात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका शेतातील विहिरीत एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून जळगाव जामोद हादरले आहे. मृतांमध्ये ३५ वर्षीय विजय मुसा किराडिया आणि त्यांच्या चार चिमुकल्या मुलांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादानंतर ही दुर्दैवी घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रशासकीय मुजोरी आणि भ्रष्टाचाराचा धक्कादायक कळस समोर आला आहे. सह दुय्यम निबंधक (वर्ग २) संजय सोनाजी काळे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून, सत्ताधारी भाजपच्या नेत्यालाच प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरावे लागले आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य आणि अनुसूचित जाती मोर्चाचे राज्य सचिव अॅड. अशोक दादा तायडे यांनी आज, २५ मे २०२६ पासून पुणे येथील नवीन शासकीय इमारतीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. संजय काळे यांच्या कथित 'काळ्या' कारभाराविरोधात गेल्या दीड वर्षांपासून केवळ विरोधी पक्षच नव्हे, तर सत्ताधारी पक्षाचे नेते आणि समाजसेवकांनी पुराव्यांसह थेट मुख्यमंत्री, महसूल मंत्री, प्रधान सचिव आणि नोंदणी महानिरीक्षक (पुणे) यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. विशेष म्हणजे, माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्री महोदयांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले होते; मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या आदेशाला थेट 'केराची टोपली' दाखवली. वरिष्ठांच्या याच मूक संमतीमुळे आणि अधिकाऱ्याच्या उघड मुजोरीमुळे सिल्लोडसह संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. सर्वात गंभीर आरोप असा आहे की, संजय काळे यांनी ३० सप्टेंबर १९९९ रोजी स्वातंत्र्यसैनिकाचे 'बोगस' पाल्य असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरी मिळवली आणि २५ वर्षे पगार लाटला. उपोषणकर्त्या अॅड. अशोक दादा तायडे यांच्या प्रमुख दोन मागण्या आहेत: एक, भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले सह दुय्यम निबंधक संजय सोनाजी काळे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी; आणि दुसरे, स्वातंत्र्यसैनिकाचे 'बोगस' पाल्य प्रमाणपत्र वापरून शासनाची फसवणूक करत २५ वर्षे पगार लाटणाऱ्या या अधिकाऱ्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा (FIR) दाखल करण्यात यावा. "जर सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या तक्रारीची आणि स्वतः मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची किंमत शून्य असेल, तर सामान्य जनतेने न्याय कुठे मागायचा? संजय काळे यांच्यावर कारवाई न करण्यासाठी मंत्रालयातून नेमका कोणाचा 'वरदहस्त' लाभत आहे?" असा संतप्त सवाल तायडे यांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत भ्रष्टाचारी संजय काळे यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि त्यांना घरचा रस्ता दाखवला जात नाही, तोपर्यंत अन्नत्याग सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. यामुळे आता भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या उपोषणाकडे लागले आहे.1
- गाडेगव्हाण हे गाव दारू आणि गांजाच्या अवैध धंद्यांमुळे हादरले आहे. या वाढत्या अवैध धंद्यांमुळे गाडेगव्हाण हे 'नशेचे अड्डे' बनले आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.1
- भोकरदन पोलिसांनी विना नंबर प्लेट असलेल्या १२ दुचाकी जप्त करत मोठी कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत आणि पोलीस कर्मचारी योगेश गवळी यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.1
- साताऱ्यातील कोरेगाव-रहिमतपूर रोड परिसरात एका बोगस कॉल सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री मोठी कारवाई करत एका आंतरराज्यीय सायबर टोळीचा पर्दाफाश केला आहे. अमेरिकन नागरिकांना 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून लाखो डॉलरची फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपाखाली या धाडीत १७ आरोपींसह चार महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी अमेरिकन नागरिकांना फोन करून 'तुमच्या नावाने अमेझॉनवरून ऑर्डर करण्यात आली आहे' अशी खोटी माहिती देत असे. त्यानंतर बनावट मेसेज आणि बनावट ऑर्डर नंबर वापरून, त्यांना 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवली जात होती. याच भीतीचा फायदा घेत, गिफ्ट व्हाऊचरच्या माध्यमातून डॉलरमध्ये मोठी रक्कम उकळली जात होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि कोरेगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने रिलायबल अपार्टमेंटमध्ये सुरू असलेले हे बोगस कॉल सेंटर उघडकीस आणले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि राजस्थानमधील व्यक्तींचा समावेश आहे. सायबर फसवणुकीच्या वाढत्या जाळ्यावर सातारा पोलिसांनी दिलेला हा एक मोठा धक्का मानला जात असून, तपास सुरू असल्याने आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.1
- बकरी ईद निमित्ताने छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहर पोलीस प्रशासनाने गोवंशीय जनावरांची कुर्बानी न करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी शहर पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब यांनी शहरातील मुस्लिम धर्मगुरुंसोबत बैठक घेतली. या बैठकीत मुस्लिम धर्मगुरुंनी पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी गोवंशीय जनावरांची कुर्बानी होणार नाही असे आश्वासन दिले, तसेच मुस्लिम समाजाला गोवंशीय जनावरांची कुर्बानी न करण्याचे आवाहनही केले. या प्रयत्नात कोणी आढळल्यास, ती व्यक्ती स्वतः जबाबदार असेल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.1
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी न करण्याबाबत स्पष्ट शब्दांत आवाहन केले आहे. त्यांनी इशारा दिला की, जर पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी केली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.1
- बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा (भाले अंजन) शिवारात एका शेतातील विहिरीत पाच जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पत्नीला माहेरी पाठविल्यानंतर ३५ वर्षीय विजय मुसा किराडिया यांनी आपल्या चार लहान मुलांना विहिरीत ढकलून दिले आणि नंतर स्वतःही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. मृतांमध्ये विजय किराडिया (वय ३५ वर्षे), मुलगी प्रीत (वय ७ वर्षे), मुलगी प्राची (वय ५ वर्षे), मुलगी पूर्वी (वय ४ वर्षे) आणि मुलगा पीयूष (वय २ वर्षे) यांचा समावेश आहे. रविवारी (२४ मे) संध्याकाळी विजय किराडिया आणि त्यांच्या पत्नीमध्ये कौटुंबिक वाद झाला. या वादामुळे पत्नी मुलांना सोडून इस्लामपूर येथील माहेरी निघून गेली. पत्नी निघून गेल्याने विजय किराडिया यांच्यावर मानसिक ताण वाढला. सोमवारी (२५ मे) सकाळी मुलांना चहा पाजून, ते शेतातील विहिरीवर गेले. तिथे त्यांनी एकामागून एक आपल्या चारही मुलांना विहिरीत ढकलले. त्यानंतर स्वतः दोरीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला, पण दोरी तुटल्याने तेही विहिरीत पडले आणि पाण्यात बुडून सर्वांचा मृत्यू झाला. शेताच्या मालकाला विहिरीकाठी मोबाईल, चपला आणि तुटलेली दोरी दिसल्याने संशय आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिल्यावर हे धक्कादायक दृश्य समोर आले. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाचही मृतदेह बाहेर काढले आणि ते शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. जळगाव जामोद पोलीस स्टेशन (संपर्क: ०७२६६-२२१५३०) या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे राजुरा परिसरासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. ग्रामीण भागात कौटुंबिक कलह, मानसिक आरोग्य समस्या आणि आर्थिक तणावामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे या बातमीत नमूद केले आहे.1