Shuru
Apke Nagar Ki App…
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागरिकांना डिजिटल 2026-27 जनगणना आव्हान
YUVA JALNA NEWS
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागरिकांना डिजिटल 2026-27 जनगणना आव्हान
More news from महाराष्ट्र and nearby areas
- चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या! पुण्यात भीषण ट्रॅफिक जाम; नवले ब्रिजवर रास्ता रोको पुण्यातील नवले ब्रिज परिसरात ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुणे-सातारा-मुंबई महामार्गावर प्रचंड कोंडी निर्माण झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत ग्रामस्थांनी चार तासांपासून आंदोलन सुरू ठेवले असून, त्यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.1
- छत्रपती संभाजीनगर: * मुकुंदवाडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भरदिवसा झालेल्या किशोर हिवाळे याच्या खुनाचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. भररस्त्यात नंगा नाच घालणाऱ्या या गुंडांनी किशोरला कशा प्रकारे मृत्यूच्या दारात ढकलले, याची दृश्ये एका तरुणाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहेत. खून प्रकरणातील समोर आलेल्या व्हिडिओमध्ये धारधार चाकू हातात घेऊन वार करणारा आरोपी दत्ता रोकडे आणि त्याचे साथीदार किशोरला जमिनीवर पाडून निर्घृणपणे मारहाण करताना दिसत आहेत. भरबाजारात आरडाओरडा सुरू असतानाही आरोपींच्या चेहऱ्यावर कायद्याची कोणतीही भीती दिसत नव्हती. मयत किशोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतानाही हे नराधम त्याच्यावर सपासप वार करत होते. हा व्हिडिओ पाहून शहरात संतापाची लाट उसळली असून, गुन्हेगारांचे धाडस किती वाढले आहे याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे. किशोर रावसाहेब हिवाळे २५ असे मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे तर दत्ता रोकडे, शुभम रणशूर आणि कांतीलाल भुईगळ तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.1
- ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत न दिल्याने मंठा पंचायत समितीसमोर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी/सुरेश ज्ञा. दवणे जालना (मंठा ) मंठा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत वारंवार मागणी करूनही उपलब्ध करून दिल्या जात नसल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज, १ मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती मंठा कार्यालयासमोर तीव्र आंदोलनास सुरुवात करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले आहे. १३ एप्रिल व २४ एप्रिल २०२६ रोजी प्रशासनाला निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे की, काही ग्रामपंचायत अधिकारी मुख्यालयी वास्तव्यास नसतानाही ग्रामसभेचे ठराव लपवून किंवा खोटे सादर करून भाडेभत्ता घेत आहेत. हा प्रकार केवळ प्रशासकीय गैरव्यवहार नसून आर्थिक अनियमिततेचाही गंभीर मुद्दा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकारास पंचायत समिती स्तरावरून पाठीशी घातली जात असल्याचाही आरोप करण्यात आला. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ तसेच भारतीय संविधानातील कलम १९(१)(अ) नुसार नागरिकांना माहिती मिळविण्याचा अधिकार असतानाही संबंधित प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने हे आंदोलन उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले. संभाजी ब्रिगेडने प्रशासनाला अंतिम इशारा देत तात्काळ ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत उपलब्ध करून देणे, दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करणे आणि माहिती दडविणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आंदोलन शांततामय व लोकशाही मार्गाने सुरू असले तरी प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पंचायत समिती प्रशासनावर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.1
- छत्रपती संभाजी नगर शासकीय रुग्णालय( घाटी )या ठिकाणी एका वडिलांनी चार चिमुकल्या मुलांना सोडून पळ काढला आहे.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- घनसावंगी : तालुक्यातील मूर्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचा आकर्षक आविष्कार सादर केला. कार्यक्रमात देशभक्तीपर गीत, लोकगीते, नाटिका, पत्रवाचन तसेच चित्रपटावर आधारित नृत्य सादरीकरणांनी उपस्थितांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला लक्ष्मणराव वडले, कुंभार पिंपळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख खोडदे एस. जे., केंद्रीय मुख्याध्यापक गोतावळे सर, तंटामुक्ती अध्यक्ष बळीबाबा सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व तरुण मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक म्हणून एकूण ५१,५२१ रुपयांची देणगी जमा झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राजू तौर, सर्व शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. दत्ता मामा उढाण यांचे विशेष सहकार्य लाभले, तर रुपसंगम ब्युटीपार्लर, कुंभार पिंपळगावच्या अलका वामन यांनी मेकअपसाठी योगदान दिले. गावकऱ्यांच्या लोकसहभागातून सुमारे पाच लाख रुपयांचा निधी शाळेच्या विकासासाठी उभारण्यात आला असून, हे गावासाठी आदर्शवत पाऊल मानले जात आहे. आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता पहिलीत २६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मूर्ती ही शैक्षणिक संकुलाचे आदर्श उदाहरण ठरत असून, भविष्यात शाळेचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.1
- छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असताना एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एका दिव्यांग महिलेचे मडक्यांचे छोटेसे दुकान जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आले.आपल्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन उद्ध्वस्त झाल्याने ती महिला भावनिक होऊन फुटलेली मडकी गोळा करताना दिसत आहे.प्रशासनाने अतिक्रमण हटवून नियमांची अंमलबजावणी केली असली तरी या कारवाईमुळे महिलेची रोजीरोटी हिरावल्याने तिच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे..2
- ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत न दिल्याने मंठा पंचायत समितीसमोर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी/सुरेश ज्ञा. दवणे जालना (मंठा ) मंठा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत वारंवार मागणी करूनही उपलब्ध करून दिल्या जात नसल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज, १ मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती मंठा कार्यालयासमोर तीव्र आंदोलनास सुरुवात करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले आहे. १३ एप्रिल व २४ एप्रिल २०२६ रोजी प्रशासनाला निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे की, काही ग्रामपंचायत अधिकारी मुख्यालयी वास्तव्यास नसतानाही ग्रामसभेचे ठराव लपवून किंवा खोटे सादर करून भाडेभत्ता घेत आहेत. हा प्रकार केवळ प्रशासकीय गैरव्यवहार नसून आर्थिक अनियमिततेचाही गंभीर मुद्दा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकारास पंचायत समिती स्तरावरून पाठीशी घातली जात असल्याचाही आरोप करण्यात आला. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ तसेच भारतीय संविधानातील कलम १९(१)(अ) नुसार नागरिकांना माहिती मिळविण्याचा अधिकार असतानाही संबंधित प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने हे आंदोलन उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले. संभाजी ब्रिगेडने प्रशासनाला अंतिम इशारा देत तात्काळ ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत उपलब्ध करून देणे, दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करणे आणि माहिती दडविणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आंदोलन शांततामय व लोकशाही मार्गाने सुरू असले तरी प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पंचायत समिती प्रशासनावर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1