पेरकेवाड समाजाचे जिल्हाध्यक्ष गोविंदजी उल्लेवाड, जिल्हा उपाध्यक्ष राजेशजी सिंगणवाड व सचिव बालाजी सुबनवाड यांची अमरण उपोषणस्थळी भेट जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सुरू असलेल्या अमरण उपोषणाला आज पेरकेवाड समाजाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गोविंदजी उल्लेवाड, जिल्हा उपाध्यक्ष राजेशजी सिंगणवाड व सचिव बालाजी सुबनवाड सर यांनी भेट दिली. यावेळी गावातील पर्यायी रस्त्याचा प्रश्न व पुरामुळे गावकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. पावसाळ्यात शाळेत जाणारी मुले, शेतकरी, महिला, वृद्ध व्यक्ती तसेच सर्व गावकऱ्यांना होणारा त्रास दाखवण्यासाठी पुराचे व्हिडिओही त्यांना दाखवण्यात आले. या सर्व परिस्थितीची पाहणी करून गोविंदजी उल्लेवाड साहेबांनी त्यांच्या अनुभवातून मोलाचे मार्गदर्शन केले तसेच आंदोलनाला नैतिक पाठिंबा दर्शविला. यावेळी त्यांच्या भेटीबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. ✊ गावाच्या न्यायासाठी सुरू असलेला लढा कायम राहणार आहे.
पेरकेवाड समाजाचे जिल्हाध्यक्ष गोविंदजी उल्लेवाड, जिल्हा उपाध्यक्ष राजेशजी सिंगणवाड व सचिव बालाजी सुबनवाड यांची अमरण उपोषणस्थळी भेट जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सुरू असलेल्या अमरण उपोषणाला आज पेरकेवाड समाजाचे जिल्हाध्यक्ष
आदरणीय गोविंदजी उल्लेवाड, जिल्हा उपाध्यक्ष राजेशजी सिंगणवाड व सचिव बालाजी सुबनवाड सर यांनी भेट दिली. यावेळी गावातील पर्यायी रस्त्याचा प्रश्न व पुरामुळे गावकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत त्यांना सविस्तर माहिती
देण्यात आली. पावसाळ्यात शाळेत जाणारी मुले, शेतकरी, महिला, वृद्ध व्यक्ती तसेच सर्व गावकऱ्यांना होणारा त्रास दाखवण्यासाठी पुराचे व्हिडिओही त्यांना दाखवण्यात आले. या सर्व परिस्थितीची पाहणी करून गोविंदजी उल्लेवाड साहेबांनी
त्यांच्या अनुभवातून मोलाचे मार्गदर्शन केले तसेच आंदोलनाला नैतिक पाठिंबा दर्शविला. यावेळी त्यांच्या भेटीबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. ✊ गावाच्या न्यायासाठी सुरू असलेला लढा कायम राहणार आहे.
- नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भानेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सिंगणवाड यांचे अमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. ग्रामपंचायतमधील विविध प्रश्न व अनियमिततेबाबत सर्व पुरावे सादर करूनही जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. “मी गावचा लोकप्रतिनिधी असूनही मला न्याय मिळत नसेल, तर सामान्य माणसाने न्यायासाठी कोणाकडे दाद मागायची?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून न्याय द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.3
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- अवकाळी पावसाच्या धास्तीने हिमायतनगर शहर व तालुका परिसरात गहू काढणीला वेग आला आहे. 🌾 वातावरणात होत असलेल्या बदलामुळे आणि अवकाळी पावसाच्या धास्तीने शेतकरी घाईगडबडीत गहू काढणी करत आहेत. मजूर टंचाईमुळे अनेक ठिकाणी हार्वेस्टरच्या माध्यमातून काढणी केली जात असून प्रति एकर सुमारे २००० रुपये खर्च येत आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतांतील गहू आडवा पडल्याने उत्पादनात घट होत आहे. मेहनत आणि खर्च वाढूनही उतारा कमी येत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. #Himayatnagar #WheatHarvest #FarmersIssue #UnseasonalRain #MaharashtraFarmers AgricultureNews FarmerProblems HarvestSeason 🌾1
- ⚡ उपोषणाचा तिसरा दिवस… आणि मन हेलावून टाकणारा प्रसंग आज माझ्या उपोषण स्थळी एक ६५ वर्षांच्या आजी भेटायला आल्या. महावितरणकडून होत असलेल्या त्रासामुळे त्या अक्षरशः डोळ्यात पाणी आणून रडू लागल्या. सामान्य गोरगरीब नागरिकांना वीज बिल, कनेक्शन व इतर समस्यांमुळे किती हाल सहन करावे लागत आहेत, याचे हे जिवंत उदाहरण आहे. एमएसईबी महावितरणच्या प्रांगणातच एका वृद्ध मायेला अश्रू ढाळावे लागतात, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. जोपर्यंत गोरगरीब वीज ग्राहकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार. #Mahavitaran #Himayatnagar #Uposhan #ElectricityIssues #CommonPeople #JusticeForConsumers #NandedNews #MaharashtraNews #PublicVoice ⚡1
- Post by Nanded_71
- # जिओ टावर बंद#नागरिकांची गैरसोय#news#kinwatnews#nandednews#1
- Post by गंगाधर जक्कुलवार1
- हिमायतनगर शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील नाली बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी बांधलेल्या नालीला भगदाड पडल्याने ठेकेदाराकडून होत असलेल्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश झाला आहे. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून संबंधित ठेकेदाराने भगदाडावर मटेरियल टाकून घाईघाईत थातूरमातूर दुरुस्ती केल्याचा आरोप व्यापारी व नागरिकांनी केला आहे. स्थानिकांच्या मते, नाली बांधल्यानंतर मजबुतीसाठी नियमित पाणी टाकण्याची प्रक्रिया होत नसल्याने अनेक ठिकाणी तडे गेले असून तीन-चार ठिकाणी भगदाड पडले आहे. तसेच नालीवर टाकण्यात येणारे झाकणही फक्त दोन ते अडीच इंच जाडीचे असल्याने भविष्यात पहिल्याच पावसात नाली कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन दर्जेदार काम करून घ्यावे, अशी मागणी व्यापारी व नागरिकांनी केली आहे. अन्यथा भविष्यात जनआक्रोश निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. #Himayatnagar #NandedNews #HighwayWork #PoorConstruction #PublicIssue #MaharashtraNews #DevelopmentWork #CitizenVoice 🚧1