Shuru
Apke Nagar Ki App…
मुखेडचे पत्रकार महेताब शेख यांचे दोन्ही सुपुत्र टाईपिंग परिक्षेत यशवंत झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. मुखेडचे पत्रकार महेताब भाई शेख यांचे चिरंजीव इरफान शेख व इमरान शेख या दोघांनी टायपिंगच्या परीक्षेत थर्टी (३०) आणि फोर्टी (४०) या विषयात चांगल्या गुणांसह उत्तीर्ण होऊन नेत्रदीपक यश संपादन केल्याबद्दल मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दैनिक जनतापत्र वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद कांबळे, राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे जिल्हा सरचिटणीस तथा व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष शेख बबलू मुल्ला, मोईन कंधारी, इलियास कादरी, कोहिनूर हॉटेलचे युसूफभाई शेख, पुणेरी गुळाचा चहा हॉटेलचे शिवराम शेल्लार यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होते.
Milind Manohar Kamble
मुखेडचे पत्रकार महेताब शेख यांचे दोन्ही सुपुत्र टाईपिंग परिक्षेत यशवंत झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. मुखेडचे पत्रकार महेताब भाई शेख यांचे चिरंजीव इरफान शेख व इमरान शेख या दोघांनी टायपिंगच्या परीक्षेत थर्टी (३०) आणि फोर्टी (४०) या विषयात चांगल्या गुणांसह उत्तीर्ण होऊन नेत्रदीपक यश संपादन केल्याबद्दल मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दैनिक जनतापत्र वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद कांबळे, राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे जिल्हा सरचिटणीस तथा व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष शेख बबलू मुल्ला, मोईन कंधारी, इलियास कादरी, कोहिनूर हॉटेलचे युसूफभाई शेख, पुणेरी गुळाचा चहा हॉटेलचे शिवराम शेल्लार यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होते.
More news from Maharashtra and nearby areas
- “ST आरक्षणाची अंमलबजावणीसाठी - मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे आक्रमक" “ST आरक्षणाची अंमलबजावणीसाठी - मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे आक्रमक"1
- आकाशात चंद्र-चांदणीचा दुर्मिळ योग; मनमोहक दृश्याने वेधले लक्ष आकाश निरीक्षकांसाठी सोमवारी एक अनोखी पर्वणी ठरली. आकाशात चंद्राच्या कोरीसोबत तेजस्वी चांदणीचे मनोहारी दर्शन घडल्याने नागरिकांचे लक्ष या खगोलीय दृश्याकडे वेधले गेले. पावसाळ्यानंतर स्वच्छ होत चाललेल्या आकाशात चंद्राची कोर आणि जवळ चमकणारी चांदणी यांचे दृश्य अत्यंत आकर्षक दिसत होते. अनेकांनी हे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपत सोशल मीडियावर शेअर केले. खगोल अभ्यासकांच्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात आकाश निरीक्षणासाठी अनेक विशेष घटना घडत आहेत. १४ सप्टेंबर रोजी चंद्र, शुक्र आणि बुध यांच्या कोरीसदृश दृश्याचे दर्शन होणे ही विशेष खगोलीय घटना ठरली. सायंकाळच्या आकाशात चंद्राच्या आसपास दिसणारी तेजस्वी चांदणी पाहण्यासाठी नागरिकांनी काही काळ आकाशाकडे नजर लावली. निसर्गाचे हे सुंदर रूप पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. खगोलीय घटनांबाबत वाढते कुतूहल अशा दुर्मीळ खगोलीय घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि खगोलप्रेमींमध्ये आकाश निरीक्षणाची उत्सुकता वाढत आहे. दुर्बीण नसतानाही काही घटना स्वच्छ आकाशात साध्या डोळ्यांनी पाहता येतात, त्यामुळे या घटनांकडे नागरिकांचे विशेष आकर्षण असते.1
- लातूरच्या लाडक्या बहिणी लागल्या तयारीला.. #चलो_मुंबई..1
- मुलींच्या शिक्षणाचे ध्येय बाळगत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या 47 वर्षीय महिलेचा तहसिलदारांच्या हस्ते सत्कार मुलींच्या शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगून साडी परिधान करून, अनवानी पायी चालत जाऊन आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी संघर्ष करत कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील रमाबाई अशोक रणवीर या 47 वर्षीय महिलेने अंबाजोगाई येथेअमृत दौड़ मॅरेथॉन स्पर्धा जिंकून भल्या भल्या प्रशिक्षित मुलीना लाजवेल अशी मोलाची कामगिरी केली आहे.या पार्श्वभूमीवर कळमनुरीचे तहसीलदार यांनी सोमवारी रमाबाई च्या घरी भेट देऊन सत्कार करून अभिनंदन केले . रमाबाई रणवीर हया अत्यंत गरिब कुटुंबातील महिला आहे .मोलमजुरी करून ती आपली उपजीविका धकवत असते, तिला दोन मुलीच आहेत .याच मजुरीच्या पैशातून ती आपल्या दोन मुलींचे शिक्षण पूर्ण करीत आहे .2012 मध्येच नवऱ्याने साथ सोडली,तेव्हा पासून त्या एकट्या पडल्या आहेत . हालाखीची कठीण परिस्थिती असताना ही तिने आपल्या एका मुलीला नांदेडला शिक्षणाला, तर दुसऱ्या मुलीला अंबाजोगाई येथे एका अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेण्याकरता ठेवले आहे .त्याच अकॅडमी मध्ये त्या स्वयंपाक करण्याचे काम करित होत्या .त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याकरता भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संस्थेच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन मोठ्या कौशल्याने स्पर्धा जिंकली .या पार्श्वभूमीवर कळमनुरी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी पोत्रा या ठिकाणी येऊन रमाबाई रणवीरचा सत्कार करून अभिनंदन केले आहे .त्यावेळी रमाबाईला घरकुल, शौचालय,या सह सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन तहसीलदार कांबळे यांनी दिले आहे.याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी शिवशंकर गुट्टे, पोलीस पाटील अनुराधा मारकोळे, रवी कांबळे,रघूनाथ पाटील, जिजाराम मुलगीर, श्रीकांत मुलगीर,वैभव मुलगीर, रघूनाथ गुहाडे, शामराव रायपुरे, गजानन राणगिरे, विक्रम रणवीर, सोपान रणवीर, डॉ. कैलास रणवीर ,शिवाजी मुलगीर, डॉ. मिलींद रणवीर यांच्या सह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती .1
- मुंबई ते मराठवाड्याचे अंतर आणखी कमी होणार ; कल्याण ते लातूर अवघ्या चार तासात पोहोचणाऱ्या तब्बल 442 किलोमीटरच्या "जनकल्याण एक्सप्रेस वेला" राज्य शासनाची मंजुरी मुंबई ते मराठवाड्याचे अंतर आणखी कमी होणार ; कल्याण ते लातूर अवघ्या चार तासात पोहोचणाऱ्या तब्बल 442 किलोमीटरच्या "जनकल्याण एक्सप्रेस वेला" राज्य शासनाची मंजुरी सोनपेठ (दर्शन) :- तब्बल 35000 कोटी रुपयांचा खर्च सहा पदरी ग्रीन फील एक्सप्रेस वे आणि माळशिरस घाटात तब्बल आठ किलोमीटरचा भव्य असा बोगदा मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे कल्याण परिसराला मराठवाड्याची जोडणाऱ्या कल्याण ते लातूर जनकल्याण एक्सप्रेस वेला राज्य सरकारची मंजुरी दिलेली आहे सध्या लातूर ते कल्याण प्रवासासाठी 12 तास वेळ लागतो तू वेळ हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर चार तासाचा होणार आहे.1
- परळी येथील बौद्ध विहारात विविध कार्यक्रमाचे आयोजन ; नागरिकांचा मोठा प्रतिसाद1
- ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार; 17 सप्टेंबरला परभणीत महामोर्चा - भारत आव्हाड ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार; 17 सप्टेंबरला परभणीत महामोर्चा - भारत आव्हाड1
- महिना उलटला पाऊस नाही, विहिर बोरवेलला पुरेसे पाणी असूनही शेतातील वीज गुल,खरीप पिके धोक्यात,शेतकऱ्याचा टाहो हिंगोली जिल्ह्यात विशेषता कळमनुरी तालुक्यात एका महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके हातची गेली आहेत,तूर ,कापूस, सोयाबीन,हळद ही पिके पाऊस नसल्याने धोक्यात आली आहे.एकंदरीत तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे.महिनाभरापासून पाऊस नाही विहिरी बोरला पुरेशी पाणी असताना देखील शेतातील वीज वारंवार गुण होत आहे त्यामुळे मुबलक पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही,अशी परिस्थिती शेतकऱ्यावर येऊन ठेपली आहे कळमनुरी तालुक्यातील सांडस परीसरात शेतकऱ्यांनी या समस्या बद्दल एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे .या भागात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने येथील पिकाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे .1
- भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय द्या! राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा सुचविण्याचे आवाहन. भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय द्या! राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा सुचविण्याचे आवाहन. सोनपेठ (दर्शन) :- छत्रपती संभाजीनगर विभागातील विद्यार्थी, परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी आपले सूचना, शिफारशी, हरकती व अभिप्राय द्यावेत. दि.१८ सप्टेंबर २०२६ ⏰ सकाळी १० ते सायंकाळी ६ 📍 आठही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांत विशेष कक्ष 🏛️ २१ सप्टेंबर २०२६ | सकाळी १०.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात उच्चस्तरीय समिती नागरिक व संबंधित घटकांशी थेट चर्चा करणार. 📧 प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसल्यास लेखी अभिप्राय पाठवा आपला अभिप्राय — अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह भरती परीक्षेकडे एक महत्त्वाचे पाऊल!1