कसाऱ्यात चोरांचा धुमाकूळ; चक्क स्मशानभूमीतील लोखंड लंपास, आकाश वाघ यांचा आंदोलनाचा इशारा! कसारा: एकीकडे कसारा गावच्या विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे स्मशानभूमीसारख्या पवित्र जागेचीही सुरक्षा रामभरोसे असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. अज्ञात चोरट्यांनी स्मशानभूमीतील अंत्यविधीच्या बेडचे लोखंडी अँगल आणि चॅनेल कटरने कापून चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे कसारा परिसरात मोठी खळबळ उडाली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशाखाप्रमुख आकाश धोंडीराम वाघ यांनी आज आक्रमक पवित्रा घेत स्मशानभूमीची पाहणी केली. प्रशासनाच्या 'मेलेल्या' संवेदना: स्मशानभूमीचे लोखंड चोरीला गेल्यामुळे आता गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाच उरलेली नाही. चॅनेल कापल्यामुळे सांगाडा कमकुवत झाला असून त्यावर मृतदेह ठेवणे धोक्याचे झाले आहे. "प्रशासनाला वारंवार सांगूनही स्मशानभूमीला संरक्षक भिंत आणि गेट का बसवले जात नाही?" असा संतप्त सवाल आकाश वाघ यांनी उपस्थित केला आहे. आकाश वाघ यांचा निर्वाणीचा इशारा: आज कसारा ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी निवेदन देऊन आकाश वाघ यांनी ठणकावून सांगितले की, "मृताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या या चोरांचा बंदोबस्त करा आणि दोन दिवसांच्या आत नवीन लोखंडी अँगल बसवून स्मशानभूमीची सोय पूर्ववत करा." केवळ दुरुस्ती करून शिवसेना थांबणार नाही, तर जोपर्यंत स्मशानभूमीला कायमस्वरूपी संरक्षक भिंत आणि मजबूत गेट बसवले जात नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर कसारा ग्रामपंचायतीच्या उंबरठ्यावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही उपशाखाप्रमुख आकाश वाघ यांनी दिला आहे.
कसाऱ्यात चोरांचा धुमाकूळ; चक्क स्मशानभूमीतील लोखंड लंपास, आकाश वाघ यांचा आंदोलनाचा इशारा! कसारा: एकीकडे कसारा गावच्या विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे स्मशानभूमीसारख्या पवित्र जागेचीही सुरक्षा रामभरोसे असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. अज्ञात चोरट्यांनी स्मशानभूमीतील अंत्यविधीच्या बेडचे लोखंडी अँगल आणि चॅनेल कटरने कापून चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे कसारा परिसरात मोठी खळबळ उडाली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशाखाप्रमुख आकाश धोंडीराम वाघ यांनी आज आक्रमक पवित्रा घेत स्मशानभूमीची पाहणी केली. प्रशासनाच्या 'मेलेल्या' संवेदना: स्मशानभूमीचे लोखंड चोरीला गेल्यामुळे आता गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाच उरलेली नाही. चॅनेल कापल्यामुळे सांगाडा कमकुवत झाला असून त्यावर मृतदेह ठेवणे धोक्याचे झाले आहे. "प्रशासनाला वारंवार
सांगूनही स्मशानभूमीला संरक्षक भिंत आणि गेट का बसवले जात नाही?" असा संतप्त सवाल आकाश वाघ यांनी उपस्थित केला आहे. आकाश वाघ यांचा निर्वाणीचा इशारा: आज कसारा ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी निवेदन देऊन आकाश वाघ यांनी ठणकावून सांगितले की, "मृताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या या चोरांचा बंदोबस्त करा आणि दोन दिवसांच्या आत नवीन लोखंडी अँगल बसवून स्मशानभूमीची सोय पूर्ववत करा." केवळ दुरुस्ती करून शिवसेना थांबणार नाही, तर जोपर्यंत स्मशानभूमीला कायमस्वरूपी संरक्षक भिंत आणि मजबूत गेट बसवले जात नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर कसारा ग्रामपंचायतीच्या उंबरठ्यावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही उपशाखाप्रमुख आकाश वाघ यांनी दिला आहे.
- Post by ग्रीस1
- बोधगयाच्या समर्थनामध्ये चंद्रशेखर आझाद पोहोचले जसं त्यांना नेता आला बौद्ध भिकूंचा नकार न देता मंचावर हाजीर झाले प्रत्येक लढ्याला साथ देणारा नेता चंद्रशेखर आझाद तुमचं काय मत आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा ज्याच्या त्याच्या धर्माचा इस्मारक त्याला भेटला पाहिजे का नाही1
- aam Aadmi party Mubarak ansari kalwa East Bhaskar Nagar Devi kripa chal3
- AP राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के चर्चित नेता नजीब मुल्ला ने हॉकर्स के लिए उठाई आवाज1
- डॉक्टर बाबासाहेब राष्ट्रपरिवहन्त पक्ष राष्ट्राध्यक्ष दत्तू नर्सिंग गायक समुद्र साहेब पत्रकार किशोर सोनवणे4
- सोशल मीडिया पर इन दिनों एक वीडियो तेजी से वायरल हो रहा है, जिसमें दिख रहा है कि रील बनाने के चक्कर में कुछ लड़के चलती गाड़ियों के दरवाजे अचानक खोल रहे हैं। हालांकि ये वीडियो पुराने बताए जा रहे हैं, लेकिन अब दोबारा वायरल हो रहे हैं। वीडियो सामने आने के बाद लोग इसमें शामिल युवकों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग कर रहे हैं। #ViralVideo #RoadSafety #DangerousStunt #SocialMedia1
- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत आयोजित होणाऱ्या आणि यांच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी सविस्तर संवाद साधला. यावेळी त्यांनी हवामान बदल, शाश्वत विकास आणि जागतिक आर्थिक सहकार्याच्या दृष्टीने मुंबई व महाराष्ट्राची भूमिका स्पष्ट केली.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नाही, तर भविष्यातील हरित आणि शाश्वत विकासाचे आघाडीचे शहर म्हणून ओळख निर्माण करत आहे. मुंबई क्लायमेट वीकमुळे पर्यावरणपूरक धोरणे, हरित गुंतवणूक, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीचे उपाय आणि आधुनिक तंत्रज्ञानावर जागतिक पातळीवर चर्चा होणार आहे.तसेच ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन 2026 कॉन्फरन्समुळे भारतासह विविध देशांतील उद्योग, गुंतवणूकदार, धोरणकर्ते एकत्र येणार असून व्यापार,गुंतवणूक, रोजगारनिर्मिती,तांत्रिक सहकार्याला मोठी चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.या परिषदेमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आकर्षित होईल आणि स्टार्टअप्स, उद्योग व युवकांसाठी नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्य सरकार हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक मोबिलिटी, स्मार्ट सिटी प्रकल्प, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आणि कार्बन न्यूट्रल धोरणांवर विशेष भर देत आहे.या दोन्ही आंतरराष्ट्रीय उपक्रमांमुळे मुंबईसह महाराष्ट्राची प्रतिमा जागतिक व्यासपीठावर अधिक भक्कम होईल. माध्यमांशी संवादाच्या शेवटी त्यांनी उद्योगजगत, पर्यावरण तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि तरुणांना या परिषदांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक प्रगती यांचा समतोल साधणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले.1
- चंद्रशेखर आजाद ने पिढी तो को मिलकर तपशील की आखिर क्या हुआ चंद्रशेखर आजाद हर ऊस पीडित समाज से मिलने तुरंत पोहच जाते है क्या आपको लगता है चंद्रशेखर आजाद उत्तर प्रदेश मे सबसे अच्छा काम कर रहे है क्या इनके जैसे और संसदो की जरूरत है जो दुखद समज सकते है1