दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्तानंतर बीड शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला. बीड येथे शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांच्या कार्यालयासमोर जमलेल्या मोठ्या संख्येतील शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या आनंदोत्सवाच्या वेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने झालेल्या आंदोलनामुळे आणि त्यांच्या एकजुटीमुळेच सरकारला हा निर्णय घ्यावा लागल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली. या वेळी बोलताना उल्हास गिराम यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. देशभरातील विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनाचा हा विजय असून विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांचा सन्मान झाला आहे. तसेच पुढील काळातही विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शांततेत आणि उत्साहात पार पडला.
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्तानंतर बीड शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला. बीड येथे शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांच्या कार्यालयासमोर जमलेल्या मोठ्या संख्येतील शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा
दर्शवला. या आनंदोत्सवाच्या वेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने झालेल्या आंदोलनामुळे आणि त्यांच्या एकजुटीमुळेच सरकारला हा निर्णय घ्यावा लागल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली. या वेळी बोलताना उल्हास गिराम यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार
नाही. देशभरातील विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनाचा हा विजय असून विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांचा सन्मान झाला आहे. तसेच पुढील काळातही विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शांततेत आणि उत्साहात पार पडला.
- दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्तानंतर बीड शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला. बीड येथे शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांच्या कार्यालयासमोर जमलेल्या मोठ्या संख्येतील शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या आनंदोत्सवाच्या वेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने झालेल्या आंदोलनामुळे आणि त्यांच्या एकजुटीमुळेच सरकारला हा निर्णय घ्यावा लागल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली. या वेळी बोलताना उल्हास गिराम यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. देशभरातील विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनाचा हा विजय असून विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांचा सन्मान झाला आहे. तसेच पुढील काळातही विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शांततेत आणि उत्साहात पार पडला.3
- परभणी जिल्ह्यातील पाथरी तहसील कार्यालयावर दादा राव गवारे यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा काढण्यात आला.1
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस आणि लोकनेत्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री मा. ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी परळी तालुक्याच्या वतीने २२ ते २६ जुलै दरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून २५/०७/२०२६ रोजी कन्हैया वारकरी शिक्षण संस्था, परळी वैजनाथ येथे वारकरी बांधवांना खिचडी वाटप करण्यात आले. या प्रसंगी आषाढी एकादशीनिमित्त निघालेल्या दिंडीत मान्यवरांनी सहभाग नोंदवत विठू नामाचा गजर केला. या कार्यक्रमाला परळी तालुका भाजपा अध्यक्ष राजेश गित्ते, कन्हैया वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक ह. भ. प. गोविंद महाराज मुंडे, भाजपा कोषाध्यक्ष भुराज बदने, भाजपा सचिव अनिल गुट्टे, कासारवाडीचे माजी सरपंच दशरथ (दादा) गुट्टे तसेच दैनिक परळी बातमीदारचे संपादक महादेव गित्ते यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. आयोजित या सर्व सामाजिक उपक्रमांचा समारोप 'आज एक पेड पंकजाताई के नाम...' या अभियानांतर्गत वृक्षारोपण करून होणार आहे.4
- जालना शहरातील वाल्मीक नगर परिसरात लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून सुरू झालेल्या वादाने भीषण वळण घेतले. या रक्तरंजित संघर्षात १८ वर्षीय अहमद रियाज सय्यद या युवकाचा बळी गेला आहे. या हत्याप्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत सात आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे. ही घटना रविवारी, १९ तारखेला दुपारच्या सुमारास घडली होती. या प्रकरणात एकूण आठ जणांविरुद्ध खुनासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या आणि पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींमध्ये तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांचाही समावेश आहे. शनिवारी, २५ तारखेला दुपारी १२ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत असून फरार आरोपीचा शोध घेत आहेत.1
- शिरूर कासार येथील पीएम श्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त एका अनोख्या उपक्रमांतर्गत भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. या दरम्यान ज्ञानोबा-तुकोबाच्या जयघोषाने आणि गजराने संपूर्ण शिरूर कासार शहर दुमदुमून गेले.1