Shuru
Apke Nagar Ki App…
Mushraf Tadvi
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Mushraf Tadvi1
- धक्कादायक CCTV LIVE! नाशिकच्या एमव्हीपी मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट अपघात; महिला कर्मचाऱ्याची मान अडकून गंभीर जखमी बातमी (Seeza News स्टाईल): नाशिक शहरातील आडगाव परिसरातील एमव्हीपी मेडिकल कॉलेजमध्ये एक अतिशय धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. रुग्णालयातील लिफ्टशी संबंधित अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये महिला कर्मचाऱ्याची मान लिफ्टमध्ये अडकताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात घडली. सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या सुमारे 50 वर्षीय महिलेने लिफ्टमध्ये वस्तू ठेवत असताना अचानक लिफ्ट खाली आली आणि तिची मान त्यात अडकली. या भीषण अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. महिलेच्या मुलाने घटनास्थळी धाव घेत आक्रोश केला, ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, काही अहवालांनुसार ही प्रवासी लिफ्ट नसून उपकरणे नेण्यासाठी वापरली जाणारी लिफ्ट (डम्बवेटर/हॉईस्ट) असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.1
- सिल्लोड शहरातील भराडी पेट्रोल पंप येथून दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली आहे सदरील घटनेत प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी चोरीच्या घटनेची नोंद घेतली असून पोलीस घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे1
- Post by Swal Jansamannyaca ...1
- Post by Labour addaa.1
- Post by अरबाज शेख. सावरगावकर1
- *धुळे :* जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) च्या मनमानी कारभारावर कडक ताशेरे ओढत ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विनाकारण आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ग्राहकाचे मीटर बदलल्याप्रकरणी कंपनीला 'सेवेतील त्रुटी' (Deficiency in Service) धरत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारदार रुपेश मराठे यांनी ॲड.महेश मराठे यांच्यामार्फत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दि.२५ मे २०२५ रोजी ग्राहकाच्या अनुपस्थितीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता, जुन्या मीटरचे अंतिम रीडिंग न घेता आणि महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नियमावलीचे पालन न करता त्यांचे वापरात असलेले वीज मीटर बदलले होते. याबाबत त्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही महावितरणकडून समाधानकारक खुलासा न मिळाल्याने त्यांनी ग्राहक आयोगाचे दार ठोठावले होते. आयोगाने याप्रकरणी महावितरणला नोटीस बजावली होती, मात्र कंपनीतर्फे कोणीही हजर न राहिल्याने हे प्रकरण एकतर्फा चालवून निकाली काढण्यात आले. आयोगाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे की, मीटर बदलताना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे आणि महावितरणने कोणतीही स्पष्टीकरण न देता किंवा कायदेशीर तरतुदी पाळल्याशिवाय केलेली ही कृती सेवा त्रुटी दर्शवते. या प्रकरणी आयोगाने तक्रारदार यांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी एकूण आठ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश महावितरणला दिला आहे, ज्यामध्ये तीन हजार रुपये आर्थिक त्रासापोटी, तीन हजार रुपये शारीरिक व मानसिक त्रासापोटी आणि दोन हजार रुपये तक्रार अर्जाच्या खर्चापोटी आहेत. ४५ दिवसांच्या आत ही रक्कम न दिल्यास, त्यावर सहा टक्के वार्षिक व्याजासह रक्कम देण्याची जबाबदारी महावितरणवर सोपवण्यात आली आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना तक्रारदार यांचे वकील ॲड. महेश मराठे म्हणाले की, हा निकाल सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक मोठा विजय आहे. महावितरण कंपनीने ग्राहकांना विश्वासात न घेता किंवा नियमांची पायमल्ली करून मनमानी कारभार करणे चुकीचे आहे आणि हा निकाल अशा प्रकारच्या मनमानी कारभाराला चाप लावणारा आहे. दरम्यान, धुळ्यातील ज्या नागरिकांचे वीज मीटर महावितरणने अशाच प्रकारे परस्पर बदलले आहेत किंवा ज्यांना या प्रकारच्या मनमानीचा फटका बसला आहे, त्यांनी घाबरून न जाता ॲड. महेश मराठे यांच्याशी संपर्क साधावा आणि कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.1
- Post by Mushraf Tadvi1