धामणा बु येथील पठार नदीला १५ वर्षांनंतर महापूर; पुलावरून पाणी, १२ ते १५ गावांचा संपर्क तुटला पर्यायी पूल व पोलीस बंदोबस्ताची तातडीची मागणी; जीव धोक्यात घालून नागरिकांची वाहतूक सुरू प्रतिनिधी अकोला सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धामणा बु येथील पठार नदीला तब्बल १५ वर्षांनंतर प्रथमच एवढा मोठा महापूर आला आहे. नदीवरील पुलावरून मोठ्या वेगाने पाणी वाहत असल्याने चोहोट्टा बाजार–करतवाडी–रेल–धामणा बु–गरसोळी–पातोंडा या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून परिसरातील सुमारे १२ ते १५ गावांचा परस्पर संपर्क तुटला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महापुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून अनेक शेतांचे तळ्यात रूपांतर झाले आहे. सोयाबीन, कापूस व इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, पुलावरून पाणी वाहत असतानाही काही नागरिक दुचाकी व चारचाकी वाहनांसह जीव धोक्यात घालून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एखादा अपघात किंवा जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते पूर्णाजी खोडके यांनी प्रशासनाकडे तातडीची मागणी केली आहे. पुलावरून पाणी वाहत असताना त्या ठिकाणी त्वरित पोलीस बंदोबस्त तैनात करून धोकादायक मार्ग पूर्णपणे बंद करण्यात यावा. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यायी रस्ता किंवा तात्पुरत्या पुलाची व्यवस्था करण्यात यावी आणि पूरस्थिती सामान्य होईपर्यंत प्रशासनाने सातत्याने देखरेख ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली. पूर्णाजी खोडके यांनी नागरिकांनाही आवाहन करताना सांगितले की, "स्वतःचा जीव धोक्यात घालून पुलावरून किंवा पुराच्या पाण्यातून जाण्याचा कोणताही प्रयत्न करू नका. असे आवाहन खोडके यांनी केले आहे.. पूरस्थिती अद्याप गंभीर असून प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना न केल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित निर्णय घेऊन आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी आता जोर धरत आहे...
धामणा बु येथील पठार नदीला १५ वर्षांनंतर महापूर; पुलावरून पाणी, १२ ते १५ गावांचा संपर्क तुटला पर्यायी पूल व पोलीस बंदोबस्ताची तातडीची मागणी; जीव धोक्यात घालून नागरिकांची वाहतूक सुरू प्रतिनिधी अकोला सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धामणा बु येथील पठार नदीला तब्बल १५ वर्षांनंतर प्रथमच एवढा मोठा महापूर आला आहे. नदीवरील पुलावरून मोठ्या वेगाने पाणी वाहत असल्याने चोहोट्टा बाजार–करतवाडी–रेल–धामणा बु–गरसोळी–पातोंडा या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून परिसरातील सुमारे १२ ते १५ गावांचा परस्पर संपर्क
तुटला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महापुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून अनेक शेतांचे तळ्यात रूपांतर झाले आहे. सोयाबीन, कापूस व इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, पुलावरून पाणी वाहत असतानाही काही नागरिक दुचाकी व चारचाकी वाहनांसह जीव धोक्यात घालून
पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एखादा अपघात किंवा जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते पूर्णाजी खोडके यांनी प्रशासनाकडे तातडीची मागणी केली आहे. पुलावरून पाणी वाहत असताना त्या ठिकाणी त्वरित पोलीस बंदोबस्त तैनात करून धोकादायक मार्ग पूर्णपणे बंद करण्यात यावा. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यायी रस्ता किंवा तात्पुरत्या
पुलाची व्यवस्था करण्यात यावी आणि पूरस्थिती सामान्य होईपर्यंत प्रशासनाने सातत्याने देखरेख ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली. पूर्णाजी खोडके यांनी नागरिकांनाही आवाहन करताना सांगितले की, "स्वतःचा जीव धोक्यात घालून पुलावरून किंवा पुराच्या पाण्यातून जाण्याचा कोणताही प्रयत्न करू नका. असे आवाहन खोडके यांनी केले आहे.. पूरस्थिती अद्याप गंभीर असून प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना न केल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित निर्णय घेऊन आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी आता जोर धरत आहे...
- बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।1
- मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे: खामगाव नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांचे आवाहन खामगाव : शहर व परिसर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील १२ ते २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खामगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आपण सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पूर किंवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपरिषद व स्थानिक प्रशासन तयार आहे. कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावरील किंवा इतर असत्य अफवांवर विश्वास ठेवू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नदी, नाले, तलाव तसेच पाणी साचलेल्या भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधावा."आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हीच आपली प्रथम प्राधान्यता आहे. सर्वांनी सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करावे व सुरक्षित राहावे," असे आवाहन सौ. अपर्णा फुंडकर यांनी केले आहे.1
- प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा आषाढी एकादशीला रमला सोहळा प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा आषाढी एकादशीला रमला सोहळा अकोट तालुका प्रतिनिधी..... अकोट तालुक्यातील आदर्श ग्राम सावरा येथील प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा येथे आषाढी एकादशीच्या दिवशी मुले मुली विठु मावली च्या गजरात वारकरी च्या गणवेशात टाळ मृदुंगात रमली विशेषता पालकांनी या सोहळ्या करीता चिमुकल्यांना छान प्रकारे तयारी करून उत्साह व्यक्त केला. या सर्व मुलांचा उत्साह महिला व पुरुष पालक यांनी पण घेतला. सर्व सहभागी मुलांना 15 ऑगष्ट 26 रोजी विशेष कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे या प्रसंगी शिक्षक वृंद सौ पुजा म्हसाये कोमल धांडे धांडे मॅडम वैशाली धांडे अक्षय निबाळकर शिवनाथ डोंगरे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमा करीता प्रज्ञेश इंग्लिश स्कूल च्या प्राचार्या सौ स्वातीताई राऊत यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी सावरा मंचनपुर देऊळगाव रंभापुर आसेगांव बाजार येथील पालकांनी सहकार्य केले.1
- धामणा बु येथील पठार नदीला १५ वर्षांनंतर महापूर; पुलावरून पाणी, १२ ते १५ गावांचा संपर्क तुटला पर्यायी पूल व पोलीस बंदोबस्ताची तातडीची मागणी; जीव धोक्यात घालून नागरिकांची वाहतूक सुरू प्रतिनिधी अकोला सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धामणा बु येथील पठार नदीला तब्बल १५ वर्षांनंतर प्रथमच एवढा मोठा महापूर आला आहे. नदीवरील पुलावरून मोठ्या वेगाने पाणी वाहत असल्याने चोहोट्टा बाजार–करतवाडी–रेल–धामणा बु–गरसोळी–पातोंडा या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून परिसरातील सुमारे १२ ते १५ गावांचा परस्पर संपर्क तुटला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महापुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून अनेक शेतांचे तळ्यात रूपांतर झाले आहे. सोयाबीन, कापूस व इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, पुलावरून पाणी वाहत असतानाही काही नागरिक दुचाकी व चारचाकी वाहनांसह जीव धोक्यात घालून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एखादा अपघात किंवा जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते पूर्णाजी खोडके यांनी प्रशासनाकडे तातडीची मागणी केली आहे. पुलावरून पाणी वाहत असताना त्या ठिकाणी त्वरित पोलीस बंदोबस्त तैनात करून धोकादायक मार्ग पूर्णपणे बंद करण्यात यावा. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यायी रस्ता किंवा तात्पुरत्या पुलाची व्यवस्था करण्यात यावी आणि पूरस्थिती सामान्य होईपर्यंत प्रशासनाने सातत्याने देखरेख ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली. पूर्णाजी खोडके यांनी नागरिकांनाही आवाहन करताना सांगितले की, "स्वतःचा जीव धोक्यात घालून पुलावरून किंवा पुराच्या पाण्यातून जाण्याचा कोणताही प्रयत्न करू नका. असे आवाहन खोडके यांनी केले आहे.. पूरस्थिती अद्याप गंभीर असून प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना न केल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित निर्णय घेऊन आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी आता जोर धरत आहे...4