भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिवळे गावात मोफत आरोग्य शिबिर संपन्न ग्रामीण व आदिवासी नागरिकांना मोफत तपासणी, औषध वितरण व आरोग्य जनजागृतीचा लाभ **दिवळे (भोर) प्रतिनिधी:** Dr. Babasaheb Ambedkar यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दिवळे गाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. इस्क्रा फाउंडेशन, सिद्धार्थ तरुण मित्र मंडळ आणि डी. एम. अव्युक्त सोशल वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात सुमारे २०० नागरिकांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी १२० नागरिकांची विविध आजारांवर तपासणी व उपचार करण्यात आले. रक्तदाब (बीपी) व रक्तातील साखर (शुगर) तपासणीसह आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. शिबिरासाठी पोलीस पाटील प्रसाद पांगारे यांनी आवश्यक परवानगी देत सहकार्य केले. तसेच दत्तात्रय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली औषधांसाठी आर्थिक मदत करण्यात आली. सावी फार्मा व सर्वेश्वर मेडिकल यांनीही औषधांच्या स्वरूपात योगदान दिले, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष हरिश्चंद्र देसले यांनी दिली. या शिबिरात डॉ. अजित कांबळे, डॉ. मायादेवी कांबळे, रेखा बाठे (आशा वर्कर) आणि अमृता गाडे (परिचर) यांनी वैद्यकीय सेवा दिली. शिबिरात आरोग्य जनजागृतीलाही प्राधान्य देण्यात आले. महिलांना आरोग्य, पोषण व मासिक पाळी स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले, तर मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच ORS तयार करण्याची पद्धत व पाणी शुद्धीकरणाविषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोशल मीडिया प्रमुख अर्पिता पिळणकर यांनी प्रभावी प्रचार-प्रसार केला. तसेच सिद्धार्थ तरुण मंडळातील कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत सहकार्य केले. ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत स्तुत्य ठरला. भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा संकल्प इस्क्रा फाउंडेशनचे संस्थापक चेतन कांबळे यांनी व्यक्त केला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिवळे गावात मोफत आरोग्य शिबिर संपन्न ग्रामीण व आदिवासी नागरिकांना मोफत तपासणी, औषध वितरण व आरोग्य जनजागृतीचा लाभ **दिवळे (भोर) प्रतिनिधी:** Dr. Babasaheb Ambedkar यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दिवळे गाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. इस्क्रा फाउंडेशन, सिद्धार्थ तरुण मित्र मंडळ आणि डी. एम. अव्युक्त सोशल वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात सुमारे २०० नागरिकांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी १२० नागरिकांची विविध आजारांवर तपासणी व उपचार करण्यात आले. रक्तदाब (बीपी) व रक्तातील साखर (शुगर) तपासणीसह आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. शिबिरासाठी पोलीस पाटील प्रसाद पांगारे यांनी आवश्यक परवानगी देत सहकार्य केले. तसेच दत्तात्रय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली औषधांसाठी आर्थिक मदत करण्यात आली. सावी
फार्मा व सर्वेश्वर मेडिकल यांनीही औषधांच्या स्वरूपात योगदान दिले, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष हरिश्चंद्र देसले यांनी दिली. या शिबिरात डॉ. अजित कांबळे, डॉ. मायादेवी कांबळे, रेखा बाठे (आशा वर्कर) आणि अमृता गाडे (परिचर) यांनी वैद्यकीय सेवा दिली. शिबिरात आरोग्य जनजागृतीलाही प्राधान्य देण्यात आले. महिलांना आरोग्य, पोषण व मासिक पाळी स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले, तर मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच ORS तयार करण्याची पद्धत व पाणी शुद्धीकरणाविषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोशल मीडिया प्रमुख अर्पिता पिळणकर यांनी प्रभावी प्रचार-प्रसार केला. तसेच सिद्धार्थ तरुण मंडळातील कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत सहकार्य केले. ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत स्तुत्य ठरला. भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा संकल्प इस्क्रा फाउंडेशनचे संस्थापक चेतन कांबळे यांनी व्यक्त केला.
- पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने चिखली येथील आदित्य लॉजवर छापा टाकून एका मोठ्या देहविक्रय व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे... या कारवाईत ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यात एका बांगलादेशी तरुणीचा समावेश आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार, चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील आदित्य लॉजवर ही धाड टाकण्यात आली. या ठिकाणी लॉजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सुटका करण्यात आलेल्या ९ महिलांपैकी एका तरुणीला आरोपींनी बांगलादेशातून तस्करी करून आणले होते. तिला पुन्हा मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी लॉज मॅनेजर अशोक बाबुराव बाबर आणि कामगार अकिबुल खालेक मुल्ला या दोघांना अटक केली आहे. तसेच लॉज चालक सुदर्शन पवार, जागा मालक नाना बोराटे आणि साहिल ऊर्फ शाहीन मंडल यांच्याविरुद्ध चिखली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे... #चिखली #पिंपरीचिंचवड #पोलीसकारवाई #देहविक्रयप्रकरण #मानवीतस्करी #रेस्क्यूऑपरेशन #महिलांचीसुटका #गुन्हेगारी #क्राईमन्यूज #पोलिसछापा #बांगलादेशीपीडित #आदित्यलॉज #Chikhali #PimpriChinchwad #PoliceRaid #SexRacketBusted #HumanTrafficking #RescueOperation #CrimeNews #WomenRescued #BangladeshiVictim #IllegalActivities #LodgeRaid #AdityaLodge1
- कात्रज कोंढावा रोड परिसर शत्रुंजय मंदिरा समोर बी जे पार्क बिल्डिंग च्या समोर चा रस्ता. 10 वर्ष झाली रस्ता असाच आहे. कोणी दखल घेत नाही. त्यामुळे दुकानाच्या धंद्यावर मोठया प्रमाणावर फरक पडला आहे. तरी हे काम लवकरात लवकर करावे ही विनंती.3
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- आम्ही कोंढवावासिय भारतीय नागरिक नाहीत का? मूलभूत सुविधांच्या अभावी कोंढवा प्रभाग १९ च्या नागरिकांचा पुणे महानगरपालिका आणि नवनियुक्त लोकप्रतिनिधींवर रोष..! @highlight #kondhwa #all1
- पिंपरी चिंचवड वाकड, तपास पथकाची कामगिरी ४८ तासांत चेन स्नॅचर जेरबंद; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त.1
- विक्रम शिंदे /भोर दि.16 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती भोर तालुका (एक तालुका, एक जयंती) यांच्या वतीने विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यामध्ये सामुहिक बुद्धवंदना, भव्य मिरवणूक/शोभारथ, व्याख्यान, अभिवादन सभा, आरोग्य शिबिर(निमा), पथनाट्य (अं.नि.स संघटना), आंबेडकरी जलसा (भोर तालुका सिंगर ग्रुप), भोजन इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला स्वराज्य निर्माण करून दिले, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्या स्वराज्याला संविधानाच्या माध्यमातून टिकविले, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. भोर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिका साठी 2.50 कोटी मंजूर केले आहेत.. अभिवादन सभेवेळी दिवंगत नेते अजित दादा पवार यांनी आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून निधी मंजूर केल्याचे रणजितदादा शिवतरे, नगराध्यक्ष नाना आवारे, गटनेते केदार देशपांडे यांनी जाहीर केले. या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष रणजीत दादा शिवतरे, जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रमदादा खुटवड, प्रविणशेठ जगदाळे, नगराध्यक्ष रामचंद्र नाना आवारे, सभापती मनिषाताई कंक, उपसभापती विशाल बंटी कोंडे, गटनेते केदार देशपांडे, उपविभागीय अधिकारी डॉ.विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, मुख्याधिकारी गजानन शिंदे, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार, पंचायत समिती सदस्य राजेश बोडके, नगरसेवक कुणाल धुमाळ, अनिल भेलके, वन अधिकारी संतोष कंक, अध्यक्ष भोर शहर संदिप शेटे, विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत पडवळ, ओबीसी अध्यक्ष मारूती गोरे, डॉ.अरूण बुरांडे, डॉ.इम्रान खान, डॉ.राजेश धिवार, नेहा डोंबे, परवेझ शेख, सोमनाथ ढवळे, बाळासाहेब खुटवड, बाळा शेटे, गौतम शेलार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. भोर तालुक्यातील अविनाश गायकवाड, राजन घोडेस्वार, गणेश साळुंके, अरूण रणखांबे, अक्षय गायकवाड, रणजीत रणखांबे, मयूर गायकवाड, नितीन माने, निलेश घोडेस्वार, सतीश गायकवाड, संतोष जाधव, सिद्धोधन कांबळे, प्रकाश ओव्हाळ, स्वप्निल सावंत, विशाल शाक्य, महेंद्र सपकाळ, सुनील गायकवाड श्रीकांत जाधव, अमोल भालेराव, विकास सपकाळ, दिपक गायकवाड, अनिल गायकवाड, युवराज शेलार, अंकुश साळुंके इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. प्रास्ताविक मयूर गायकवाड यांनी, सूत्रसंचालन राजन घोडेस्वार, तर आभार अविनाश गायकवाड यांनी मानले. 🙏1
- शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम 24}: श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील प्रीतम प्रकाश नगर परिसरात भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक काढण्यात आली. “स्वामी समर्थ महाराज की जय”च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. प्रीतम प्रकाश नगरमधील विविध रस्त्यांवरून पालखी मिरवणूक पार पडली. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरासह संपूर्ण भाग आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. भक्तांच्या उपस्थितीमुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मिरवणुकीनंतर आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध गायक श्रीहरी विठ्ठल मेहंदरकर यांनी सादर केलेल्या भक्तीगीतांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले. यावेळी सादर झालेल्या भजन व भक्तीगीतांनी आध्यात्मिक अनुभूती दिली. कार्यक्रमाची सुरुवात “खेळ मांडियेला” या अभंगाने होत “रूपे सुंदर”, “ॐ ओंकार प्रधान” आणि “ग सारेगमप” यांसारख्या सादरीकरणांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. त्यानंतर “रचिला ऋषीमुनींनी”, “विठू माऊली” व “सेवा धर्मी पुण्य आहे” या गीतांनी श्रद्धेची उंची वाढवली, तर “धाव पाव स्वामी” आणि “हरी म्हणा” या गजरांनी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला. पुढे “मन लागो रे”, “स्वामी समर्था सदगुरु समर्था”, “कानडा राजा पंढरीचा” आणि “वृंदावनी वेणु” या सादरीकरणांनी कार्यक्रम रंगत गेला. “शाम तेरी बंसी” व “धरिला ला पंढरीचा चोर” यानंतर “माझी रेणुका माऊली” आणि “सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा” ही गीते सादर करण्यात आली “घागर घेऊन”, “भवरा भवरा” व “अबीर गुलाल” “तीर्थ विठ्ठल”, “अवघे गर्जे पंढरपूर” या गीतांनी वातावरण अधिकच भारावले . कार्यक्रमाची सांगता “निघालो घेऊन दत्ताची पालखी” या भक्तिगीताने होत उपस्थित भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव देत सोहळ्याचा समारोप करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, शिरूर यांच्या वतीने करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष योगेश वाळकीकर, उपाध्यक्ष अॅड. नारायण पवार, सचिव दीपक वर्मा, खजिनदार गणेश घाडगे यांच्यासह संपत लोखंडे, प्रमोद पवार, विष्णू वेताळ, मंगला बागमार, भूषण कडेकर, चंद्रकांत निघोजकर आदी पदाधिकारी आहेत. दरम्यान, संस्थेच्या वतीने प्रीतम प्रकाश नगर येथे स्वामी समर्थ मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून येथे नियमित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. तसेच गरजूंना वॉकर, वॉटर बेड आदी वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याचे सामाजिक कार्यही सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष योगेश वाळकीकर व श्यामसुंदर चिखलीकर यांनी दिली. गरजूंनी या बाबत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे3
- पिंपरी चिंचवड :- आकुर्डी येथील कै. फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत आरटीई RTE प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र पडताळणी प्रक्रियेदरम्यान प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शेकडो पालक आपल्या मुलांसह शाळेत जमा झाले असताना, कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता निघून गेल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे... आरटीई प्रवेशासाठी १५ ते २२ एप्रिल हा कालावधी अत्यंत मर्यादित आहे. या अल्प मुदतीत कागदपत्रे पडताळणे आवश्यक असताना, शाळेतील कर्मचारी पालकांना उन्हात ताटकळत ठेवून अचानक निघून गेले. यामुळे संतापलेल्या पालकांनी विचारणा केली की, जर वेळेत पडताळणी झाली नाही आणि मुलांचे वर्ष वाया गेले, तर याला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण विभागाने आकुर्डीतील गैरसोयीची माहिती मिळताच जादा कर्मचारी पाठवले असून प्रक्रिया सुरळीत पार पडेल याची काळजी घेतली जात आहे. दरम्यान मुदत संपण्यापूर्वी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित व्हावा, यासाठी पालकांची धावपळ सुरू असून प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची मागणी होत आहे... #आकुर्डी #पिंपरीचिंचवड #आरटीईप्रवेश #शिक्षणविभाग #पालकांचा_संताप #प्रशासनाचा_गोंधळ #उन्हातहाल #शाळाप्रवेश #विद्यार्थीप्रश्न #RTEगोंधळ #Akurdi #PimpriChinchwad #RTEAdmission #EducationDepartment #ParentsProtest #AdministrativeFailure #SchoolAdmission #StudentIssues #RTEProcess #BreakingNews1