Shuru
Apke Nagar Ki App…
उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी त्यांच्या बारामती दौऱ्यादरम्यान निरा येथे आयोजित श्री संत शिरोमणी सावता महाराज वारकरी सप्ताह सोहळ्यास उपस्थिती लावली. याप्रसंगी त्यांनी वारकरी सप्ताहाच्या ठिकाणी लोकनेते दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. या सोहळ्याला मोठ्या संख्येने वारकरी बांधव, नागरिक तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित वारकरी बांधवांशी संवाद साधताना सुनेत्रावहिनी यांनी दिवंगत अजितदादांच्या जनसेवेच्या कार्याची आठवण करून दिली. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले, की *“मानवता हाच धर्म व मानव सेवा हीच ईश्वरसेवा, याच विचारांवरती दादांनी जनसेवेचा वसा अखंडपणे अविरत सुरू ठेवला होता.”*
EXPRESS NEWS
उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी त्यांच्या बारामती दौऱ्यादरम्यान निरा येथे आयोजित श्री संत शिरोमणी सावता महाराज वारकरी सप्ताह सोहळ्यास उपस्थिती लावली. याप्रसंगी त्यांनी वारकरी सप्ताहाच्या ठिकाणी लोकनेते दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. या सोहळ्याला मोठ्या संख्येने वारकरी बांधव, नागरिक तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित वारकरी बांधवांशी संवाद साधताना सुनेत्रावहिनी यांनी दिवंगत अजितदादांच्या जनसेवेच्या कार्याची आठवण करून दिली. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले, की *“मानवता हाच धर्म व मानव सेवा हीच ईश्वरसेवा, याच विचारांवरती दादांनी जनसेवेचा वसा अखंडपणे अविरत सुरू ठेवला होता.”*
More news from Sangli and nearby areas
- उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी त्यांच्या बारामती दौऱ्यादरम्यान निरा येथे आयोजित श्री संत शिरोमणी सावता महाराज वारकरी सप्ताह सोहळ्यास उपस्थिती लावली. याप्रसंगी त्यांनी वारकरी सप्ताहाच्या ठिकाणी लोकनेते दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. या सोहळ्याला मोठ्या संख्येने वारकरी बांधव, नागरिक तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित वारकरी बांधवांशी संवाद साधताना सुनेत्रावहिनी यांनी दिवंगत अजितदादांच्या जनसेवेच्या कार्याची आठवण करून दिली. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले, की *“मानवता हाच धर्म व मानव सेवा हीच ईश्वरसेवा, याच विचारांवरती दादांनी जनसेवेचा वसा अखंडपणे अविरत सुरू ठेवला होता.”*3
- पंढरपूरजवळील करकंब येथे शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यात आला आहे. स्थानिक शेतकरी आणि एका समितीने या महामार्गास आपला विरोध दर्शवला आहे.1
- पंचगंगा आरती भक्त मंडळातर्फे पंचगंगा नदीची अविरतपणे आरती केली जात आहे. हे मंडळ पंचगंगा नदीची आरती सातत्याने करत आहे.1
- AIMIM Party चे नेते वारिस पठाण म्हणाले की मुसलमान किसी1
- गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने हैराण झालेल्या दापोली आणि परिसरातील नागरिकांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. आज सकाळनंतर हवामानात अचानक बदल होऊन दापोलीत ढगांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पहिल्याच दमदार पावसामुळे संपूर्ण परिसरात गारवा पसरला असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सकाळपर्यंत कडक ऊन आणि हवेत प्रचंड दमटपणा जाणवत होता. मात्र, सकाळनंतर आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले आणि पाहता पाहता सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. वारा इतका मोठा होता की काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली. दापोली शहरासह पंचक्रोशीतील गावांमध्येही या पावसाने चांगलीच बॅटिंग केली असल्याचे बोलले जात आहे.1
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती दौऱ्यावर असताना नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याच दरम्यान, पंढरपूरहून आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकांनी वहिनींसाठी एक अनोखी भेट आणत आपले प्रेम व्यक्त केले. सुनेत्रा वहिनींनीही अत्यंत आपुलकीने ही भेट स्वीकारली आणि नागरिकांच्या अडचणी समजून घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्या समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना दिल्या. उपस्थित नागरिकांनी वहिनींच्या संवेदनशील आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीचे कौतुक केले.1
- आजच्या जनता दरबारात दोन चिमुकल्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमोर आपली आई हरवल्याची व्यथा मांडली. लहानग्यांची ही कैफियत ऐकताच सुनेत्रावहिनींनी त्यांना तात्काळ जवळ घेत धीर दिला. त्यानंतर त्यांनी पोलीस यंत्रणेला या मुलांच्या आईचा तात्काळ शोध घेण्याच्या सूचना दिल्या. या प्रसंगातून सत्तेपेक्षा संवेदनशीलता मोठी असते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला, जिथे त्यांना मायेचा हात आणि आधाराची साथ मिळाली.1
- मोदींना थेट आव्हान देण्याच्या बाबतीत काँग्रेस पक्ष शरद पवारांपेक्षा अधिक पसंत केला जात आहे. हे सांगण्यात आले आहे की काँग्रेस मोदींना समोरासमोर आव्हान देत आहे, तर शरद पवार मात्र असे करत नाहीत. देशाच्या गाव पातळीपासून ते लोकसभेपर्यंत आणि मुंबईपर्यंत काँग्रेस पक्ष मोदींना सातत्याने शह देत आहे, परंतु शरद पवारांकडून असा थेट सामना होताना दिसत नाही.1