खेर्डी ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी; शिवरायांना अभिवादन प्रतिनिधी – दापोली निर्मल व तंटामुक्त ग्रामपंचायत खेर्डी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मा. सरपंच अनिल जाधव आणि ग्रामसेविका अमिता नेरसेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. मा. उपसरपंच गुरुदास सवणसकर आणि मा. चेअरमन शशिकांत पवार यांनी धुपप्रज्वलन करून अभिवादन केले. तसेच मा. उपसरपंच शरद तांबे आणि युवामंच सचिव सुजित कदम यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी मा. सरपंच मिलिंदी यादव, शालेय समिती अध्यक्ष शांताराम गायकर, अंगणवाडी सेविका अपर्णा जाधव, कर्मचारी राजाराम शिंदे, संतोष कोळंबे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिक्रिया : यावेळी मा. सरपंच अनिल जाधव म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून जनतेला स्वाभिमान दिला. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन गावाच्या विकासासाठी आणि समाजातील एकता टिकवण्यासाठी आपण सर्वांनी कार्य केले पाहिजे.” ग्रामसेविका अमिता नेरसेकर यांनी सांगितले की, “शिवरायांचे कार्य आणि त्यांची प्रेरणा आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला.” या कार्यक्रमामुळे ग्रामपंचायत परिसरात देशभक्तीचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले
खेर्डी ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी; शिवरायांना अभिवादन प्रतिनिधी – दापोली निर्मल व तंटामुक्त ग्रामपंचायत खेर्डी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मा. सरपंच अनिल जाधव आणि ग्रामसेविका अमिता नेरसेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. मा. उपसरपंच गुरुदास सवणसकर आणि मा. चेअरमन शशिकांत पवार यांनी धुपप्रज्वलन करून अभिवादन केले. तसेच मा. उपसरपंच शरद तांबे आणि युवामंच सचिव सुजित कदम यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी मा. सरपंच मिलिंदी यादव, शालेय समिती अध्यक्ष शांताराम गायकर, अंगणवाडी सेविका अपर्णा जाधव, कर्मचारी राजाराम शिंदे, संतोष कोळंबे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिक्रिया : यावेळी मा. सरपंच अनिल जाधव म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून जनतेला स्वाभिमान दिला. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन गावाच्या विकासासाठी आणि समाजातील एकता टिकवण्यासाठी आपण सर्वांनी कार्य केले पाहिजे.” ग्रामसेविका अमिता नेरसेकर यांनी सांगितले की, “शिवरायांचे कार्य आणि त्यांची प्रेरणा आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला.” या कार्यक्रमामुळे ग्रामपंचायत परिसरात देशभक्तीचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले
- हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज, योगीराज, श्रीमान योगी, स्वराज्याधिपती, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्मदिनानिमित्त त्रिवार मानाचा कोटी कोटी मुजरा. शिवजयंती निमित्त सर्वांना भगव्या शुभेच्छा.....1
- विक्रम शिंदे /भोर दि.19 भोर शहरासह तालुक्यात शिवजयंतीची लगबग सुरू असून भोर आणि परिसरातील गड किल्ल्यावरून शिवज्योत आणणे ,गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी तरुणाई सहभाग घेत असल्याचे चित्र आहे.सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून अवघा परिसर शिवमय झाला आहे.1
- 🚩 *शिवरायांचे स्वप्नदर्शन; समाजजागृतीसाठी कार्य करण्याची महाराजांची प्रेरणा* 🚩 १९ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. या दिवशी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम, न्याय आणि लोककल्याणाचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवराय हे केवळ एक राजा नव्हते, तर ते जनतेचे रक्षणकर्ते, स्त्रीसन्मानाचे पुरस्कर्ते आणि स्वाभिमानाची जाज्वल्य ज्योत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना करून जगाला दाखवून दिले की ध्येय, धैर्य आणि योग्य विचार यांच्या बळावर अशक्यही शक्य होते. त्यांनी नेहमीच धर्मनिरपेक्षता, न्याय आणि लोकहित यांना सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या राज्यकारभारात सामान्य माणूस केंद्रस्थानी होता. महाराजांचे महानत्व केवळ इतिहासापुरते मर्यादित नाही. त्यांच्या विचारांची प्रेरणा आजही अनेकांच्या जीवनाला दिशा देते. माझ्या आयुष्यातही महाराजांचे स्थान अत्यंत विशेष आहे. अनेकदा स्वप्नामध्ये मला छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होते. त्या स्वप्नांमध्ये महाराज मला मार्गदर्शन करतात, समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देतात आणि “समाजाचा उद्धार कर, लोकांमध्ये जागृती निर्माण कर” असा संदेश देतात. महाराज स्वप्नामध्ये सांगतात की स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नसून लोकांच्या मनात स्वाभिमान जागवणे होय. समाजामध्ये एकता, न्याय, स्त्रीसन्मान आणि मानवतेचे मूल्य पसरवण्याचे उपदेश ते देतात. त्यांच्या आशीर्वादातून समाजसेवेची ऊर्जा आणि धैर्य मिळते. महाराजांचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचवणे हीच खरी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. आजच्या काळात शिवरायांचे विचार अधिक महत्त्वाचे ठरतात. अन्यायाविरुद्ध उभे राहणे, दुर्बलांच्या पाठीशी उभे राहणे आणि समाजहिताला प्राधान्य देणे — हाच खरा शिवमार्ग आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त भूतकाळ नाही, तर तो वर्तमान आणि भविष्य घडवणारी प्रेरणा आहे. १९ फेब्रुवारी या पावन दिवशी आपण सर्वांनी शिवरायांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प करूया. स्वराज्याची भावना आपल्या कृतीतून जिवंत ठेवूया. 🙏 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम व मानाचा मुजरा! 🚩 #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवजयंती #शिवराय #हिंदवीस्वराज्य #शिवप्रेरणा #समाजजागृती #महाराष्ट्रअभिमान #जयशिवराय #१९फेब्रुवारी #शिवविचार1
- घोटावडे वरून मुठा आणि पुढे पानशेत रोड ओसाडे असा रिंग रोड वरदाडे गाव आणि पुढे सिंहगड घेरा जवळून कल्याण2
- पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर झिवजयंती उत्सवाची कशी तयारी सुरू आहेत्यासोबतच शिवनेरी महोत्सवात वेगवेगळे रांगडे खेळ यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेशञ करण्यात आला आहे ासनाने याकरिता भरीव असा निधी दिलेला आहे एकूणच शिवभक्तांचा उत्साह यामुळे वाढलेला दिसून येत आहे राज्यभरामधून लाखो शिवभक्त हे शिवजयंतीसाठी उपस्थित राहण्याची डाक्यता आहे यासंदर्भात जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी माहिती दिली आहे1
- Post by Prasad Panchal1
- साडीतील नृत्याने सोशल मीडियावर धूम अरुणिमा देवांसीस ठरल्या वायरल डान्स टीचर1
- विक्रम शिंदे /भोर दि.19 शहरातील निवासी मूकबधिर विद्यालय आणि प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडल्याचे मुख्याध्यापक शरद जाधव , विनया कुलकर्णी यांनी सांगितले.यावेळी भोर एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थांनी सादर केलेल्या विविध कलांना पालकांनी दाद दिली तर संस्थेने विद्यार्थी तसेच पालकांचे कौतुक आणि अभिनंदन केले1