*श्री गुरुदेव सेवाश्रम, उत्तमसरा येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात* शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन गौरव; नवविवाहित वधूंना ग्रामगीता भेट आयकॉन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भातकुली:- श्री गुरुदेव सेवाश्रम, उत्तमसरा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उत्तमसरा येथील इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. नामदेवरावजी गव्हाळे महाराज होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य सौ. वैशालीताई पवार (चांदूर रेल्वे), राष्ट्रसंत साहित्य अभ्यासक सौ. चंद्रकांताताई मते, आजीवन प्रचारक विजयरावजी बोके (अंजनगाव सुर्जी), मुख्य सेवाधिकारी सुनीलभाऊ देशमुख (जिल्हा वाशिम),संस्थेचे अध्यक्ष गुनूसिंग मालवे,डाॅ.सवाई तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उत्तमसरा येथील सहशिक्षक गजानन येलोने उपस्थित होते. संतांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सौ. विद्याताई मालधुरे यांच्या वतीने उत्तमसरा गावातील नवविवाहित वधूंना मान्यवरांच्या हस्ते ग्रामगीता ग्रंथ भेट देण्यात आला. तसेच सौ. विद्याताई मालधुरे, नवविवाहित वधू आणि सौ. लताताई विनायकराव सवाई यांनी मनोगत व्यक्त केले. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उत्तमसरा येथील इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प, ग्रामगीता ग्रंथ, कंपास पेटी व अन्य शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांकडून माता-पिता व गुरु पूजनाचा भावपूर्ण कार्यक्रम पार पडला. यावर्षी शाळेचे एकूण १३ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले. त्यामध्ये कु. देवांशी अमोल पवार, कु. वेदिका अरविंद मोहोड, कु. वंशिका गणेश मानकर, कु. परी राजरत्न मेश्राम, कु. प्राची अमोल वासनिक, सोहम बंडू थोटे, प्रथमेश रविंद्र गवई, जय श्रीकृष्ण मुंदाणे, विनीत मोहन मांगे, शिवम नरेश सावरकर, सोहम संतोष कांबळे, रूपम सतीश पिंगे तसेच अन्य एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक राजेश सावरकर व प्रमोद कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापिका श्रीमती मिनाक्षी इंगळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वंदना सवाई व सौ. साक्षी पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. सुलोचना दहिकर यांनी मानले. कार्यक्रमाला श्री गुरुदेव सेवाश्रमचे सचिव गोपाळरावजी झाडे, सेवाश्रमाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ======================
*श्री गुरुदेव सेवाश्रम, उत्तमसरा येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात* शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन गौरव; नवविवाहित वधूंना ग्रामगीता भेट आयकॉन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भातकुली:- श्री गुरुदेव सेवाश्रम, उत्तमसरा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उत्तमसरा येथील इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. नामदेवरावजी गव्हाळे महाराज होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य सौ. वैशालीताई पवार (चांदूर रेल्वे), राष्ट्रसंत साहित्य अभ्यासक सौ. चंद्रकांताताई मते, आजीवन प्रचारक विजयरावजी बोके (अंजनगाव सुर्जी), मुख्य सेवाधिकारी सुनीलभाऊ देशमुख (जिल्हा वाशिम),संस्थेचे अध्यक्ष गुनूसिंग मालवे,डाॅ.सवाई तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उत्तमसरा येथील सहशिक्षक गजानन येलोने उपस्थित होते. संतांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सौ. विद्याताई मालधुरे यांच्या वतीने उत्तमसरा गावातील नवविवाहित वधूंना मान्यवरांच्या हस्ते ग्रामगीता ग्रंथ भेट देण्यात आला. तसेच सौ. विद्याताई मालधुरे, नवविवाहित वधू आणि सौ. लताताई विनायकराव सवाई यांनी मनोगत व्यक्त केले. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उत्तमसरा येथील इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प, ग्रामगीता ग्रंथ, कंपास पेटी व अन्य शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांकडून माता-पिता व गुरु पूजनाचा भावपूर्ण कार्यक्रम पार पडला. यावर्षी शाळेचे एकूण १३ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले. त्यामध्ये कु. देवांशी अमोल पवार, कु. वेदिका अरविंद मोहोड, कु. वंशिका गणेश मानकर, कु. परी राजरत्न मेश्राम, कु. प्राची अमोल वासनिक, सोहम बंडू थोटे, प्रथमेश रविंद्र गवई, जय श्रीकृष्ण मुंदाणे, विनीत मोहन मांगे, शिवम नरेश सावरकर, सोहम संतोष कांबळे, रूपम सतीश पिंगे तसेच अन्य एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक राजेश सावरकर व प्रमोद कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापिका श्रीमती मिनाक्षी इंगळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वंदना सवाई व सौ. साक्षी पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. सुलोचना दहिकर यांनी मानले. कार्यक्रमाला श्री गुरुदेव सेवाश्रमचे सचिव गोपाळरावजी झाडे, सेवाश्रमाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ======================
- सिल्लोड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर.. प्रेस नोट *सिल्लोड येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न* *११ हजार ५०० हून अधिक लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ* *प्रशासनाने जनतेच्या विश्वासाचे केंद्र बनावे; शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा – आमदार अब्दुल सत्तार* सिल्लोड (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' सिल्लोड शहरातील डोंगरगाव फाटा येथील स्वस्तिक लॉन्स येथे उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. या शिबिरात महसूल, ग्रामविकास, कृषी, एकात्मिक बाल विकास, वन विभाग, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, नगर परिषद आदी विविध विभागांच्या योजनांअंतर्गत सुमारे ११ हजार ५०० हून अधिक लाभार्थ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्य शासन हे सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेले लोककल्याणकारी सरकार असल्याचे सांगितले. ग्रामसभा व विविध उपक्रमांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. महसूल प्रशासन हे केवळ कागदपत्रांची पूर्तता करणारे कार्यालय नसून जनतेच्या विश्वासाचे केंद्र आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने संवेदनशीलता, पारदर्शकता आणि तत्परता या तत्त्वांवर काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख प्रशासनाचा उल्लेख करताना सांगितले की, महाराजांनी रयतेला केंद्रस्थानी ठेवून प्रशासनाची उभारणी केली. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व दुर्बल घटकांच्या हिताला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याच विचारांवर राज्य शासन कार्यरत असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून विविध विकासात्मक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मनापासून पुढाकार घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचारामुळे शासनाची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. दिव्यांग, आदिवासी, शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे तसेच सर्व वंचित घटकांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे. नागरिकांशी सुसंवाद ठेवून त्यांचे समाधान होईल अशा पद्धतीने प्रशासनाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. ------------- प्रलंबित पीक विमा दाव्यांच्या संदर्भात बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी पीक विमा हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अधिकार असून तो मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे सांगितले. येत्या विधिमंडळ अधिवेशनात या विषयावर शासनाकडे पाठपुरावा करून प्रश्न उपस्थित केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ------------ यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध लोकहिताचे निर्णय घेतले जात असल्याचा उल्लेख केला. तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांना विनम्र अभिवादन केले. ---------- नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आपल्या भाषणात सिल्लोड शहरातील बेघर नागरिकांसाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून म्हाडा योजनेंतर्गत पाच हजार घरांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती देत नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी प्रास्ताविकात 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांचा तसेच निकाली काढलेल्या प्रकरणांचा आढावा सादर केला. तहसीलदार अंकिता ताकभाते (सिल्लोड) व तहसीलदार मनीषा मेने (सोयगाव) यांनी महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देत नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी ग्रामविकास विभागाच्या योजनांची माहिती देत पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करून योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार अब्दुल सत्तार व मान्यवरांनी स्वस्तिक लॉन्स परिसरात विविध विभागांनी उभारलेल्या शासकीय स्टॉलची पाहणी केली. तसेच महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची खरेदी करून त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन दिले व नागरिकांनी स्थानिक बचत गटांच्या उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. सिल्लोड नगर परिषदेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक व पुष्पगुच्छाद्वारे मान्यवरांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार तहसीलदार अंकिता ताकभाते यांनी मानले. ------ यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अंकिता ताकभाते (सिल्लोड), तहसीलदार मनीषा मेने (सोयगाव), गटविकास अधिकारी रत्नाकर पगार (सिल्लोड), गटविकास अधिकारी अमोल जगताप (सोयगाव), नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप (सिल्लोड), भारत कासार ( सोयगाव ), नायब तहसीलदार तुकाराम बनकर ,बळीराम मुंडे , संभाजी पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पाटील तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख (सोयगाव) प्रभाकर काळे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना तालुकाप्रमुख (सोयगाव) धरमसिंग चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन गाडे, जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर, अब्दुल आमेर अ. सत्तार, सय्यद नासेर हुसेन, राजू बाबा काळे, माजी जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी सभापती रामदास पालोदकर, विश्वासराव दाभाडे, नगर परिषद शिवसेना गटनेते सुधाकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश ताठे, संदीप राऊत, राजाराम पाडळे, जयराम चिंचपुरे, नानासाहेब रहाटे, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, सुरेखा शिंदे, शिवसेना शहरप्रमुख मनोज झंवर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगरसेवक रउफ बागवान, अकील वसईकर, आसिफ बागवान, सिद्धेश्वर आहेर, डॉ. फिरोज पठाण, बबलू पठाण, नूर मोहंमद कुरेशी, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, संजय डमाळे, राजूमिया देशमुख, अंबादास सपकाळ, मोतीराम पाडळे, पंकज जयस्वाल आदींसह शासनाच्या विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, लाभार्थी तसेच विविध गावांतील आजी-माजी सरपंच, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- खुलताबाद तालुक्यात पावसाचा जोर कायम; जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी खुलताबाद तालुक्यात दिवसभर पावसाची संततधार सुरू असून पुढील काही दिवसही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पुढील काही तासांत जोरदार पाऊस, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदी-नाले व पूरग्रस्त भागांपासून दूर राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- छ.संभाजीनगरात भेसळयुक्त पनीर आणि गाईच्या तुपावर अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई; साडेतीन लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त छत्रपती संभाजीनगरात भेसळयुक्त पनीर आणि गाईच्या तुपावर अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई; साडेतीन लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त छत्रपती संभाजीनगरात Safe Food, Safe Maharashtra मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा विभागाने भेसळयुक्त पनीर आणि गाईच्या तुपाविरोधात मोठी कारवाई केली आहे. एमआयडीसी चिकलठाणा येथील अमोल दूध डेअरीवर टाकलेल्या छाप्यात भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ, सोयाबीन तेल आणि पनीर असा तीन लाख १२ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करून युनिट बंद करण्यात आले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा विभागाने एमआयडीसी चिकलठाणा येथील अमोल दूध डेअरीवर धाड टाकली. तपासादरम्यान नॉन-फूड ग्रेड सोयाबीन तेलाचा वापर करून अनालॉग पनीर आणि गाईचे तूप तयार केले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यावेळी २९९ किलो तूप, १९९ किलो क्रीम, १७४ किलो पनीर आणि २७८ किलो रिफाइंड सोयाबीन तेल असा एकूण ९५० किलो वजनाचा व तीन लाख १२ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासात ही डेअरी शहरातील लक्ष्मी डेअरीच्या टीव्ही सेंटर, कामगार चौक आणि श्रीराम चौक, दरगा रोड येथील तीन विक्री केंद्रांना पनीर आणि गाईचे तूप पुरवत असल्याचे समोर आले. त्यानंतर या तीन दुकानांवरही कारवाई करण्यात आली. तेथून ४१ किलो गाईचे तूप जप्त करून अन्न नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या कारवाईनंतर संबंधित उत्पादन युनिटचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून आस्थापना बंद करण्यात आली आहे. ही धडक मोहीम अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे, प्रज्ञा सुरसे, फरीद सिद्दीकी, योगेश चिभाडे यांनी सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच संयुक्त आयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. बाईट - अन्न औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त श्रीकांत करकळे1
- 🚚 "हर पार्सल की सुरक्षित मंज़िल – Kiran Courier Services!" 🚚 "हर पार्सल की सुरक्षित मंज़िल – Kiran Courier Services!" "सिर्फ़ पार्सल नहीं... हम आपकी भावनाएँ भी सही समय पर पहुँचाते हैं! ❤️📦" 📲 आज ही अपना Courier बुक करें! ☎️ Call / WhatsApp: 9545789966 🚚 Kiran Courier Services – Fast • Safe • Trusted #KiranCourier #CourierService #FastDelivery #SafeDelivery #DoorPickup #ParcelService #ExpressDelivery #IndiaCourier #CourierPartner #BusinessCourier #DocumentDelivery #Logistics #ReliableCourier #CourierLife #SameDayPickup #Aurangabad #ChhatrapatiSambhajinagar #SmallBusiness #InstaReels #ReelsIndia #ViralReels #TrendingReels #SupportLocalBusiness #BookNow #FastService1
- शाळेच्या खिचडीत काच; पेडणेकरांचा थेट तुकाराम मुंढेंना फोन!1
- महावितरणचे दीपक देवरे यांना आपल्या जीव वर खेळून लोकांच्या अंधे दुनियेत प्रकाश केला भर पावसाळ्यात बीच कोल्हापूर चढून दिल्लीचे तार जोडले1
- जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण1
- खुलताबाद तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग; नदी-नाले तुडुंब, गिरिजा मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक खुलताबाद तालुक्यात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. म्हैसमाळ परिसरात सर्वत्र पाणी साचून परिसर जलमय झाला असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गिरिजा नदीमध्ये पाणी येत असून नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे निसर्गरम्य दृश्ये खुलली असली तरी नागरिकांनी अनावश्यकपणे पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.2