आरोग्य विमा क्लेम मंजुरी व अवाजवी बिलांवर तोडगा शोधण्यासाठी आरोग्यमंत्र्यांची बैठक आरोग्य विमा क्लेम मंजुरी व अवाजवी बिलांवर तोडगा शोधण्यासाठी आरोग्यमंत्र्यांची बैठक रुग्णकल्याणासाठी निश्चित कार्यपद्धती ठरवण्यावर भर रुग्णांना उपचारादरम्यान विमा कंपन्यांकडून क्लेम मंजुरी मिळण्यात येणाऱ्या अडचणी तसेच काही रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी वैद्यकीय बिलांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली. या बैठकीत रुग्णांच्या हितासाठी निश्चित कार्यपद्धती ठरवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यात प्रथमच विमा कंपन्या, खासगी रुग्णालये, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) तसेच आरोग्य विभागाचे प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर येऊन या विषयावर चर्चा केली. रुग्णांना उपचारावेळी येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी तसेच पारदर्शक प्रणाली निर्माण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर बैठकीत विचारमंथन झाले. यावेळी बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, विमा कंपन्या आणि रुग्णालये व्यावसायिक पद्धतीने काम करत असली तरी सामान्य नागरिकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. वैद्यकीय विमा ही अत्यंत महत्त्वाची बाब असून मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांत दर्जेदार आणि अद्ययावत वैद्यकीय सेवा देणाऱ्या रुग्णालयांची तसेच खासगी विमाधारकांची संख्या वाढत आहे. राज्यात वैद्यकीय पर्यटनाच्या (मेडिकल टुरिझम) विकासासाठी रुग्णालये व विमा कंपन्यांनी व्यवसायातील विश्वासार्हता वाढवणे गरजेचे आहे. रुग्ण हा केंद्रबिंदू मानून सर्व यंत्रणांनी काम करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीमुळे रुग्णांना उपचारावेळी क्लेम मंजुरी मिळण्यात येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी आणि वैद्यकीय बिलांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ठोस कार्यपद्धती निश्चित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आरोग्य विमा क्लेम मंजुरी व अवाजवी बिलांवर तोडगा शोधण्यासाठी आरोग्यमंत्र्यांची बैठक आरोग्य विमा क्लेम मंजुरी व अवाजवी बिलांवर तोडगा शोधण्यासाठी आरोग्यमंत्र्यांची बैठक रुग्णकल्याणासाठी निश्चित कार्यपद्धती ठरवण्यावर भर रुग्णांना उपचारादरम्यान विमा कंपन्यांकडून क्लेम मंजुरी मिळण्यात येणाऱ्या अडचणी तसेच काही रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी वैद्यकीय बिलांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली. या बैठकीत रुग्णांच्या हितासाठी निश्चित कार्यपद्धती ठरवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यात प्रथमच विमा कंपन्या, खासगी रुग्णालये, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) तसेच आरोग्य विभागाचे प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर येऊन या विषयावर चर्चा केली. रुग्णांना उपचारावेळी येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी तसेच पारदर्शक प्रणाली निर्माण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर बैठकीत विचारमंथन झाले. यावेळी बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, विमा कंपन्या आणि रुग्णालये व्यावसायिक पद्धतीने काम करत असली तरी सामान्य नागरिकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. वैद्यकीय विमा ही अत्यंत महत्त्वाची बाब असून मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांत दर्जेदार आणि अद्ययावत वैद्यकीय सेवा देणाऱ्या रुग्णालयांची तसेच खासगी विमाधारकांची संख्या वाढत आहे. राज्यात वैद्यकीय पर्यटनाच्या (मेडिकल टुरिझम) विकासासाठी रुग्णालये व विमा कंपन्यांनी व्यवसायातील विश्वासार्हता वाढवणे गरजेचे आहे. रुग्ण हा केंद्रबिंदू मानून सर्व यंत्रणांनी काम करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीमुळे रुग्णांना उपचारावेळी क्लेम मंजुरी मिळण्यात येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी आणि वैद्यकीय बिलांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ठोस कार्यपद्धती निश्चित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आपले मोठे कार्यकर्तासह मस्तगड इथे पुष्पहार अर्पण करून साजरी केली1
- जेल में बंद महिला से दारोगा की डिमांड-बेटी दो, छोड़ देंगे!1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले तसेच गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग नोंदविला1
- स्व मधुकर दादा चांदणे मित्र मंडळ तर्फे भारतरत्न ड्रा बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अतिशबाजी करून जयंती साजरी करताना नागरिक मोठया प्रमाणे उपस्थित होते.1
- छत्रपती संभाजी नगर शहरातील साजापूर परिसरामध्ये भंगार च्या गोडाऊन व त्याच्या परिसराला आग लागल्याची घटना आज रोजी भेटली होती सदरील माहिती अग्निशामक विभागाला कळतच अग्निशामक विभागाच्या वतीने या ठिकाणी आग विझवण्यात आली आहे.1
- (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जाळपोळ प्रकरणांसह गंभीर गुन्ह्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी बीड जिल्हा कृती समितीने केली आहे. तसेच निनावी पत्रांच्या माध्यमातून प्रशासनाविषयी अविश्वास निर्माण करण्याच्या प्रकारावर तातडीने कारवाई करावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा सामाजिक अस्वस्थतेच्या छायेत वावरत असून, जाळपोळ प्रकरणांमध्ये अपेक्षित ती प्रभावी कारवाई झालेली दिसून येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. दरम्यान, अलीकडील काळात खून, दरोडे, अत्याचार या सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या शिवाय, निनावी पत्रांच्या माध्यमातून समाजात भीती व संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार वाढत असल्याचे निदर्शनास आणून देत, अशा प्रकरणांचा तांत्रिक पद्धतीने तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. जिल्ह्याची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची शक्यता व्यक्त करत, जाळपोळ व इतर गंभीर गुन्ह्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बीड जिल्हा कृती समिती सदस्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, रामनाथ खोड, शेख युनुस, माजी सैनिक अशोक येडे, बाळासाहेब मोरे पाटील, रामधन जमाले, सय्यद सादेक, सुहास जायभाये, किष्किंधा पांचाळ यांच्या वतीने करण्यात आली आहे.1
- छ संभाजीनगर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व पक्ष जिल्हा उत्सव महा समिती व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरी करताना रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय ठोकळ नगरसेवक सभापती मिलिंद दाभाडे जिल्हा अध्यक्ष विजय मगरे नगरसेवक गौतम भाऊ खरात नगरसेवक गौतम भाऊ लांडगे रामभाऊ पेरकर ब्राह्मण आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत पिंपळे भंडारे संतोष भिंगारे अभिषेक ठोकळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होते1
- हायकोर्टातील वकिलाचा खून झाल्याची घटना छत्रपती संभाजी नगर शहरातील गांधीली फाटा बीड बायपास या ठिकाणी घेतली असून अज्ञात आरोपींनी हा कोण केला असून सदरील घटनेचे नोंद सिडको एमआयडीसी पोलिसांनी घेतली पोलीस पुढील तपास करीत आहे.1