घरभाडे लाटण्यासाठी खोटे दस्तऐवज दाखल केले शिक्षिकेविरुध्द न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल खामगाव : तालुक्यातील आवार येथील जिल्हा परीषद शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षिकेने घरभाडे लाटण्यासाठी गावातीलच व्यक्तीच्या घराचे खोटे दस्ताऐवज सादर केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई १६ फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे.आवार येथील जिल्हा परीषद शाळेवर श्रीमती मानसी निलेश अडबे रा. यशोधा रेसीडेन्सी डीपी रोड सुटाळा ह्या कार्यरत आहेत. त्यांनी गावातीलचनिलेश सुरेश गवई यांच्या परात भाड्याने राहात असल्याचे खोटे दस्तऐवज दाखल करून गेल्या दोन वर्षापासून शासनाकडून घरभाडे घेत आहेत, याबाबत प्रथम पोस्टेला व नंतर न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरुन न्यायालयाने श्रीमती मानसी अडवे यांच्या विरुध्द कलम ३१६ (२), ३१६ (५), ३१८ (१), ३३६, ३३७ भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश खामगाव ग्रामीण पोस्टेला दिले होते. त्यामुळे खामगाव ग्रामीण पोलिसांनी उपरोक्त कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत अधिक तपास खामगाव ग्रामीण पोस्टेचे महिला पोहेकों प्रतीक्षा जाधव करीत आहेत.
घरभाडे लाटण्यासाठी खोटे दस्तऐवज दाखल केले शिक्षिकेविरुध्द न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल खामगाव : तालुक्यातील आवार येथील जिल्हा परीषद शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षिकेने घरभाडे लाटण्यासाठी गावातीलच व्यक्तीच्या घराचे खोटे दस्ताऐवज सादर केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई १६ फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे.आवार येथील जिल्हा परीषद शाळेवर श्रीमती मानसी निलेश अडबे रा. यशोधा रेसीडेन्सी डीपी रोड सुटाळा ह्या कार्यरत आहेत. त्यांनी गावातीलचनिलेश सुरेश गवई यांच्या परात भाड्याने राहात असल्याचे खोटे दस्तऐवज दाखल करून गेल्या दोन वर्षापासून शासनाकडून घरभाडे घेत आहेत, याबाबत प्रथम पोस्टेला व नंतर न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरुन न्यायालयाने श्रीमती मानसी अडवे यांच्या विरुध्द कलम ३१६ (२), ३१६ (५), ३१८ (१), ३३६, ३३७ भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश खामगाव ग्रामीण पोस्टेला दिले होते. त्यामुळे खामगाव ग्रामीण पोलिसांनी उपरोक्त कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत अधिक तपास खामगाव ग्रामीण पोस्टेचे महिला पोहेकों प्रतीक्षा जाधव करीत आहेत.
- किन्होळा ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली. या प्रसंगी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवाला अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव करणारा हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री.मदन कुटे, सरपंच सौ.अर्चना वसंत जाधव. शेख इरफान शेख लड्डू, जाफर भाई, प्राचार्य वसंत जाधव, किशोर निकाळजे, सुनील बाहेकर , पोलीस पाटील नंदकिशोर बाहेकर, ज्ञानेश्वर बाहेकरयांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या कार्याला आदराने वंदन केले. ताहेरभाई , युनूस मेंबर, अशोक जाधव , अशोक वानखेडे,अरुण सरदार प्रदीप सरदार ,शेषराव वानखेडे , तसेच महिला , व यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.. उपस्थितानी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर च्या कार्याला आदराने वंदन केले. याप्रसंगी अनेक वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आणि त्यांच्या अजोड कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये बाबासाहेबांचे योगदान, दलित आणि वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेला संघर्ष, शिक्षण आणि समानतेचे त्यांचे विचार यावर सखोल विवेचन केले... मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व आणि ते आजही कसे प्रासंगिक आहेत, यावर आपले विचार मांडले. प्राचार्य वसंत जाधव यांनीआपल्या भाषणात, डॉ. आंबेडकरांनी समाजाला दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली आणि त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.भारतरत्न डॉ.बाबासाहेबांच्या कार्याची महती विशद केली आणि त्यांच्या स्वप्नातील समतावादी समाज घडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमामुळे उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आणि विचारांची नव्याने ओळख झाली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज भारत एक लोकशाही आणि समतावादी राष्ट्र म्हणून उभा आहे, हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. किन्होळा ग्रामपंचायतीने आयोजित केलेला हा जयंती सोहळा बाबासाहेबांच्या स्मृतींना आदरांजली वाहणारा आणि त्यांच्या विचारांना पुढे नेणारा एक महत्त्वाचा उपक्रम ठरला.1
- Post by Ganesh Govindrav Bhombe1
- बुलढाण्यात भीमजयंतीचा जल्लोष; गाण्यावर थिरकले आ. संजूभाऊ गायकवाड बुलढाणा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ठिकठिकाणी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जयभीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी “अरे बाबासाहेबानं दिल बाबासाहेबानं!” या संतोष जोंधळे यांच्या गाजलेल्या गीतावर आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी ठेका धरत जल्लोषात सहभाग घेतला. त्यांच्या या उपस्थितीने कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्साह द्विगुणित झाला. कार्यक्रमादरम्यान “व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं, व्हीआयपी मान-सन्मान” अशा घोषणांसह बाबासाहेबांच्या विचारांचा गौरव करण्यात आला. शहरात विविध ठिकाणी अभिवादन, पुष्पांजली आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भीमजयंतीनिमित्त बुलढाण्यात सर्वत्र आनंद, अभिमान आणि ऐक्याचे वातावरण निर्माण झाले असून, तरुणाईने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. जयभीमच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले1
- विझोरा येथे बुद्ध विहार मध्ये महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी1
- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐शुभेच्छुक: डॉक्टर संजय पगारे,सृष्टी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद1
- Post by Sharad Dayedar1
- खामगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची , १४ एप्रिल २०२६ रोजी साजरी होणारी १3५ वी जयंती उत्सवात साजरी करण्यासाठी खामगाव शहर सज्ज झाले आहे. या निमित्ताने शहरातील नगरपरिषद मैदान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुख्य पुतळ्याला आणि संपूर्ण परिसराला अतिशय सुंदर व भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने पुतळा परिसरात रंगीबेरंगी दिव्यांची आरास करण्यात आली असून, रात्रीच्या वेळी हे दृश्य अत्यंत विलोभनीय दिसत आहे. निळ्या आणि पांढऱ्या विद्युत माळांच्या प्रकाशझोतात महामानवाचा पुतळा न्हाऊन निघाला आहे. ही रोषणाई पाहण्यासाठी आणि महामानवाला अभिवादन करण्यासाठी आज रात्रीपासूनच नागरिकांनी परिसरात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.शहरातील मुख्य पुतळ्याची ही सजावट भीम अनुयायांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. "कोटी कोटी प्रणाम त्या महामानवाला!" अशा शब्दांत नागरिक आपल्या भावना व्यक्त करत आहेत. केवळ रोषणाईच नव्हे, तर स्वच्छतेवरही विशेष भर देण्यात आला असून, संपूर्ण परिसरात एक चैतन्यमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेपासूनच विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर दिवसभर शहरातून विविध मिरवणुका आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.1
- Post by Santosh Bahekar PRESS2
- कोटा ब्रेकिंग आरकेपुरम पोलिस स्टेशन क्षेत्रातील आवली रोजडी येथे प्रेमविवाहाच्या विरोधात हिंसक हल्ला! कोटा शहरातील आरकेपुरम थाना अंतर्गत आवली रोजडी (गणपती विहार) भागात ८ एप्रिल २०२६ रोजी एक भयानक मारपीट आणि तलवारी-लाठ्यांचा हल्ला झाल्याचे लाइव व्हिडिओ समोर आला आहे. या हल्ल्यात एका बाजूने दुसऱ्या बाजूवर तलवारी, लाठ्या आणि सरिया घेऊन जोरदार हल्ला चढवला. हल्ल्यामुळे मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या हिंसक घटनेत एक महिला सहित अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची पार्श्वभूमी: विशाल आणि तनिषा यांनी २४ मार्च २०२६ रोजी कोर्ट मॅरेज केली होती. मुलीच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी (धीरज व इतर) मुलाच्या घरी घुसून लाठ्या, सरिया आणि तलवारीने हल्ला केला. विशालच्या कुटुंबातील अनेक जणांचे डोके फुटले, टाके पडले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरकेपुरम पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या पोलिस पूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवत आहेत. आरोपी अद्याप फरारी आहेत. तनिषा यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही घटना कोटा शहरातील लव मॅरेज विरोधातील पारिवारिक हिंसाचाराचे आणखी एक उदाहरण आहे. अधिक अपडेट हवे असतील किंवा व्हिडिओ डिटेल्स हव्या असतील तर सांगा! सावधानी: सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ फक्त विश्वसनीय स्त्रोतांमधूनच शेअर करा.1