राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी; १५ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी; १५ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू.. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी सन २०२६ च्या उन्हाळी सुट्टीबाबत शिक्षण संचालनालयाने महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये शनिवार, दि. २ मे २०२६ पासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी देण्यात येणार आहे. शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सन २०२६-२७ चे नवे शैक्षणिक वर्ष सोमवार, दि. १५ जून २०२६ पासून सुरू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे संपूर्ण राज्यातील शाळांच्या सुट्ट्यांमध्ये एकसमानता राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान, इतर मंडळांच्या शाळांबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित शाळा प्रशासनाला देण्यात आले आहेत. अशा शाळांमध्ये शैक्षणिक उपक्रम सुरू असल्यास सुट्टी जाहीर करण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेता येणार आहे. विदर्भातील उष्णतेचा विचार करून तेथील शाळांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. विदर्भ विभागातील शाळा १५ जून ते २९ जून या कालावधीत सकाळच्या सत्रात (सकाळी ७.०० ते ११.४५) चालविण्यात येणार असून, ३० जूनपासून नियमित वेळेनुसार शाळा सुरू होतील. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महेश पालकर तसेच शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी; १५ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी; १५ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू.. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी सन २०२६ च्या उन्हाळी सुट्टीबाबत शिक्षण संचालनालयाने महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये शनिवार, दि. २ मे २०२६ पासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी देण्यात येणार आहे. शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सन २०२६-२७ चे नवे शैक्षणिक वर्ष सोमवार, दि. १५ जून २०२६ पासून सुरू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे संपूर्ण राज्यातील शाळांच्या सुट्ट्यांमध्ये एकसमानता राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान, इतर मंडळांच्या शाळांबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित शाळा प्रशासनाला देण्यात आले आहेत. अशा शाळांमध्ये शैक्षणिक उपक्रम सुरू असल्यास सुट्टी जाहीर करण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेता येणार आहे. विदर्भातील उष्णतेचा विचार करून तेथील शाळांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. विदर्भ विभागातील शाळा १५ जून ते २९ जून या कालावधीत सकाळच्या सत्रात (सकाळी ७.०० ते ११.४५) चालविण्यात येणार असून, ३० जूनपासून नियमित वेळेनुसार शाळा सुरू होतील. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महेश पालकर तसेच शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
- Arun Borde Visit The Soul Of Fashion Opening Ceremony in Kalda Corner1
- आखाती देशाच्या युद्धामुळे छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस टंचाईमुळे रिक्षामध्ये गॅस मिळत नसल्याने आखिरकार रिक्षा चालकांनी रिक्षा बंद पुकारत प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला3
- आज ३० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली यात विजांचा मोठा कडकडाट सुरू झाला होता आमठाणा येथे एका झाडावर वीज पडल्याची घटना घडली असून सदरील प्रकार बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे.1
- Post by Jansagar 9 Marathi1
- सिल्लोड तालुक्यातील कोट नांद्रा येथे श्रीराम संकरित बायो सीड्स कंपनीच्या 97 99 मका वाहनाचा पीक पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये शेतकऱ्यांनी मोठी हजेरी लावली1
- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- आज सोमवार 30 मार्च रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर शहरात सिडको परिसरात एलपीजी गॅस नसल्याने रिक्षा चालकांनी संप पुकारला असून मात्र काही रिक्षा चालकांनी सिटी बस मध्ये जाणाऱ्या प्रवासी यांना दादागिरी करत होते सदरील माहिती सिडको पोलिसांना माहिती दादागिरी करणाऱ्या रिक्षाचालकांना ताब्यात घेतली आहे.1
- Post by Swal Jansamannyaca ...1
- बुलढाणा जिल्ह्यात इंधन_पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष खबरदारी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानुसार, सर्व पेट्रोल पंपांवर इंधन केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच वितरित करणे बंधनकारक असून कॅन, बाटली किंवा इतर उघड्या कंटेनरमध्ये इंधन देणे सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रतिबंधित करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आता प्रशासनाने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.1