आगीचा कहर! जिगाव प्रकल्पाचे हजारो पाइप भस्मसात; शेगाव पालिकेचा ट्रॅक्टरही खाक आगीचा कहर! जिगाव प्रकल्पाचे हजारो पाइप भस्मसात; शेगाव पालिकेचा ट्रॅक्टरही खाक बुलढाणा जिल्ह्यात सलग दोन भीषण आगींच्या घटनांनी खळबळ बुलढाणा जिल्ह्यात आगीच्या दोन मोठ्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका ठिकाणी जिगाव प्रकल्पाचे हजारो पाइप जळून खाक झाले, तर दुसऱ्या घटनेत शेगाव नगरपालिकेचा ट्रॅक्टर आगीत भस्मसात झाला. जळगाव : ३५०० पाइप जळून कोट्यवधींचे नुकसान जिगाव प्रकल्पांतर्गत जळगाव शिवारात मुऱ्हे यांच्या शेतात साठवून ठेवलेल्या पीव्हीसी पाइपांना २६ एप्रिल रोजी भीषण आग लागली. जवळपास ९ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत सुमारे ३ हजार ५०० पाइप जळून खाक झाले होते. या घटनेत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुमारे २५० किलोमीटर क्षेत्रासाठी वापरण्यात येणारे हे पाइप शेतात साठवले होते. पीव्हीसीसारखे ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केले. आगीचे लोळ तब्बल १० किलोमीटर अंतरावरूनही दिसत होते. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मात्र आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शेगाव : कचऱ्याच्या आगीत पालिकेचा ट्रॅक्टर जळून खाक दरम्यान, शेगाव शहरातील जुन्या धान्य मार्केट परिसरात २९ एप्रिल रोजी दुपारी कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली. या आगीने काही क्षणांतच उग्र रूप धारण करत नगरपालिकेचा ट्रॅक्टर-ट्रॉली पूर्णतः जळून खाक केला. या घटनेत अंदाजे ६ ते ७.५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिकांच्या मते, अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ टाकल्याने आग लागली असावी. व्यापाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस व नगरपालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. सुरक्षेचा अभाव ठरतोय धोकादायक? दोन्ही घटनांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव ठळकपणे समोर आला आहे. जळगाव येथे पाइप साठवणूक असूनही कोणतीही निगराणी व्यवस्था नव्हती, तर शेगावमध्ये कचऱ्याचे ढिगारे खुलेच ठेवले जात होते. त्यामुळे अशा घटनांना निमंत्रण मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. प्रशासनाने धडा घेण्याची गरज सलग घडलेल्या या घटनांमुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
आगीचा कहर! जिगाव प्रकल्पाचे हजारो पाइप भस्मसात; शेगाव पालिकेचा ट्रॅक्टरही खाक आगीचा कहर! जिगाव प्रकल्पाचे हजारो पाइप भस्मसात; शेगाव पालिकेचा ट्रॅक्टरही खाक बुलढाणा जिल्ह्यात सलग दोन भीषण आगींच्या घटनांनी खळबळ बुलढाणा जिल्ह्यात आगीच्या दोन मोठ्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका ठिकाणी जिगाव प्रकल्पाचे हजारो पाइप जळून खाक झाले, तर दुसऱ्या घटनेत शेगाव नगरपालिकेचा ट्रॅक्टर आगीत भस्मसात झाला. जळगाव : ३५०० पाइप जळून कोट्यवधींचे नुकसान जिगाव प्रकल्पांतर्गत जळगाव शिवारात मुऱ्हे यांच्या शेतात साठवून ठेवलेल्या पीव्हीसी पाइपांना २६ एप्रिल रोजी भीषण आग लागली. जवळपास ९ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत सुमारे ३ हजार ५०० पाइप जळून खाक झाले होते. या घटनेत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुमारे २५० किलोमीटर क्षेत्रासाठी वापरण्यात येणारे हे पाइप शेतात साठवले होते. पीव्हीसीसारखे ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केले. आगीचे लोळ तब्बल १० किलोमीटर अंतरावरूनही दिसत होते. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मात्र आग
लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शेगाव : कचऱ्याच्या आगीत पालिकेचा ट्रॅक्टर जळून खाक दरम्यान, शेगाव शहरातील जुन्या धान्य मार्केट परिसरात २९ एप्रिल रोजी दुपारी कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली. या आगीने काही क्षणांतच उग्र रूप धारण करत नगरपालिकेचा ट्रॅक्टर-ट्रॉली पूर्णतः जळून खाक केला. या घटनेत अंदाजे ६ ते ७.५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिकांच्या मते, अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ टाकल्याने आग लागली असावी. व्यापाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस व नगरपालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. सुरक्षेचा अभाव ठरतोय धोकादायक? दोन्ही घटनांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव ठळकपणे समोर आला आहे. जळगाव येथे पाइप साठवणूक असूनही कोणतीही निगराणी व्यवस्था नव्हती, तर शेगावमध्ये कचऱ्याचे ढिगारे खुलेच ठेवले जात होते. त्यामुळे अशा घटनांना निमंत्रण मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. प्रशासनाने धडा घेण्याची गरज सलग घडलेल्या या घटनांमुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
- जनगणना-2026 संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन1
- खामगाव : शहरातील नगरपरिषदेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या 'नाना-नानी' पार्कमध्ये आता प्रति व्यक्ती ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याने सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामध्ये नागरिक आणि पार्कच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव नगरपरिषदेने ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी आणि लहान मुलांसाठी नाना-नानी पार्कची निर्मिती केली आहे. मात्र, आता या ठिकाणी प्रत्येकी ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक नागरिक कर्मचाऱ्याला विचारणा करताना म्हणतो, "एका व्यक्तीचे ५ रुपये ठीक आहेत, पण जर कुटुंबातील १०-१२ लोक एकत्र आले, तर ५०-६० रुपये भरावे लागतील. हे नगरपरिषदेचे गार्डन असून, सामान्य माणसाला हे पैसे देणे जड जाते." हे उद्यान लोकांसाठी आहे, मग तिथे प्रवेशासाठी पैसे का मोजावे लागतात?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. एकाच वेळी संपूर्ण कुटुंब फिरायला गेल्यास त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.अशा तक्रारी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे हा निर्णय कोणी घेतला आणि जमा होणारा पैसा कशासाठी वापरला जातो, याबाबत स्पष्टता हवी अशी मागणी होत आहे. या व्हिडिओमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक युजर्सनी याला "सामान्य नागरिकांची लूट" असे संबोधले आहे. नगरपरिषदेने अशा सार्वजनिक सुविधांवर शुल्क आकारू नये, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणावर नगरपरिषद प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, गार्डनच्या देखभालीसाठी हे शुल्क आहे की अन्य काही कारण, हे प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.1
- मोताळा वन विभागात घोटाळा? परवानगीशिवाय बांधकाम सुरू!1
- कामगार दिनाच्या महाराष्ट्रातील सर्व कामगारांना हार्दिक शुभेच्छा1
- बुलढाणा, दि. १ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले. पोलिस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचा विचार करून शासनाने अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील १ कोटी ५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांसाठी १६ हजार २२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ३ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या मदतीतून कोणतीही बँक वसुली होऊ नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” जाहीर करण्यात आली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासन त्याच्या सन्मान करणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे.1
- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजचा 50 वा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन बुलढाणा जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा कार्यालय बुलढाणा अंतर्गत बीज प्रक्रिया केंद्र खामगाव येथे हा विशेष सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून कृषी अधिकारी बुलढाणा मा. विजय पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाबीजचे भागधारक श्री. संतोषराव देशमुख होते. यावेळी भागधारक, बीजोत्पादक, महाबीज विक्रेते, कृषी अधिकारी, शेतकरी तसेच कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र कोल्हे, कृषी क्षेत्र अधिकारी यांनी केले. तर प्रास्ताविक श्री. सुरेश मोहकर, केंद्र व्यवस्थापक खामगाव यांनी सादर केले. त्यांनी महाबीजच्या मागील 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेत नवीन योजना, आधुनिक उपक्रम आणि भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना शेती, बियाण्यांची गुणवत्ता आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या विविध प्रश्नांचे समाधानही करण्यात आले. अध्यक्ष श्री. संतोषराव देशमुख यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत, महाबीजची प्रगती अशीच शतकोत्तर वेगाने पुढे जावो, अशी अपेक्षा व्यक्त केली. या विशेष प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीजोत्पादक, हमाल, कंत्राटी कर्मचारी, कृषी अधिकारी, कर्मचारी आणि शिपाई यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमस्थळी महाबीज उत्पादनांचे आकर्षक दालन उभारण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून सुवर्ण महोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला.1
- Post by विदर्भ शासन न्यूज..1
- महाराष्ट्र स्वातंत्र्य दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा3