logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सध्याच्या युद्धामध्ये लग्नाआधी फोटोशूट करण्याचा कार्यक्रम जोर धरत असून अशातच एका वधू ने फोटोशूट करण्यासाठी गेली व त्यानंतर ती परत आलीच नाही

3 hrs ago
user_महेंद्र कुमार महाजन
महेंद्र कुमार महाजन
Coffee roasters रिसोड, वाशिम, महाराष्ट्र•
3 hrs ago
3ac273c5-fe75-4776-b3e8-1a257b63665b

सध्याच्या युद्धामध्ये लग्नाआधी फोटोशूट करण्याचा कार्यक्रम जोर धरत असून अशातच एका वधू ने फोटोशूट करण्यासाठी गेली व त्यानंतर ती परत आलीच नाही

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मंठा तालुक्यातील हेलस येथे एका ७० वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. अचित विश्वनाथराव खराबे (वय ७०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने गळफास घेऊन जीवन संपवले. घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये "माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही" असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे हेलस परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    1
    मंठा तालुक्यातील हेलस येथे एका ७० वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. अचित विश्वनाथराव खराबे (वय ७०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने गळफास घेऊन जीवन संपवले. घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये "माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही" असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे हेलस परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • परभणी (प्रतिनिधी) : परभणी तालुक्यातील लोहगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, आग लागली तेव्हा सर्व दुकानदार गावातील एका लग्नसमारंभासाठी गेले होते, त्यामुळे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, लोहगावातील बाजारपेठ परिसरात अचानक दुपारच्या च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला आग लहान स्वरूपाची होती, मात्र काही वेळातच तिने भीषण रूप धारण केले आणि शेजारील चार दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली.
    1
    परभणी (प्रतिनिधी) : परभणी तालुक्यातील लोहगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, आग लागली तेव्हा सर्व दुकानदार गावातील एका लग्नसमारंभासाठी गेले होते, त्यामुळे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, लोहगावातील बाजारपेठ परिसरात अचानक दुपारच्या च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला आग लहान स्वरूपाची होती, मात्र काही वेळातच तिने भीषण रूप धारण केले आणि शेजारील चार दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली.
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • *बुलढाण्यात आज राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापलेले पाहायला मिळाले. 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलिसांनी बुलढाण्यात पोहोचण्यापूर्वीच चिखलीत रोखले आहे. दुसरीकडे, बुलढाणा शहरात आक्रमक झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी अक्षरशः फरफटत ताब्यात घेतले असून, आंदोलन दडपल्याचा आरोप आता केला जात आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली. निमित्त होते 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशन आणि आमदार संजय गायकवाड यांनी दिलेला इशारा. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी ही संपूर्ण आंदोलनाची मोहीम चिरडून टाकली आहे.पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी हे बुलढाण्याच्या दिशेने येत असताना, चिखली पोलिसांनी त्यांना वाटेतच गाठले. सध्या आंबी यांना चिखलीतील 'हॉटेल अमृततुल्य'मध्ये पोलिसांनी स्थानबद्ध केले असून, त्यांच्याभोवती पोलिसांचा मोठा गराडा तैनात आहे.दुसरीकडे, बुलढाणा शहरात परिस्थिती अधिकच स्फोटक झाली होती. प्रशांत आंबी यांच्या स्वागतासाठी आणि समर्थनासाठी जमलेले आंदोलक आक्रमक झाले होते. यावेळी आंदोलकांनी **'संजय गायकवाड मुर्दाबाद'**च्या जोरदार घोषणा दिल्या. "जोपर्यंत आंबी बुलढाण्यात येत नाहीत, तोपर्यंत जागा सोडणार नाही," असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. मात्र, वातावरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरून फरफटत उचलले आणि व्हॅनमध्ये भरून ताब्यात घेतले.या वादाची पार्श्वभूमी आमदार संजय गायकवाड यांच्या विधानाशी जोडली जात आहे. "एकेरी उल्लेख केला तर कानाखाली वाजवू, आम्ही शिवभक्तांना रोखू शकणार नाही," असा इशारा गायकवाडांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर जिल्ह्यात तणाव निर्माण झाला होता, परिणामी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
    1
    *बुलढाण्यात आज राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापलेले पाहायला मिळाले. 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलिसांनी बुलढाण्यात पोहोचण्यापूर्वीच चिखलीत रोखले आहे. दुसरीकडे, बुलढाणा शहरात आक्रमक झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी अक्षरशः फरफटत ताब्यात घेतले असून, आंदोलन दडपल्याचा आरोप आता केला जात आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली. निमित्त होते 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशन आणि आमदार संजय गायकवाड यांनी दिलेला इशारा. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी ही संपूर्ण आंदोलनाची मोहीम चिरडून टाकली आहे.पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी हे बुलढाण्याच्या दिशेने येत असताना, चिखली पोलिसांनी त्यांना वाटेतच गाठले. सध्या आंबी यांना चिखलीतील 'हॉटेल अमृततुल्य'मध्ये पोलिसांनी स्थानबद्ध केले असून, त्यांच्याभोवती पोलिसांचा मोठा गराडा तैनात आहे.दुसरीकडे, बुलढाणा शहरात परिस्थिती अधिकच स्फोटक झाली होती. प्रशांत आंबी यांच्या स्वागतासाठी आणि समर्थनासाठी जमलेले आंदोलक आक्रमक झाले होते. यावेळी आंदोलकांनी **'संजय गायकवाड मुर्दाबाद'**च्या जोरदार घोषणा दिल्या. "जोपर्यंत आंबी बुलढाण्यात येत नाहीत, तोपर्यंत जागा सोडणार नाही," असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता.
मात्र, वातावरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरून फरफटत उचलले आणि व्हॅनमध्ये भरून ताब्यात घेतले.या वादाची पार्श्वभूमी आमदार संजय गायकवाड यांच्या विधानाशी जोडली जात आहे. "एकेरी उल्लेख केला तर कानाखाली वाजवू, आम्ही शिवभक्तांना रोखू शकणार नाही," असा इशारा गायकवाडांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर जिल्ह्यात तणाव निर्माण झाला होता, परिणामी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • गावात जागा असूनही कोंडवाड्यावरच डोळा का? वरवंडच्या 'बळीराजा'चा प्रशासकीय अन्यायाविरुद्ध आत्मदहनाचा इशारा.
    1
    गावात जागा असूनही कोंडवाड्यावरच डोळा का? वरवंडच्या 'बळीराजा'चा प्रशासकीय अन्यायाविरुद्ध आत्मदहनाचा इशारा.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • ​खामगाव : लग्नामध्ये नाचण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका २२ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या तिन्ही फरार आरोपींना शिवाजी नगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना वरवट बकाल परिसरातून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. २६ एप्रिल २०२६ रोजी मोहम्मद साबीर शेख मुसा (वय ३६, रा. बर्डेप्लॉट, खामगाव) यांनी शिवाजी नगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, त्यांचा भाचा शोएब खान अमीन खान (वय २२) याला दिनांक २५ एप्रिल रोजी लग्नात नाचण्याच्या कारणावरून आरोपींनी वाद घालून दगडाने डोक्यावर व शरीरावर गंभीर मारहाण केली होती. या हल्ल्यात शोएब खानचा मृत्यू झाला. या तक्रारीवरून पोलिसांनी कलम १०३(१), ११८(२), ११५(२), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा (अप क्र. १५८/२०२६) दाखल केला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाची विविध पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हे वरवट बकाल परिसरात असून तेथून मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांनी वेगाने हालचाली करत ​ मुजम्मील खान जमील खान (वय २२, रा. बर्डेप्लॉट), शेख तालीब शेख रहेमान (वय २२, रा. बर्डेप्लॉट),फैजान खान बुढन खान (वय २५, रा. बर्डेप्लॉट) तिघांना ताब्यात घेतले. ​पोलिसी खाक्या दाखवताच तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना २६ एप्रिल रोजी रीतसर अटक करण्यात आली आहे. सदरची यशस्वी कारवाई बुलडाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर, सपोनी मंदार पुरी, पोहेकॉ संदिप टाकसाळ, निलसींग चव्हाण, देवेंद्र शेळके, विजय उभे, राजू कोल्हे, नितीन भालेराव, प्रविण गायकवाड, केशव झाल्टे, पल्लवी बोर्डे, योगेश सोनटक्के, तसेच सायबर सेलचे कैलास ठोंबरे व राजू आढवे यांनी केली आहे. ​पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदार पुरी करीत आहेत.
    1
    ​खामगाव : लग्नामध्ये नाचण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका २२ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या तिन्ही फरार आरोपींना शिवाजी नगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना वरवट बकाल परिसरातून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले.  २६ एप्रिल २०२६ रोजी मोहम्मद साबीर शेख मुसा (वय ३६, रा. बर्डेप्लॉट, खामगाव) यांनी शिवाजी नगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, त्यांचा भाचा शोएब खान अमीन खान (वय २२) याला दिनांक २५ एप्रिल रोजी लग्नात नाचण्याच्या कारणावरून आरोपींनी वाद घालून दगडाने डोक्यावर व शरीरावर गंभीर मारहाण केली होती. या हल्ल्यात शोएब खानचा मृत्यू झाला. या तक्रारीवरून पोलिसांनी कलम १०३(१), ११८(२), ११५(२), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा (अप क्र. १५८/२०२६) दाखल केला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाची विविध पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हे वरवट बकाल परिसरात असून तेथून मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांनी वेगाने हालचाली करत ​ मुजम्मील खान जमील खान (वय २२, रा. बर्डेप्लॉट), शेख तालीब शेख रहेमान (वय २२, रा. बर्डेप्लॉट),फैजान खान बुढन खान (वय २५, रा. बर्डेप्लॉट) तिघांना ताब्यात घेतले. ​पोलिसी खाक्या दाखवताच तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना २६ एप्रिल रोजी रीतसर अटक करण्यात आली आहे. सदरची यशस्वी कारवाई बुलडाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर, सपोनी मंदार पुरी, पोहेकॉ संदिप टाकसाळ, निलसींग चव्हाण, देवेंद्र शेळके, विजय उभे, राजू कोल्हे, नितीन भालेराव, प्रविण गायकवाड, केशव झाल्टे, पल्लवी बोर्डे, योगेश सोनटक्के, तसेच सायबर सेलचे कैलास ठोंबरे व राजू आढवे यांनी केली आहे. ​पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदार पुरी करीत आहेत.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • संजय गायकवाडांना जिजाऊंच्या संस्कारांची गरज; आरती आंबी यांचा घणाघात
    1
    संजय गायकवाडांना जिजाऊंच्या संस्कारांची गरज; आरती आंबी यांचा घणाघात
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by Labour addaa.
    1
    Post by Labour addaa.
    user_Labour addaa.
    Labour addaa.
    Plumber Jalna, Maharashtra•
    5 hrs ago
  • बळीराजाचा आक्रोश! रस्त्यावर फेकला भाजीपाला; कांदा-भाजीपाल्याला फुकट भाव राज्यात सध्या कांदा व भाजीपाल्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्रचंड कष्ट करूनही उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. दरम्यान, एका संतप्त शेतकऱ्याने आपला भाजीपाला थेट रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींची तीव्रता अधोरेखित झाली आहे. शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत जात असल्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही अशा प्रश्न उभा राहत आहे.
    1
    बळीराजाचा आक्रोश! रस्त्यावर फेकला भाजीपाला; कांदा-भाजीपाल्याला फुकट भाव
राज्यात सध्या कांदा व भाजीपाल्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्रचंड कष्ट करूनही उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. दरम्यान, एका संतप्त शेतकऱ्याने आपला भाजीपाला थेट रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींची तीव्रता अधोरेखित झाली आहे.
शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत जात असल्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही अशा प्रश्न उभा राहत आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.