logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लाच घेताना जलसंधारण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; फोन-पेद्वारे ७ हजारांची लाच स्वीकारताना कारवाई लाच घेताना जलसंधारण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; फोन-पेद्वारे ७ हजारांची लाच स्वीकारताना कारवाई प्रलंबित बिले मंजूर करून देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून रंगेहाथ पकडले. वैजापूर येथे कार्यरत असलेले उपविभागीय जलसंधारण अधिकारी निखिल अशोक कवाडे (वय ३३) यांनी तक्रारदाराकडून फोन-पे अॅपद्वारे लाचेची रक्कम स्वीकारल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी असून त्यांनी जलसंधारण विभागाला भाडेतत्त्वावर बोलेरो वाहन उपलब्ध करून दिले होते. या वाहनाच्या प्रलंबित बिलासंदर्भातील एमबी बुक, लॉग बुक आणि कंटिजेन्सी बिलावर स्वाक्षरी करून ते मंजुरीसाठी मुख्य कार्यालयाकडे पाठवण्यासाठी कवाडे यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ७ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. तक्रारदाराने याबाबत एसीबी कडे तक्रार केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने अयोध्या नगर, शिरूर रोड परिसरात सापळा रचला. तक्रारदाराकडून फोन-पे अॅपद्वारे ७ हजार रुपये स्वीकारताच कवाडे यांना पंच साक्षीदारांसमक्ष ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांचा मोबाईल जप्त केला असून त्यांच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे आणि त्यांच्या पथकाने केली.

1 day ago
user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
पत्रकार ओमप्रकाश उढाण
घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
1 day ago
5fb7462c-a245-49ef-806a-61052641f9be

लाच घेताना जलसंधारण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; फोन-पेद्वारे ७ हजारांची लाच स्वीकारताना कारवाई लाच घेताना जलसंधारण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; फोन-पेद्वारे ७ हजारांची लाच स्वीकारताना कारवाई प्रलंबित बिले मंजूर करून देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून रंगेहाथ पकडले. वैजापूर येथे कार्यरत असलेले उपविभागीय जलसंधारण अधिकारी निखिल अशोक कवाडे (वय ३३) यांनी तक्रारदाराकडून फोन-पे अॅपद्वारे लाचेची रक्कम स्वीकारल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी असून त्यांनी जलसंधारण विभागाला भाडेतत्त्वावर बोलेरो वाहन उपलब्ध करून दिले होते. या वाहनाच्या प्रलंबित बिलासंदर्भातील एमबी बुक, लॉग बुक आणि कंटिजेन्सी बिलावर स्वाक्षरी करून ते मंजुरीसाठी मुख्य कार्यालयाकडे पाठवण्यासाठी कवाडे यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ७ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. तक्रारदाराने याबाबत एसीबी कडे तक्रार केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने अयोध्या नगर, शिरूर रोड परिसरात सापळा रचला. तक्रारदाराकडून फोन-पे अॅपद्वारे ७ हजार रुपये स्वीकारताच कवाडे यांना पंच साक्षीदारांसमक्ष ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांचा मोबाईल जप्त केला असून त्यांच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे आणि त्यांच्या पथकाने केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जुने जे प्रकल्प आहेत ते बंद पडले आहेत त्यांना सुरू करण्यात यावे अशी मागणी हिकमत दादा उढान यांनी केली
    1
    जुने जे प्रकल्प आहेत ते बंद पडले आहेत त्यांना सुरू करण्यात यावे अशी मागणी हिकमत दादा उढान यांनी केली
    user_Vithal Khoje
    Vithal Khoje
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    10 min ago
  • Post by Parmeshor Khoje
    1
    Post by Parmeshor Khoje
    user_Parmeshor Khoje
    Parmeshor Khoje
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जालना शहरातील आझाद मैदान परिसरात असलेल्या अंकुश कोचिंग क्लासेस येथे विजेचा धक्का लागून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवारी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करण मोरे (वय १८, रा. खरपुडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक कोचिंग क्लासच्या इमारतीवर टँकरद्वारे पाणी चढवण्याचे काम करत असताना त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. या प्रकरणात जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत काही नागरिकांनी सदर बाजार पोलीस ठाण्यातही गर्दी केली. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तसेच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
    1
    जालना शहरातील आझाद मैदान परिसरात असलेल्या अंकुश कोचिंग क्लासेस येथे विजेचा धक्का लागून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवारी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
करण मोरे (वय १८, रा. खरपुडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक कोचिंग क्लासच्या इमारतीवर टँकरद्वारे पाणी चढवण्याचे काम करत असताना त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. या प्रकरणात जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत काही नागरिकांनी सदर बाजार पोलीस ठाण्यातही गर्दी केली.
दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तसेच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • जालन्यात विजेचा धक्का लागून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू; अंकुश कोचींग क्लासेस आझाद मैदान परिसरातील दुर्दैवी घटना
    1
    जालन्यात विजेचा धक्का लागून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू; अंकुश कोचींग क्लासेस आझाद मैदान परिसरातील दुर्दैवी घटना
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • इसराइल और ईरान के युद्ध में भारत पर क्या असर पड़ सकता है देखें पूरी खबर नकारात्मक और सकारात्मक प्रभाव क्या हो सकते हैं
    1
    इसराइल और ईरान के युद्ध में भारत पर क्या असर पड़ सकता है देखें पूरी खबर नकारात्मक और सकारात्मक प्रभाव क्या हो सकते हैं
    user_Imran Siddiqui
    Imran Siddiqui
    Jalna, Maharashtra•
    21 hrs ago
  • मां-बहन की गाली देने वालों की अब खैर नहीं! देश के भीतर इस जगह लागू हुई सख्त व्‍यवस्‍था, बच्चाें की पढ़ाई के दौरान मोबाइल-टीवी रहेंगे बंद महाराष्ट्र के अहिल्यानगर जिले के कोलगांव गांव ने एक अनोखा नियम लागू किया है. यानी अब अगर कोई व्यक्ति मां-बहन से जुड़ी गालियां देता है तो उस पर 500 रुपये का जुर्माना लगाया जाएगा. ग्राम सभा में पास हुए इस प्रस्ताव का मकसद गांव में सम्मानजनक माहौल बनाना और महिलाओं की गरिमा की रक्षा करना है. जिसकी खूब चर्चा हो रही है.समझते हैं पूरी बात.
    1
    मां-बहन की गाली देने वालों की अब खैर नहीं! देश के भीतर इस जगह लागू हुई सख्त व्‍यवस्‍था, बच्चाें की पढ़ाई के दौरान मोबाइल-टीवी रहेंगे बंद
महाराष्ट्र के अहिल्यानगर जिले के कोलगांव गांव ने एक अनोखा नियम लागू किया है. यानी अब अगर कोई व्यक्ति मां-बहन से जुड़ी गालियां देता है तो उस पर 500 रुपये का जुर्माना लगाया जाएगा. ग्राम सभा में पास हुए इस प्रस्ताव का मकसद गांव में सम्मानजनक माहौल बनाना और महिलाओं की गरिमा की रक्षा करना है. जिसकी खूब चर्चा हो रही है.समझते हैं पूरी बात.
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    9 hrs ago
  • तालुक्यातील मौजे बेलोरा येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या फळबाग, पोखरा योजना तसेच सामाजिक वनीकरण योजनेत गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे कायदेशीर अर्ज सादर करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, गावातील ग्रामरोजगार सहाय्यक व कृषी सहाय्यक यांनी संगनमत करून शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर फळबाग, पोखरा योजना व सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत झाडे प्रत्यक्षात न लावता अनुदान काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाची योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असताना संबंधित अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे, खोटी हजेरी व काल्पनिक अहवाल तयार करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासनाची फसवणूक होण्यासोबतच शेतकऱ्यांचाही विश्वासघात झाल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. शासनाच्या निधीचा अपहार करणे हा भारतीय दंड संहिता व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असल्याने संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी तात्काळ चौकशी समिती नेमून सर्व कागदपत्रे व नोंदींची पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे अनुदान तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेण्यात टाळाटाळ झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
    1
    तालुक्यातील मौजे बेलोरा येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या फळबाग, पोखरा योजना तसेच सामाजिक वनीकरण योजनेत गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे कायदेशीर अर्ज सादर करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, गावातील ग्रामरोजगार सहाय्यक व कृषी सहाय्यक यांनी संगनमत करून शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर फळबाग, पोखरा योजना व सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत झाडे प्रत्यक्षात न लावता अनुदान काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाची योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असताना संबंधित अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे, खोटी हजेरी व काल्पनिक अहवाल तयार करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे शासनाची फसवणूक होण्यासोबतच शेतकऱ्यांचाही विश्वासघात झाल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. शासनाच्या निधीचा अपहार करणे हा भारतीय दंड संहिता व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असल्याने संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.
तसेच या प्रकरणी तात्काळ चौकशी समिती नेमून सर्व कागदपत्रे व नोंदींची पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे अनुदान तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची दखल घेण्यात टाळाटाळ झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • मोतीबागेत कचरा जाळण्याचा प्रकरणात मानपाने कर्मचाऱ्यांवर केली‌ करवाई पाच हजार चा दंड ठोकला
    1
    मोतीबागेत कचरा जाळण्याचा प्रकरणात मानपाने कर्मचाऱ्यांवर केली‌ करवाई पाच हजार चा दंड ठोकला
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.