Shuru
Apke Nagar Ki App…
बाळकृष्ण प्रकाश कदम
More news from महाराष्ट्र and nearby areas
- ❌ पुन्हा MIDC पोलीसांचा प्रताप ❌ नागझरी च्या मुस्लिम परिवाराला 2200रु साठी गावातील सुवर्णा जोगदंड यांच्या परिवाराकडून बेदम मारहाण, अतिशय दुर्दैवी घटना. न्याया साठी सकाळी नऊ वाजल्या पासून MIDC पोलीस स्टेशनं ला पोलिसांनी ठेवलं बसउन, मारहाण करणाऱ्या जोगदंड परिवाराला पाठीशी घालन्याचा भोसले नमक पोलीस अधिकारी यांचा प्रयत्न. नजेमा शेख फिर्याद घेऊन आली असता मारहाण करणाऱ्या ना सांगतात तुम्ही आधी ऍट्रॉसिटी करा शेख यांच्या वर- नाजेमा शेख. लातूर शहरात अजून पोलीस स्टेशन आहेत पण लातूर च्या MIDC पोलीसांचा काही तरी वेगळाच नियम आहे जो ज्याच्या विरोधात तक्रार करायला येतो त्याला धरतात वेठीस आणि जाच्या विरोधात तक्रार असते त्याला म्हणतात तुम्ही आधी तक्रार द्या. रोगा पेक्षा औषधं भयंकर असच म्हणावं लागेल MIDC पोलिसांच्या बाबतीत. आता जनता ठरवेल नेमक काय हा प्रकार आणि काय MIDC पोलिसांची पद्धत.1
- Post by Sunil Gawali1
- धनादेश न वाटल्यामुळे लातूरच्या बांधकाम व्यावसायिकास सहा महिने कारावास; १० लाख ६८ हजार नुकसानभरपाईचा आदेश लातूर (प्रतिनिधी) : बँकांची विश्वासार्हता कायम टिकून राहिली पाहिजे, या दृष्टीने धनादेश अनादराच्या प्रकरणांमध्ये आता न्यायव्यवस्था देखील कठोर भूमिका घेऊ लागले आहेत. अशाच एका धनादेश अनादरणाच्या प्रकरणात लातूर येथील न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत लातूर तालुक्यातील धनेगाव येथील बांधकाम व्यावसायिक शंकर सूर्यकांत चामले यांना सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच १० लाख ६८ हजार रुपयांची नुकसानभरपाई फिर्यादीस देण्याचे आदेश दिले आहेत. बांधकाम साहित्य भाड्याने देणारे व्यावसायिक बालाजी विरप्पा होनराव यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला होता. फिर्यादीकडून आरोपीने विविध बांधकाम साहित्य भाडेतत्त्वावर घेतले होते. त्या बदल्यात देय असलेल्या रकमेपोटी आरोपीने धनादेश दिला; मात्र संबंधित धनादेश बँकेत सादर केल्यानंतर खात्यात अपुरी शिल्लक असल्याने तो अनादरित झाला. त्यानंतर फिर्यादीने कायद्यानुसार आरोपीस नोटीस बजावून ठरावीक कालावधीत रक्कम अदा करण्याची मागणी केली; परंतु आरोपीकडून कोणताही समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले. सुनावणीदरम्यान फिर्यादीकडील कागदपत्रे, बँकेचे परताव्याचे मेमो, नोटीसची प्रत तसेच इतर पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायदंडाधिकारी सौ. एस. पी. केस्तगीकर (नलगे) यांनी आरोपीस दोषी ठरवत सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच फिर्यादीस १० लाख ६८ हजार रुपये नुकसानभरपाई दोन महिन्यांच्या आत अदा करण्याचे आदेश दिले. ही रक्कम मुदतीत न भरल्यास आरोपीस अतिरिक्त दोन महिने साधी कैद भोगावी लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट नमूद केले आहे. या प्रकरणात फिर्यादीची बाजू ॲड. राहुल पांडे यांनी प्रभावीपणे मांडली. त्यांना ॲड. सुशील मोरे आणि ॲड. प्रकाश कुलकर्णी यांनी सहकार्य केले. या निकालामुळे चेक अनादरणाच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाकडून कठोर भूमिका घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले असून व्यावसायिक व्यवहार करताना आर्थिक शिस्त पाळण्याचा संदेश या निकालातून देण्यात आला आहे.1
- परभणी (प्रतिनिधी) :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरात उत्साह, अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते. या निमित्ताने जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः रक्तदान करून समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली. त्यांच्या या प्रेरणादायी कृतीमुळे युवकांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला असून अनेकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेत सहभाग नोंदवला. “शिवरायांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी कार्य करणे हीच खरी सेवा आहे,” असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त परभणी शहरात उत्साह, सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.1
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव साजरी1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- शास्त्री विद्यालयात शिवजयंती साजरी उदगीर (प्रतिनिधी) येथील लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात शिवजयंती संपन्न झाली.याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृष्णा मारावार, तर प्रमुख पाहुण्या आशा मोरे, पर्यवेक्षक किरण नेमट, माधव मठवाले, कार्यक्रम प्रमुख विश्वजीत श्रीखंडे उपस्थित होते. यावेळी कल्याणी महामुनी हीने शिवरायांच्या सर्वधर्मसमभाव या भूमिकेबद्दल भाषण केले तर प्रमुख पाहुण्या आशा मोरे यांनी आदर्श राज्यकर्ता, मुत्सद्दी व कर्तुत्ववान राजा हे शिवरायांचे गुणवैशिष्ट्ये आपल्या भाषणात विशद केले. अध्यक्ष समारोपात कृष्णा मारावार यांनी शिवरायांच्या विलक्षण व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय शिवशट्टे यांनी तर प्रास्ताविक विश्वजीत श्रीखंडे, स्वागत व परिचय मनीषा आचार्य तर आभार मच्छिंद्र सोनकांबळे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता प्रीती शेंडे यांच्या कल्याणमंत्रानी झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभ्यासपूरक मंडळ प्रमुख अनिता येलमटे सहप्रमुख निलेश मांडवकर यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.1
- तलवाडा येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त1
- LIVE || पवित्र रमज़ान के मद्देनज़र तुरंत विभिन्न उपाययोजनाएँ करने का निर्देश. #ramadan #20261