शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयाच्या खाटेवरूनच राज्य सरकारला खणखणीत इशारा दिला आहे. अन्नत्याग आंदोलन स्थगित करताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कर्जमाफीचे निकष बदलण्यासंदर्भात सरकारसोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने दिलेला हा शब्द पाळावा, हवे तर आणखी चार-पाच दिवसांचा वेळ घ्यावा, मात्र सकारात्मक निर्णय घ्यावा; अन्यथा शेतकऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडेल आणि त्याचे परिणाम राज्य सरकारला भोगावे लागतील, अशी गर्जना तुपकर यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना केली आहे. तुपकर यांनी १५ जूनपासून बुलढाणा येथील निवासस्थानासमोर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्ती, पीकविमा आणि अन्य २३ मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. सुरुवातीला सरकारने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले होते, ज्यामुळे तुपकर यांची प्रकृती खालावत गेली. याच वेळी राज्यभरातील शेतकऱ्यांचा संतापही उफाळून आला. अनेक ठिकाणी आंदोलनांनी आक्रमक वळण घेतले; एसटी बस जाळणे, सरकारी कार्यालयांवर हल्ले, आत्मदहनाचे प्रयत्न, जाळपोळ, तलाठी कार्यालये आणि शासकीय वाहनांची तोडफोड अशा घटनांनी प्रशासन हादरून गेले होते. राज्यातील ग्रामीण भागात असंतोषाचा जणू स्फोटच झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली. अखेर, पाचव्या दिवशी सरकार झुकले आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेत तुपकर यांच्याशी चर्चा केली. कर्जमाफी संदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन दिल्यानंतर, शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन आणि सरकारला संधी देण्याच्या भूमिकेतून तुपकर यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. मात्र, या अन्नत्याग आंदोलनामुळे तुपकर यांना स्वतःच्या प्रकृतीने मोठी किंमत चुकवावी लागली. त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी धोकादायकरीत्या घसरली होती, किटोनचे प्रमाण वाढले आणि किडनीवर परिणाम झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी, सरकारने दिलेला शब्द विसरू नये अशी आठवण त्यांनी रुग्णालयाच्या खाटेवरूनच करून दिली आहे. जर सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, तर यावेळी संघर्ष अधिक तीव्र होईल, असे सांगत तुपकर यांनी, 'मी स्वतः मुंबईत येऊन आंदोलनाला बसेल आणि एकदा बसल्यावर उठणार नाही,' असा निर्धार व्यक्त केला. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल, तसेच 'शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका,' असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयाच्या खाटेवरूनच राज्य सरकारला खणखणीत इशारा दिला आहे. अन्नत्याग आंदोलन स्थगित करताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कर्जमाफीचे निकष बदलण्यासंदर्भात सरकारसोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने दिलेला हा शब्द पाळावा, हवे तर आणखी चार-पाच दिवसांचा वेळ घ्यावा, मात्र सकारात्मक निर्णय घ्यावा; अन्यथा शेतकऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडेल आणि त्याचे परिणाम राज्य सरकारला भोगावे लागतील, अशी गर्जना तुपकर यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना केली आहे. तुपकर यांनी १५ जूनपासून बुलढाणा येथील निवासस्थानासमोर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्ती, पीकविमा आणि अन्य २३ मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. सुरुवातीला सरकारने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले होते, ज्यामुळे तुपकर यांची प्रकृती खालावत गेली. याच वेळी राज्यभरातील शेतकऱ्यांचा संतापही उफाळून आला. अनेक ठिकाणी आंदोलनांनी आक्रमक वळण घेतले; एसटी बस जाळणे, सरकारी कार्यालयांवर हल्ले, आत्मदहनाचे प्रयत्न, जाळपोळ, तलाठी कार्यालये आणि शासकीय वाहनांची तोडफोड अशा घटनांनी प्रशासन हादरून गेले होते. राज्यातील ग्रामीण भागात असंतोषाचा जणू स्फोटच झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली. अखेर, पाचव्या दिवशी सरकार झुकले आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेत तुपकर यांच्याशी चर्चा केली. कर्जमाफी संदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन दिल्यानंतर, शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन आणि सरकारला संधी देण्याच्या भूमिकेतून तुपकर यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. मात्र, या अन्नत्याग आंदोलनामुळे तुपकर यांना स्वतःच्या प्रकृतीने मोठी किंमत चुकवावी लागली. त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी धोकादायकरीत्या घसरली होती, किटोनचे प्रमाण वाढले आणि किडनीवर परिणाम झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी, सरकारने दिलेला शब्द विसरू नये अशी आठवण त्यांनी रुग्णालयाच्या खाटेवरूनच करून दिली आहे. जर सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, तर यावेळी संघर्ष अधिक तीव्र होईल, असे सांगत तुपकर यांनी, 'मी स्वतः मुंबईत येऊन आंदोलनाला बसेल आणि एकदा बसल्यावर उठणार नाही,' असा निर्धार व्यक्त केला. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल, तसेच 'शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका,' असा इशाराही त्यांनी दिला आहे.
- महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आक्रमक भूमिका घेताना दिसली आहे. पक्षाने फुटलेल्या सहा खासदारांच्या विरोधात 'भीक मांगो' आंदोलन छेडले.1
- महाराष्ट्रामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांसाठी आता नवीन कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.1
- जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे काल रात्री झालेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. तब्बल साडेसात तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने गावकऱ्यांना रात्रभर अंधारात काढावी लागली. विशेष म्हणजे, पर्यायी व्यवस्था उपलब्ध असूनही, केवळ स्थानिक वायरमनच्या मद्यधुंद अवस्थेमुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. काल रात्री सात वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हजेरीनंतर सुनगाव येथील वीजपुरवठा बंद झाला. सुनगाव गावाला तीन क्रमांकाच्या सबस्टेशनवरून इमर्जन्सीमध्ये वीजपुरवठा करण्याची सोय उपलब्ध असतानाही, रात्री अडीच वाजेपर्यंत वीज आली नाही. यामुळे संतप्त झालेल्या ३० ते ४० गावकऱ्यांनी थेट जामोद सबस्टेशन गाठले. तिथे पोहोचल्यानंतरही संबंधित वायरमन महेंद्र सोळंके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर गावकऱ्यांनी कनिष्ठ अभियंता (जे.ई.) हिंगणे यांच्याशी संपर्क साधून शनी मंदिर सबस्टेशन गाठले. तिथे पोहोचल्यावर वायरमन महेंद्र सोळंके हे पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. जे.ई. साहेबांसमोर त्यांनी स्वतःहून दारू प्यायल्याची कबुली दिली. हा सर्व प्रकार घडत असतानाच, विद्युत विभागाचे कर्मचारी रवी नानग्दे यांनी रात्री अवघ्या १५ ते २० मिनिटांत तांत्रिक बिघाड (फॉल्ट) दुरुस्त केला आणि रात्री २:४० च्या सुमारास गावाची वीज सेवा सुरळीत केली. एका जबाबदार शासकीय पदावर असूनही ड्युटीवर दारूच्या नशेत आढळणे आणि जनतेला रात्रभर अंधारात ठेवणे, हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. आता या मद्यधुंद वायरमनवर कनिष्ठ अभियंता हिंगणे नेमकी काय कारवाई करतात, याकडे सुनगावच्या ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.1
- जून महिना अर्ध्याहून अधिक संपला असला तरी, अपेक्षित पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. एकीकडे आकाशात ढगांचा मागमूस नसताना, दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. पावसाअभावी शेतीची कामे थांबली असून, ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी जूनमध्ये मान्सून सक्रिय झाल्यावर शेतकरी पेरणी करतात. मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. बियाणे, खते आणि शेतीची पूर्वतयारी करूनही पावसाअभावी पेरणी रखडली आहे. पर्यावरण अभ्यासकांच्या मते, वाढती वृक्षतोड, कमी होत जाणारे हरित क्षेत्र आणि बदलते हवामान यामुळे पावसाचे प्रमाण व वितरण अनियमित झाले असून, वातावरणातील नैसर्गिक समतोल बिघडला आहे. दरम्यान, तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि शेतमजूर यांना सर्वाधिक फटका बसत असून, पंखे, कुलर आणि एसी सुरू असूनही उकाड्यापासून दिलासा मिळत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. पाण्याचे स्रोतही वेगाने आटत असल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे. कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पाऊस आणखी लांबल्यास खरीप हंगामावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपली हतबलता व्यक्त करताना म्हटले आहे की, "आकाशात ढग नाहीत, शेतात ओलावा नाही आणि वाढत्या उकाड्याने जीव कासावीस झाला आहे." पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी आणि उष्णतेने त्रस्त नागरिक आता एकच प्रार्थना करत आहेत की, "लवकर बरस रे मेघा, अन्यथा संकट आणखी गडद होईल!"1
- सिल्लोड तालुक्यातील भराडी गावातील उर्दू शाळेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान शेख उसामा यांनी इंग्रजी भाषेत आपले भाषण दिले.1
- वानखेडमध्ये तलाठी कार्यालयाच्या जागेसंदर्भात एक निर्णय ग्रामपंचायतीला डावलून घेतल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.1
- अधिकारी तुकाराम मुंढे यांनी गुटखा विक्रेत्यांना थेट चेतावणी दिली आहे. बंदी असलेल्या गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर ‘मोक्का’ (MCOCA) लावण्याचे आदेश त्यांनी जारी केले आहेत. तुकाराम मुंढे यांची ही धडक कारवाई मानली जात आहे.1
- औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील जरंडी-बनोटी परिसरात बुधवारी सायंकाळी सुमारे दीड तास ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळला, ज्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. या अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, अनेक ठिकाणी पाणी रस्त्यांवरून वाहत असल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पावसाचा जोर इतका होता की शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले असून, उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यात सोयाबीन, मका, कापूस व इतर खरीप पिकांना फटका बसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच, काही गावांना जोडणारे अंतर्गत रस्ते जलमय झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. नदी-नाल्यांमधील पाण्याची पातळी वेगाने वाढल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नुकसानग्रस्त भागांचा तातडीने पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.1