Shuru
Apke Nagar Ki App…
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि पुढे पंतप्रधान व्हावेत - आमदार सिद्धार्थ खरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि पुढे पंतप्रधान व्हावेत - आमदार सिद्धार्थ खरात
विष्णु आखरे पाटील
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि पुढे पंतप्रधान व्हावेत - आमदार सिद्धार्थ खरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि पुढे पंतप्रधान व्हावेत - आमदार सिद्धार्थ खरात
More news from महाराष्ट्र and nearby areas
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि पुढे पंतप्रधान व्हावेत - आमदार सिद्धार्थ खरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि पुढे पंतप्रधान व्हावेत - आमदार सिद्धार्थ खरात1
- बुलढाणा जिल्ह्यातून सरकारला एक मोठा प्रश्न विचारला गेला आहे. रविकांत तुपकरांचा प्रश्न आहे की, 'नियमित कर्ज भरून आम्ही पाप केलंय का?' त्यांनी सरकारला हा संतप्त प्रश्न विचारला आहे. त्यांच्या मते, शेतकऱ्यांनी कर्ज नियमितपणे भरले तरी त्यांच्यासाठी काही केले जात नाही. रविकांत तुपकरांचा हेही आरोप आहे की, सरकार शेतकऱ्यांना फक्त ५० हजार रुपये देण्याची योजना आखत आहे, मात्र त्यांच्या मते शेतकऱ्यांना २ लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे लागेल. त्यांच्या मते, सरकारने जर शेतकऱ्यांची मागणी पूर्ण केली नाही तर महाराष्ट्रात पुन्हा आंदोलन सुरू होईल. त्यांनी राज्यव्यापी दौऱ्यातून नव्या आक्रमक आंदोलनाचे संकेत दिले आहेत. त्यांच्या मते, सरकारने जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केली नाहीत तर महाराष्ट्रात पुन्हा आंदोलन सुरू होईल. शेतकरी आता सरकारच्या धोरणांपासून निराश झाले आहेत आणि त्यांच्या मते सरकारने जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केली नाही तर शेतकरी सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार आहेत.1
- शेतकरी नेते रविकांत तुपकर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या नाराजीचा आवाज बुलंद करत आहेत. त्यांनी एक संतप्त प्रश्न उपस्थित केला आहे की, 'नियमित कर्ज भरून आम्ही पाप केलंय का?' या प्रश्नाच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या असंतुष्टीला बल देत आहेत. तुपकर यांची ठाम मागणी आहे की, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान न देता ते थेट २ लाख रुपये करावे. ते सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर असून शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन पुढील आंदोलनाची रणनीती आखत आहेत. सरकारने ही मागणी तातडीने मान्य केली नाही, तर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा तुपकर यांनी दिला आहे. क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष तथा संस्थापक असलेले रविकांत तुपकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.1
- गोपाळनगरमध्ये जुगारावर पोलिसांची धाड; ११ जणांवर गुन्हा खामगाव : गोपाळनगर परिसरात बेकायदेशीरपणे एका घरात सुरू असलेल्या 'एक्का-बादशहा' जुगारावर शिवाजीनगर पोलिसांनी धाड टाकून ११ जुगारींना रंगेहात पकडले आहे.या कारवाईत रोख रकमेसह मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण ४५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन कौटुंबिक त्रासाबाबत तक्रार दिली होती.या तक्रारीच्या शहानिशेसाठी पोलीस पथक गोपाळनगर येथे गेले असता, उमेश चव्हाण याच्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत पैशांच्या हार-जीतवर ५२ ताश पत्यांचा 'एक्का-बादशहा' जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.पोलीस निरीक्षक मंदार पुरी यांच्या मार्गदर्शनानुसार, पोउपनि अमित तळोले आणि सहकाऱ्यांच्या मदतीने पंचासमक्ष सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाईत उमेश जीवनसिंग चव्हाण, जयसिंग प्रल्हाद सोळंके , नितीन आत्माराम बिलारे, आकाश रामेश्वर लाहुडकर,सूर्यकांत सुखदेव निमकर्डे,विजय काशिराम सुलताने,केशव सिताराम टाले,गुलचंद रामसिंग चव्हाण,पुरुषोत्तम दादाराव वखारे,अंबादास शिवनारायण जाधव,शंकर विठ्ठल कुकडे सर्व रा.गोपाळनगर या ११ जणांना जागीच पकडण्यात आले,तर काही इसम घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले.कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींन कडून नगदी,मोबाईल व इतर साहित्यासह इतर असा एकूण ४५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल अमरसिंग पवार यांच्या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.1
- दिवसाढवळ्या 9 लाखांची रक्कम लंपास, भोकरदन पोलिसांची धडाकेबाज कारवाई . मध्य प्रदेशातून 8 लाख 80 हजार हस्तगत, 3 आंतरराज्य चोरटे गजाआड महिलांचा विश्वास परत मिळवला बचत गटाच्या महिलांनी पोलिसांचा केला सत्कार भोकरदन शहर आणि परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या 9 लाख रुपयांच्या चोरी प्रकरणाचा भोकरदन पोलिसांनी अवघ्या 5 दिवसांत छडा लावला आहे. मध्य प्रदेशातील राजगड आणि गुणा जिल्ह्यातून 3 आंतरराज्य चोरट्यांना अटक करून 8 लाख 80 हजार रुपये रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. या धडाकेबाज कारवाईने कोटा जहागीर येथील जय योगेश्वर बचत गटाच्या महिलांचा जीव भांड्यात पडला असून त्यांनी पोलिसांचा सत्कार करून आभार मानले दि. 23 जुलै 2026 रोजी दुपारी 4 ते 4.30 च्या सुमारास कोटा जहागीर येथील जय योगेश्वर बचत गटाच्या महिला बबीता भागाजी इच्चे वय 40 या भारतीय स्टेट बँक भोकरदन शाखेतून बचत गटाचे 9 लाख रुपये काढून त्यांच्या पिकअप वाहन क्रमांक MH-21-BH-0504 मध्ये ठेवून भोकरदन ते जाफ्राबाद रोडवरील रत्नमाला लॉनजवळ चहा पिण्यासाठी थांबल्या. काही क्षणांतच अज्ञात चोरट्यांनी वाहनाची डावी बाजूची काच फोडून आतील रोख रक्कम लंपास केली. या घटने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. गुन्हा दाखल होताच मा. पोलीस अधीक्षक श्री. तेघबीरसिंह संधू, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. किरण बिडवे यांनी विशेष पथक तयार केले. पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच SBI बँक आणि परिसरातील CCTV फुटेज तपासले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरटे मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील गुलखेडी येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपनिरीक्षक राहुल बांगर, संतोष बनकर, पोलीस अंमलदार यांच्या पथकाने तात्काळ मध्य प्रदेशात धाव घेऊन 3 आरोपींना ताब्यात घेतले. 1.राहुल उत्तम सिसोदीया वय 22, रा. गुलखेडी, ता. पचोर, जि. राजगड 2.कालू उर्फ शिवप्रसाद सिसोदीया, रा. कडीया, ता. पचोर, जि. राजगड 3.कल्लू उर्फ जगप्रकाश सांसी वय 25, रा. मुगावली, ता. गुणा, जि. अशोकनगर आरोपींकडून 8 लाख 80 हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले पोलिसांच्या तपासात समोर आले की, हे आरोपी टोळीने काम करतात. एकजण बँकेत आणि सोन्याच्या दुकानात रेकी करतो, तर दुसरा वाहनासह बाहेर लक्ष ठेवतो. गुन्हा करून ते लगेच लॉजवर थांबत नाहीत आणि मोटारसायकलसह हेल्मेटचा वापर करतात पोलिसांनी हस्तगत केलेली रक्कम आज भोकरदन पोलीस स्टेशनच्या आवारात बचत गटाच्या महिलांना परत करण्यात आली. पैसे परत मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. महिलांनी पोलीस निरीक्षक किरण बिडवे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी बचत गटाच्या महिला म्हणाल्या, आमची आयुष्यभराची पुंजी होती. पोलीसांनी ती परत मिळवून दिली. आमचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. या प्रकरणानंतर पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मोठी रक्कम एकट्याने घेऊन जाऊ नये. शक्यतो ऑनलाईन व्यवहार करावा. रक्कम उघडपणे दाखवू नये. बँकेतून पैसे काढल्यानंतर थेट घरी किंवा ऑफिसला जावे. निर्जन ठिकाणी वाहन थांबवू नये. संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ 112 किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. या यशस्वी कारवाईबद्दल मा. पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू यांनी संपूर्ण भोकरदन पोलीस टीमचे कौतुक केले आहे. इसरारखान पठाण पत्रकार भोकरदन तर्फे भोकरदन पोलिसांच्या या तत्पर आणि व्यावसायिक कामगिरीचे अभिनंदन!4
- सीसीटीव्हीत कैद झाला भामट्याचा कारनामा; गंगापूरच्या सराफा दुकानातून दीड तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास सीसीटीव्हीत कैद झाला भामट्याचा कारनामा; गंगापूरच्या सराफा दुकानातून दीड तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरातील एका सराफा दुकानात ग्राहक बनून आलेल्या एका भामट्याने दीड तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती सराफा दुकानात ग्राहक असल्याचे भासवत आला. त्याने विविध दागिने पाहिल्यानंतर दीड तोळ्याची सोन्याची अंगठी पाहण्यासाठी घेतली. संधी साधत त्याने अंगठी स्वतःजवळ ठेवली आणि दुकानातून बाहेर पडत पोबारा केला. काही वेळाने अंगठी नसल्याचे लक्षात आल्यानंतर दुकान मालकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे गंगापूरमधील सराफा व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, ग्राहकांना दागिने दाखविताना अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे.1
- जळणा जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातले वालसावंगी गावात असलेल्या मिनी आरोग्य केंद्राचा पहिल्याच पावसात पोलखोल झाला आहे. केंद्राच्या इमारतीची स्थिती खूपच खराब असल्याचे समोर आले आहे. पावसामुळे इमारतीचा एक भाग कोसळण्याची शक्यता असल्याचे स्थानिक रहिवासी सांगत आहेत. या केंद्राच्या बांधकामावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहेत. रहिवाशांनी जिल्हा आरोग्य विभागाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्हे उभी केली आहेत. त्यांच्या मते, केंद्राच्या देखभालीवर पुरेसे लक्ष दिले जात नाही. यामुळे, नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करणे कठीण झाले आहे. स्थानिक रहिवाशांनी जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांना या समस्यांबाबत तत्पर लक्ष देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, केंद्राची त्वरित दुरुस्ती करणे आवश्यक आहे, ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होऊ शकतील.1
- नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने तातडीने २ लाखांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर करावे - शेतकरी नेते रविकांत तुपकर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने तातडीने २ लाखांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर करावे - शेतकरी नेते रविकांत तुपकर1