आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम, भूकंपामुळे इमारत कोसळली; जखमींना तातडीने मदत लातूर (प्रतिनिधी) : जिल्हा क्रीडा संकुल परिसरात मोठा आवाज झाला. भूकंपाच्या धक्क्याने येथील इमारत कोसळल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून स्थानिक अग्निशमन पथक, आपदा मित्रांचे शोध व बचाव पथक तसेच रुग्णवाहिका आणि आरोग्य पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. हा प्रसंग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भूकंप विषयक आपत्ती व्यवस्थापना च्या रंगीत तालमीचा होता. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर-घुगे, औसा-रेणापूर उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, औसा तहसीलदार घनश्याम अडसूळ, पुणे येथील एनडीआरएफचे सहाय्यक कमांडंट गौरव जांकटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.भूकंपामुळे दुमजली इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस नियंत्रण लातूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला आणि आरोग्य विभागालाही तात्काळ सूचित करण्यात आले. पोलीस पथक, अग्निशमन वाहन, होमगार्ड, रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक, आपदा मित्र हे काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. ‘इन्सीडंट रेस्पॉन्स सिस्टम’ (आयआरएस) नुसार इन्सीडंट कमांडर, ऑपरेशनल चीफ, लायझन ऑफिसर, इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर प्रभारी, जनसंपर्क अधिकारी यांनी त्वरित जबाबदाऱ्या पार पाडल्या. घटनास्थळी वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आणि इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर कार्यान्वित झाले. पोलिसांनी परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. पोलीस, आपदा मित्र आणि अग्निशमन दलाने जखमींचा शोध घेऊन त्यांना वैद्यकीय पथकाकडे पाठवण्यास सुरुवात केली. इमारतीत लागलेली आग अग्निशमन पथकाने नियंत्रणात आणली. इमारतीखाली काही जण अडकले असण्याची शक्यता लक्षात घेऊन इन्सीडंट कमांडरांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाशी (एनडीआरएफ) संपर्क साधला आणि शोध व बचाव पथक मागवले. एनडीआरएफ पथक दाखल होण्यापूर्वी स्थानिक पथकांनी चार जखमींना उपचारासाठी रवाना केले. अजयकुमार यादव यांच्या नेतृत्वा खालील एनडीआरएफ पथकाने घटनास्थळी पोहोचून इन्सीडंट कमांडर घनश्याम अडसूळ यांच्याकडून परिस्थिती जाणून घेतली. इमारतीत आणखी आठ जण अडकले असल्याचे समजताच त्यांनी शोध कार्य सुरू केले. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पाच जणांची सुटका करून त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आले. इतर व्यक्तीचा ठावठिकाणा समजत नसल्याने एनडीआरएफच्या प्रशिक्षित श्वान पथकाची मदत घेण्यात आली. श्वानाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीचे ठिकाण शोधून दिले. विविध साधनांचा वापर करून बेशुद्धावस्थेतील गंभीर जखमीला बाहेर काढण्यात आले आणि त्यालाही रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठवले. भूकंपग्रस्त इमारतीच्या लगत असलेल्या एका बसमध्ये एक व्यक्ती अडकल्याची माहिती मिळताच ऑपरेशनल चीफने एनडीआरएफ पथकाला सूचना दिल्या. कटिंग टीम आणि व्हीएलएस उपकरणांच्या सहाय्याने त्या व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली. श्वान पथकाच्या मदतीने तपासणी करून इमारतीत आणखी कोणी अडकले नसल्याची खात्री पटल्यानंतर इन्सीडंट कमांडरांनी शोध व बचाव मोहीम थांबवल्याची घोषणा केली. भूकंपासारख्या आपत्तीच्या वेळी सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधणे, त्यांची क्षमता वाढवणे यासाठी ही रंगीत तालिम आयोजित करण्यात आली होती. सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी चोखपणे बजावली, आणि जखमींना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. याप्रसंगी तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी इन्सीडंट कमांडर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी यांनी डेप्युटी इन्सिडेंट कमांडर म्हणून जबाबदारी पार पाडली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ लातूर उपकेंद्राचे डॉ. प्रमोद पाटील, एम. ए. खान, महानगर गॅसचे सेफ्टी ऑफिसर अक्षय कुचेकर यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. लायजनिंग ऑफिसर म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद कलमे, कमांड पोस्ट प्रमुख म्हणून नंदकिशोर करले, कम्युनिकेशन पोस्ट प्रमुख म्हणून श्रीमती शीतल शिंदे व श्रीराम वाघमारे, स्थानिक ऑपरेशन प्रमुख म्हणून अग्निशमन अधिकारी बापू किरण देशमुख, उदगीरचे अग्निशमन अधिकारी क्षीरसागर, अहमदपूरचे अग्निशमन अधिकारी कैलास सोनकांबळे, मेडिकल पोस्ट प्रमुख म्हणून डॉ. विशाल गरड, तसेच लॉ अँड ऑर्डर प्रमुख म्हणून पोलीस उपनिरीक्षक मुख्तार शेख यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागातील श्रीराम वाघमारे, इनायत पटेल, सय्यद गफार आणि श्रीमती आफ्रोज शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. पोलीस दल, लातूर महानगरपालिका अग्निशमन दल, आरोग्य विभाग, डायल 108 रुग्णवाहिका, विविध महाविद्यालयांतील एनसीसी विद्यार्थी आणि आपदा मित्र यांनी या तालमीत सहभाग नोंदविला. जिल्हा क्रीडा संकुलात अत्याधुनिक शोध व बचाव साहित्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. नागरिक आणि विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली. स्थानिक बचाव पथकांसाठी लवकरच प्रशिक्षणाचे आयोजन : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात आलेल्या पूर परिस्थितीत स्थानिक शोध व बचाव पथकांनी उत्तम कामगिरी केली होती. भूकंपासारख्या आपत्तीच्या वेळी नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी स्थानिक पथकांना एनडीआरएफच्या सहकार्याने लवकरच प्रशिक्षण आयोजित केले जाईल, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. तसेच या रंगीत तालमीत सर्व विभागांनी चांगली कामगिरी केल्याचे त्यांनी नमूद केले.
आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम, भूकंपामुळे इमारत कोसळली; जखमींना तातडीने मदत लातूर (प्रतिनिधी) : जिल्हा क्रीडा संकुल परिसरात मोठा आवाज झाला. भूकंपाच्या धक्क्याने येथील इमारत कोसळल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून स्थानिक अग्निशमन पथक, आपदा मित्रांचे शोध व बचाव पथक तसेच रुग्णवाहिका आणि आरोग्य पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. हा प्रसंग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भूकंप विषयक आपत्ती व्यवस्थापना च्या रंगीत तालमीचा होता. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर-घुगे, औसा-रेणापूर उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, औसा तहसीलदार घनश्याम अडसूळ, पुणे येथील एनडीआरएफचे सहाय्यक कमांडंट गौरव जांकटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.भूकंपामुळे दुमजली इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस नियंत्रण लातूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला आणि आरोग्य विभागालाही तात्काळ सूचित करण्यात आले. पोलीस पथक, अग्निशमन वाहन, होमगार्ड, रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक, आपदा मित्र हे काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. ‘इन्सीडंट रेस्पॉन्स सिस्टम’ (आयआरएस) नुसार
इन्सीडंट कमांडर, ऑपरेशनल चीफ, लायझन ऑफिसर, इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर प्रभारी, जनसंपर्क अधिकारी यांनी त्वरित जबाबदाऱ्या पार पाडल्या. घटनास्थळी वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आणि इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर कार्यान्वित झाले. पोलिसांनी परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. पोलीस, आपदा मित्र आणि अग्निशमन दलाने जखमींचा शोध घेऊन त्यांना वैद्यकीय पथकाकडे पाठवण्यास सुरुवात केली. इमारतीत लागलेली आग अग्निशमन पथकाने नियंत्रणात आणली. इमारतीखाली काही जण अडकले असण्याची शक्यता लक्षात घेऊन इन्सीडंट कमांडरांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाशी (एनडीआरएफ) संपर्क साधला आणि शोध व बचाव पथक मागवले. एनडीआरएफ पथक दाखल होण्यापूर्वी स्थानिक पथकांनी चार जखमींना उपचारासाठी रवाना केले. अजयकुमार यादव यांच्या नेतृत्वा खालील एनडीआरएफ पथकाने घटनास्थळी पोहोचून इन्सीडंट कमांडर घनश्याम अडसूळ यांच्याकडून परिस्थिती जाणून घेतली. इमारतीत आणखी आठ जण अडकले असल्याचे समजताच त्यांनी शोध कार्य सुरू केले. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पाच जणांची सुटका करून त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आले. इतर व्यक्तीचा ठावठिकाणा समजत नसल्याने एनडीआरएफच्या प्रशिक्षित श्वान पथकाची मदत घेण्यात आली. श्वानाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीचे ठिकाण शोधून दिले. विविध साधनांचा वापर करून बेशुद्धावस्थेतील गंभीर जखमीला बाहेर
काढण्यात आले आणि त्यालाही रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठवले. भूकंपग्रस्त इमारतीच्या लगत असलेल्या एका बसमध्ये एक व्यक्ती अडकल्याची माहिती मिळताच ऑपरेशनल चीफने एनडीआरएफ पथकाला सूचना दिल्या. कटिंग टीम आणि व्हीएलएस उपकरणांच्या सहाय्याने त्या व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली. श्वान पथकाच्या मदतीने तपासणी करून इमारतीत आणखी कोणी अडकले नसल्याची खात्री पटल्यानंतर इन्सीडंट कमांडरांनी शोध व बचाव मोहीम थांबवल्याची घोषणा केली. भूकंपासारख्या आपत्तीच्या वेळी सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधणे, त्यांची क्षमता वाढवणे यासाठी ही रंगीत तालिम आयोजित करण्यात आली होती. सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी चोखपणे बजावली, आणि जखमींना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. याप्रसंगी तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी इन्सीडंट कमांडर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी यांनी डेप्युटी इन्सिडेंट कमांडर म्हणून जबाबदारी पार पाडली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ लातूर उपकेंद्राचे डॉ. प्रमोद पाटील, एम. ए. खान, महानगर गॅसचे सेफ्टी ऑफिसर अक्षय कुचेकर यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. लायजनिंग ऑफिसर म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद कलमे, कमांड पोस्ट प्रमुख म्हणून नंदकिशोर करले, कम्युनिकेशन पोस्ट प्रमुख म्हणून श्रीमती शीतल शिंदे व श्रीराम वाघमारे, स्थानिक ऑपरेशन
प्रमुख म्हणून अग्निशमन अधिकारी बापू किरण देशमुख, उदगीरचे अग्निशमन अधिकारी क्षीरसागर, अहमदपूरचे अग्निशमन अधिकारी कैलास सोनकांबळे, मेडिकल पोस्ट प्रमुख म्हणून डॉ. विशाल गरड, तसेच लॉ अँड ऑर्डर प्रमुख म्हणून पोलीस उपनिरीक्षक मुख्तार शेख यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागातील श्रीराम वाघमारे, इनायत पटेल, सय्यद गफार आणि श्रीमती आफ्रोज शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. पोलीस दल, लातूर महानगरपालिका अग्निशमन दल, आरोग्य विभाग, डायल 108 रुग्णवाहिका, विविध महाविद्यालयांतील एनसीसी विद्यार्थी आणि आपदा मित्र यांनी या तालमीत सहभाग नोंदविला. जिल्हा क्रीडा संकुलात अत्याधुनिक शोध व बचाव साहित्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. नागरिक आणि विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली. स्थानिक बचाव पथकांसाठी लवकरच प्रशिक्षणाचे आयोजन : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात आलेल्या पूर परिस्थितीत स्थानिक शोध व बचाव पथकांनी उत्तम कामगिरी केली होती. भूकंपासारख्या आपत्तीच्या वेळी नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी स्थानिक पथकांना एनडीआरएफच्या सहकार्याने लवकरच प्रशिक्षण आयोजित केले जाईल, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. तसेच या रंगीत तालमीत सर्व विभागांनी चांगली कामगिरी केल्याचे त्यांनी नमूद केले.
- संस्काराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या गुरु कडून आशीर्वाद हेच जीवनाचे साफल्य - रामभाऊ तिरुके उदगीर (एल पी उगीले) उदगीर तालुक्यातील वाढवणा जिल्हा परिषद गटामधून भारतीय जनता पक्षाचे नेते रामभाऊ तिरुके विजयी झाल्यानंतर त्यांनी आपल्यावर संस्कार केलेल्या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत संस्कार करणारे, शिक्षणाची भक्कम पायाभरणी करून देणारे मार्गदर्शक तथा शिक्षक शिवाजीराव पांचाळ गुरुजी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत आशीर्वाद घेतले. गुरु पेक्षा शिष्य मोठा व्हावा, तोच गुरुला खरा आनंद असतो. भावनेने प्रचंड आनंदाने त्यांनी रामभाऊ तिरुके यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद घेतल्यानंतर बोलताना रामभाऊ तिरुके म्हणाले की, प्राथमिक शिक्षणाच्या त्या मजबूत पायावर उभा राहूनच मी पुढील शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक वाटचाल सुरू ठेवू शकलो. गेली ३२ वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यकर्ता म्हणून काम करत असताना लोकांनी दिलेला विश्वास, उभं केलेलं काम आणि चार वेळा जिल्हा परिषद निवडणूक लढवताना तीन वेळा जनतेने माझ्यावर उधळलेला विजयाचा गुलाल, हे सर्व ऐकून आणि पाहून गुरुजींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान होता. गुरुजींचे आशीर्वाद हेच माझे खरे बळ असून त्यांच्या कृपाशिर्वादाने समाजसेवेची ही वाटचाल अधिक जोमाने आणि निष्ठेने पुढे सुरू राहील, याचा मला पूर्ण विश्वास आहे. माझ्या गुरुजनांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या पक्षश्रष्ठींचा सन्मान झाला पाहिजे अशाच पद्धतीचे काम माझ्या हातून होत राहील. आज पर्यंत जो आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे, तोच आदर्श शेवटपर्यंत माझ्यासमोर राहील. त्यामुळे मी समाजसेवा हेच जीवनाचे ध्येय ठेवले आहे, असे स्पष्ट केले.1
- औसा रोड वरील खुनाच्या वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकाराला पोलिसांकडून आरोग्य भाषेत अपमान कारक वागणूक. लातूर आतील समस्त पत्रकार बांधवांकडून त्या मुजोर पोलीस अधिकाऱ्याचा जाहीर निषेध.1
- *शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्येला पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश* २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले शहीद संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला आज मोठा दिलासा मिळाला आहे. जगदाळे कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचे छत्र हरपल्याने निर्माण झालेल्या संकटाच्या काळात, त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवेत सामावून घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, त्यांना नियुक्ती देण्याचे आदेश निर्गमित होत आहेत. शहीद संतोष जगदाळे यांच्या निधनानंतर जगदाळे कुटुंब उघड्यावर पडले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २५ मे २०२५ रोजी जगदाळे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली होती. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आणि व्यथा जाणून घेतल्यानंतर, डॉ. गोऱ्हे यांनी २७ मे २०२५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांना पत्र लिहून आसावरी जगदाळे यांना विशेष बाब म्हणून शासकीय सेवेत सामावून घेण्याची विनंती केली होती. डॉ. गोऱ्हे यांच्या पत्राच्या अनुषंगाने १९ जून २०२५ रोजी नगरविकास विभागाने पुणे महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या प्रक्रियेत अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणींमुळे नियुक्ती लांबणीवर पडत असताना डॉ. गोऱ्हे यांनी खचून न जाता सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेतल्या आणि सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण केला. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी या प्रकरणात संवेदनशीलतेने लक्ष घातले. तांत्रिक अडचणी असूनही एका शहीद कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका त्यांनी घेतली. डॉ. गोऱ्हे यांच्या सततच्या पाठपुराव्याला आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या सकारात्मक निर्णयाला आज यश आले असून आसावरी यांना नोकरी प्राप्त होत आहे. "संतोष जगदाळे यांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांचे जाणे ही न भरून निघणारी हानी आहे. त्यांच्या बलिदानाची परतफेड आपण करू शकत नाही, मात्र त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणे ही आपली संस्कृती नाही. आसावरीला नोकरी मिळवून देण्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे थोडा विलंब झाला, त्याबद्दल आम्ही जगदाळे कुटुंबाच्या भावनेशी सहमत आहोत. मात्र, आज तिला नियुक्ती मिळत असल्याचा समाधान आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ते केवळ राज्याचे प्रमुख नसून खऱ्या अर्थाने 'लाडक्या बहिणीचे राखणदार' आहेत." या निर्णयामुळे जगदाळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभणार असून, एका वीरपुत्राच्या बलिदानाचा सन्मान शासनाकडून करण्यात आला आहे.1
- Post by EKMAT DIGITAL1
- वसंत स्मृती येथील बैठकीत कडक इशारा..! नायगाव पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केवळ पद मिळवणे पुरेसे नाही तर गावपातळीवर जाऊन गोरगरीब जनतेची कामे करणे आवश्यक आहे पद घेऊन घरी बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आता गय केली जाणार नाही कामात कसूर करणाऱ्यांना तातडीने पदावरून कमी करून सक्रिय कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असा स्पष्ट इशारा खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिला नायगाव येथील वसंत स्मृती मेमोरियल मध्ये आयोजित नांदेड दक्षिण काँग्रेस'च्या विस्तारित बैठकीत ते बोलत होते1
- १० लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त; तिघांवर गुन्हा जिल्हा प्रतिनिधी मोहम्मद रफीख नांदेड : गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करून साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत अंदाजे १० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता मार्कंड शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने तत्काळ छापा टाकला. या कारवाईत अंदाजे ५ ब्रास रेती (सुमारे २५ हजार रुपये), एक जेसीबी मशीन (३ लाख रुपये) आणि एक ट्रॅक्टर (७ लाख ५० हजार रुपये) असा एकूण १०,७५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी धर्मपाल ज्ञानोबा कांबळे (वय ३४, व्यवसाय पोलीस, नांदेड ग्रामीण) यांच्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी केशवराव लमदाडे, बापुराव शीरसागर, मदन येवले (सर्व रा. मार्कंड) व इतर दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०३(२), ३०३(५) सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसानी प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस कर्मचारी विठ्ठल शिंदे, आरिफ, जमीर सरवे आदींचा सहभाग होता. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.2
- शिवपुतळ्यासाठी आमरण उपोषण सुरू 🚨 हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडून तोंडी आश्वासन देण्यात आले असले तरी लेखी आदेश मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दि. 10 ऑगस्ट 2023 पासून मागणी प्रलंबित असूनही ठोस निर्णय न झाल्याने शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवरायांच्या जयंतीपूर्वी पेटलेला हा प्रश्न प्रशासन कसा सोडवते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. ✊ शिवरायांच्या सन्मानासाठी लढा सुरूच! #हिमायतनगर #शिवपुतळा #छत्रपतीशिवाजीमहाराज #स्वाभिमानीसंभाजीब्रिगेड #आमरणउपोषण #शिवप्रेमी #महाराष्ट्र #लोकशाही #नगरपंचायत #BreakingNews1
- उदगीर (एल पी उगीले) येथील जीवन फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आद्य क्रांतिगृह असतात लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रामुख्याने जीवन प्रयाग फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभात सूर्यवंशी, प्रा. संजय बीबीनवरे, सामाजिक कार्यकर्ते दयानंद कांबळे, चंद्रकला सूर्यवंशी यांच्यासह वस्ताद लहुजी साळवे यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.1