logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मैंदर्गी नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे. आज दिनांक 10 मार्च 2026 रोजी मैंदर्गी नगरपरिषदेच्या कार्यालयात जागतिक महिला दिन माननीय नगराध्यक्षा सौ. अंजली योगिनाथ बाजारमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सदरील कार्यक्रमात मैंदर्गी शहरातील 15 स्वयंसहायता महिला बचत गटांना 32 लाख रुपये कर्जाचे वितरण करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर मैंदर्गी नगर परिषदेच्या अंतर्गत काम करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार ही प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अंजली योगिनाथ बाजार मठ यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना महिलांनी शासनाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ घेऊन आपला व आपल्या कुटुंबाचा विकास करावा तसेच मैंदर्गी शहर पुढील काळात एक सुजलाम सुफलाम शहर घडवून इतिहास घडवणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी महिलांना कापडी पिशवी वाटप देखील करण्यात आले. वरील कार्यक्रमास मुख्याधिकारी श्री अर्जुन सुरवसे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. कावेरी पुजारी, गटनेत्या सुरेखा होळीकट्टी, व सर्व महिला नगरसेविका उपस्थित होत्या. शहरातील सुमारे 200 महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजेंद्र गायधनकर यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना अल्पोपहार देऊन कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

12 hrs ago
user_Akkalkot news
Akkalkot news
Press reporter अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
12 hrs ago
3e581fe9-8e8b-4be3-966a-5af938e2fed8

मैंदर्गी नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे. आज दिनांक 10 मार्च 2026 रोजी मैंदर्गी नगरपरिषदेच्या कार्यालयात जागतिक महिला दिन माननीय नगराध्यक्षा सौ. अंजली योगिनाथ बाजारमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सदरील कार्यक्रमात मैंदर्गी शहरातील 15 स्वयंसहायता महिला बचत गटांना 32 लाख रुपये कर्जाचे वितरण करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर मैंदर्गी नगर परिषदेच्या अंतर्गत काम करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार ही प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अंजली योगिनाथ बाजार मठ यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना महिलांनी शासनाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ घेऊन आपला व आपल्या कुटुंबाचा विकास करावा तसेच मैंदर्गी शहर पुढील काळात एक सुजलाम सुफलाम शहर घडवून इतिहास घडवणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी महिलांना कापडी पिशवी वाटप देखील करण्यात आले. वरील कार्यक्रमास मुख्याधिकारी श्री अर्जुन सुरवसे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. कावेरी पुजारी, गटनेत्या सुरेखा होळीकट्टी, व सर्व महिला नगरसेविका उपस्थित होत्या. शहरातील सुमारे 200 महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजेंद्र गायधनकर यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना अल्पोपहार देऊन कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या महान प्रणेत्या, विद्येची जननी आणि समस्त स्त्रियांना ज्ञानाचा व स्वाभिमानाचा उजेड दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले महान कार्य आणि समाजप्रबोधनाची परंपरा आजही प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक नरसिंह आसादे, महिला काँग्रेस अध्यक्षा प्रमिलाताई तूपलवंडे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, माजी महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, सुमन जाधव, उपाध्यक्ष लखन गायकवाड, सागर उबाळे, शोभा बोबे, ज्योती गायकवाड, भीमराव शिंदे, शिवाजी साळुंखे, दत्तात्रेय गजभार, सर लक्ष्मण बनसोडे, अभिलाष अच्युगटला, सचिन सुरवसे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    1
    भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या महान प्रणेत्या, विद्येची जननी आणि समस्त स्त्रियांना ज्ञानाचा व स्वाभिमानाचा उजेड दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले महान कार्य आणि समाजप्रबोधनाची परंपरा आजही प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या प्रसंगी नगरसेवक नरसिंह आसादे, महिला काँग्रेस अध्यक्षा प्रमिलाताई तूपलवंडे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, माजी महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, सुमन जाधव, उपाध्यक्ष लखन गायकवाड, सागर उबाळे, शोभा बोबे, ज्योती गायकवाड, भीमराव शिंदे, शिवाजी साळुंखे, दत्तात्रेय गजभार, सर लक्ष्मण बनसोडे, अभिलाष अच्युगटला, सचिन सुरवसे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Press reporter अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Dilip Surwase
    5
    Post by Dilip Surwase
    user_Dilip Surwase
    Dilip Surwase
    Local Politician उमरगा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • सध्या संपूर्ण देशात रमजानच्या पवित्र महिना चालू आहे या महिन्यात मुस्लिम समुदायाने रोजे व नमाज पाटण करत आहेत याच म्हणजे सोलापुरात सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वांकडून इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वेष, आपसी वैमनस्य आणि तणाव निर्माण होतो, जे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. भारत हा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्म, मजहब किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही. यावेळी पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते
    1
    सध्या संपूर्ण देशात रमजानच्या पवित्र महिना चालू आहे या महिन्यात मुस्लिम समुदायाने रोजे व नमाज पाटण करत आहेत याच म्हणजे  सोलापुरात सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वांकडून इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वेष, आपसी वैमनस्य आणि तणाव निर्माण होतो, जे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
भारत हा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्म, मजहब किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही.
यावेळी पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते
    user_ईलियास नजीर शेख
    ईलियास नजीर शेख
    Salesperson सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • आखरी सच बोलणे वाला जोतिषी मिल गया भाई लोग
    1
    आखरी सच बोलणे वाला जोतिषी मिल गया भाई लोग
    user_Mahadev Shinde
    Mahadev Shinde
    Advertising Photographer उस्मानाबाद, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.
    1
    मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.
    user_Rahul S
    Rahul S
    पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • भाजपा जिल्हा महामंत्री संजय गिरी यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर तात्काळ भाजप जिल्हा शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर दखल घेत संजय गिरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची केली मनधरणी, पक्ष मोठा आहे इच्छुकांची संख्या ही मोठी आहे, पण पक्ष आणि पक्षश्रेष्ठी कायम सच्चा कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे आहेत, येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठी नक्कीच संजय गिरी यांच्या बाबतीत विचार करतील आणि एक चांगली संधी येणाऱ्या काळात त्यांना मिळेल, असे यावेळी अजित पाटील कव्हेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. #CMOMaharashtra #abhimanyupawar #sambhajinagarkar #bavnkule #pankajmunde
    1
    भाजपा जिल्हा महामंत्री संजय गिरी यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर  तात्काळ भाजप  जिल्हा शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर दखल घेत संजय गिरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची केली मनधरणी,
पक्ष मोठा आहे इच्छुकांची संख्या ही मोठी आहे, पण पक्ष आणि पक्षश्रेष्ठी कायम सच्चा कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे आहेत, येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठी नक्कीच संजय गिरी यांच्या बाबतीत विचार करतील आणि एक चांगली संधी येणाऱ्या काळात त्यांना मिळेल, असे यावेळी अजित पाटील कव्हेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
#CMOMaharashtra 
#abhimanyupawar 
#sambhajinagarkar 
#bavnkule 
#pankajmunde
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • सांगोल तालुका अजनाळे येथे पत्रकार सचिन धांडोरे मित्रपरिवार व डॉक्टर खंडागळे हॉस्पिटल यांच्या वतीने सर्व रोग आरोग्य शिबिर संपन्न या शिबिरामध्ये 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
    1
    सांगोल तालुका अजनाळे येथे पत्रकार सचिन धांडोरे मित्रपरिवार व डॉक्टर खंडागळे हॉस्पिटल यांच्या वतीने सर्व रोग आरोग्य शिबिर संपन्न या शिबिरामध्ये 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • आज नवी दिल्लीतील संसद भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, देशात गॅस तुटवडा व इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे युद्धाचे परिणाम भारतातही दिसू लागले असून व्यापार करारामुळे भाजीपाला व शेतीमाल अमेरिकेकडून आयात करण्याची वेळ येत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. इतक्या गंभीर परिस्थितीत केंद्र सरकारकडून केवळ निवेदन देऊन विषय संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. संसद हे देशातील सर्वात मोठे लोकशाही व्यासपीठ असताना विरोधकांना बोलू दिले जात नाही, संसदेत सखोल चर्चा होऊ दिली जात नाही आणि अनेक मुद्दे संसदेच्या अधिकृत नोंदीतही येऊ दिले जात नाहीत. अशा परिस्थितीत संसद चालवण्याचा अर्थ काय, असा सवालही खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. खासदार प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, अमेरिका–इस्त्राईल–इराण या युद्धपरिस्थितीबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्टपणे दिसत नाही. या संघर्षाचे परिणाम भारतावर होत असतानाही सरकारकडून याबाबत ठोस भूमिका मांडली जात नाही. भारतात युद्ध अभ्यासासाठी आलेल्या इराणच्या जहाजावर अमेरिकेकडून कारवाई झाल्याबाबतही केंद्र सरकारकडून एक शब्दही उच्चारला जात नाही, असे खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या. देशासमोर उभ्या राहिलेल्या गॅस तुटवडा, इंधन टंचाई आणि युद्धजन्य परिस्थितीच्या परिणामांवर संसदेत सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नाही आणि चर्चा टाळली जात आहे. अशा परिस्थितीत संसद अधिवेशन घेण्याचा उद्देश काय, असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. खासदार प्रणिती शिंदे पुढे बोलताना म्हणाल्या की, पंतप्रधान अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर झुकत असल्याची प्रतिमा निर्माण होत असून त्यामुळे देशाची भूमिका कमजोर होत आहे. देशाला कमजोर करण्याचे श्रेय पंतप्रधानांकडेच जाते, असेही त्यांनी सांगितले. देशातील गंभीर परिस्थिती लक्षात घेता संसदेत तातडीने चर्चा घ्यावी आणि देशासमोर उभ्या राहिलेल्या प्रश्नांवर सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.
    1
    आज नवी दिल्लीतील संसद भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, देशात गॅस तुटवडा व इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे युद्धाचे परिणाम भारतातही दिसू लागले असून व्यापार करारामुळे भाजीपाला व शेतीमाल अमेरिकेकडून आयात करण्याची वेळ येत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.
इतक्या गंभीर परिस्थितीत केंद्र सरकारकडून केवळ निवेदन देऊन विषय संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. संसद हे देशातील सर्वात मोठे लोकशाही व्यासपीठ असताना विरोधकांना बोलू दिले जात नाही, संसदेत सखोल चर्चा होऊ दिली जात नाही आणि अनेक मुद्दे संसदेच्या अधिकृत नोंदीतही येऊ दिले जात नाहीत. अशा परिस्थितीत संसद चालवण्याचा अर्थ काय, असा सवालही खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.
खासदार प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, अमेरिका–इस्त्राईल–इराण या युद्धपरिस्थितीबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्टपणे दिसत नाही. या संघर्षाचे परिणाम भारतावर होत असतानाही सरकारकडून याबाबत ठोस भूमिका मांडली जात नाही. भारतात युद्ध अभ्यासासाठी आलेल्या इराणच्या जहाजावर अमेरिकेकडून कारवाई झाल्याबाबतही केंद्र सरकारकडून एक शब्दही उच्चारला जात नाही, असे खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.
देशासमोर उभ्या राहिलेल्या गॅस तुटवडा, इंधन टंचाई आणि युद्धजन्य परिस्थितीच्या परिणामांवर संसदेत सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नाही आणि चर्चा टाळली जात आहे. अशा परिस्थितीत संसद अधिवेशन घेण्याचा उद्देश काय, असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.
खासदार प्रणिती शिंदे पुढे बोलताना म्हणाल्या की, पंतप्रधान अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर झुकत असल्याची प्रतिमा निर्माण होत असून त्यामुळे देशाची भूमिका कमजोर होत आहे. देशाला कमजोर करण्याचे श्रेय पंतप्रधानांकडेच जाते, असेही त्यांनी सांगितले.
देशातील गंभीर परिस्थिती लक्षात घेता संसदेत तातडीने चर्चा घ्यावी आणि देशासमोर उभ्या राहिलेल्या प्रश्नांवर सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Press reporter अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.