भांडेगाव टोल नाक्यावर महाविकास आघाडीचे तोडफोड आंदोलन , पोलिसांनी घेतले पदाधिकाऱ्यांना ताब्यात दारव्हा–कारंजा मार्गावरील भुलाई–भांडेगाव दरम्यान सुरू करण्यात आलेल्या टोल नाक्याविरोधात दारव्हा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ११ मार्च रोजी दुपारी १२. ०० वाजता टोलनाक्यावर तोडफोड आंदोलन करण्यात आले. अपूर्ण व खड्डेमय रस्त्यावर टोल वसुली सुरू केल्याचा आरोप करत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टोल नाका तात्काळ बंद करण्याची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी टोल नाक्याजवळ एकत्र येत शासनाविरोधात घोषणाबाजी केली. नागरिक, शेतकरी, व्यापारी व वाहनधारकांवर अन्यायकारक टोल वसुली थांबवावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.या आंदोलनात राहुल ठाकरे (माजी अध्यक्ष, जि.प. यवतमाळ), प्रकाश नवरंगे (अध्यक्ष, दारव्हा तालुका काँग्रेस कमिटी), शिवसेना उबाठाचे उपजिल्हाप्रमुख अजय गाडगे, तालुका प्रमुख संतोष ठाकरे, शहर प्रमुख अमोल दुधे, नगरसेवक सैय्यद फारुक, ज्ञानेश्वरराव बोरकर, पंढरीनाथ सिंहे, गजानन बिबेकर, अजय पाटील ठाकरे, अतुल राऊत, सर्फराज खान, मनोहर नवरंगे, मसूद खान, अजीम शहा, , ज्ञानेश्वर खोडे, ज्ञानेश्वर कदम राजीव अवचट यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भांडेगाव टोल नाक्यावर महाविकास आघाडीचे तोडफोड आंदोलन , पोलिसांनी घेतले पदाधिकाऱ्यांना ताब्यात दारव्हा–कारंजा मार्गावरील भुलाई–भांडेगाव दरम्यान सुरू करण्यात आलेल्या टोल नाक्याविरोधात दारव्हा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ११ मार्च रोजी दुपारी १२. ०० वाजता टोलनाक्यावर तोडफोड आंदोलन करण्यात आले. अपूर्ण व खड्डेमय रस्त्यावर टोल वसुली सुरू केल्याचा आरोप करत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टोल नाका तात्काळ बंद करण्याची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी टोल नाक्याजवळ एकत्र येत शासनाविरोधात घोषणाबाजी केली. नागरिक, शेतकरी, व्यापारी व वाहनधारकांवर अन्यायकारक टोल वसुली थांबवावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.या आंदोलनात राहुल ठाकरे (माजी अध्यक्ष, जि.प. यवतमाळ), प्रकाश नवरंगे (अध्यक्ष, दारव्हा तालुका काँग्रेस कमिटी), शिवसेना उबाठाचे उपजिल्हाप्रमुख अजय गाडगे, तालुका प्रमुख संतोष ठाकरे, शहर प्रमुख अमोल दुधे, नगरसेवक सैय्यद फारुक, ज्ञानेश्वरराव बोरकर, पंढरीनाथ सिंहे, गजानन बिबेकर, अजय पाटील ठाकरे, अतुल राऊत, सर्फराज खान, मनोहर नवरंगे, मसूद खान, अजीम शहा, , ज्ञानेश्वर खोडे, ज्ञानेश्वर कदम राजीव अवचट यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- दारव्हा–कारंजा मार्गावरील भुलाई–भांडेगाव दरम्यान सुरू करण्यात आलेल्या टोल नाक्याविरोधात दारव्हा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ११ मार्च रोजी दुपारी १२. ०० वाजता टोलनाक्यावर तोडफोड आंदोलन करण्यात आले. अपूर्ण व खड्डेमय रस्त्यावर टोल वसुली सुरू केल्याचा आरोप करत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टोल नाका तात्काळ बंद करण्याची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी टोल नाक्याजवळ एकत्र येत शासनाविरोधात घोषणाबाजी केली. नागरिक, शेतकरी, व्यापारी व वाहनधारकांवर अन्यायकारक टोल वसुली थांबवावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.या आंदोलनात राहुल ठाकरे (माजी अध्यक्ष, जि.प. यवतमाळ), प्रकाश नवरंगे (अध्यक्ष, दारव्हा तालुका काँग्रेस कमिटी), शिवसेना उबाठाचे उपजिल्हाप्रमुख अजय गाडगे, तालुका प्रमुख संतोष ठाकरे, शहर प्रमुख अमोल दुधे, नगरसेवक सैय्यद फारुक, ज्ञानेश्वरराव बोरकर, पंढरीनाथ सिंहे, गजानन बिबेकर, अजय पाटील ठाकरे, अतुल राऊत, सर्फराज खान, मनोहर नवरंगे, मसूद खान, अजीम शहा, , ज्ञानेश्वर खोडे, ज्ञानेश्वर कदम राजीव अवचट यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- Post by Sharad Dayedar1
- Post by सारनाथ अवचार1
- नेर येथील शासकीय वस्तीगृहात विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे खाद्य पदार्थ जेवणात दिल्या जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात आता भारतीय विद्यार्थी मोर्चाने उडी घेतली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आणि याकरीता समाज कल्याण आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.1
- तीन शहरांच्या अग्निशमन दलाची धाव1
- Post by स्मिता तलेय1
- नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड-रोठे अक्का यांची वार्डात फिरून स्वच्छतेची पाहणी; कर्मचाऱ्यांना दिल्या कडक सूचना प्रतिनिधी : संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे : धामणगांव शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी राहावे या उद्देशाने नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड-रोठे (अक्का) यांनी सकाळी विविध वार्डांमध्ये प्रत्यक्ष फिरून स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरातील नाल्या, कचरा शौचालय व्यवस्थापन तसेच स्वच्छतेसंदर्भातील विविध बाबींची तपासणी करून संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. सकाळच्या वेळेत नगराध्यक्षांनी वार्डांमध्ये फेरफटका मारत नागरिकांशी संवाद साधला. परिसरातील नाल्यांची स्वच्छता, रस्त्यावरील कचरा तसेच स्वच्छता कामांच्या अंमलबजावणीची त्यांनी बारकाईने पाहणी केली. काही ठिकाणी नाल्यांमध्ये साचलेला कचरा आणि स्वच्छतेच्या इतर बाबी लक्षात घेऊन त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी वार्ड परिसरात नागरिकांशी चर्चा करत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. शहरात स्वच्छतेबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार येऊ नये, यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नियमितपणे आणि जबाबदारीने काम करावे, तसेच नाल्या व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता वेळोवेळी करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना नगराध्यक्षांनी दिल्या. नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड-रोठे यांनी यावेळी नागरिकांनाही स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. घरातील कचरा रस्त्यावर किंवा नाल्यांमध्ये टाकू नये, तो डस्टबिनमध्ये जमा करून नगरपरिषदेच्या घंटागाडीतच द्यावा. शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. स्वच्छ आणि निरोगी शहर घडवण्यासाठी सर्वांनी नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. नगराध्यक्ष स्वतः सकाळी वार्डांमध्ये फिरून स्वच्छतेची पाहणी करत असल्याचे पाहून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपरिषद प्रशासन कटिबद्ध असून धामणगांव शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वासही नगराध्यक्षांनी यावेळी व्यक्त केला.1
- Post by Amravati News Update1