खत टंचाई, लिकींग व काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हाधीकाऱ्यांची कृषी सेवा केंद्रावर धडक तपासणी खरीप हंगामच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नवीन मोंढा, नांदेड येथील वसुंधरा फर्टीलायझर्स #कृषीनिविष्ठा विक्री केंद्रास तसेच गोदामास भेट देवून साठा केलेल्या खताची #तपासणी केली तसेच श्री फर्टीलायझर्स कृषी सेवा केंद्र येथे अचानक भेट देऊन बाजारातील #खते व #बियाणे पुरवठा व विक्री संदर्भात माहिती घेतली. कृषी निविष्ठा विक्रेते यांचे परवाने, साठा रजिस्टर, इ-पॉस मशीनची तपासणी करून प्रत्यक्षात खताचा किती साठा आहे हे तपासले.याबाबत कृषी निविष्ठा विक्रेते यांना इ-पॉस मशीन शिवाय खत विक्री करू नये तसेच खताची साठेबाजी करू नये अशा सूचना दिल्या. युरिया व डीएपीच्या विक्री बाबत जिल्ह्यातील सर्व कृषि क्रेंदाची खरीप हंगामपूर्व 100 टक्के तपासणी पूर्ण करण्याबाबत कृषि अधिकारी गुणनियत्रण तालुका नांदेड श्रीमती चातरमल यांना सुचना देण्यात आल्या. तसेच दर्शनी भागात फलक लावण्याबाबत सुचना दिल्या. ई-पॉस वरून खतांचा अहवाल काढून प्रत्यक्ष भौतीक साठ्यासोबत व साठा रजीस्टर सोबत जुळतो किंवा कसे याची पडताळणी केली. खत विक्रीच्या भौतीक बीलांची तपासणी केली व #शेतकरी बांधवांनी प्रत्यक्षात ते खरेदी केल्याची खातरजमा केली. शेतकऱ्यांना दर्जेदार व योग्य दरात कृषी निविष्ठा उपलब्ध होत आहेत का याची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी खत टंचाई, कृत्रीम साठेबाजी, लिकींग पद्धत व काळा बाजार होणार नाही यासाठी कडक सूचना दिल्या. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, खतांचा साठा लपून किंवा कृत्रीम टंचाई निर्माण करण्याऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. लिकींग पद्धतीने विक्री केल्यास व शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास तात्काळ परवाने निलंबीत करण्यात येतील असे स्पष्ट निर्देश दिले. ज्यादा दराने खत विक्री केल्यास संबंधीतावर दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले. शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. बनावट व निकृष्ट दर्जाच्या निविष्टा विरूद्ध शून्य सहनशिलता धोरण राबवीण्याचे स्पष्ट केले. कृषी निविष्टा गुणवत्ता नियंत्रणासाठी सर्वतोपरी उपाययोजना करणेबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, कृषी विकास अधिकारी अनिल कुमार ऐतवाडे विभागीय तंत्र अधिकारी बालाजी मुंडे, मोहीम अधिकारी सचिन कपाळे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अमोल पेकम तालुका गुणनियंत्रण निरीक्षक श्रीमती पुनम चातरमल, आरसीएफ जिल्हा प्रतिनिधी श्री. कापसे व इफको जिल्हा प्रतिनिधी श्री. घाडगे हजर होते.
खत टंचाई, लिकींग व काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हाधीकाऱ्यांची कृषी सेवा केंद्रावर धडक तपासणी खरीप हंगामच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नवीन मोंढा, नांदेड येथील वसुंधरा फर्टीलायझर्स #कृषीनिविष्ठा विक्री केंद्रास तसेच गोदामास भेट देवून साठा केलेल्या खताची #तपासणी केली तसेच श्री फर्टीलायझर्स कृषी सेवा केंद्र येथे अचानक भेट देऊन बाजारातील #खते व #बियाणे पुरवठा व विक्री संदर्भात माहिती घेतली. कृषी निविष्ठा विक्रेते यांचे परवाने, साठा रजिस्टर, इ-पॉस मशीनची तपासणी करून प्रत्यक्षात खताचा किती साठा आहे हे तपासले.याबाबत कृषी निविष्ठा विक्रेते यांना इ-पॉस मशीन शिवाय खत विक्री करू नये तसेच खताची साठेबाजी करू नये अशा सूचना दिल्या. युरिया व डीएपीच्या विक्री बाबत जिल्ह्यातील सर्व कृषि क्रेंदाची खरीप हंगामपूर्व 100 टक्के तपासणी पूर्ण करण्याबाबत कृषि अधिकारी गुणनियत्रण तालुका नांदेड श्रीमती चातरमल यांना सुचना देण्यात आल्या. तसेच दर्शनी भागात फलक लावण्याबाबत सुचना दिल्या. ई-पॉस वरून खतांचा अहवाल काढून प्रत्यक्ष भौतीक साठ्यासोबत व साठा रजीस्टर सोबत जुळतो किंवा कसे याची पडताळणी केली. खत विक्रीच्या भौतीक बीलांची तपासणी केली व #शेतकरी बांधवांनी प्रत्यक्षात ते खरेदी केल्याची खातरजमा केली. शेतकऱ्यांना दर्जेदार व योग्य दरात कृषी निविष्ठा उपलब्ध होत आहेत का याची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी खत टंचाई, कृत्रीम साठेबाजी, लिकींग पद्धत व काळा बाजार होणार नाही यासाठी कडक सूचना दिल्या. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, खतांचा साठा लपून किंवा कृत्रीम टंचाई निर्माण करण्याऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. लिकींग पद्धतीने विक्री केल्यास व शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास तात्काळ परवाने निलंबीत करण्यात येतील असे स्पष्ट निर्देश दिले. ज्यादा दराने खत विक्री केल्यास संबंधीतावर दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले. शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. बनावट व निकृष्ट दर्जाच्या निविष्टा विरूद्ध शून्य सहनशिलता धोरण राबवीण्याचे स्पष्ट केले. कृषी निविष्टा गुणवत्ता नियंत्रणासाठी सर्वतोपरी उपाययोजना करणेबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, कृषी विकास अधिकारी अनिल कुमार ऐतवाडे विभागीय तंत्र अधिकारी बालाजी मुंडे, मोहीम अधिकारी सचिन कपाळे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अमोल पेकम तालुका गुणनियंत्रण निरीक्षक श्रीमती पुनम चातरमल, आरसीएफ जिल्हा प्रतिनिधी श्री. कापसे व इफको जिल्हा प्रतिनिधी श्री. घाडगे हजर होते.
- जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा मुखेड जि नांदेड शिवसेना मुखेड प्रसाद सेवा2
- नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे एमआयडीसी स्थापन करण्याच्या मुख्यमंत्र्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी व्यक्त केली आहे. ही मागणी केल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती.1
- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ महा आंदोलन1
- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथे कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना २५ एप्रिल २०२६ रोजी उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकरी आर्थिक अडचणी व वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे मानसिक तणावाखाली होता. शेतीतील उत्पन्न घटल्याने आणि कर्जफेडीचा ताण वाढल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक कारण समोर येत आहे.1
- पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ‘पालकमंत्री चषक’ ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण ⚽🏆1
- 📍फटाक्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला लागली आग मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती सोशल मीडियावर होत आहे व्हायरल.1
- रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता? लातूर शहरातील गरुड चौक ते डी मार्ट अहिल्याबाई होळकर चौक मार्गावरील रस्त्यांची दुरावस्था. पूर्व भाग कृती समितीने रस्त्यावरील खड्ड्यात बेश्रमाचे झाड लावून प्रशासनाचा जाहीर निषेध करीत केले तीव्र आंदोलन. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. रविवार दिनांक 26 एप्रिल 2026. लातूर शहरातील गरुड चौक, शिवरत्न जीवाजी महाले चौक ते डी मार्ट मार्गे नवीन रेनापूर नाका अहिल्याबाई होळकर चौक रिंग रोडवरील खड्यात आज 26 एप्रिल रोजी दुपारी तळपत्या उन्हात समितीने बेशर्माचे झाड लावून प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवत केले आंदोलन. लातूर शहराच्या तिन्ही बाजूनी राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून रस्त्याचे रुंदीकरण करून रस्ते विकास करण्यात आले परंतु गरुड चौक शिवरत्न जिवाजी महाले चौक ते डी मार्ट मार्गाने नवीन रेणापूर नाका अहिल्याबाई होळकर चौक दरम्यान असलेला 5 किलोमीटर मार्ग असलेला रस्ता लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत असल्याने जाणीवपूर्वक या रोडचा अद्यापही विकास करण्यात आला नाही. परिणामी सदरील अरुंद मार्गावर जागोजागी लहान मोठे असंख्य खड्डे पडल्याने नागरिकांना रहदारी करण्यात अनेक समस्या निर्माण होत असून खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात रोज अनेक दूचाकी चालक या मार्गावर पडतात तर चार चाकी चे अपघात होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे तसेच पावसाळ्यात या रोडवर प्रवाशांना जाण्यासाठी खूप मोठा धोका पत्करून जीव मोठे धरून चालावे लागत आहे. सदरील मार्ग मिसिंग रस्ता म्हणून दुरुस्त करण्यात यावा याकरिता स्थानिक आमदार अमित देशमुख यांनी राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता पण अद्याप सदरील रोड नव्याने दुरुस्त करण्यात आलेला नसल्याने अनेक अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असून पावसाळ्यात शहरातील पाणी या रस्त्यावर येऊन पूरपरिस्थिती निर्माण होऊन रस्ता बंद होतो याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज लातूर शहर पूर्व भाग कृती समितीने सदरील रोडवरील खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून आंदोलन करीत प्रशासनाने पुढील पंधरा दिवसाच्या आत या रोडची दुरुस्ती नाही केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लातूर शहर पूर्वभाग कृती समितीच्या वतीने दीपक गंगणे, बाबासाहेब बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता कटके, भगवेश्वर धनगर, राहुल गायकवाड, गौतम ससाणेसह परिसरातील नागरिकांकडून देण्यात आला आहे.1
- मुखेड शहरात जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा संपन्न. अनावरण सोहळा दिनांक : २५ एप्रिल २०२६ वेळ : सायं. ०६:०० वाजता स्थळ : जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय प्रांगण,मुखेड जि.नांदेड.1