मानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा विधिमंडळ अवलोकन समितीकडे मनोहर राठोड यांचे साकडे मानोरा प्रतिनिधी : राज्यातील आकांक्षीत व अति मागास तालुक्यांमध्ये गणना होणाऱ्या मानोरा तालुक्याला शासनाने दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेचे नेते मनोहर राठोड यांनी विधिमंडळ अवलोकन अंदाज समितीकडे केली. विधिमंडळ अवलोकन अंदाज समिती विदर्भ दौऱ्यावर असताना पुसद येथील नाईक बंगल्यावर समितीचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत तसेच सदस्यांची भेट घेऊन राठोड यांनी मानोरा तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या विविध समस्या मांडल्या. यावर्षी पावसात वारंवार खंड पडल्याने खरीप हंगामातील उभी पिके करपली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मानोऱ्याचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. प्रत्यक्ष शेतपातळीवरील पीक नुकसानीचा विचार करून मानोरा तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, तसेच मागील वर्षाचा रखडलेला पीक विमा तातडीने देण्यात यावा, अशी मागणी राठोड यांनी केली. तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण व सिंचनाच्या मूलभूत सुविधांबाबतही त्यांनी समितीचे लक्ष वेधले. कारखेडा-वरोली, गलमगाव-चिखली-धानोरा तसेच देवठाणा-कारपा रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
मानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा विधिमंडळ अवलोकन समितीकडे मनोहर राठोड यांचे साकडे मानोरा प्रतिनिधी : राज्यातील आकांक्षीत व अति मागास तालुक्यांमध्ये गणना होणाऱ्या मानोरा तालुक्याला शासनाने दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेचे नेते मनोहर राठोड यांनी विधिमंडळ अवलोकन अंदाज समितीकडे केली. विधिमंडळ अवलोकन अंदाज समिती विदर्भ दौऱ्यावर असताना पुसद येथील नाईक बंगल्यावर समितीचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत तसेच सदस्यांची भेट घेऊन राठोड यांनी मानोरा तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या विविध समस्या मांडल्या. यावर्षी पावसात वारंवार खंड पडल्याने खरीप हंगामातील उभी पिके करपली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मानोऱ्याचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. प्रत्यक्ष शेतपातळीवरील पीक नुकसानीचा विचार करून मानोरा तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, तसेच मागील वर्षाचा रखडलेला पीक विमा तातडीने देण्यात यावा, अशी मागणी राठोड यांनी केली. तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण व सिंचनाच्या मूलभूत सुविधांबाबतही त्यांनी समितीचे लक्ष वेधले. कारखेडा-वरोली, गलमगाव-चिखली-धानोरा तसेच देवठाणा-कारपा रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
- आजेगाव येथे पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असून मागील चार वर्षापासून आजेगाव येथील रवी चौधरी हा विद्यार्थी दरवर्षी नैसर्गिक पद्धतीने पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करतो. रवी चौधरी यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर वृक्ष गजानन गणेश मंडळाचा पर्यावरण पूरक देखावा बघण्यासाठी व पर्यावरण पूरक मूर्ती असलेल्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. कराल झाडावर माया तर मिळेल घनदाट छाया,वृक्षवल्ली आम्हा सोयरे. करा संकल्प जलसंवर्धनाचा,मार्ग सुकर करा उद्याच्या भविष्याचा. अशा विविध प्रकारचे पर्यावरण रक्षणाचे संदेश गणेश मंडळाकडून देण्यात आले आहेत मागील चार वर्षापासून आजेगावात पर्यावरण पूरक गणेश मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे संदेश देण्यात येत आहेत तसेच सर्व नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करण्याचे आवाहन देखील रवी चौधरी यांनी केले. सेनगाव तालुक्यामध्ये पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून आकर्षक देखावा गणपती जवळ करण्यात आला असून रवी चौधरी यांच्या या उत्कृष्ट स्तुत्य उपक्रमावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.1
- काळजाला थरकाप उडवणारी घटना "तुम्ही माझी आई घेऊन आले का हो?" माजी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांच्यासमोर आत्महत्याग्रस्त महिलेच्या लेकीचा टाह़ो! सेनगाव/विश्वनाथ देशमुख सण-उत्सवाच्या दिवशी जिथे अवघा महाराष्ट्र बळीराजाच्या कृतज्ञतेत मग्न होता,तिथेच हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे एका शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.कर्जाचा डोंगर आणि सततची नापिकी या दुष्टचक्रात अडकलेल्या महिला शेतकरी कमलाबाई सोपान कांदे यांनी बैलपोळ्याच्या दिवशीच विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. ऐन सणासुदीला घरातून उठलेल्या या अंत्ययात्रेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.या दुर्दैवी घटनेनंतर विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी गोजेगाव येथे जाऊन पीडित कांदे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली.मात्र,या भेटीदरम्यान घडलेल्या एका प्रसंगामुळे उपस्थितांच्या काळजाचे पाणी झाले. "माझी आई आणली का हो?..." विवाहित लेकीच्या आक्रोशाने काळीज पाझरले माजी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे कांदे यांच्या घरी पोहोचताच,मृत कमलाबाई यांच्या विवाहित मुलीने त्यांना पाहताच हंबरडा फोडला. "तुम्ही माझी आई घेऊन आले का हो?"असा आर्त प्रश्न विचारत तिने थेट त्यांचा समोर टाहो फोडला.आईच्या विरहाने व्याकुळ झालेल्या त्या लेकीचा आक्रोश आणि डोळ्यांतील अश्रू पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे हृदय पिळवटून निघाले.जिचे माहेरचे छत्र कायमचे हरपले आहे,त्या दुःखी कन्येचा हा प्रश्न केवळ एका नेत्याला नसून,संपूर्ण शासकीय व्यवस्थेला आणि समाजाच्या संवेदनशीलतेला सुन्न करणारा होता.माहितीनुसार,कांदे कुटुंबाने शेतीसाठी घेतलेले कर्ज तसेच नातेवाईकांचे कर्ज होते.यंदाही पावसाने दगा दिल्यामुळे शेतातून हाती काहीच लागणार नाही,ही भीती आणि कर्जाच्या हप्त्यांचा तगादा यांमुळे कमलाबाई अत्यंत मानसिक तणावात होत्या.अखेर याच विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. विरोधी पक्षनेते पोहोचले,पण सरकार कधी जागे होणार? या हृदयद्रावक घटनेची दखल घेत विरोधी पक्षाचे नेते गोजेगावच्या या पीडित कुटुंबाच्या दारापर्यंत पोहोचले. त्यांनी या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त करत मराठवाड्यातील कोरड्या दुष्काळाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.मात्र,अत्यंत खेदाची बाब अशी की,घटना घडून एवढे दिवस झाले तरी शासकीय यंत्रणा आणि हक्काची सरकारी मदत अद्याप या अनाथ कुटुंबापर्यंत पोहोचलेली नाही.एकीकडे शासन विविध योजनांचे ढोल पिटत असताना,दुसरीकडे प्रत्यक्ष जमिनीवर मात्र मदतीअभावी शेतकरी कुटुंबांची अशी वाताहत होत आहे.या दुःखी लेकीच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी आणि या कुटुंबाला तातडीने आर्थिक आधार देण्यासाठी मायबाप सरकार आतातरी जागे होऊन तात्काळ मदत जाहीर करणार का? हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.2
- मंजूर झालेले सोलर संबंधित सोलर कंपनीने बसवल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान सोलर तात्काळ बसून देण्याची सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांची महावितरण कडे मागणी मंजुर सोलर परंतु न बसवल्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्या अभावी नुकसान! (शेतकऱ्यांनी वर्ग संबंधित ऑफिसमध्ये मारतात चक्ररा) तात्काळ सोलर बसवावे जाधव यांनी केली मागणी, मालेगाव प्रतिनिधी,दि,१५:- पावसाने तर मारली दांडी परंतु सोलर व महावितरण अधिकारी पण देत आहेत उडवा उडी चे उत्तर, पाण्याअभावी शेतकऱ्यांचे शेतातील हळद सोयाबीन इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात होत आहे नुकसान शासन दरबारी शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सोलर सह इतर योजना असल्या तरी मात्र पात्र लाभार्थ्यांनी दोन दोन तीन तीन महिने पूर्वी लागणारी कागदपत्रे व सोलर साठी लागणारी रक्कम ची भरणा केली परंतु अद्यापही त्यांना सोलर कंपनी मार्फत सोलर तसेच महावितरण कंपनीकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून खंत शेतकरी वर्ग व्यक्त करत आहेत, मालेगाव तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी विविध सोलर कंपन्याकडे ऑनलाइन अर्ज केले आहेत, अमानी येथील शेतकरी राजू भिमराव गवळी,व अनिल गंगाराम जाधव यांनी मागील दोन - महीन्यापृर्वी सोलर साठी,ओस्वाल कंपनी साठी ऑनलाइन अर्ज केला तसेच लागणारी रक्कम सुद्धा भरली परंतु अद्याप यांच्या शेतात बोरवर सोलर बसवण्यात आले नसल्याने यांचे हळद ,सोयाबीन इतर पिक वाळून चालले यांनी मालेगाव महावितरण कंपनीकडे तसेच वाशिम कंपनीकडे चकरा मारून परेशान झाले असता आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी महावितरणचे अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय वाशिम संदीप दत्तात्रेय दरवडे यांची प्रत्यक्ष भेट सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव तसेच शेतकरी राजु गवळी यांनी घेतली असता, त्यांनी संबंधित महावितरणचे उपकार्यकारी अभियंता व्हि बी चव्हाण, तसेच ओसवाल कंपनीचे विनोद ब्रह्मेकर यांच्याशी संपर्क साधून या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात सांगितले, याबाबत ओबीसी सेलचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख विवेक गवळी यांनी सुद्धा दूरध्वनीवरून साहेबांशी संपर्क साधून विचारणा केली, सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी थेट महावितरण चे वरिष्ठ अधीक्षक दरवडे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडली व त्यांनी तात्काळ दाखल घेऊन दोनच दिवसात सोलर बसवल्या जातील असे यावेळी जाधव यांना सांगितले, जाधव यांनी महावितरण व सोलर कंपनी वाले शेतकऱ्याकडून पैशाची मागणी देखील करतात असे सांगितले असता, दरवडे म्हणाले ज्यांनी पैशाची मागणी केली असेल त्यांना डायरेक्ट लाच लुचपत विभागाकडे तक्रार करून पकडून द्या , काही शेतकरी तर आमचे अधिकाऱ्यांचे पाय धरायचे राहिले हो साहेब असे म्हणाले तेव्हा या बाबीची तात्काळ दखल घेऊन पात्र परंतु सोलर पासून वंचित असलेले सर्व शेतकऱ्यांचे सोलर तात्काळ बसून द्यावे अशी मागणीही अनिल जाधव यांनी यावेळी केली2
- मुलींच्या शिक्षणाचे ध्येय बाळगत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या 47 वर्षीय महिलेचा तहसिलदारांच्या हस्ते सत्कार मुलींच्या शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगून साडी परिधान करून, अनवानी पायी चालत जाऊन आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी संघर्ष करत कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील रमाबाई अशोक रणवीर या 47 वर्षीय महिलेने अंबाजोगाई येथेअमृत दौड़ मॅरेथॉन स्पर्धा जिंकून भल्या भल्या प्रशिक्षित मुलीना लाजवेल अशी मोलाची कामगिरी केली आहे.या पार्श्वभूमीवर कळमनुरीचे तहसीलदार यांनी सोमवारी रमाबाई च्या घरी भेट देऊन सत्कार करून अभिनंदन केले . रमाबाई रणवीर हया अत्यंत गरिब कुटुंबातील महिला आहे .मोलमजुरी करून ती आपली उपजीविका धकवत असते, तिला दोन मुलीच आहेत .याच मजुरीच्या पैशातून ती आपल्या दोन मुलींचे शिक्षण पूर्ण करीत आहे .2012 मध्येच नवऱ्याने साथ सोडली,तेव्हा पासून त्या एकट्या पडल्या आहेत . हालाखीची कठीण परिस्थिती असताना ही तिने आपल्या एका मुलीला नांदेडला शिक्षणाला, तर दुसऱ्या मुलीला अंबाजोगाई येथे एका अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेण्याकरता ठेवले आहे .त्याच अकॅडमी मध्ये त्या स्वयंपाक करण्याचे काम करित होत्या .त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याकरता भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संस्थेच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन मोठ्या कौशल्याने स्पर्धा जिंकली .या पार्श्वभूमीवर कळमनुरी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी पोत्रा या ठिकाणी येऊन रमाबाई रणवीरचा सत्कार करून अभिनंदन केले आहे .त्यावेळी रमाबाईला घरकुल, शौचालय,या सह सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन तहसीलदार कांबळे यांनी दिले आहे.याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी शिवशंकर गुट्टे, पोलीस पाटील अनुराधा मारकोळे, रवी कांबळे,रघूनाथ पाटील, जिजाराम मुलगीर, श्रीकांत मुलगीर,वैभव मुलगीर, रघूनाथ गुहाडे, शामराव रायपुरे, गजानन राणगिरे, विक्रम रणवीर, सोपान रणवीर, डॉ. कैलास रणवीर ,शिवाजी मुलगीर, डॉ. मिलींद रणवीर यांच्या सह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती .1
- घरोघरी गणरायाचे मोठ्या थाटामाटात आगमण , गणेश उत्सव साजरा1
- आमच्या गावाची स्वच्छता आमच्या dalambi गावामध्ये खूप प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. ओला कचरा सुखा कचरा आणि घरातील wastage कचरा यामुळे गावात बिमारी च प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.3
- माना फाट्यावर प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग! | एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट मूर्तिजापूर तालुक्यातील माना फाटा येथे प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. गुजरातमधील दहेज येथून प्लास्टिकचे दाणे घेऊन कलकत्त्याच्या दिशेने जाणाऱ्या NL 01 AJ 4266 क्रमांकाच्या ट्रकच्या एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. माना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत ट्रकच्या एसी केबिनचे मोठे नुकसान झाले असून प्लास्टिकच्या दाण्यांचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने चालकासह कोणालाही दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला. 📍 घटनास्थळ: माना फाटा, मूर्तिजापूर तालुका, अकोला 🚛 ट्रक: NL 01 AJ 4266 🔥 प्राथमिक कारण: एसी केबिनमधील शॉर्टसर्किट इंडिया न्यूज आर सेवन | भारताची आवाज उपसंपादक मोहम्मद रिज़वान सिद्दिकी, मूर्तिजापूर बातमी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.1
- महिना उलटला पाऊस नाही, विहिर बोरवेलला पुरेसे पाणी असूनही शेतातील वीज गुल,खरीप पिके धोक्यात,शेतकऱ्याचा टाहो हिंगोली जिल्ह्यात विशेषता कळमनुरी तालुक्यात एका महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके हातची गेली आहेत,तूर ,कापूस, सोयाबीन,हळद ही पिके पाऊस नसल्याने धोक्यात आली आहे.एकंदरीत तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे.महिनाभरापासून पाऊस नाही विहिरी बोरला पुरेशी पाणी असताना देखील शेतातील वीज वारंवार गुण होत आहे त्यामुळे मुबलक पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही,अशी परिस्थिती शेतकऱ्यावर येऊन ठेपली आहे कळमनुरी तालुक्यातील सांडस परीसरात शेतकऱ्यांनी या समस्या बद्दल एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे .या भागात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने येथील पिकाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे .1