मेन राजाराममध्ये महिला दिन उत्साहात साजरा* *मेन राजाराममध्ये महिला दिन उत्साहात साजरा* महिला म्हणजे फक्त एक व्यक्ती नसून ती घराची धडपड,स्वप्नांची उंच भरारी आहे-शितल सोळसे कोल्हापूर:( प्रतिनिधी यांस कडून) महिला दिन हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसून स्त्रीच्या सामर्थ्यांचा त्यागाचा,संघर्षाचा आणि अमर्याद कर्तृत्वाचा सन्मानाचा दिवस आहे.आपला स्वाभिमान सांभाळत आई वडील,गुरूजन यांनी केलेल्या संस्काराच्या मार्गावर चालत रहा,असे प्रतिपादन पोस्टमन शितल सोळसे यांनी व्यक्त केले.त्या जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. स्त्री ही केवळ घराचा आधारस्तंभ नसून संयमाने संसाराला शांती समाधान मिळते.तिच्या भक्तीने घर उजळते.तिच्या संयम, सहनशीलतेमुळे प्रत्येक अडचण दूर होते.तिचा सन्मान व आदर करूया असे विचार अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ गजानन खाडे यांनी मांडले. याप्रसंगी हिंद कन्या छात्रालय,टाकाळा कोल्हापूर चे अधिक्षक वंदना कांबळे, भवानी मंडप येथे खेळणी विक्री करणाऱ्या पुजा शंभू साह,तसेच एक किंवा दोन मुली असणाऱ्या महिला कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. वंदना कांबळे (अधिक्षक) ,प्रिया खाडे,दिशा चव्हाण, सृष्टी कंदले, प्रणाली तोडकर या विद्यार्थ्यिनींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पर्यवेक्षिका शितल पत्रावळे,अतिथी स्वागत व परिचय प्रा बाबासाहेब माळवे , सूत्रसंचालन सुषमा पाटील व आभार प्रमिला मळगे यांनी मानले. यावेळी अयोध्या धुमाळ,दिपा लोहार,एच जे पठाण,विद्या कदम, दिपाली पाटील,पुनम माळी, माधवी खाडे, प्रणाली जांभळे,सरोजिनी चव्हाण, संगिता चव्हाण, अनिल लाड,बी टी यादव, हर्षवर्धन काटकर,संजय कुंभार, विकास पाटील, राहूल देशमुख, डॉ संतोष माने,राजू मोरे, प्रफुल्ल कदम, निलेश साळोखे,शुभम गुरव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
मेन राजाराममध्ये महिला दिन उत्साहात साजरा* *मेन राजाराममध्ये महिला दिन उत्साहात साजरा* महिला म्हणजे फक्त एक व्यक्ती नसून ती घराची धडपड,स्वप्नांची उंच भरारी आहे-शितल सोळसे कोल्हापूर:( प्रतिनिधी यांस कडून) महिला दिन हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसून स्त्रीच्या सामर्थ्यांचा त्यागाचा,संघर्षाचा आणि अमर्याद कर्तृत्वाचा सन्मानाचा दिवस आहे.आपला स्वाभिमान सांभाळत आई वडील,गुरूजन यांनी केलेल्या संस्काराच्या मार्गावर चालत रहा,असे प्रतिपादन पोस्टमन शितल सोळसे यांनी व्यक्त केले.त्या जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. स्त्री ही केवळ घराचा आधारस्तंभ नसून संयमाने संसाराला शांती समाधान मिळते.तिच्या भक्तीने घर उजळते.तिच्या संयम, सहनशीलतेमुळे प्रत्येक अडचण दूर होते.तिचा सन्मान व आदर करूया असे विचार अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ
गजानन खाडे यांनी मांडले. याप्रसंगी हिंद कन्या छात्रालय,टाकाळा कोल्हापूर चे अधिक्षक वंदना कांबळे, भवानी मंडप येथे खेळणी विक्री करणाऱ्या पुजा शंभू साह,तसेच एक किंवा दोन मुली असणाऱ्या महिला कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. वंदना कांबळे (अधिक्षक) ,प्रिया खाडे,दिशा चव्हाण, सृष्टी कंदले, प्रणाली तोडकर या विद्यार्थ्यिनींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पर्यवेक्षिका शितल पत्रावळे,अतिथी स्वागत व परिचय प्रा बाबासाहेब माळवे , सूत्रसंचालन सुषमा पाटील व आभार प्रमिला मळगे यांनी मानले. यावेळी अयोध्या धुमाळ,दिपा लोहार,एच जे पठाण,विद्या कदम, दिपाली पाटील,पुनम माळी, माधवी खाडे, प्रणाली जांभळे,सरोजिनी चव्हाण, संगिता चव्हाण, अनिल लाड,बी टी यादव, हर्षवर्धन काटकर,संजय कुंभार, विकास पाटील, राहूल देशमुख, डॉ संतोष माने,राजू मोरे, प्रफुल्ल कदम, निलेश साळोखे,शुभम गुरव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
- इचलकरंजी जवळील तारदाळ येथे जुन्या वादातून चाकूहल्ल्याची धक्कादायक घटना घडली. जावेद मुजावर वय अंदाजे बावीस वर्षे राहणार तारदाळ याच्यावर यश गायकवाड राहणार जावई वाडी याने चाकूने जीवघेणा वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या जावेद मुजावर याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. शहापूर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.1
- कोल्हापूर ०८ सिटी न्यूज नेटवर्क जागतिक महिला दिनानिमित्त मुस्लिम प्रोग्रेसिव महासंघाच्या वतीने महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिलांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन यावेळी मान्यवरांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. गीता पिल्लई उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. योग्य आहार, नियमित तपासणी आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतल्यास महिलांचे आयुष्य अधिक निरोगी आणि सक्षम होऊ शकते. महिलांनी स्वयंपूर्ण होऊन कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीत मोठा वाटा उचलावा, असेही त्यांनी सांगितले1
- वारंवार होणारी वीज रोहित्र (डीपी) चोरी आणि त्यामुळे अंधारात जाणारी शेती यावर अखेर चितळीच्या शेतकऱ्यांनी स्वतःच 'इलाज' शोधला आहे. टेंभू कॅनॉल जलसेतू परिसरातील जंगल डीपीवर पुन्हा एकदा दरोडा टाकण्याचा चोरट्यांचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि बसवलेल्या सीसीटीव्ही सायरनमुळे फसला आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांचा चेहरा कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून आता 'मायणी पोलीस' त्यांना कधी गजाआड करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चितळी येथील टेंभू कॅनॉल नजीक असलेला 'जंगल डीपी' चोरट्यांचे सॉफ्ट टार्गेट बनला होता. यापूर्वी दोन वेळा या ठिकाणची चोरी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते आणि पिकांना पाणी देणेही कठीण झाले होते. सततच्या या त्रासाला कंटाळून येथील लाभार्थी शेतकऱ्यांनी एकत्र येत एक अनोखा निर्णय घेतला. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी नवीन डीपी बसवताना शेतकऱ्यांनी स्वखर्चाने वर्गणी गोळा केली आणि या परिसरात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे व हाय-डेसिबल सायरन बसवला. तंत्रज्ञानाचा हा वापर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला. सायरन वाजला अन् चोरट्यांनी पळ काढला! ५ मार्च २०२६ च्या रात्री चोरट्यांनी पुन्हा एकदा या डीपीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, डीपीला हात लावताच कार्यान्वित झालेल्या सायरनने परिसरात एकच खळबळ उडवून दिली. सायरनच्या आवाजाने धास्तावलेल्या चोरट्यांनी सामानासह तिथून पोबारा केला. या धावपळीत चोरट्यांचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे टिपला गेला आहे. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे चितळीकर शेतकरी हैराण आहेत. आतापर्यंत या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नव्हते. मात्र, आता शेतकऱ्यांनी चोरट्याचा थेट 'फोटो'च उपलब्ध करून दिल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी याठिकाणचे शेतकरी राजू पाटील,लालासो पाटील, दादासो पवार , विश्वजित पवार,लक्ष्मण कदम,गणेश मदने,सचिन पाटील,प्रशांत पवार,सुरेश सूर्यवशी,इंद्रजीत पवार,विकास पवार व ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. चौकट - "शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांच्या प्रश्नाकडे पोलिस विभागाने आजवर दुर्लक्ष केल्यानेच चोरट्याचे धाडस वाढले आहे. आता स्थानिक शेतकऱ्यांनी पैसे जमवून स्वतःच सुरक्षा यंत्रणा बसवली. आता चोरट्याचा पुरावाही त्यांनी पोलिसांकडे दिला आहे. पोलिस प्रशासनाने आता तरी कडक पावले उचलून या टोळीचा बंदोबस्त करावा, जेणेकरून शेतकरी सुखाची झोप घेऊ शकेल." - सौ,अनिता संभाजी कोळी, सदस्या,पंचायत समिती. (चितळी) चौकट - चितळीत वाळू चोरी, शेतकऱ्यांच्या विहिरीच्या मोटारी, डिपी , केबल चोरी,अवैध दारू विक्री,शालेय वस्तूंची चोरी ,अवैध धंदे असा लहान मोठ्या चोऱ्यां आणि प्रकरणाचा सिलसिला सुरूच आहे. याची पोलिस प्रशासनात दफ्तरी नोंद होते आणि प्रकरण विसरून टाकले जाते. काही बाबांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षही केले जाते . लोकांनी आता आपल्या चोऱ्यांची माहितीही पोलिसांना देणेही टाळले आहे. सातत्याने होणाऱ्या या चोऱ्यांच्या घटनांचा बीमोड करण्यासाठी मायणी पोलिसांना आपल्या धडक मोहिमेच्या कारभारातून आपली प्रतिमा उंचावून जनतेत आपली विश्वासार्हता वाढवण्याची गरज आहे. फोटो ओळी - १) चितळी येथील डीपी चोरीच्या प्रकरणात शेतकऱ्यांनी बसवलेल्या सीसीटीव्हीत कैद झालेला चोर. २) डिपी चोरी आणि हतबल शेतकरी यांचे काल्पनिक चित्र2
- Post by LOKSHAKATI RAKASHAK1
- मालवण कोळंब खालचीवाडी येथे गाव कमिटी अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्यावर रविवारी रात्री उशिरा गोळीबार करण्यात आला. गोळी त्यांच्या डोक्याच्या बाजूने गेल्यामुळे ते बचावले आहेत ज्या ठिकाणी गोळीबार झाला या घटनेत शिरटकर थोडक्यात बजावले आहेत रात्री उशिरा घटना घडल्यानंतर पोलिसांचे पथक कोळंबी ते दाखल झाला होतं पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत1
- मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.1
- Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र1
- ठीक आहे. **“मयूर एक्सप्रेस न्यूज”** साठी न्यूज स्टाईलमध्ये हेडलाईन आणि छोटा रिपोर्ट असा तयार करून देतो. --- **हेडलाईन :** **बांधकाम कामगारांवर प्रायव्हेट भांडे किट वाटप करणारारे ठेकेदारांची हुकूमशाही; मूलभूत सुविधांचा अभाव** **सोलापूर | प्रतिनिधी – मयूर एक्सप्रेस न्यूज** सोलापूर येथे बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या भांड्यांच्या किटचे वितरण करताना गोडाउनवर काही प्रायव्हेट ठेकेदारांकडून हुकूमशाही पद्धतीने वागणूक दिली जात असल्याची तक्रार कामगारांकडून करण्यात येत आहे. कामगारांना बसण्यासाठी जागा नाही, उभे राहण्यासाठीही योग्य व्यवस्था नाही, तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठीही कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. कामगारांशी अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक केली जात असून त्यांचा सन्मान राखला जात नसल्याची नाराजी कामगारांनी व्यक्त केली आहे. भारत हा कामगारांचा देश आहे आणि सोलापूर ही चार हुतात्म्यांची भूमी आहे, जे गिरणी कामगार होते. त्यामुळे कामगारांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र काही प्रायव्हेट ठेकेदारांना कामगारांची काळजी नसून फक्त टेंडर घेण्याचीच घाई दिसून येत असल्याची टीका कामगारांनी केली आहे. याशिवाय गोडाउन परिसरात व्हिडिओ काढण्यास मनाई करण्यात येत असून व्हिडिओ काढणाऱ्या नागरिकांशी आक्रमक पद्धतीने वागण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कामगारांना योग्य सन्मान देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनावर राहील, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत1