जिल्हा परिषद संचलित मेन राजाराम हायस्कूलमध्ये महिला दिन उत्साहात साजरा कोल्हापूर ०९ सिटी न्यूज नेटवर्क जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून स्त्रीशक्तीचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून पोस्टमन शितल सोळसे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महिला दिन हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसून स्त्रीच्या सामर्थ्याचा, त्यागाचा, संघर्षाचा आणि अमर्याद कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. महिला म्हणजे फक्त एक व्यक्ती नसून ती घराची धडपड आणि स्वप्नांची उंच भरारी आहे. आई-वडील आणि गुरुजनांनी दिलेल्या संस्कारांच्या मार्गावर चालत स्वाभिमानाने जीवन जगावे, असे त्यांनी विद्यार्थिनींना आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गजानन खाडे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, स्त्री ही केवळ घराचा आधारस्तंभ नसून तिच्या संयम, सहनशीलता आणि भक्तीमुळे घरात शांती व समाधान नांदते. समाजाने स्त्रीचा सन्मान आणि आदर करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी हिंद कन्या छात्रालय टाकाळा, कोल्हापूरच्या अधिक्षक वंदना कांबळे, भवानी मंडप परिसरात खेळणी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या पुजा शंभू साह तसेच एक किंवा दोन मुली असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात वंदना कांबळे, प्रिया खाडे, दिशा चव्हाण, सृष्टी कंदले आणि प्रणाली तोडकर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका शितल पत्रावळे यांनी केले. अतिथींचे स्वागत व परिचय प्रा. बाबासाहेब माळवे यांनी करून दिला. सूत्रसंचालन सुषमा पाटील यांनी केले, तर आभार प्रमिला मळगे यांनी मानले. या कार्यक्रमास अयोध्या धुमाळ, दिपा लोहार, एच. जे. पठाण, विद्या कदम, दिपाली पाटील, पुनम माळी, माधवी खाडे, प्रणाली जांभळे, सरोजिनी चव्हाण, संगिता चव्हाण, अनिल लाड, बी. टी. यादव, हर्षवर्धन काटकर, संजय कुंभार, विकास पाटील, राहुल देशमुख, डॉ. संतोष माने, राजू मोरे, प्रफुल्ल कदम, निलेश साळोखे, शुभम गुरव यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद संचलित मेन राजाराम हायस्कूलमध्ये महिला दिन उत्साहात साजरा कोल्हापूर ०९ सिटी न्यूज नेटवर्क जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून स्त्रीशक्तीचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून पोस्टमन शितल सोळसे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महिला दिन हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसून स्त्रीच्या सामर्थ्याचा, त्यागाचा, संघर्षाचा आणि अमर्याद कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. महिला म्हणजे फक्त एक व्यक्ती नसून ती घराची धडपड आणि स्वप्नांची उंच भरारी आहे. आई-वडील आणि गुरुजनांनी दिलेल्या संस्कारांच्या मार्गावर चालत स्वाभिमानाने जीवन जगावे, असे त्यांनी विद्यार्थिनींना आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गजानन खाडे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, स्त्री ही केवळ घराचा आधारस्तंभ नसून तिच्या संयम, सहनशीलता आणि भक्तीमुळे घरात शांती व समाधान नांदते. समाजाने स्त्रीचा सन्मान आणि आदर करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी हिंद कन्या छात्रालय टाकाळा, कोल्हापूरच्या अधिक्षक वंदना कांबळे, भवानी मंडप परिसरात खेळणी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या पुजा शंभू साह तसेच एक किंवा दोन मुली असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात वंदना कांबळे, प्रिया खाडे, दिशा चव्हाण, सृष्टी कंदले आणि प्रणाली तोडकर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका शितल पत्रावळे यांनी केले. अतिथींचे स्वागत व परिचय प्रा. बाबासाहेब माळवे यांनी करून दिला. सूत्रसंचालन सुषमा पाटील यांनी केले, तर आभार प्रमिला मळगे यांनी मानले. या कार्यक्रमास अयोध्या धुमाळ, दिपा लोहार, एच. जे. पठाण, विद्या कदम, दिपाली पाटील, पुनम माळी, माधवी खाडे, प्रणाली जांभळे, सरोजिनी चव्हाण, संगिता चव्हाण, अनिल लाड, बी. टी. यादव, हर्षवर्धन काटकर, संजय कुंभार, विकास पाटील, राहुल देशमुख, डॉ. संतोष माने, राजू मोरे, प्रफुल्ल कदम, निलेश साळोखे, शुभम गुरव यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- कोल्हापूर ०८ सिटी न्यूज नेटवर्क जागतिक महिला दिनानिमित्त मुस्लिम प्रोग्रेसिव महासंघाच्या वतीने महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिलांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन यावेळी मान्यवरांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. गीता पिल्लई उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. योग्य आहार, नियमित तपासणी आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतल्यास महिलांचे आयुष्य अधिक निरोगी आणि सक्षम होऊ शकते. महिलांनी स्वयंपूर्ण होऊन कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीत मोठा वाटा उचलावा, असेही त्यांनी सांगितले1
- इचलकरंजी जवळील तारदाळ येथे जुन्या वादातून चाकूहल्ल्याची धक्कादायक घटना घडली. जावेद मुजावर वय अंदाजे बावीस वर्षे राहणार तारदाळ याच्यावर यश गायकवाड राहणार जावई वाडी याने चाकूने जीवघेणा वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या जावेद मुजावर याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. शहापूर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.1
- मालवण कोळंब खालचीवाडी येथे गाव कमिटी अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्यावर रविवारी रात्री उशिरा गोळीबार करण्यात आला. गोळी त्यांच्या डोक्याच्या बाजूने गेल्यामुळे ते बचावले आहेत ज्या ठिकाणी गोळीबार झाला या घटनेत शिरटकर थोडक्यात बजावले आहेत रात्री उशिरा घटना घडल्यानंतर पोलिसांचे पथक कोळंबी ते दाखल झाला होतं पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत1
- वारंवार होणारी वीज रोहित्र (डीपी) चोरी आणि त्यामुळे अंधारात जाणारी शेती यावर अखेर चितळीच्या शेतकऱ्यांनी स्वतःच 'इलाज' शोधला आहे. टेंभू कॅनॉल जलसेतू परिसरातील जंगल डीपीवर पुन्हा एकदा दरोडा टाकण्याचा चोरट्यांचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि बसवलेल्या सीसीटीव्ही सायरनमुळे फसला आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांचा चेहरा कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून आता 'मायणी पोलीस' त्यांना कधी गजाआड करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चितळी येथील टेंभू कॅनॉल नजीक असलेला 'जंगल डीपी' चोरट्यांचे सॉफ्ट टार्गेट बनला होता. यापूर्वी दोन वेळा या ठिकाणची चोरी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते आणि पिकांना पाणी देणेही कठीण झाले होते. सततच्या या त्रासाला कंटाळून येथील लाभार्थी शेतकऱ्यांनी एकत्र येत एक अनोखा निर्णय घेतला. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी नवीन डीपी बसवताना शेतकऱ्यांनी स्वखर्चाने वर्गणी गोळा केली आणि या परिसरात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे व हाय-डेसिबल सायरन बसवला. तंत्रज्ञानाचा हा वापर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला. सायरन वाजला अन् चोरट्यांनी पळ काढला! ५ मार्च २०२६ च्या रात्री चोरट्यांनी पुन्हा एकदा या डीपीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, डीपीला हात लावताच कार्यान्वित झालेल्या सायरनने परिसरात एकच खळबळ उडवून दिली. सायरनच्या आवाजाने धास्तावलेल्या चोरट्यांनी सामानासह तिथून पोबारा केला. या धावपळीत चोरट्यांचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे टिपला गेला आहे. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे चितळीकर शेतकरी हैराण आहेत. आतापर्यंत या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नव्हते. मात्र, आता शेतकऱ्यांनी चोरट्याचा थेट 'फोटो'च उपलब्ध करून दिल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी याठिकाणचे शेतकरी राजू पाटील,लालासो पाटील, दादासो पवार , विश्वजित पवार,लक्ष्मण कदम,गणेश मदने,सचिन पाटील,प्रशांत पवार,सुरेश सूर्यवशी,इंद्रजीत पवार,विकास पवार व ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. चौकट - "शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांच्या प्रश्नाकडे पोलिस विभागाने आजवर दुर्लक्ष केल्यानेच चोरट्याचे धाडस वाढले आहे. आता स्थानिक शेतकऱ्यांनी पैसे जमवून स्वतःच सुरक्षा यंत्रणा बसवली. आता चोरट्याचा पुरावाही त्यांनी पोलिसांकडे दिला आहे. पोलिस प्रशासनाने आता तरी कडक पावले उचलून या टोळीचा बंदोबस्त करावा, जेणेकरून शेतकरी सुखाची झोप घेऊ शकेल." - सौ,अनिता संभाजी कोळी, सदस्या,पंचायत समिती. (चितळी) चौकट - चितळीत वाळू चोरी, शेतकऱ्यांच्या विहिरीच्या मोटारी, डिपी , केबल चोरी,अवैध दारू विक्री,शालेय वस्तूंची चोरी ,अवैध धंदे असा लहान मोठ्या चोऱ्यां आणि प्रकरणाचा सिलसिला सुरूच आहे. याची पोलिस प्रशासनात दफ्तरी नोंद होते आणि प्रकरण विसरून टाकले जाते. काही बाबांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षही केले जाते . लोकांनी आता आपल्या चोऱ्यांची माहितीही पोलिसांना देणेही टाळले आहे. सातत्याने होणाऱ्या या चोऱ्यांच्या घटनांचा बीमोड करण्यासाठी मायणी पोलिसांना आपल्या धडक मोहिमेच्या कारभारातून आपली प्रतिमा उंचावून जनतेत आपली विश्वासार्हता वाढवण्याची गरज आहे. फोटो ओळी - १) चितळी येथील डीपी चोरीच्या प्रकरणात शेतकऱ्यांनी बसवलेल्या सीसीटीव्हीत कैद झालेला चोर. २) डिपी चोरी आणि हतबल शेतकरी यांचे काल्पनिक चित्र2
- Post by LOKSHAKATI RAKASHAK1
- मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.1
- Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र1
- विक्रम शिंदे/ भोर दि.9 भोर पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया आज दि.9 प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांच्या मार्गदर्शकसूचने नुसार पंचायत समिती भोर येथे पार पडली.राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपाचे समसमान उमेदवार निवडून आल्याने अखेर चिट्ठीवर सभापती आणि उपसभापती निवडनुकीत नशिबाची साथ राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाली आणि दोन्ही पदे मिळाल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.यावेळी जिप माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे ,राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष संतोष घोरपडे , विक्रम खुटवड ,भालचंद्र जगताप आदी उपस्थित होते.1