एटापल्ली, भामरागडला जाणाऱ्या बसेस अडकल्या आलापल्लीत भामरागडपर्यंत जाऊ शकल्या नाहीत. या बसेस आलापल्ली येथून नागपूरला परत आल्या अहेरी गडचिरोली परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही भागातील वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांना त्याचा फटका बसला असून एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातून रवाना झालेल्या बसेस एटापल्ली व भामरागडपर्यंत जाऊ शकल्या नाहीत. या बसेस आलापल्ली येथून नागपूरला परत आल्या. नागपूर विभागातून एकूण ३ बसेस भामरागड आणि एटापल्लीसाठी धावतात; परंतु गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे एटापल्ली आणि भामरागड भागातील रस्ते पाण्याखाली आले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव नागपूर विभागातील बसेस आलापल्लीला थांबविण्यात आल्या. तेथूनच या बसेस नागपूरला परत आल्या. यामुळे एसटी महामंडळाच्या बसेस ५०० किलोमीटर अंतर कमी धावल्या. एटापल्ली आणि भामरागड भागातील पावसाचे पाणी ओसरल्यानंतर या बसेस पुन्हा धावतील, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
एटापल्ली, भामरागडला जाणाऱ्या बसेस अडकल्या आलापल्लीत भामरागडपर्यंत जाऊ शकल्या नाहीत. या बसेस आलापल्ली येथून नागपूरला परत आल्या अहेरी गडचिरोली परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही भागातील वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांना त्याचा फटका बसला असून एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातून रवाना झालेल्या बसेस एटापल्ली व भामरागडपर्यंत जाऊ शकल्या नाहीत. या बसेस आलापल्ली येथून नागपूरला परत आल्या. नागपूर विभागातून एकूण ३ बसेस भामरागड आणि एटापल्लीसाठी धावतात; परंतु गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे एटापल्ली आणि भामरागड भागातील रस्ते पाण्याखाली आले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव नागपूर विभागातील बसेस आलापल्लीला थांबविण्यात आल्या. तेथूनच या बसेस नागपूरला परत आल्या. यामुळे एसटी महामंडळाच्या बसेस ५०० किलोमीटर अंतर कमी धावल्या. एटापल्ली आणि भामरागड भागातील पावसाचे पाणी ओसरल्यानंतर या बसेस पुन्हा धावतील, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
- ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ1
- दरवर्षीचा तोच खेळ... पूर आला की रस्ता बंद! वडकी–पिंपळापूर पुलासाठी नागरिकांचा संताप अनावर दरवर्षीचा तोच खेळ... पूर आला की रस्ता बंद! वडकी–पिंपळापूर पुलासाठी नागरिकांचा संताप अनावर पुलाची उंची वाढवा, नागरिकांचे जीव वाचवा; सरपंच रवींद्र चौधरींचा लोकप्रतिनिधींवर घणाघात राळेगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील वडकी गावाला लागून असलेल्या पिंपळापूर मार्गावरील नाल्याला आज आलेल्या पुरामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. थोड्याशा पावसातही पूल पाण्याखाली जात असल्याने शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिकांना दोन्ही बाजूंना तासन्तास अडकून पडावे लागले. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून प्रशासन व लोकप्रतिनिधीं विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वडकी, पिंपळापूर व वडगाव येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची उंची वाढविण्याची मागणी सातत्याने करीत आहेत. मात्र प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आज नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे खोळंबली. शाळेतून परतणारे विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर आणि इतर नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर पिंपळापूरचे सरपंच रवींद्र चौधरी यांनी लोकप्रतिनिधींवर जोरदार घणाघात केला. "दरवर्षी हाच प्रकार घडतो. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असतानाही लोकप्रतिनिधींना या प्रश्नाचे काहीच सोयरसुतक नाही. केवळ आश्वासनांची खैरात केली जाते; मात्र पुलाची उंची वाढविण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही," असा संताप त्यांनी व्यक्त केला. नागरिकांचे म्हणणे आहे की, पुलाची उंची वाढविल्यास दरवर्षी उद्भवणारी ही गंभीर समस्या कायमची निकाली निघू शकते. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने या पुलाच्या उंचीवाढीचा निर्णय घ्यावा. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.1
- देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रंजीत कांबळे यांचा वृक्षारोपण करून करण्यात आला वाढदिवस साजरा देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राची माजी आमदार रंजीत कांबळे यांचा वृक्षारोपण करून वाढदिवस करण्यात आला साजरा वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील काँग्रेस पक्षाद्वारे देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रंजीत कांबळे यांचा वाढदिवस अल्लीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये उपयोगी अनेक झाडे लावण्यात आली वृक्षारोपण कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष हिंगणघाट श्रीराम साखरकर बालू महाजन प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य सचिन पारसडे गोपाल मेघरे संदीप नरड प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य हरून अली माजी उपसरपंच खलील शेख प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य राहुल वाटखेडे माझी तंटामुक्ती अध्यक्ष धनराज सुपारे नितीन शेलकर सतीश देठे वैद्यकीय अधिकारी गुजरकर मॅडम व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व गावातील काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.2
- एस टी महामंडळाचा लपंडाव सुरू विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात..... तालुका प्रतिनिधी हिंगणा हिंगणा मार्ग वाघ उमरी ही बस शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता नेहमी सुरू असते. परंतू शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत नेहमी लपंडाव खेळत आहे दोन दोन विषयांचे तास निघून जातात परंतु एस टी महामंडळाचा लपंडाव मात्र सुरू उमरी वाघ येथील पालकांनी निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकरी आणि विद्यार्थी करीत आहे.1
- गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखरावर भक्तीचा महासागर; रिमझिम पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखरावर भक्तीचा महासागर; रिमझिम पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती माहूरगड प्रतिनिधी: धनंजय आराध्ये श्रीक्षेत्र माहूरगड येथील पवित्र श्री दत्तात्रेय शिखर संस्थानात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित गुरुपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतानाही महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या हजारो भाविकांनी दत्तशिखरावर दर्शनासाठी अलोट गर्दी केली. पावसाकडे दुर्लक्ष करून भाविकांनी गुरुदर्शन व गुरुपूजनाचा लाभ घेतल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्तात्रेय शिखर संस्थानाचे श्री श्री १००८ महंत धनेश्वर भारती महाराज (गुरु मधुसूदन भारती) यांच्या शुभहस्ते पहाटे श्री दत्तात्रेय महाराजांचा वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात आला. त्यानंतर परिसरातील सर्व देवतांचे पूजन, समाधीपूजन तसेच विविध धार्मिक विधी पार पडले. या धार्मिक विधींचे पुरोहित्य विलासराव जोशी, रवींद्र जोशी, ऋषिकेश जोशी व विकास जोशी यांनी केले. यानंतर श्री १००८ महंत धनेश्वर भारती महाराज गादीवर विराजमान झाले. पोथीवाचन, गुरुपूजन, आशीर्वचन आणि विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. उपस्थित संत-महंत, महापुरुष तसेच हजारो भाविकांनी गुरुपूजन करून आशीर्वाद घेतले. पावसाच्या सरींनीही या पवित्र सोहळ्याची शोभा अधिक खुलविली. या सोहळ्यास वासुदेव भारती महाराज, परमेश्वर भारती, धनराज भारती महाराज, चिंतामण भारती महाराज, चिरंजीव भारती, हरिहर भारती, वामन भारती, सुभाष भारती, शिलानंद भारती, सुजान भारती, माधवगिरी महाराज, गजराज भारती, नितेश भारती, अक्षयगिरी यांच्यासह अनेक संत-महंत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थानचे व्यवस्थापक जी. एन. नाईक, अश्विन माने, विश्वस्त मंडळ तसेच सेवेकरी यांनी विशेष परिश्रम घेतले. गुरुपूजनानंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या अखेरीस "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त", "देवदत्त श्री दत्तात्रय महाराज की जय" या जयघोषांनी संपूर्ण दत्तशिखर परिसर दुमदुमून गेला. भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाने भरलेला हा गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला.1
- एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या वतीने व्याघ्र संवर्धनासह इतर प्रजातींचे संरक्षण, बचाव व जागृतीसाठी एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या वतीने व्याघ्र संवर्धनासह इतर प्रजातींचे संरक्षण, बचाव व जागृतीसाठी1
- अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव यांनी नागपूर चे जिल्हाधिकारी मा.श्री.कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली. अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव यांनी नागपूर चे जिल्हाधिकारी मा.श्री.कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली. आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भूमाफियांनी विविध बोगस सोसायटी स्थापन केल्या असून,आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करण्यात येत आहे. या संदर्भात ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गंभीर विषयाची सविस्तर माहिती दिली.1
- गडचिरोलीतील भामरागड आणि सिरोंचा परिसरात अनेक नदी-नाल्यांना पूर गडचिरोलीतील भामरागड आणि सिरोंचा परिसरात अनेक नदी-नाल्यांना पूर गडचिरोली: (दि ३०) गडचिरोली–चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. तसेच दक्षिण गडचिरोलीतील भामरागड आणि सिरोंचा परिसरात अनेक नदी-नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.1