सुरगाणा तालुक्यातील केम डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पंगारबारी गावात अपूर्ण स्मशानभूमीमुळे अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे. गावातील १६ वर्षीय खुशी कांतीलाल पिठे हिचे अल्पशा आजाराने निधन झाले, मात्र गेल्या वर्षभरापासून स्मशानभूमीचे बांधकाम अर्धवट पडून असल्याने ग्रामस्थांना मुसळधार पावसात भुईडाग करून तिच्यावर अंत्यसंस्कार करावे लागले. अंत्यसंस्कारासाठी खड्डा खोदताना सतत पावसाचे आणि जमिनीतून झिरपणारे पाणी साचत असल्याने ग्रामस्थांना बादल्या, मोटारपंप आणि इतर साधनांच्या मदतीने अथक प्रयत्न करून पाणी उपसावे लागले. या घटनेमुळे पंगारबारी ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पसरला असून त्यांनी ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित ठेकेदाराच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सार्वजनिक निधीतून सुरू असलेले काम वर्षभरापासून अपूर्ण का राहिले, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नागरिक आगामी ग्रामसभेत हा मुद्दा ठामपणे मांडून जबाबदारी निश्चित करण्याच्या निर्धारात आहेत. दरवर्षी पावसाळ्यात अपूर्ण स्मशानभूमीमुळे नागरिकांना असा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याने जिल्हा प्रशासन, पंचायत समिती आणि संबंधित विभागांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. भविष्यात कोणत्याही कुटुंबावर अशी वेदनादायी वेळ येऊ नये यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दर्जेदार काम पूर्ण करावे आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
सुरगाणा तालुक्यातील केम डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पंगारबारी गावात अपूर्ण स्मशानभूमीमुळे अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे. गावातील १६ वर्षीय खुशी कांतीलाल पिठे हिचे अल्पशा आजाराने निधन झाले, मात्र गेल्या वर्षभरापासून स्मशानभूमीचे बांधकाम अर्धवट पडून असल्याने ग्रामस्थांना मुसळधार पावसात भुईडाग करून तिच्यावर अंत्यसंस्कार करावे लागले. अंत्यसंस्कारासाठी खड्डा खोदताना
सतत पावसाचे आणि जमिनीतून झिरपणारे पाणी साचत असल्याने ग्रामस्थांना बादल्या, मोटारपंप आणि इतर साधनांच्या मदतीने अथक प्रयत्न करून पाणी उपसावे लागले. या घटनेमुळे पंगारबारी ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पसरला असून त्यांनी ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित ठेकेदाराच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सार्वजनिक निधीतून सुरू असलेले काम वर्षभरापासून
अपूर्ण का राहिले, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नागरिक आगामी ग्रामसभेत हा मुद्दा ठामपणे मांडून जबाबदारी निश्चित करण्याच्या निर्धारात आहेत. दरवर्षी पावसाळ्यात अपूर्ण स्मशानभूमीमुळे नागरिकांना असा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याने जिल्हा प्रशासन, पंचायत समिती आणि संबंधित
विभागांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. भविष्यात कोणत्याही कुटुंबावर अशी वेदनादायी वेळ येऊ नये यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दर्जेदार काम पूर्ण करावे आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
- दिव्य भारत बीएसएम न्यूजनाशिक, नाशिक, महाराष्ट्र8 hrs ago
- नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता 'टोलकरी' नितीन गडकरी यांनीही तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. देशात इथेनॉलच्या अनुषंगाने एक मोठे कांड झाले असून हे कांड करणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून मोदी सरकारमधीलच एक मंत्री असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. सर्वसामान्यांच्या वाहनांमध्ये इथेनॉलयुक्त डिझेल आणि पेट्रोल दिल्यामुळे एका बाजूला गाड्यांची पूर्ण वाट लागली असून वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला इथेनॉलची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी यातून वारेमाप पैसा कमावला आहे. हा एकीकडे भ्रष्टाचार आहे, तर दुसरीकडे नागरिकांना छळण्याचाच प्रकार आहे. या इथेनॉल घोटाळ्यामुळे गेल्या दिवसांत ज्या तमाम वाहनधारकांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर क्षती झाली आहे, अशा सर्वांची मोदी यांनी माफी मागावी आणि नितीन गडकरी यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा येथे केली.1
- आषाढी एकादशीचे औचित्य साधून कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयातर्फे 'आषाढी वारी व साक्षरता दिंडी' अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. टाळ-मृदुंगाचा गजर आणि "ज्ञानबा-तुकाराम"च्या जयघोषाने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता. विद्यालयातून निघालेली ही दिंडी श्रीराममंदिर मार्गे कोपरगाव पंचायत समितीपर्यंत काढण्यात आली. या दिंडीत वारकरी वेशभूषेत आलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि विठ्ठल-रखुमाईचे रूप धारण केलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या दिंडीतून भक्तीसोबतच साक्षरतेचा संदेशही प्रभावीपणे देण्यात आला, ज्यामध्ये साक्षरता फलकाचे आकर्षक लेखन श्री. अतुल कोताडे यांनी केले. यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन श्री. चंद्रकांत ठोळे, कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. कैलास ठोळे, सचिव श्री. दिलीप अजमेरे, सहसचिव श्री. सचिन अजमेरे, खजिनदार श्री. आनंद ठोळे, सदस्य डॉ. अमोल अजमेरे, श्री. राजेश ठोळे, श्री. संदीप अजमेरे आणि श्री. दिलीप तुपसैंदर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून दिंडीचे स्वागत केले व विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री. सुरेंद्र शिरसाळे, पर्यवेक्षक श्री. बलभीम उल्हारे यांच्यासह श्री. संजय बर्डे, सौ. शितल अजमेरे, सौ. संजीवनी डरांगे, सौ. रूपाली साळुंखे, श्रीमती स्वाती जाधव, सौ. पल्लवी तुपसैंदर, सौ. छाया निंबाळकर, श्री. योगेश गवळे, श्री. दिगंबर देसाई, श्री. सचिन डोळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध, भक्तिमय आणि उत्स्फूर्त सहभागामुळे या आषाढी वारीने सर्व कोपरगावकरांची मने जिंकली.3
- नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या बातमीचे वृत्त धडकताच येवला शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या आनंदोत्सवाची सुरुवात विंचूर चौफुली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यानंतर शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात आणि आंदोलक विद्यार्थ्यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. चौफुलीवर भव्य फटाक्यांची आतिशबाजी करत शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला. या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, शहरप्रमुख लक्ष्मण गवळी, तालुकाप्रमुख छगनराव आहेर, युवा सेना तालुकाप्रमुख संतोष गोरे आणि शहरप्रमुख गणेश वडनेरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसैनिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.1
- मालेगाव शहरातील जुना आग्रा रोडवर एकरा टूल्स या दुकानासमोर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नादुरुस्त झाली असून तेथे गळती सुरू झाली आहे. सध्या या लिकेजचे प्रमाण कमी असले तरी ते कधीही वाढण्याची शक्यता आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी बुधवार २९ जुलै, गुरुवार ३० जुलै व शुक्रवार ३१ जुलै अशा तीन दिवसांचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे. शटडाऊनचे सुधारित वेळापत्रक नियोजन करून जाहीर केले जाईल. जलवाहिनी दुरुस्तीचे हे ठिकाण अत्यंत रहदारीचे आणि वर्दळीचे असल्याने कामात येणाऱ्या अडचणींमुळे दुरुस्तीसाठी अधिकचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बुधवार २९ जुलै ते शुक्रवार ३१ जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत मालेगाव शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.1
- सोशल मीडियावर गुजरातच्या वळसाडमधील मधुबन धरण फुटल्याची खोटी अफवा पसरल्यामुळे गावांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी ही अफवा तातडीने फेटाळत धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. कपराडा-धरमपूर भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाणी वाढले होते, त्यामुळे नियमांनुसार टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः धरणावर जाऊन व्हिडिओद्वारे नागरिकांना माहिती दिली. प्रशासनाने लोकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि घरे न सोडण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे वळसाड शहरातील सखल भागात पूर आला असून काही भागांत ७ ते ११ फूट पाणी शिरले आहे.1
- नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील सराड परिसरात २५ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजेच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. नाशिकचे जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संखे, तहसीलदार रामजी राठोड आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रभावित भागांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम सराड गावात भेट देऊन जीवित अथवा वित्तहानीची माहिती घेतली आणि सर्व संबंधित यंत्रणांना आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या. प्रशासकीय दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांनी हतगडजवळील गायदरपाडा येथील अंगणवाडी व शाळेला भेट देऊन इमारतीची सुरक्षितता, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय आणि पोषण आहाराच्या व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर गारमाळ येथे एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडल्याने पीडित कुटुंबाची भेट घेऊन नुकसानाची पाहणी केली. महसूल अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून नियमानुसार मदत देण्याचे निर्देश देण्यात आले असून, नागरिकांना धोकादायक इमारतींपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर देवलदरी येथे तालुका कृषी विभागाच्या 'खत वितरण बांधावर' या उपक्रमात जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी स्वतः पारंपरिक घोंगडे (इरले) परिधान करून चिखलात उतरत भातलावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी त्यांनी पावसाचे प्रमाण, भात लागवड, खत पुरवठा आणि कृषी योजनांबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. दुर्गम आदिवासी भागातील शेतकऱ्यांना वेळेत बियाणे, खते व तांत्रिक मार्गदर्शन पुरवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या दौऱ्यात तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तिखे, संजय पवार, विलास भोये, श्रीमती सहारे आणि पोलीस पाटील रेखा पवार यांच्यासह अनेक अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.2
- विद्यार्थ्यांना झालेल्या अमानुष मारहाणीची चौकशी होणे गरजेचे असल्याचे अतुल लोंढे यांनी स्पष्ट केले आहे.1
- नाशिकच्या येवला येथील खांबेकर खुंटा येथे धडपड मंचच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्य देखाव्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी डॉक्टर बोळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले आणि उपस्थितांमध्ये लाडूचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, जलकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे आणि दत्तात्रेय नागडेकर सर उपस्थित होते. यांच्यासोबतच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सोहळ्याला उपस्थित होते.1
- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर भरारी पथक क्रमांक २ ने अकोले तालुक्यातील राजूर-घोटी रस्त्यावरील रंधा शिवार येथे मोठी कारवाई करत बनावट विदेशी दारूची विनापरवाना वाहतूक उघडकीस आणली आहे. या कारवाईत १२ बॉक्स परराज्यनिर्मित बनावट विदेशी दारू, एमएच १५ एफएफ ६१९३ क्रमांकाचे चारचाकी वाहन आणि एका अल्टो कारसह एकूण ₹५,३८,५२० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील नळवाळपाडा येथील रहिवासी समीर शिवाजी सोनवणे (वय १८), सुमित गोकुळ पवार (वय १८) आणि दीपक रघुनाथ महाले (वय २५) यांचा समावेश आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक ऋषिकेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भरारी पथक क्रमांक २ चे निरीक्षक एस. एस. हांडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत दुय्यम निरीक्षक एस. सी. मांडवेकर, पी. आर. गायकवाड तसेच जवान व्ही. एम. पाटोळे, एस. ए. बटुळे, ओ. बी. पालवे आणि यु. डी. काळे यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. सी. मांडवेकर करत आहेत.2