जागतिक वन दिनानिमित्त नवेगाव बांध येथे विद्यार्थ्यांना वनसंवर्धनाचा संदेश.. जागतिक वन दिनानिमित्त नवेगाव बांध येथे विद्यार्थ्यांना वनसंवर्धनाचा संदेश सामाजिक वनीकरण विभाग गोंदिया अंतर्गत वनपरिक्षेत्र अर्जुनी मोरच्या वतीने जागतिक वन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम आज दिनांक ३० मार्च रोजी नवेगाव बांध येथील ऑप्शन हॉलमध्ये पार पडला.कार्यक्रमाला लागवड अधिकारी कुमारी बनसोड मॅडम, हिरवळ संस्थेचे अध्यक्ष श्री रुपेशजी निंबार्ते, क्षेत्र सहाय्यक घुगे साहेब, बी.एम. लाडे सर, छत्रपाल चौधरी, आशिष दुबे, कुमारी मोनिका कोरे ( वनरक्षक) तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी सामाजिक वनीकरण विभाग गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात यू. एम. संग्रामय विद्यालय व बी. ए. डी. विद्यालय नवेगाव बांध येथील राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना वन आणि वन्यजीवांचे महत्त्व, पर्यावरणाचे संरक्षण तसेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वनसंवर्धन किती आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना चलतचित्रांच्या माध्यमातून पर्यावरणाचे बदलते चित्र दाखवण्यात आले. जंगल हे पर्यावरणाचे आत्मा असल्याने "वन वाचवा पर्यावरण वाचवा" हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. कार्यक्रमात प्रसिद्ध वनतज्ज्ञ - मारुती चितमपल्ली यांच्या जीवनकार्याचीही माहिती देण्यात आली. त्यांनी नवेगाव दिन नागझिरा अभयारण्य येथे केलेल्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनरक्षक श्री लाडे, वैभवजी कराडे (वनसेवक), छगन मेश्राम, रीतीन राऊत यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून परिसरात वनसंवर्धनाचा सकारात्मक संदेश पोहोचला आहे.
जागतिक वन दिनानिमित्त नवेगाव बांध येथे विद्यार्थ्यांना वनसंवर्धनाचा संदेश.. जागतिक वन दिनानिमित्त नवेगाव बांध येथे विद्यार्थ्यांना वनसंवर्धनाचा संदेश सामाजिक वनीकरण विभाग गोंदिया अंतर्गत वनपरिक्षेत्र अर्जुनी मोरच्या वतीने जागतिक वन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम आज दिनांक ३० मार्च रोजी नवेगाव बांध येथील ऑप्शन हॉलमध्ये पार पडला.कार्यक्रमाला लागवड अधिकारी कुमारी बनसोड मॅडम, हिरवळ संस्थेचे अध्यक्ष श्री रुपेशजी निंबार्ते, क्षेत्र सहाय्यक घुगे साहेब, बी.एम. लाडे सर, छत्रपाल चौधरी, आशिष दुबे, कुमारी मोनिका कोरे ( वनरक्षक) तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी सामाजिक वनीकरण विभाग गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात यू. एम. संग्रामय विद्यालय व बी. ए. डी. विद्यालय नवेगाव बांध येथील राष्ट्रीय
हरित सेनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना वन आणि वन्यजीवांचे महत्त्व, पर्यावरणाचे संरक्षण तसेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वनसंवर्धन किती आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना चलतचित्रांच्या माध्यमातून पर्यावरणाचे बदलते चित्र दाखवण्यात आले. जंगल हे पर्यावरणाचे आत्मा असल्याने "वन वाचवा पर्यावरण वाचवा" हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. कार्यक्रमात प्रसिद्ध वनतज्ज्ञ - मारुती चितमपल्ली यांच्या जीवनकार्याचीही माहिती देण्यात आली. त्यांनी नवेगाव दिन नागझिरा अभयारण्य येथे केलेल्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनरक्षक श्री लाडे, वैभवजी कराडे (वनसेवक), छगन मेश्राम, रीतीन राऊत यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून परिसरात वनसंवर्धनाचा सकारात्मक संदेश पोहोचला आहे.
- Post by Ashlesh Made1
- Post by मनिषा विजय काशीवार4
- नवनियुक्त ठाणेदार यांनी पत्रकारांशी शहरातील विविध विषयावर साधला संवाद उमरेड (राजु जांभुळे ) भिवापूर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी शहरातील पत्रकारांसोबत संवाद साधत कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित राहण्यासाठी व यासरख्या इतर विषयाबाबत चर्चा बैठक घेण्यात आली. यावेळी नवनियुक्त ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी शहरातील पत्रकारांशी दि. २८ मार्चला महत्वाच्या विषयावर चर्चा केली. यात शहरातील महामार्गावर होणारे अपघात व वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेमके काय करावे याबाबतची माहिती पत्रकाराकडून जाणून घेतली. यावेळी शहरात मोकाट जनावारे महामार्गावर फिरत असतात. बस स्थानक परिसर हॉटेल समोर प्रवासी आपली वाहने उभी करीत असतात. तसेच दोन्ही बाजूच्या मार्गावर ट्रॉव्हस थांबतात तिथे वाहतूक वाहतूक कोंडी होवून येजा करणाऱ्यांना त्याचा त्रास होत असतो.तसेच माँ भिमादेवी प्रवेश द्वारा कडून येणाऱ्या नागरीक व वाहन चालकांना राष्ट्रीय महामार्ग वरील वाहने दुकानांच्या अतिक्रमणामुळे दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. याबाबत संबंधित विभागाशी संपर्क सांधण्यात येवून उपाय योजना करण्याची आवशकता असल्याची गरज पत्रकारांनी व्यक्त केली. बिअर बार व दारूची दुकाने सकाळीच सुरू शहरातील बिअर बार व देशीची दुकाने सकाळीच ६ वाजता उघडण्यात येते. तर बरीच बिअर बार समोरून बंद अवस्थेत दिसतात तर मात्र मागील दारातून आतमध्ये मद्यपीला टेबलवर राजरोसपणे दारू पुरविण्यात येत असल्याची माहिती यावेळी पत्रकारांनी ठाणेदार मस्कर यांना सांगितली. तसेच कारगाव व पांढरवाणी येथे अवैधपणे दारूची विक्री होत असल्याची माहिती ठाणेदारांना देण्यात आली. अगोदर खुलेआम सट्टापट्टी व्यवसाय सुरू होती. आताही स्वःताला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारे लपून - छपून फोनद्वारे सट्टापट्टी घेत असल्याचा प्रकार सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वाहन परवाना नसलेल्यावर कारवाई ! शहरात मोठया प्रमाणात दुचाकी वाहनाची रेलचेल असून यात बिना वाहन परवाना धारक असलेल्या युवक वर्गाची संख्या मोठया प्रमाणात असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी या युवका करीता आरटीओ कॅम्प उमरेड विधासभा क्षेत्र आमदार संजय मेश्राम यांच्या सहकार्याने शहरात लावण्यात येवून जास्तीत जास्त जणांचे परवाना काढण्याची संधी यात देणार असून त्यानंतर परवाना नसलेल्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून चोरी घटना घडू नये यासाठी रात्रीचे गस्त घालण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार रविद्र मस्कर यांनी पत्रकारांशी संवांद सांधताना दिली. यावेळी भिवापूर तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष शरद मिरे, व्हाईस ऑफ मिडीया तालुकाध्यक्ष प्रदीप राऊत, पत्रकार अमर मोकाशी, राजेश जांभुळे, पंढरी हिवसे, जोग्रेंद्र सरदारे,नरेंद्र ढोणे उपस्थित होते.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- एअर फोर्स स्टेशन नागपूर जवळच्या शिवणगाव जवळील पु लावरून ट्रकचा अपघात कोणतीही जीवितहानी नाही!1
- Post by Samachar king digital1
- भीषण अपघात! रेती डोजर आणि पिकअपची जोरदार धडक – चालकाचा जागीच मृत्यू नागपूर :- हिंगणा ते किन्ही रोडवरील लक्ष बियर बार समोर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. मौदा कडून हिंगणा किन्ही दिशेने जाणारा रेतीचा डोजर (MH 40 CT 9153) आणि जुनेवणी कडून हिंगणा दिशेने येणारी कंपनीची पिकअप (MH 31 FC 3056) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की पिकअप चालक गाडी रस्त्यावर घासत गेल्याने गंभीर जखमी झाला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. मृत चालक हा खापरखेडा येथील असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस स्टेशन, अग्निशमन दल व शिवगर्जना ॲम्ब्युलन्स तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकारी श्री.राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, परिसरात संताप व्यक्त केला जात असून शनिवार-रविवारी महसूल विभागाचे अधिकारी अनुपस्थित असल्याने रेती, गिट्टी व मुरुम वाहतूक करणारी वाहने बेधडक वेगात धावत असल्याची चर्चा रंगली आहे. याच निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. नुकतेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिंगणात भेट दिली होती, त्यामुळे आता तहसील प्रशासनाच्या कारभारावर लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.1
- Post by मनिषा विजय काशीवार2