आज नवी दिल्ली येथे बौद्ध भिक्खूंच्या शिष्टमंडळासह केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह जी यांची भेट घेतली. आज नवी दिल्ली येथे बौद्ध भिक्खूंच्या शिष्टमंडळासह केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह जी यांची भेट घेतली. नवी दिल्ली। प्रतिनिधी: बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान आहे. महाबोधी महाविहारच्या व्यवस्थापनातील चेअरमन व सर्व विश्वस्त बौद्ध धर्मीय असावेत, ही देशभरातील बौद्ध समाजाची मागणी आहे. ही मागणी कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून, भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र धम्मस्थळाचे व्यवस्थापन बौद्धांकडे असावे, या न्याय्य भावनेतून आहे. महाबोधी महाविहार टेम्पल ॲक्ट, 1949 मध्ये आवश्यक दुरुस्ती करून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी मी मा. अमित शाह जी यांच्याकडे केली. मा. गृहमंत्री अमित शाह जी यांनी महाबोधी महाविहारचा संपूर्ण इतिहास व प्रकरणाची माहिती घेऊन याचा सखोल अभ्यास करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या सूचनेनुसार आज ही महत्त्वपूर्ण भेट झाली. देशभरातील बौद्ध समाजाच्या भावना आणि श्रद्धेचा सन्मान राखत महाबोधी महाविहार मुक्तीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, हीच माझी अपेक्षा.
आज नवी दिल्ली येथे बौद्ध भिक्खूंच्या शिष्टमंडळासह केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह जी यांची भेट घेतली. आज नवी दिल्ली येथे बौद्ध भिक्खूंच्या शिष्टमंडळासह केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह जी यांची भेट घेतली. नवी दिल्ली। प्रतिनिधी: बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान आहे. महाबोधी महाविहारच्या व्यवस्थापनातील चेअरमन व सर्व विश्वस्त बौद्ध धर्मीय असावेत, ही देशभरातील बौद्ध समाजाची मागणी आहे. ही मागणी कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून, भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र धम्मस्थळाचे व्यवस्थापन बौद्धांकडे असावे, या न्याय्य भावनेतून
आहे. महाबोधी महाविहार टेम्पल ॲक्ट, 1949 मध्ये आवश्यक दुरुस्ती करून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी मी मा. अमित शाह जी यांच्याकडे केली. मा. गृहमंत्री अमित शाह जी यांनी महाबोधी महाविहारचा संपूर्ण इतिहास व प्रकरणाची माहिती घेऊन याचा सखोल अभ्यास करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या सूचनेनुसार आज ही महत्त्वपूर्ण भेट झाली. देशभरातील बौद्ध समाजाच्या भावना आणि श्रद्धेचा सन्मान राखत महाबोधी महाविहार मुक्तीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, हीच माझी अपेक्षा.
- अबब!! निष्टी येथील शेतकऱ्याच्या शेतात आढळला अकरा फुट लांबीचा अजगर ११ फुट अजगर सर्पमित्रांनी शिताफीने पकडले भिवापूर (प्रतिनिधी ) निष्टी ता. पवनी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात ११ फुट अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. याबाबत शेतकऱ्याने सर्पमित्रांला बोलविले. यावेळी सर्पमित्र दुर्गेश बडघरे यांच्या टिमने अतिशय काळजीपुर्वक ११ फुट अजगर यास पकडले आणि वनविभाच्या सुचनेनुसार पुल्लरच्या जंगलात सोडण्यात आले. भिवापूर पासून १० किमी अंतरावर असलेला निष्टी ता. पवनी येथील शेतकरी भगवान चट्टे यांच्या शेतात काल सकाळी ९ वाजता भव्य मोठा अजगर आढळून आला. त्यामुळे शेतकरी चांगलाच भयभीत झाला. त्याने भिवापूर येथील सर्पमित्रांना पाचरण केले. ११ फुट अजगर सर्पमित्र दुर्गेश बडघरे , जाकीर सय्यद, कृणाल रोहनकर, प्रदीप मडावी यांनी मोठया शिताफीने पकडून त्यास उमरेड कऱ्हाडला अभयारण्य कार्यालयात याबाबतची नोंद केली. या अजगराचे वजन २१ किलो होते. त्याचे वय ५ ते ७ वर्षे इतके सांगण्यात आले. हा बिनविषारी होता अशी माहिती आहे. हा भव्य अजगर पुल्लरच्या जंगलात वनविभाग माध्यमातून अधिवासात सोडण्यात आले.1
- दहिसर ठाकुरपाड़ा की स्थिति बदहाल! जनप्रतिनिधि क्यों नहीं दे रहे ध्यान? नागरिकों ने बताई अपनी आपबीती Rok Tok Hindustan news imran shaikh [14/09, 15:47] Imran Shaikh: दहिसर ठाकुरपाड़ा इलाके में नागरिकों ने खराब व्यवस्था और स्थानीय समस्याओं को लेकर अपनी आपबीती साझा की। लोगों का सवाल है कि आखिर जनप्रतिनिधि इन समस्याओं पर ध्यान क्यों नहीं दे रहे हैं? नागरिकों ने प्रशासन और जनप्रतिनिधियों से जल्द से जल्द समस्याओं का संज्ञान लेकर उचित कार्रवाई की मांग की है। अब देखना होगा कि जिम्मेदार प्रशासन और जनप्रतिनिधि इस मामले में कब तक कदम उठाते हैं। [14/09, 15:47] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #Dahisar #ThakurPada #MumbaiNews #CitizenVoice #जनताकीआवाज #LocalNews #CivicIssues #मुंबई1
- कु.रविना रवी रंगारी हिचा सत्कार एकोडी येथील रहिवासी कु.रविना रवि रंगारी ही पवित्र पोर्टल अंतर्गत रयत शिक्षण संस्था सातारा येथे क्रीडा शिक्षकम्हणून नियुक्ती झाली त्या करिता नवनिकेतन नाट्य कला संच एकोडी च्या वतीने घरी जाऊन रविना चा स्मृती चिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. रविना ही अत्यंत मेहनती मुलगी लहानपनापासून क्रीडा क्षेत्राची आवड, धनुर्विद्या तिचा आवडता खेळ व त्या खेळात ती राष्ट्रीय पातळीपर्यत खेडायला गेली आई वडिलांचे संस्कार , कोणत्याही व्यक्तीला सन्मानाने बोलणे हा तिचा स्वभाव सर्वांना आवडत असतो त्या निमित्ताने तिच्या मेहनतीने जिद्द चिकाटीने तिने पवित्र पोर्टल अंतर्गत सातारा येथे क्रीडा शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. सत्कार करतांना नवनिकेतन नाट्य कला संचाचे पदाधिकारी कलावंत ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, सुकराम बन्सोड, कमलाकर चांदेवार,एकनाथ कोटांगले, फिरोज कोटांगले, टिकाराम द्रगकर, राधेश्याम चौधरी,अमित भैसारे,कैलास जांभूळकर,कार्तिक मेश्राम, संदिप कोटांगले, पूरणदास निपाने, रंजना रंगारी, रवीकुमार रंगारी उपस्थित होते.1
- जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल प्रतिनिधी : संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे : जुना धामणगांव येथील दलित वस्तीच्या मुख्य मार्गावरील नालीची दुरवस्था झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नालीमध्ये पावसाचे पाणी अथवा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानंतर नालीतील घाण पाणी, गाळ व कचरा थेट मुख्य रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. तसेच शाळकरी विद्यार्थी, महिला, वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांनाही याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र, नालीचे घाण पाणी व गाळ रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांना त्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला असून, दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नालीतील साचलेले घाण पाणी आणि गाळ यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय नाली व परिसरात पाणी व कचरा साचत असल्याने साप तसेच इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होत असून, नालीची योग्य साफसफाई, दुरुस्ती व पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित विभागाने केवळ तात्पुरती साफसफाई न करता नालीची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी तसेच पावसाचे पाणी रस्त्यावर येणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन नालीची स्वच्छता, गाळ काढणे, दुरुस्ती आणि पाण्याच्या योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त, पुसद वसंत नगर पोलीसांची कारवाई डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त, गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे व कर्णकर्कश आवाजावर बंदी असताना नियमांचे उल्लंघन करणारे वाहन पुसद वसंतनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनात डीजेचे १० मोठे स्पीकर बॉक्स व बँजोचे साहित्य जप्त केले १४ सप्टेंबर रोजी दुपारी नवीन पुसद येथील एका मंडळाकडे डीजे वाजविण्यासाठी जात असताना एमएच २९ एम बारा ७१ क्रमांकाचे वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. चालक नारायण पांढरे व मालक नरेश खंडागळे यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.ही कारवाई परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.1
- आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात विकासाची गंगा! विविध गावांमध्ये महिला बचत भवन व विकास कामांचे थाटात भूमिपूजन संपन्न नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. देवरी, १५ सप्टेंबर २०२६: आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. संजयजी पुराम यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि दूरदृष्टीतून देवरी तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला अधिक गतिशीलता प्राप्त झाली आहे. याच विकास पर्वांतर्गत तालुक्यातील विविध गावांमध्ये महिला बचत गटांसाठी हक्काचे 'महिला बचत भवन' तसेच अन्य महत्त्वपूर्ण विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचा मोठा कार्यक्रम पार पडला. माजी महिला व बालकल्याण सभापती तथा वर्तमान जिल्हा परिषद सदस्य सौ. सविता संजय पुराम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते या सर्व विकास कामांचे गाव-गाव प्रत्यक्ष भेट देऊन अत्यंत उत्साहात भूमिपूजन संपन्न झाले. विविध गावांमध्ये पार पडलेली विकास कामे व भूमिपूजन सोहळा (सविस्तर तपशील) * मौजा ककोडी (ता. देवरी): येथील ग्रामस्थांच्या आणि महिलांच्या मागणीचा विचार करून, रावण मैदानाजवळ तब्बल १५ लक्ष रुपये खर्चाच्या भव्य अशा सभागृह बांधकामाचे दुपारी १२ वाजता भूमिपूजन करण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांना विविध सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तसेच, याच गावात हनुमान मंदिरा जवळ ५ लक्ष रुपये खर्चाच्या गट्टू लावण्याच्या कामाचे दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी भूमिपूजन संपन्न झाले, ज्यामुळे परिसराची दळणवळण व स्वच्छता सुधारेल. * मौजा चीपोटा (ता. देवरी): येथील आदिवासी बांधवांच्या सांस्कृतिक, सामाजिक व पारंपरिक उपक्रमांना हक्काची जागा मिळावी, यासाठी १५ लक्ष रुपये खर्चाच्या 'आदिवासी समाज भवन' बांधकामाचे दुपारी १ वाजता भूमिपूजन करण्यात आले. * मौजा पालांदूर (ता. देवरी): येथील वर्दळीच्या आणि मध्यवर्ती अशा बाजार चौकात १५ लक्ष रुपये खर्चाच्या नवीन सभागृह बांधकामाचे भूमिपूजन दुपारी २ वाजता पार पडले. यामुळे बाजारनिमित्त येणाऱ्या नागरिकांना व महिला वर्गान विशेष सवलत व सोय मिळणार आहे. * मौजा बोरगांव / बाजार (ता. देवरी): येथील तलाठी कार्यालयाजवळ परिसरातील प्रशासकीय व सामाजिक कामकाजाच्या सुविधेसाठी १५ लक्ष रुपये खर्चाच्या सभागृह बांधकामाचे भूमिपूजन दुपारी ३ वाजता अत्यंत उत्साहात करण्यात आले. महिला बचत गटांचा वाढला उत्साह, व्यक्त केली कृतज्ञता या प्रत्येक गावातील भूमिपूजन सोहळ्यादरम्यान ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या महिलांमध्ये व भगिनींमध्ये अभूतपूर्व उत्साह दिसून आला. आपल्या भावना व्यक्त करताना महिलांनी सांगितले की, "आतापर्यंत आम्हाला आमच्या बचत गटाच्या मासिक मीटिंग्स, आर्थिक व्यवहार किंवा महिलांचे विविध प्रशिक्षण व इतर कार्यक्रम घेण्यासाठी हक्काची आणि सुरक्षित जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे अनेकदा अडचणींचा सामना करावा लागत असे. परंतु, आमदार मा. संजयजी पुराम आणि सौ. सविता संजय पुराम यांनी आमची ही मोठी अडचण लक्षात घेऊन आमच्यासाठी हक्काचे 'महिला बचत भवन' उपलब्ध करून दिले आहे. यामुळे आता बचत गटाचे कामकाज करणे अत्यंत सोयीस्कर झाले आहे." यावेळी महिलांनी आमदार संजय पुराम व सौ. सविता संजय पुराम यांचे मनःपूर्वक आभार मानले. मोठ्या संख्येने नागरिकांची व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या प्रत्येक गावातील भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी संबंधित गावांचे माननीय सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विविध महिला बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. या सर्व विकास कामांमुळे देवरी तालुक्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणार असून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल ठरत आहे.1
- ईतवारा बाजार में अतिक्रमण है2
- शाळेत पिण्याचे पाणीच नाही! विद्यार्थ्यांचे हाल; 15 दिवसांत पाणी न मिळाल्यास ‘भीक मांगो आंदोलन’ शाळेत पिण्याचे पाणीच नाही! विद्यार्थ्यांचे हाल; 15 दिवसांत पाणी न मिळाल्यास ‘भीक मांगो आंदोलन’1
- जबरी चोरी करणाऱ्या दोन अज्ञातांना अवघ्या काही तासांत बेड्या,नांदगाव पेठ पोलिसांची धडक कारवाई 1