Shuru
Apke Nagar Ki App…
शिक्षण विभाग आयुक्त यांचे चौकशी संदर्भ मुंबई मंत्रालय संभाजी ब्रिगेड औसा तालुका यांच्या वतीने मुख्यमंत्री प्रधान सचिव यांच्या कडे निवेदन देण्यात आले
बाळकृष्ण प्रकाश कदम
शिक्षण विभाग आयुक्त यांचे चौकशी संदर्भ मुंबई मंत्रालय संभाजी ब्रिगेड औसा तालुका यांच्या वतीने मुख्यमंत्री प्रधान सचिव यांच्या कडे निवेदन देण्यात आले
More news from महाराष्ट्र and nearby areas
- भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा1
- माहूर गडाकडे जाणाऱ्या भाविकांनी प्रवास टाळावा; पैनगंगा नदीला पूर, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांचे आवाहन नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पैनगंगा धनोडा नदीवर सध्या पाण्याची पातळी वाढल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माहूर गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी तसेच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांनी सध्याचा प्रवास शक्यतो टाळावा, असे नम्र आवाहन माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी केले आहे. परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत असून नागरिकांनी पूर्ण सतर्कता बाळगावी आणि स्वतःची काळजी घ्यावी, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी नगर पंचायत माहूर, तहसील प्रशासन आणि पोलीस प्रशासन तत्पर आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित स्थळी राहावे आणि गरज भासल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.1
- उपळी येथे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन उपळी येथे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन वडवणी, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील उपळी जिल्हा परिषद सर्कलमध्ये पोलीस चौकी अथवा पोलीस दूरक्षेत्र तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या संदर्भात उपळी येथील सौ. रूपाली कचरे यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयाचा तसेच महाराष्ट्र पोलीस नियमावली, १९९९ मधील तरतुदींचा उल्लेख करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस चौकी अथवा दूरक्षेत्राची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदनानुसार, उपळी परिसरात गेल्या पाच वर्षांत ३१ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद झाल्याचा दावा करण्यात आला असून, महिला, विद्यार्थिनी व सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपळी येथे तात्काळ पोलीस चौकी सुरू करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. तसेच परिसरात २४ तास पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत आणि पोलीस चौकी सुरू करण्यास झालेल्या विलंबाबाबत जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनानंतर उपळी परिसरात पोलीस चौकी सुरू करण्याबाबत शासन व गृह विभाग कोणता निर्णय घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.1
- पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. 📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा! #Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi1
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबविणार; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची नांदेड जिल्ह्यात प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. लाभार्थ्यांची माहिती, पात्रता पडताळणी, बँकांशी समन्वय तसेच अर्ज प्रक्रियेसंदर्भात काटेकोर नियोजन करण्यात आले असून कोणताही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासन दक्षता घेणार आहे.1
- सोशल मीडियावर पत्रकाराविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट; कंधारमध्ये एसटी वाहकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे एका पत्रकाराविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट अपलोड केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ कंधार डिजिटल मराठी मीडिया परिषदेच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. संबंधित एसटी वाहकाने पत्रकाराच्या सन्मानाला ठेच पोहोचवणारी पोस्ट शेअर केल्याचा आरोप करत त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे. पत्रकारांच्या सन्मानावर आणि अस्मितेवर आघात करणारे अशा प्रकारचे गैरकृत्य अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा सडेतोड इशाराही यावेळी कंधारमधील पत्रकार बांधवांनी दिला आहे. पोलीस आता याप्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे1
- उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते कंकालेश्वर मंदिर येथील विकास कामांचे भुमिपुजन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते कंकालेश्वर मंदिर येथील विकास कामांचे भुमिपुजन बीड, दि. 31 (जिमाका) :- राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी जिल्ह्यातील ऐतिहासिक व प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिर परिसरातील विविध विकासकामांचे भुमिपुजन करण्यात आले. तसेच त्यांनी भगवान कंकालेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन विधीवत पूजा-अर्चा केली आणि जिल्ह्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी आमदार धनंजय मुंडे, आमदार विजयसिंह पंडीत, आमदार विक्रम काळे, माजी आमदार संजय दौड, विश्वनाथ माणुसमारे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांचे मंदिर परिसरात आगमन होताच त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत मंदिराच्या विकासकामांची पाहणी केली व कोनशिलेचे अनावरण केले. कंकालेश्वर मंदिराच्या विधीवत पूजेप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी बीड जिल्ह्याच्या विकासाबाबत आणि सांस्कृतिक वारसा जपण्याबाबत सकारात्मक चर्चा केली. या प्रसंगी परिसरातील नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीड येथील 12 व्या शतकात बांधण्यात आलेल्या कंकालेश्वर मंदिर या राज्य संरक्षित स्मारकाची दुरूस्ती व संवर्धल याचे काम पुरातत्व खात्याच्या वतीने करण्यास सुरूवात झाली आहे. या कामासाठी स्व. अजितदादा पवार यांनी 9 कोटी 14 लाखांहून अधिकचा पुरातत्व विभागीय निधी आणि जिल्हा नियोजन निधी अंतर्गत 11 कोटी 21 लाखांहून अधिकचा निधी मंजूरी दिलेली आहे. या मंदिराचे क्षेत्रफळ 12 एकर आहे. येथील अतिक्रमणे हटविण्यासह दुरूस्ती व इतर सुविधांचा विकास करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. -*-*-*-*-1
- *लखनऊ में अलग-अलग सड़क हादसों में दो की मौत:* पीड़ित की पहचान: मृतक की पहचान भोलाखेड़ा निवासी अमन वर्मा (32-34 वर्ष) के रूप में हुई है, जो पेशे से एक ऑटो चालक था.घटना का क्रम: अमन मंगलवार रात को ऑटो चलाकर घर लौटा था. बुधवार तड़के वह बाइक लेकर पान मसाला लेने निकला. लौटते समय गली में आवारा कुत्तों के एक झुंड ने उसे दौड़ा लियादुर्घटना: कुत्तों के हमले से बचने के लिए अमन ने अपनी बाइक की रफ्तार तेज कर दी. तेज गति के कारण बाइक अनियंत्रित हो गई और पहले एक ठेले से टकराने के बाद सीधे लोहे के बिजली के खंभे से जा भिड़ी.अस्पताल में मौत: टक्कर इतनी भीषण थी कि हेलमेट पहनने के बावजूद अमन के सिर में गंभीर चोटें आईं और वह खून से लथपथ होकर गिर पड़ा. स्थानीय लोगों और परिजनों द्वारा उसे तुरंत लोकबंधु अस्पताल ले जाया गया, जहां डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया. वह अपने परिवार का इकलौता बेटा था.. ब्रेकिंग न्यूज़ संवाददाता आशीष मिश्रा1