logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाराष्ट्र राज्य यशवंत सेना आणि जयमल्हार शैक्षणिक आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने राज्यातील कर्तुत्ववान व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार,आपले प्रस्ताव १५ मे २०२६ पर्यंत पाठवण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य यशवंत सेना आणि जयमल्हार शैक्षणिक आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने राज्यातील कर्तुत्ववान व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार,आपले प्रस्ताव १५ मे २०२६ पर्यंत पाठवण्याचे आवाहन ( अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्र राज्य यशवंत सेना आणि जयमल्हार शैक्षणिक आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्था, केडगाव, अहिल्यानगर यांच्या वतीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवा निमित्ताने राज्यातील नामांकित कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार देऊन गुणगौरव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. जय मल्हार शैक्षणिक आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्था व यशवंत सेनेच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात येणार आहे.या पुरस्कारा साठी आपले प्रस्ताव १५ मे २०२६ पर्यंत पाठविण्याचे आवाहन संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना या सोहळ्यात पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक , अध्यक्ष कांतीलाल जाडकर साहेब, यांनी दिली आहे. या जयंती महोत्सवा निमित्त सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,कृषी, सहकार,उद्योग, वैद्यकीय, प्रशासकीय तसेच पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील मान्यवर व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. समाजकारण आणि लोक कल्याणाच्या कार्याला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजन समितीने स्पष्ट केले आहे. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते ‘लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार’, युवा गौरव पुरस्कार,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार, रणरागिणी पुरस्कार,छत्रपती शिवाजी महाराज जीवनगौरव पुरस्कार’, "महाराष्ट्र भूषण पुरस्कार" तसेच समाज भूषण आध्यात्मिक, आरोग्य,सडेतोड पत्रकारिता, कृषीतज्ञ, उद्योजक, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, कलागौरव, कलारत्न,आदर्श शिक्षक, शिक्षिका,आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस, नगरसेवक, युवा नेते,उदयोन्मुख महिला नेतृत्व,प्रगतशिल शेतकरी,आदर्श सरपंच,आदर्श ग्रामसेवक, आदर्श किर्तनकार, आदर्श संवादक, समाजरत्न, सहकार महर्षी,सहकार सम्राट,आदर्श वारकरी,बाल किर्तनकार, आदर्श वकील,आदर्श मेंढपाळ,आदर्श वेगवान पोर्टल चॅनल, साहित्यिक , क्रिडा,आदर्श एकल महीला, सामाजिक परीवर्तन,"आदर्श अहिल्येची लेक" असे विविध पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.या सर्व पुरस्कारांचे स्वरूप सन्मानचिन्ह व प्रमाणित मानपत्र असे असणार आहे. समाजातील सामाजिक कार्यकर्ते,लोक कल्याणकारी संस्था,नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी योग्य त्या उमेदवारांचे प्रस्ताव त्वरित पाठवावेत,असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.इच्छुकांनी संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती, त्यांच्या कार्याचा तपशील आणि आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे पीडीएफ फाईल स्वरुपात तयार करून दि. १५ मे २०२६ पर्यंत 8805922960या क्रमांकावर व्हॉटसाॅप द्वारे किंवा कांतिलाल महादेव जाडकर, रो बंगला नंबर १ ,ओंकार नगर, पाण्याच्या टाकीजवळ, केडगाव देवी, अहिल्यानगर पिनकोड ४१४००३ या पत्यावर पाठवावीत,असे कळविण्यात आले आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव सोहळ्याची तारीख व कार्यक्रमाचे ठिकाण हे संयोजक समितीने पुरस्कारार्थीची निवड केल्या नंतरच सविस्तरपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे संयोजन समितीने नमुद केले आहे. समाज हितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कला गुणांना वाव मिळावा,आणि भविष्यात ही त्यांनी अतिशय जोमाने काम करत रहावे, त्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेण्याच्या उद्देशाने हा सन्मान सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक अष्टपैलू हिरे दडलेले आहेत.त्यांच्या कार्याला चकाकी देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.तरी इच्छुकांनी आपले प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावे. प्रस्तावात आपले नाव,गाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, केलेल्या कामाची सविस्तर माहिती,स्वत:चापासपोर्ट साईज फोटो,आणि केलेल्या कामाचे फोटो सह माहिती पाठवावी.

13 hrs ago
user_Pramod dada bari
Pramod dada bari
Pachora, Jalgaon•
13 hrs ago
6d0aad7f-2dc2-429d-bd27-f38e8651a38f

महाराष्ट्र राज्य यशवंत सेना आणि जयमल्हार शैक्षणिक आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने राज्यातील कर्तुत्ववान व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार,आपले प्रस्ताव १५ मे २०२६ पर्यंत पाठवण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य यशवंत सेना आणि जयमल्हार शैक्षणिक आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने राज्यातील कर्तुत्ववान व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार,आपले प्रस्ताव १५ मे २०२६ पर्यंत पाठवण्याचे आवाहन ( अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्र राज्य यशवंत सेना आणि जयमल्हार शैक्षणिक आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्था, केडगाव, अहिल्यानगर यांच्या वतीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवा निमित्ताने राज्यातील नामांकित कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार देऊन गुणगौरव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. जय मल्हार शैक्षणिक आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्था व यशवंत सेनेच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात येणार आहे.या पुरस्कारा साठी आपले प्रस्ताव १५ मे २०२६ पर्यंत पाठविण्याचे आवाहन संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना या सोहळ्यात पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक , अध्यक्ष कांतीलाल जाडकर साहेब, यांनी दिली आहे. या जयंती महोत्सवा निमित्त सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,कृषी, सहकार,उद्योग, वैद्यकीय, प्रशासकीय तसेच पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील मान्यवर व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. समाजकारण आणि लोक कल्याणाच्या कार्याला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजन समितीने स्पष्ट केले आहे. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते ‘लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार’, युवा गौरव पुरस्कार,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार, रणरागिणी पुरस्कार,छत्रपती शिवाजी महाराज जीवनगौरव पुरस्कार’, "महाराष्ट्र भूषण पुरस्कार" तसेच समाज भूषण आध्यात्मिक, आरोग्य,सडेतोड पत्रकारिता, कृषीतज्ञ, उद्योजक, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, कलागौरव, कलारत्न,आदर्श शिक्षक, शिक्षिका,आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस, नगरसेवक, युवा नेते,उदयोन्मुख महिला नेतृत्व,प्रगतशिल शेतकरी,आदर्श सरपंच,आदर्श ग्रामसेवक, आदर्श किर्तनकार, आदर्श संवादक, समाजरत्न, सहकार महर्षी,सहकार सम्राट,आदर्श वारकरी,बाल किर्तनकार, आदर्श वकील,आदर्श मेंढपाळ,आदर्श वेगवान पोर्टल चॅनल, साहित्यिक , क्रिडा,आदर्श एकल महीला, सामाजिक परीवर्तन,"आदर्श अहिल्येची लेक" असे विविध पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.या सर्व पुरस्कारांचे स्वरूप सन्मानचिन्ह व प्रमाणित मानपत्र असे असणार आहे. समाजातील सामाजिक कार्यकर्ते,लोक कल्याणकारी संस्था,नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी योग्य त्या उमेदवारांचे प्रस्ताव त्वरित पाठवावेत,असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.इच्छुकांनी संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती, त्यांच्या कार्याचा तपशील आणि आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे पीडीएफ फाईल स्वरुपात तयार करून दि. १५ मे २०२६ पर्यंत 8805922960या क्रमांकावर व्हॉटसाॅप द्वारे किंवा कांतिलाल महादेव जाडकर, रो बंगला नंबर १ ,ओंकार नगर, पाण्याच्या टाकीजवळ, केडगाव देवी, अहिल्यानगर पिनकोड ४१४००३ या पत्यावर पाठवावीत,असे कळविण्यात आले आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव सोहळ्याची तारीख व कार्यक्रमाचे ठिकाण हे संयोजक समितीने पुरस्कारार्थीची निवड केल्या नंतरच सविस्तरपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे संयोजन समितीने नमुद केले आहे. समाज हितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कला गुणांना वाव मिळावा,आणि भविष्यात ही त्यांनी अतिशय जोमाने काम करत रहावे, त्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेण्याच्या उद्देशाने हा सन्मान सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक अष्टपैलू हिरे दडलेले आहेत.त्यांच्या कार्याला चकाकी देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.तरी इच्छुकांनी आपले प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावे. प्रस्तावात आपले नाव,गाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, केलेल्या कामाची सविस्तर माहिती,स्वत:चापासपोर्ट साईज फोटो,आणि केलेल्या कामाचे फोटो सह माहिती पाठवावी.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • दिंडोरीत भीषण अपघात: उघड्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह 🗞️ सविस्तर बातमी: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका येथे शिवाजीनगर (इंदोरे भाग) परिसरात शुक्रवारी रात्री (३ एप्रिल २०२६) सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. सुनील दरगोडे यांच्या कुटुंबातील एकूण ९ जण कारने (MH15 JS 1053) स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत कार कोसळली. रात्रीचा अंधार आणि विहिरीभोवती कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसल्याने चालकाला विहीर दिसली नाही आणि हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत ६ लहान शालेय मुले, २ महिला आणि १ चालक अशा सर्व ९ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन राबवले. घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या अपघाताला “अधिकाऱ्यांची मोठी चूक” ठरवत संताप व्यक्त केला. “रस्त्याच्या मध्यभागी विहीर कशी असू शकते?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी अपघाताला “अत्यंत दुर्दैवी” संबोधत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आणि रस्ता सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी विहिरीचे मालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर प्रशासनाने विहिरीभोवती तातडीने बॅरिकेडिंग केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्ता सुरक्षेबाबत आणि उघड्या विहिरींसारख्या धोकादायक ठिकाणांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
    1
    दिंडोरीत भीषण अपघात: उघड्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह
🗞️ सविस्तर बातमी:
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका येथे शिवाजीनगर (इंदोरे भाग) परिसरात शुक्रवारी रात्री (३ एप्रिल २०२६) सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला.
सुनील दरगोडे यांच्या कुटुंबातील एकूण ९ जण कारने (MH15 JS 1053) स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत कार कोसळली. रात्रीचा अंधार आणि विहिरीभोवती कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसल्याने चालकाला विहीर दिसली नाही आणि हा भीषण अपघात घडला.
या दुर्घटनेत ६ लहान शालेय मुले, २ महिला आणि १ चालक अशा सर्व ९ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन राबवले.
घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या अपघाताला “अधिकाऱ्यांची मोठी चूक” ठरवत संताप व्यक्त केला. “रस्त्याच्या मध्यभागी विहीर कशी असू शकते?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी अपघाताला “अत्यंत दुर्दैवी” संबोधत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आणि रस्ता सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश दिले.
या प्रकरणी विहिरीचे मालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर प्रशासनाने विहिरीभोवती तातडीने बॅरिकेडिंग केले आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्ता सुरक्षेबाबत आणि उघड्या विहिरींसारख्या धोकादायक ठिकाणांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    user_अब तक न्यूज महाराष्ट्र
    अब तक न्यूज महाराष्ट्र
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • धुळे जिल्ह्यात पाकिस्तान निर्मित सौंदर्यप्रसाधनांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 61 हजार 474 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
    1
    धुळे जिल्ह्यात पाकिस्तान निर्मित सौंदर्यप्रसाधनांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 61 हजार 474 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Shaha News Marathi
    1
    Post by Shaha News Marathi
    user_Shaha News Marathi
    Shaha News Marathi
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer फुलंब्री, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • अल्पवयीन मुलीला बलात्कार करून गरोदर करणाऱ्या आरोपीला अजिंठा पोलीस यांनी अटक केल्याची माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली असून मोहोळ येथील एका तरुणीला आरोपीने बळजबरीने बलात्कार करून तिला गरोदर करून पाहून गेला होता सदरील आरोपीला आज रोजी अजिंठा पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.
    1
    अल्पवयीन मुलीला बलात्कार करून गरोदर करणाऱ्या आरोपीला अजिंठा पोलीस यांनी अटक केल्याची माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली असून मोहोळ येथील एका तरुणीला आरोपीने बळजबरीने बलात्कार करून तिला गरोदर करून पाहून गेला होता सदरील आरोपीला आज रोजी अजिंठा पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Santosh Bahekar PRESS
    1
    Post by Santosh Bahekar PRESS
    user_Santosh Bahekar PRESS
    Santosh Bahekar PRESS
    Advertising Photographer बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • साक्री तालुक्यातील तामसवाडी परिसरात वऱ्हाडींना घेऊन जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
    1
    साक्री तालुक्यातील तामसवाडी परिसरात वऱ्हाडींना घेऊन जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.