logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शक्तिपीठ महामार्गा रद्द करण्याची मागणी शेतकरी आक्रमक भूमिकेत

1 hr ago
user_दिपक हैबतराव चोरमले
दिपक हैबतराव चोरमले
Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
1 hr ago

शक्तिपीठ महामार्गा रद्द करण्याची मागणी शेतकरी आक्रमक भूमिकेत

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    1
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जायकवाडी धरण येथून शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या दाबावरून परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. धरणातून बाराशे क्युसेक्सने पाणी सोडले जात असल्याचा दावा असताना, तेच पाणी परभणीपर्यंत येईपर्यंत केवळ सुमारे आठशे क्युसेक्स दाबाने पोहोचत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. यामुळे कॅनॉलमधील पाण्याचा वेग कमी झाला असून, शेतीपर्यंत पाणी पोहोचत नाही. परिणामी रब्बी हंगाम जवळपास हातातून गेला असून, आता उसासारखी उभी पिकेही करपण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांसमोर गंभीर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जायकवाडी प्रकल्पाच्या “दोन” कार्यालयात धडक दिली. अधीक्षक अभियंता अनुपस्थित असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर आंदोलन तीव्र होत गेले आणि संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंत्यांची खुर्चीच उचलून नेली. “जोपर्यंत कॅनॉलमधून योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत ही खुर्ची परत दिली जाणार नाही,” असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. या घटनेतून प्रशासनाविषयीचा रोष स्पष्टपणे समोर आला असून, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
    1
    जायकवाडी धरण येथून शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या दाबावरून परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. धरणातून बाराशे क्युसेक्सने पाणी सोडले जात असल्याचा दावा असताना, तेच पाणी परभणीपर्यंत येईपर्यंत केवळ सुमारे आठशे क्युसेक्स दाबाने पोहोचत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
यामुळे कॅनॉलमधील पाण्याचा वेग कमी झाला असून, शेतीपर्यंत पाणी पोहोचत नाही. परिणामी रब्बी हंगाम जवळपास हातातून गेला असून, आता उसासारखी उभी पिकेही करपण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांसमोर गंभीर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जायकवाडी प्रकल्पाच्या “दोन” कार्यालयात धडक दिली. अधीक्षक अभियंता अनुपस्थित असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यानंतर आंदोलन तीव्र होत गेले आणि संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंत्यांची खुर्चीच उचलून नेली. “जोपर्यंत कॅनॉलमधून योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत ही खुर्ची परत दिली जाणार नाही,” असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
या घटनेतून प्रशासनाविषयीचा रोष स्पष्टपणे समोर आला असून, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    14 min ago
  • पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ‘पालकमंत्री चषक’ ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण ⚽🏆
    1
    पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ‘पालकमंत्री चषक’ ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण ⚽🏆
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    22 hrs ago
  • Post by Shaikh irfan Shaikh isa
    1
    Post by Shaikh irfan Shaikh isa
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • ​हिमायतनगर ​येथे आज तहजीब फाउंडेशन आणि हाजी अब्दुल वहीद सेठ यांनी हिमायतनगरमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. आज रविवार,आज दिनांक २६ एप्रिल 2026 रोजी संपन्न झालेल्या ३२ निकाह सोहळ्यासह त्यांनी २००७ पासून आतापर्यंत एकूण ५४० लेकींना स्वतःच्या मुलीप्रमाणे मानून त्यांचे संसार थाटले आहेत.या भव्य सोहळ्याचे आणि संपूर्ण व्यवस्थेचे मॅनेजमेंट मुबीन सेठ आणि त्यांच्या टीमने अत्यंत चोखपणे सांभाळले. ​पितृत्वाचे कर्तव्य आणि सन्मान: हाजी साहेबांनी या लेकींना निरोप देताना एका पित्याप्रमाणे त्यांचे सर्व हक्क आणि सन्मान जपला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती कासिम मौलाना, खुदुस मौलाना आणि अजीम मौलाना यांची होती.आणि नगराध्यक्ष शेख रफीक, माजी उपनगराध्यक्ष जावेद भाई यांच्यासह शहरातील सर्व सन्माननीय नगरसेवक आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.तहजीब फाउंडेशनच्या या अफाट कार्याचे आणि मुबीन सेठ व टीमच्या व्यवस्थापनाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
    1
    ​हिमायतनगर ​येथे आज तहजीब फाउंडेशन आणि हाजी अब्दुल वहीद सेठ यांनी हिमायतनगरमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. आज रविवार,आज दिनांक २६ एप्रिल 2026 रोजी संपन्न झालेल्या ३२ निकाह सोहळ्यासह त्यांनी २००७ पासून आतापर्यंत एकूण ५४० लेकींना स्वतःच्या मुलीप्रमाणे मानून त्यांचे संसार थाटले आहेत.या भव्य सोहळ्याचे आणि संपूर्ण व्यवस्थेचे मॅनेजमेंट मुबीन सेठ आणि त्यांच्या टीमने अत्यंत चोखपणे सांभाळले. 
​पितृत्वाचे कर्तव्य आणि सन्मान:
हाजी साहेबांनी या लेकींना निरोप देताना एका पित्याप्रमाणे त्यांचे सर्व हक्क आणि सन्मान जपला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती कासिम मौलाना, खुदुस मौलाना आणि अजीम मौलाना यांची होती.आणि नगराध्यक्ष शेख रफीक, माजी उपनगराध्यक्ष जावेद भाई यांच्यासह शहरातील सर्व सन्माननीय नगरसेवक आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.तहजीब फाउंडेशनच्या या अफाट कार्याचे आणि मुबीन सेठ व टीमच्या व्यवस्थापनाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
    user_Sk Chand
    Sk Chand
    मी सॅटॅलाइट न्यूज पत्रकार आहे. उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • *भुवन रेती घाटावर अवैध उपसा जोमात; ठेकेदार–महसूल कर्मचाऱ्यांच्या संगनमताचा आरोप* (एकाच पावतीवर दिवसभर वाळू वाहतूक, कोऱ्या पावत्या आढळल्याने लाखो रुपयांच्या महसूल घोटाळ्याची शक्यता) मंठा तालुक्यातील भुवन येथील रेती घाटावर अवैध रेती उपसा जोमात सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अधिकृत लिलावधारकाच्या ताब्यात घाट देण्यात आला असला तरी, महसूल कर्मचारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतातून शासनाच्या महसुलाला लाखो रुपयांचा चुना लावला जात असल्याची चर्चा आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, एकाच रॉयल्टी पावतीवर दिवसभर अनेक फेऱ्या मारल्या जात आहेत. दोन ब्रासच्या पावतीवर चार ब्रासची गाडी, तर चार ब्रासच्या पावतीवर सहा ब्रासपर्यंत वाळू भरली जात असल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक पावत्यांवर तारीख, वेळ आणि ब्रासची नोंदच नसून काही पावत्या कोऱ्या आढळल्या आहेत. या प्रकारामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असल्याने नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
    1
    *भुवन रेती घाटावर अवैध उपसा जोमात; ठेकेदार–महसूल कर्मचाऱ्यांच्या संगनमताचा आरोप*
(एकाच पावतीवर दिवसभर वाळू वाहतूक, कोऱ्या पावत्या आढळल्याने लाखो रुपयांच्या महसूल घोटाळ्याची शक्यता)
मंठा तालुक्यातील भुवन येथील रेती घाटावर अवैध रेती उपसा जोमात सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
अधिकृत लिलावधारकाच्या ताब्यात घाट देण्यात आला असला तरी, महसूल कर्मचारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतातून शासनाच्या महसुलाला लाखो रुपयांचा चुना लावला जात असल्याची चर्चा आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, एकाच रॉयल्टी पावतीवर दिवसभर अनेक फेऱ्या मारल्या जात आहेत.
दोन ब्रासच्या पावतीवर चार ब्रासची गाडी, तर चार ब्रासच्या पावतीवर सहा ब्रासपर्यंत वाळू भरली जात असल्याचा आरोप आहे.
धक्कादायक बाब म्हणजे अनेक पावत्यांवर तारीख, वेळ आणि ब्रासची नोंदच नसून काही पावत्या कोऱ्या आढळल्या आहेत.
या प्रकारामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असल्याने नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
    user_AJINKYA S DAWANE
    AJINKYA S DAWANE
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये मागील एक महिन्यापासून रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. हा उपक्रम सायन्स किड्झ मुंबई अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन (प्रशिक्षक) रवी गुप्ता यांनी केले,जे सध्या अमेरिकेत कार्यरत आहेत. त्यांनी तेथील प्रगत तंत्रज्ञानाचा अनुभव घेऊन, येथील विद्यार्थ्यांना आधुनिक रोबोटिक्स आणि AI विषयी सखोल मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष प्रकल्पांच्या माध्यमातून शिकविण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः काही नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार केले, जसे की स्मार्ट फूड बॉक्स फॉर नॉन-प्रिव्हिलेज्ड पीपल हा प्रकल्प गरजू लोकांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरतो, ज्यामुळे अन्नाची नासाडी कमी होऊन गरजूंना मदत मिळू शकते.शेतकऱ्यांसाठी ऑटोमॅटिक वेदर सिस्टीम या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती आणि अलर्ट मिळू शकतात,ज्यामुळे ते आपल्या पिकांची योग्य काळजी घेऊ शकतात.या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करणे हा होता. आजच्या युगात रोबोटिक्स आणि AI हे केवळ विषय नसून भविष्यातील तंत्रज्ञानाची पायाभरणी आहेत. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता,तार्किक विचारशक्ती, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नवकल्पनांची आवड विकसित झाली आहे.विवेकानंद इंग्लिश स्कूल मधील हा उपक्रम लहान शहरांतील विद्यार्थ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे. खरंच,आजचे हे विद्यार्थी उद्याचे वैज्ञानिक,अभियंते आणि नवोन्मेषक बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या उपक्रमाची आज सांगता करण्यात आली. हा उपक्रम शाळेचे अध्यक्ष आदरणीय श्री. संदीप दादा बाहेकर सर, शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती. रश्मी यादव मॅडम, (प्रशिक्षक) रवी गुप्ता सर,राठोड सर,सर्व शिक्षक वृंद,तसेच पालक आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बाहेकर सर व यादव मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर उपक्रमाचे मार्गदर्शक रवी गुप्ता सर यांना श्रीफळ,शाल,गुच्छ देऊन,सन्मानित करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रकल्पाची पाहणी बाहेकर सर यादव मॅडम तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यावेळी विद्यार्थ्यांसह पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी शाळेचे अध्यक्ष बाहेकर सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम शाळेमार्फत राबवली जातील. असे आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले.तसेच शाळेचे विद्यार्थी भविष्यात प्रकल्पाच्या माध्यमातून, योग्य प्रशिक्षण घेऊन,देश विदेशात गरुड झेप घेतील.अशी आशा व्यक्त केली. या प्रकल्पाचे पंचक्रोशीसह इतर सर्व स्तरातून जोरदार कौतुक होत आहे. शाळेने असे उत्कृष्ट उपक्रम यापुढेही विद्यार्थ्यांसाठी राबवावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
    1
    विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये मागील एक महिन्यापासून रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
हा उपक्रम सायन्स किड्झ मुंबई अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन (प्रशिक्षक) रवी गुप्ता यांनी केले,जे सध्या अमेरिकेत कार्यरत आहेत. त्यांनी तेथील प्रगत तंत्रज्ञानाचा अनुभव घेऊन, येथील विद्यार्थ्यांना आधुनिक रोबोटिक्स आणि AI विषयी सखोल मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष प्रकल्पांच्या माध्यमातून शिकविण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः काही नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार केले, जसे की स्मार्ट फूड बॉक्स फॉर नॉन-प्रिव्हिलेज्ड पीपल हा प्रकल्प गरजू लोकांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरतो, ज्यामुळे अन्नाची नासाडी कमी होऊन गरजूंना मदत मिळू शकते.शेतकऱ्यांसाठी ऑटोमॅटिक वेदर सिस्टीम या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती आणि अलर्ट मिळू शकतात,ज्यामुळे ते आपल्या पिकांची योग्य काळजी घेऊ शकतात.या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करणे हा होता. आजच्या युगात रोबोटिक्स आणि AI हे केवळ विषय नसून भविष्यातील तंत्रज्ञानाची पायाभरणी आहेत. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता,तार्किक विचारशक्ती, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नवकल्पनांची आवड विकसित झाली आहे.विवेकानंद इंग्लिश स्कूल मधील हा उपक्रम लहान शहरांतील विद्यार्थ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.
खरंच,आजचे हे विद्यार्थी उद्याचे वैज्ञानिक,अभियंते आणि नवोन्मेषक बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या उपक्रमाची आज सांगता करण्यात आली. हा उपक्रम शाळेचे अध्यक्ष आदरणीय श्री. संदीप दादा बाहेकर सर, शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती. रश्मी यादव मॅडम, (प्रशिक्षक) रवी गुप्ता सर,राठोड सर,सर्व शिक्षक वृंद,तसेच पालक आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बाहेकर सर व यादव मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर उपक्रमाचे मार्गदर्शक रवी गुप्ता सर यांना श्रीफळ,शाल,गुच्छ देऊन,सन्मानित करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रकल्पाची पाहणी बाहेकर सर यादव मॅडम तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यावेळी विद्यार्थ्यांसह पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी शाळेचे अध्यक्ष बाहेकर सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम शाळेमार्फत राबवली जातील. असे आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले.तसेच शाळेचे विद्यार्थी भविष्यात प्रकल्पाच्या माध्यमातून, योग्य प्रशिक्षण घेऊन,देश विदेशात गरुड झेप घेतील.अशी आशा व्यक्त केली. या प्रकल्पाचे पंचक्रोशीसह इतर सर्व स्तरातून जोरदार कौतुक होत आहे. शाळेने असे उत्कृष्ट उपक्रम यापुढेही विद्यार्थ्यांसाठी राबवावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • सस्नेह जय महाराष्ट्र… स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त… आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रेरणेतून… हदगाव नगरीत उभा राहिला… एक आदर्श… एक संस्कार… आणि एक सामाजिक क्रांती…! आजच्या काळात… लग्न म्हणजे वाढता खर्च… दिखाऊपणा… आणि अनेक कुटुंबांसाठी ओझं… अशा परिस्थितीत सामूहिक विवाह ही फक्त परंपरा नाही… तर समाजाला दिलासा देणारी… समानतेचा संदेश देणारी… एक शक्ती आहे…! आणि हीच संकल्पना प्रत्यक्षात उतरवली… आमदार बाबुराव कदम कोहळीकर साहेबांनी… Baburao kadam kohalikar ज्यांनी आजच्या काळातही… साधेपणा आणि सामाजिक बांधिलकी जिवंत ठेवत… एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिलं…! उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांच्या उपस्थितीत… हदगाव येथे तब्बल २९ जोडप्यांचा विवाह मोठ्या उत्साहात… आणि मंगलमय वातावरणात पार पडला…! या सोहळ्याला लाभली मान्यवरांची उपस्थिती… मा. आमदार हेमंतभाऊ पाटील साहेब… Hemant Patil - हेमंत पाटील मा. आमदार संतोष बांगर साहेब… Mla Santosh Bangar माजी खासदार शिवाजीराव माने साहेब… मा. आमदार उत्तमराव इंगळे साहेब… या भव्य सोहळ्याचं सुंदर सूत्रसंचालन केलं… मुरलीधर हुंबर्डे यांनी… Murlidhar Hambarde Patil ज्यांनी प्रत्येक क्षण अधिक संस्मरणीय बनवला…! तसंच… हदगाव–हिमायतनगर तालुक्यातील सर्व शिवसैनिक आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी… हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षरशः जीवाचं रान केलं…! हा फक्त विवाह सोहळा नव्हता… तर समाजाला नवा विचार देणारा… साधेपणातून एकात्मता निर्माण करणारा… आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी आदर्श ठरणारा एक ऐतिहासिक उपक्रम होता…! सामूहिक विवाह — काळाची गरज… आणि समाजासाठी एक शक्तिशाली दिशा…! जय महाराष्ट्र…! 🚩
    1
    सस्नेह जय महाराष्ट्र…
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त…
आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रेरणेतून…
हदगाव नगरीत उभा राहिला…
एक आदर्श… एक संस्कार… आणि एक सामाजिक क्रांती…!
आजच्या काळात…
लग्न म्हणजे वाढता खर्च… दिखाऊपणा… आणि अनेक कुटुंबांसाठी ओझं…
अशा परिस्थितीत सामूहिक विवाह ही फक्त परंपरा नाही…
तर समाजाला दिलासा देणारी… समानतेचा संदेश देणारी… एक शक्ती आहे…!
आणि हीच संकल्पना प्रत्यक्षात उतरवली…
आमदार बाबुराव कदम कोहळीकर साहेबांनी… Baburao kadam kohalikar 
ज्यांनी आजच्या काळातही…
साधेपणा आणि सामाजिक बांधिलकी जिवंत ठेवत…
एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिलं…!
उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांच्या उपस्थितीत…
हदगाव येथे तब्बल २९ जोडप्यांचा विवाह
मोठ्या उत्साहात… आणि मंगलमय वातावरणात पार पडला…!
या सोहळ्याला लाभली मान्यवरांची उपस्थिती…
मा. आमदार हेमंतभाऊ पाटील साहेब… Hemant Patil - हेमंत पाटील
मा. आमदार संतोष बांगर साहेब… Mla Santosh Bangar
माजी खासदार शिवाजीराव माने साहेब…
मा. आमदार उत्तमराव इंगळे साहेब…
या भव्य सोहळ्याचं सुंदर सूत्रसंचालन केलं…
मुरलीधर हुंबर्डे यांनी… Murlidhar Hambarde Patil 
ज्यांनी प्रत्येक क्षण अधिक संस्मरणीय बनवला…!
तसंच…
हदगाव–हिमायतनगर तालुक्यातील सर्व शिवसैनिक आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी…
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षरशः जीवाचं रान केलं…!
हा फक्त विवाह सोहळा नव्हता…
तर समाजाला नवा विचार देणारा…
साधेपणातून एकात्मता निर्माण करणारा…
आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी आदर्श ठरणारा एक ऐतिहासिक उपक्रम होता…!
सामूहिक विवाह — काळाची गरज… आणि समाजासाठी एक शक्तिशाली दिशा…!
जय महाराष्ट्र…! 🚩
    user_Arvind D. Patil
    Arvind D. Patil
    Hadgaon, Nanded•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.