कन्नड -अंधानेर–मुंडवाडी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; तातडीच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी अंधानेर–मुंडवाडी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; तातडीच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी कन्नड तालुका प्रतिनिधी : कन्नड तालुक्यातील अंधानेर–मुंडवाडी हा महत्त्वाचा संपर्क रस्ता सध्या अत्यंत दुरवस्थेत असून वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवास धोकादायक बनला आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या मार्गावरून दररोज शेकडो नागरिकांची ये-जा होत असल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि रस्त्याचे कायमस्वरूपी मजबुतीकरण करावे, अशी मागणी केली आहे. लवकरात लवकर काम सुरू न झाल्यास लोकशाही मार्गाने निषेध नोंदविला आहे. प्रतिक्रिया - अंधानेर–मुंडवाडी रस्त्याची झालेली दुरवस्था ही अत्यंत गंभीर बाब आहे. या रस्त्यावरून दररोज विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिक प्रवास करतात. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येची तातडीने दखल घेऊन रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रश्न अधिक काळ प्रलंबित ठेवू नये, हीच सर्वांची अपेक्षा आहे.
कन्नड -अंधानेर–मुंडवाडी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; तातडीच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी अंधानेर–मुंडवाडी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; तातडीच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी कन्नड तालुका प्रतिनिधी : कन्नड तालुक्यातील अंधानेर–मुंडवाडी हा महत्त्वाचा संपर्क रस्ता सध्या अत्यंत दुरवस्थेत असून वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवास धोकादायक बनला आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या मार्गावरून दररोज शेकडो नागरिकांची ये-जा होत असल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि रस्त्याचे कायमस्वरूपी मजबुतीकरण करावे, अशी मागणी केली आहे. लवकरात लवकर काम सुरू न झाल्यास लोकशाही मार्गाने निषेध नोंदविला आहे. प्रतिक्रिया - अंधानेर–मुंडवाडी रस्त्याची झालेली दुरवस्था ही अत्यंत गंभीर बाब आहे. या रस्त्यावरून दररोज विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिक प्रवास करतात. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येची तातडीने दखल घेऊन रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रश्न अधिक काळ प्रलंबित ठेवू नये, हीच सर्वांची अपेक्षा आहे.
- सिल्लोड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर.. प्रेस नोट *सिल्लोड येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न* *११ हजार ५०० हून अधिक लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ* *प्रशासनाने जनतेच्या विश्वासाचे केंद्र बनावे; शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा – आमदार अब्दुल सत्तार* सिल्लोड (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' सिल्लोड शहरातील डोंगरगाव फाटा येथील स्वस्तिक लॉन्स येथे उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. या शिबिरात महसूल, ग्रामविकास, कृषी, एकात्मिक बाल विकास, वन विभाग, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, नगर परिषद आदी विविध विभागांच्या योजनांअंतर्गत सुमारे ११ हजार ५०० हून अधिक लाभार्थ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्य शासन हे सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेले लोककल्याणकारी सरकार असल्याचे सांगितले. ग्रामसभा व विविध उपक्रमांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. महसूल प्रशासन हे केवळ कागदपत्रांची पूर्तता करणारे कार्यालय नसून जनतेच्या विश्वासाचे केंद्र आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने संवेदनशीलता, पारदर्शकता आणि तत्परता या तत्त्वांवर काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख प्रशासनाचा उल्लेख करताना सांगितले की, महाराजांनी रयतेला केंद्रस्थानी ठेवून प्रशासनाची उभारणी केली. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व दुर्बल घटकांच्या हिताला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याच विचारांवर राज्य शासन कार्यरत असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून विविध विकासात्मक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मनापासून पुढाकार घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचारामुळे शासनाची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. दिव्यांग, आदिवासी, शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे तसेच सर्व वंचित घटकांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे. नागरिकांशी सुसंवाद ठेवून त्यांचे समाधान होईल अशा पद्धतीने प्रशासनाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. ------------- प्रलंबित पीक विमा दाव्यांच्या संदर्भात बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी पीक विमा हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अधिकार असून तो मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे सांगितले. येत्या विधिमंडळ अधिवेशनात या विषयावर शासनाकडे पाठपुरावा करून प्रश्न उपस्थित केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ------------ यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध लोकहिताचे निर्णय घेतले जात असल्याचा उल्लेख केला. तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांना विनम्र अभिवादन केले. ---------- नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आपल्या भाषणात सिल्लोड शहरातील बेघर नागरिकांसाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून म्हाडा योजनेंतर्गत पाच हजार घरांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती देत नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी प्रास्ताविकात 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांचा तसेच निकाली काढलेल्या प्रकरणांचा आढावा सादर केला. तहसीलदार अंकिता ताकभाते (सिल्लोड) व तहसीलदार मनीषा मेने (सोयगाव) यांनी महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देत नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी ग्रामविकास विभागाच्या योजनांची माहिती देत पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करून योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार अब्दुल सत्तार व मान्यवरांनी स्वस्तिक लॉन्स परिसरात विविध विभागांनी उभारलेल्या शासकीय स्टॉलची पाहणी केली. तसेच महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची खरेदी करून त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन दिले व नागरिकांनी स्थानिक बचत गटांच्या उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. सिल्लोड नगर परिषदेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक व पुष्पगुच्छाद्वारे मान्यवरांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार तहसीलदार अंकिता ताकभाते यांनी मानले. ------ यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अंकिता ताकभाते (सिल्लोड), तहसीलदार मनीषा मेने (सोयगाव), गटविकास अधिकारी रत्नाकर पगार (सिल्लोड), गटविकास अधिकारी अमोल जगताप (सोयगाव), नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप (सिल्लोड), भारत कासार ( सोयगाव ), नायब तहसीलदार तुकाराम बनकर ,बळीराम मुंडे , संभाजी पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पाटील तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख (सोयगाव) प्रभाकर काळे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना तालुकाप्रमुख (सोयगाव) धरमसिंग चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन गाडे, जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर, अब्दुल आमेर अ. सत्तार, सय्यद नासेर हुसेन, राजू बाबा काळे, माजी जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी सभापती रामदास पालोदकर, विश्वासराव दाभाडे, नगर परिषद शिवसेना गटनेते सुधाकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश ताठे, संदीप राऊत, राजाराम पाडळे, जयराम चिंचपुरे, नानासाहेब रहाटे, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, सुरेखा शिंदे, शिवसेना शहरप्रमुख मनोज झंवर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगरसेवक रउफ बागवान, अकील वसईकर, आसिफ बागवान, सिद्धेश्वर आहेर, डॉ. फिरोज पठाण, बबलू पठाण, नूर मोहंमद कुरेशी, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, संजय डमाळे, राजूमिया देशमुख, अंबादास सपकाळ, मोतीराम पाडळे, पंकज जयस्वाल आदींसह शासनाच्या विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, लाभार्थी तसेच विविध गावांतील आजी-माजी सरपंच, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- खुलताबाद तालुक्यात पावसाचा जोर कायम; जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी खुलताबाद तालुक्यात दिवसभर पावसाची संततधार सुरू असून पुढील काही दिवसही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पुढील काही तासांत जोरदार पाऊस, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदी-नाले व पूरग्रस्त भागांपासून दूर राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- छ.संभाजीनगरात भेसळयुक्त पनीर आणि गाईच्या तुपावर अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई; साडेतीन लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त छत्रपती संभाजीनगरात भेसळयुक्त पनीर आणि गाईच्या तुपावर अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई; साडेतीन लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त छत्रपती संभाजीनगरात Safe Food, Safe Maharashtra मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा विभागाने भेसळयुक्त पनीर आणि गाईच्या तुपाविरोधात मोठी कारवाई केली आहे. एमआयडीसी चिकलठाणा येथील अमोल दूध डेअरीवर टाकलेल्या छाप्यात भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ, सोयाबीन तेल आणि पनीर असा तीन लाख १२ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करून युनिट बंद करण्यात आले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा विभागाने एमआयडीसी चिकलठाणा येथील अमोल दूध डेअरीवर धाड टाकली. तपासादरम्यान नॉन-फूड ग्रेड सोयाबीन तेलाचा वापर करून अनालॉग पनीर आणि गाईचे तूप तयार केले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यावेळी २९९ किलो तूप, १९९ किलो क्रीम, १७४ किलो पनीर आणि २७८ किलो रिफाइंड सोयाबीन तेल असा एकूण ९५० किलो वजनाचा व तीन लाख १२ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासात ही डेअरी शहरातील लक्ष्मी डेअरीच्या टीव्ही सेंटर, कामगार चौक आणि श्रीराम चौक, दरगा रोड येथील तीन विक्री केंद्रांना पनीर आणि गाईचे तूप पुरवत असल्याचे समोर आले. त्यानंतर या तीन दुकानांवरही कारवाई करण्यात आली. तेथून ४१ किलो गाईचे तूप जप्त करून अन्न नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या कारवाईनंतर संबंधित उत्पादन युनिटचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून आस्थापना बंद करण्यात आली आहे. ही धडक मोहीम अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे, प्रज्ञा सुरसे, फरीद सिद्दीकी, योगेश चिभाडे यांनी सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच संयुक्त आयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. बाईट - अन्न औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त श्रीकांत करकळे1
- 🚚 "हर पार्सल की सुरक्षित मंज़िल – Kiran Courier Services!" 🚚 "हर पार्सल की सुरक्षित मंज़िल – Kiran Courier Services!" "सिर्फ़ पार्सल नहीं... हम आपकी भावनाएँ भी सही समय पर पहुँचाते हैं! ❤️📦" 📲 आज ही अपना Courier बुक करें! ☎️ Call / WhatsApp: 9545789966 🚚 Kiran Courier Services – Fast • Safe • Trusted #KiranCourier #CourierService #FastDelivery #SafeDelivery #DoorPickup #ParcelService #ExpressDelivery #IndiaCourier #CourierPartner #BusinessCourier #DocumentDelivery #Logistics #ReliableCourier #CourierLife #SameDayPickup #Aurangabad #ChhatrapatiSambhajinagar #SmallBusiness #InstaReels #ReelsIndia #ViralReels #TrendingReels #SupportLocalBusiness #BookNow #FastService1
- शाळेच्या खिचडीत काच; पेडणेकरांचा थेट तुकाराम मुंढेंना फोन!1
- महावितरणचे दीपक देवरे यांना आपल्या जीव वर खेळून लोकांच्या अंधे दुनियेत प्रकाश केला भर पावसाळ्यात बीच कोल्हापूर चढून दिल्लीचे तार जोडले1
- सरला बेटाला पाण्याचा वेढा; गोदावरीच्या कुशीत खुलले निसर्गाचे अद्भुत रूप छत्रपती संभाजीनगर... सरला बेटाला पाण्याचा वेढा; गोदावरीच्या कुशीत खुलले निसर्गाचे अद्भुत छत्रपती संभाजीनगर... रूप सौजन्य : भगवान फोटो ANC : छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुका आणि अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवरील गोदावरी नदीपात्रात वसलेले ६५ एकरांचे सराला बेट सध्या निसर्गसौंदर्याने नटले आहे. यंदाच्या मान्सूनमधील सलग ५९ दिवसांच्या पावसानंतर बेटाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला असून, दाट हिरवळ आणि मध्यभागी उभे असलेले भव्य मंदिर संकुल पर्यटक व भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. पावसाळ्यात सराला बेटावर खुललेले हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. ANC : छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुका आणि अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवरील गोदावरी नदीपात्रात वसलेले ६५ एकरांचे सराला बेट सध्या निसर्गसौंदर्याने नटले आहे. यंदाच्या मान्सूनमधील सलग ५९ दिवसांच्या पावसानंतर बेटाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला असून, दाट हिरवळ आणि मध्यभागी उभे असलेले भव्य मंदिर संकुल पर्यटक व भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. पावसाळ्यात सराला बेटावर खुललेले हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत.1
- पार्किंगच्या वादातून पैठण गेटमध्ये तुफान राडा; एकाच कॉलवर टोळके जमले, दुकानात घुसून हाणामारी छत्रपती संभाजीनगर... ANC : छत्रपती संभाजीनगर शहरातील पैठण गेट परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादाने हिंसक वळण घेतले. मोहन टॉकीजसमोरील महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्स दुकानात दोन गट आमनेसामने येत दुकानात घुसून तुंबळ हाणामारी केली. एका कॉलनंतर मोठे टोळके घटनास्थळी पोहोचल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच सिटी चौक पोलिसांनी तत्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. विशेष म्हणजे, या घटनेत कोणताही पक्ष तक्रार देण्यास पुढे आला नाही. त्यामुळे सिटी चौक पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत दोन्ही गटांतील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पार्किंगवरून सुरू झालेला हा वाद पुन्हा उफाळून थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली असून, प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल असगर शेख करत आहेत.1