Shuru
Apke Nagar Ki App…
धामणगाव रेल्वे तालुक्यातील कॅनॉलमध्ये आढळला एक व्यक्तीचा मृतदेह,मृतकाची ओळख पटली
Amravati News Update
धामणगाव रेल्वे तालुक्यातील कॅनॉलमध्ये आढळला एक व्यक्तीचा मृतदेह,मृतकाची ओळख पटली
More news from महाराष्ट्र and nearby areas
- तीन शहरांच्या अग्निशमन दलाची धाव1
- Post by स्मिता तलेय1
- नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड-रोठे अक्का यांची वार्डात फिरून स्वच्छतेची पाहणी; कर्मचाऱ्यांना दिल्या कडक सूचना प्रतिनिधी : संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे : धामणगांव शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी राहावे या उद्देशाने नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड-रोठे (अक्का) यांनी सकाळी विविध वार्डांमध्ये प्रत्यक्ष फिरून स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरातील नाल्या, कचरा शौचालय व्यवस्थापन तसेच स्वच्छतेसंदर्भातील विविध बाबींची तपासणी करून संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. सकाळच्या वेळेत नगराध्यक्षांनी वार्डांमध्ये फेरफटका मारत नागरिकांशी संवाद साधला. परिसरातील नाल्यांची स्वच्छता, रस्त्यावरील कचरा तसेच स्वच्छता कामांच्या अंमलबजावणीची त्यांनी बारकाईने पाहणी केली. काही ठिकाणी नाल्यांमध्ये साचलेला कचरा आणि स्वच्छतेच्या इतर बाबी लक्षात घेऊन त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी वार्ड परिसरात नागरिकांशी चर्चा करत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. शहरात स्वच्छतेबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार येऊ नये, यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नियमितपणे आणि जबाबदारीने काम करावे, तसेच नाल्या व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता वेळोवेळी करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना नगराध्यक्षांनी दिल्या. नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड-रोठे यांनी यावेळी नागरिकांनाही स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. घरातील कचरा रस्त्यावर किंवा नाल्यांमध्ये टाकू नये, तो डस्टबिनमध्ये जमा करून नगरपरिषदेच्या घंटागाडीतच द्यावा. शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. स्वच्छ आणि निरोगी शहर घडवण्यासाठी सर्वांनी नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. नगराध्यक्ष स्वतः सकाळी वार्डांमध्ये फिरून स्वच्छतेची पाहणी करत असल्याचे पाहून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपरिषद प्रशासन कटिबद्ध असून धामणगांव शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वासही नगराध्यक्षांनी यावेळी व्यक्त केला.1
- Post by सारनाथ अवचार1
- Post by Sharad Dayedar1
- दारव्हा तालुक्यातील लाखखिंड परिसरात एका शेतातील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून वन विभागाने बिबट्याच्या सुटकेसाठी रेस्क्यू मोहीम सकाळी ११. ०० वाजता सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाखखिंड येथील शेतकरी रमेश जाधव यांचे तीवरी रोडलगत शेत आहे. सोमवारी रात्री पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या त्यांच्या शेतातील विहिरीमध्ये पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास रमेश जाधव शेतात गेले असता विहिरीमध्ये बिबट्या पडलेला दिसून आला. ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ गावातील नागरिकांना माहिती दिली. काही वेळातच ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, घटनेची माहिती दारव्हा वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी विशेष रेस्क्यू मोहीम सुर राबविण्यात आली.वन विभागाकडून बिबट्याला पकडून सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव चऱ्हाटे यांनी सांगितले.1
- आई सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन माहिला साठी शिक्षण खुले माहिला व पाहिली शिक्षिका महाराष्ट्र राज्य तसेच देशातील माहिला समान मिळवून देणा-यार आई सावित्री अभिवादन1
- Post by Amravati News Update1