आष्टी रोडवरील दिना पुलाची दुरवस्था; अपघाताचा धोका वाढला अहेरी: सततच्या पावसामुळे आष्टी रोडवरील दिना पुलावरील रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पुलावर पाणी साचत असल्याने वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या पुलावरून दररोज शेकडो लहान-मोठी वाहने तसेच पादचारी ये-जा करतात. मात्र रस्त्याची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसात परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) तातडीने पुलावरील खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. सद्यस्थितीत पुलाची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती न केल्यास मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आष्टी रोडवरील दिना पुलाची दुरवस्था; अपघाताचा धोका वाढला अहेरी: सततच्या पावसामुळे आष्टी रोडवरील दिना पुलावरील रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पुलावर पाणी साचत असल्याने वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या पुलावरून दररोज शेकडो लहान-मोठी वाहने तसेच पादचारी ये-जा करतात. मात्र रस्त्याची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसात परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) तातडीने पुलावरील खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. सद्यस्थितीत पुलाची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती न केल्यास मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
- साकोली तालुक्यातील विर्सी येथे चक्रिवादळ, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, वीजेचे पोल व झाडे पडली1
- ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ1
- दरवर्षीचा तोच खेळ... पूर आला की रस्ता बंद! वडकी–पिंपळापूर पुलासाठी नागरिकांचा संताप अनावर दरवर्षीचा तोच खेळ... पूर आला की रस्ता बंद! वडकी–पिंपळापूर पुलासाठी नागरिकांचा संताप अनावर पुलाची उंची वाढवा, नागरिकांचे जीव वाचवा; सरपंच रवींद्र चौधरींचा लोकप्रतिनिधींवर घणाघात राळेगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील वडकी गावाला लागून असलेल्या पिंपळापूर मार्गावरील नाल्याला आज आलेल्या पुरामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. थोड्याशा पावसातही पूल पाण्याखाली जात असल्याने शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिकांना दोन्ही बाजूंना तासन्तास अडकून पडावे लागले. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून प्रशासन व लोकप्रतिनिधीं विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वडकी, पिंपळापूर व वडगाव येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची उंची वाढविण्याची मागणी सातत्याने करीत आहेत. मात्र प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आज नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे खोळंबली. शाळेतून परतणारे विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर आणि इतर नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर पिंपळापूरचे सरपंच रवींद्र चौधरी यांनी लोकप्रतिनिधींवर जोरदार घणाघात केला. "दरवर्षी हाच प्रकार घडतो. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असतानाही लोकप्रतिनिधींना या प्रश्नाचे काहीच सोयरसुतक नाही. केवळ आश्वासनांची खैरात केली जाते; मात्र पुलाची उंची वाढविण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही," असा संताप त्यांनी व्यक्त केला. नागरिकांचे म्हणणे आहे की, पुलाची उंची वाढविल्यास दरवर्षी उद्भवणारी ही गंभीर समस्या कायमची निकाली निघू शकते. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने या पुलाच्या उंचीवाढीचा निर्णय घ्यावा. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.1
- देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रंजीत कांबळे यांचा वृक्षारोपण करून करण्यात आला वाढदिवस साजरा देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राची माजी आमदार रंजीत कांबळे यांचा वृक्षारोपण करून वाढदिवस करण्यात आला साजरा वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील काँग्रेस पक्षाद्वारे देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रंजीत कांबळे यांचा वाढदिवस अल्लीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये उपयोगी अनेक झाडे लावण्यात आली वृक्षारोपण कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष हिंगणघाट श्रीराम साखरकर बालू महाजन प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य सचिन पारसडे गोपाल मेघरे संदीप नरड प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य हरून अली माजी उपसरपंच खलील शेख प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य राहुल वाटखेडे माझी तंटामुक्ती अध्यक्ष धनराज सुपारे नितीन शेलकर सतीश देठे वैद्यकीय अधिकारी गुजरकर मॅडम व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व गावातील काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.2
- जि.प. भोजापूर शाळेत शैक्षणिक साहित्याचा नियमित वापराने विद्यार्थी आनंदी जि.प. भोजापूर शाळेत शैक्षणिक साहित्याचा नियमित वापराने विद्यार्थी आनंदी गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांचे उपक्रमातून प्रयत्न1
- शहर महिला काँग्रेस अध्यक्षपदी सुचिता आगाशे यांची नियुक्ती साकोली, साकोली येथील मा. आमदार श्री. नानाभाऊ पटोले यांच्या संपर्क कार्यालयात आज महिला काँग्रेसच्या संघटनात्मक बळकटीसाठी आयोजित कार्यक्रमात सौ. सुचिताताई आगाशे यांची महिला काँग्रेसच्या पदावर नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी मा. आमदार श्री. नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला भंडारा जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मा. सौ. जयश्रीताई बोरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच जिल्ह्यातील महिला काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी मा. नानाभाऊ पटोले यांनी नवनियुक्त सौ. सुचिताताई आगाशे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. महिला काँग्रेस अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्तीने जनतेच्या प्रश्नांवर सक्रियपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सौ. सुचिताताई आगाशे यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.1
- एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या वतीने व्याघ्र संवर्धनासह इतर प्रजातींचे संरक्षण, बचाव व जागृतीसाठी एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या वतीने व्याघ्र संवर्धनासह इतर प्रजातींचे संरक्षण, बचाव व जागृतीसाठी1
- गडचिरोलीतील भामरागड आणि सिरोंचा परिसरात अनेक नदी-नाल्यांना पूर गडचिरोलीतील भामरागड आणि सिरोंचा परिसरात अनेक नदी-नाल्यांना पूर गडचिरोली: (दि ३०) गडचिरोली–चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. तसेच दक्षिण गडचिरोलीतील भामरागड आणि सिरोंचा परिसरात अनेक नदी-नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.1