बाटलीबंद पाण्यात किडा उत्पादक कंपनीचा विक्रेत्याला 50 हजाराचा दंड बाटलीबंद पाण्यात मृत कीडा आढळल्याने धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते गोपाल चौधरी यांनी केलेल्या तक्रारीची अन्न व औषध प्रशासनाने दखल घेतली. प्रयोगशाळेच्या तपासणीत सदर पाणी मानवी सेवनासाठी अयोग्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उत्पादक कंपनीसह विक्रेत्यावर ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. नाशिक विभागाचे सह आयुक्त तथा न्यायनिर्णय अधिकारी यांच्या न्यायालयात ही कारवाई करण्यात आली. *बाटलीत आढळला मृत कीडा* मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते गोपाल चौधरी यांनी १७ जून २०२४ रोजी धुळे शहरातील मोहाडी परिसरातील भूषण किराणा दुकानातून 'ऑक्सीवुड' कंपनीची एक लिटर पाण्याची बाटली खरेदी केली होती. बाटलीतील पाणी पाहिले असता ते दुषित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच पाण्यात एक मृत कीडा आढळून आला. याबाबत त्यांनी तातडीने दुकानदाराकडे तक्रार केली. मात्र, दुकानदाराने कंपनीशी संपर्क साधण्यास सांगून कंपनीचा संपर्क क्रमांक दिला. चौधरी यांनी कंपनीशी संपर्क साधला असता समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी अन्न व औषध प्रशासन, धुळे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीसोबत संबंधित पाण्याची बाटली पुरावा म्हणून सादर करून उत्पादक कंपनी व विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी केली. *प्रयोगशाळा तपासणीत धक्कादायक निष्कर्ष* अन्न व औषध प्रशासनाने तक्रारीची दखल घेत पाण्याचे नमुने तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील नारायण लॅबोरेटरी येथे पाठविले. तपासणी अहवालात सदर पाणी मानवी सेवनासाठी अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत संबंधितांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. नाशिक विभागाचे न्यायनिर्णय अधिकारी तथा सह आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन यांच्या न्यायालयात प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीनंतर उत्पादक कंपनी मे. गुमाजी फूड्स अँड अॅग्रो इंडस्ट्रीज, चाळीसगावचे मालक आशिष गोपाळदास गुप्ता तसेच विक्रेता मे. न्यू ललिता प्रोव्हिजन अँड जनरल स्टोअर्स, मोहाडी, धुळेचे मालक भूषण हिरामण पाटील यांना एकूण ५० हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला. *नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना दणका* बाटलीबंद पाण्याच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध झालेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सामाजिक कार्यकर्ते गोपाल चौधरी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रकरणाचा निकाल लागला असून, त्यांच्या लढ्याला यश आले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अन्न सुरक्षा कायद्याची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. कुठेही चुकीचे किंवा बेकायदेशीर प्रकार आढळल्यास जागरूक नागरिकांनी आवाज उठविला पाहिजे, असे सामाजिक कार्यकर्ते गोपाल चौधरी यांनी सांगितले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत
बाटलीबंद पाण्यात किडा उत्पादक कंपनीचा विक्रेत्याला 50 हजाराचा दंड बाटलीबंद पाण्यात मृत कीडा आढळल्याने धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते गोपाल चौधरी यांनी केलेल्या तक्रारीची अन्न व औषध प्रशासनाने दखल घेतली. प्रयोगशाळेच्या तपासणीत सदर पाणी मानवी सेवनासाठी अयोग्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उत्पादक कंपनीसह विक्रेत्यावर ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. नाशिक विभागाचे सह आयुक्त तथा न्यायनिर्णय अधिकारी यांच्या न्यायालयात ही कारवाई करण्यात आली. *बाटलीत आढळला मृत कीडा* मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते गोपाल चौधरी यांनी १७ जून २०२४ रोजी धुळे शहरातील मोहाडी परिसरातील भूषण किराणा दुकानातून 'ऑक्सीवुड' कंपनीची एक लिटर पाण्याची बाटली खरेदी केली होती. बाटलीतील पाणी पाहिले असता ते दुषित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच पाण्यात एक मृत कीडा आढळून आला. याबाबत त्यांनी तातडीने दुकानदाराकडे तक्रार केली. मात्र, दुकानदाराने कंपनीशी संपर्क साधण्यास सांगून कंपनीचा संपर्क क्रमांक दिला. चौधरी यांनी कंपनीशी संपर्क साधला असता समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी अन्न व औषध प्रशासन, धुळे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीसोबत संबंधित पाण्याची बाटली पुरावा म्हणून सादर करून उत्पादक कंपनी व विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी केली. *प्रयोगशाळा तपासणीत धक्कादायक निष्कर्ष* अन्न व औषध प्रशासनाने तक्रारीची दखल घेत पाण्याचे नमुने तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील नारायण लॅबोरेटरी येथे पाठविले. तपासणी अहवालात सदर पाणी मानवी सेवनासाठी अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत संबंधितांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. नाशिक विभागाचे न्यायनिर्णय अधिकारी तथा सह आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन यांच्या न्यायालयात प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीनंतर उत्पादक कंपनी मे. गुमाजी फूड्स अँड अॅग्रो इंडस्ट्रीज, चाळीसगावचे मालक आशिष गोपाळदास गुप्ता तसेच विक्रेता मे. न्यू ललिता प्रोव्हिजन अँड जनरल स्टोअर्स, मोहाडी, धुळेचे मालक भूषण हिरामण पाटील यांना एकूण ५० हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला. *नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना दणका* बाटलीबंद पाण्याच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध झालेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सामाजिक कार्यकर्ते गोपाल चौधरी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रकरणाचा निकाल लागला असून, त्यांच्या लढ्याला यश आले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अन्न सुरक्षा कायद्याची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. कुठेही चुकीचे किंवा बेकायदेशीर प्रकार आढळल्यास जागरूक नागरिकांनी आवाज उठविला पाहिजे, असे सामाजिक कार्यकर्ते गोपाल चौधरी यांनी सांगितले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत
- बुलढाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक; लोणारमध्ये वाजवले 'डफडे', ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास सिंदखेडराजा येथे बैलजोड्यांसह चक्काजामचा इशारा!1
- बुलढाणा जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन खामगाव: बुलढाणा जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल टिकार पाटील यांनी खामगाव तालुक्यातील अटाळी येथे टावरवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात ७ आमदार, १ खासदार आणि ३ मंत्री (केंद्रीय मंत्री, पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री) असूनही जिल्ह्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले, ही दुर्दैवाची बाब आहे. सरकारला आमच्या थडग्यावर राज्य करायचे आहे का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपली असून शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. स्थानिक तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांनी आंदोलकांची भेट घेऊन सकारात्मक मध्यस्थीचे व प्रशासकीय स्तरावर १००% प्रयत्न करण्याचे लिखित आश्वासन दिले. प्रशासनाच्या विनंतीवरून हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र येत्या १५ तारखेपर्यंत बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला नाही, तर आमदार आकाश फुंडकर यांच्या घरावर थेट घुसून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.3
- भोकरदन शहरात शहीद स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी मांडला ठराव माजी सैनिकांच्या मागणीला मिळाला न्याय भोकरदन इसरारखान पठाण भोकरदन नगर परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत तालुक्यातील शहीद जवानांच्या स्मृतीला उजाळा देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. माजी सैनिकांच्या मागणीला मान देऊन भोकरदन शहरात ‘शहीद स्मारक’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. हा महत्त्वपूर्ण ठराव नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी सभागृहात मांडला. सभेदरम्यान हातात ठरावाची प्रत घेऊन उभे राहत रणवीर सिंग देशमुख यांनी भावनिक आवाहन केले. ते म्हणाले, आपल्या देशाकरता जे जवान शहीद होतात... त्या शहिदांकरता आपल्या तालुक्यात कुठंही स्मारक नाही. नगरपालिकेच्या ठिकाणी पैसा आहे, तर तो आपल्या काळात आपण सर्वांनी हात वर करून हा ठराव मंजूर करावा. रणवीरसिंग देशमुख यांनी मांडलेल्या या ठरावाला उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवकांनी तत्काळ पाठिंबा दर्शवला. नगराध्यक्षा सौ. समरीन नाज बेग वसीम मिर्झा आणि उपनगराध्यक्षा सौ. सुरेखाताई जाधव यांनी ठरावाला संमती देत हा निर्णय एकमताने पारित केला. या ठरावाचे अनुमोदक म्हणून कदीर बापू यांचे नाव जाहीर करण्यात आले. ठराव मंजूर झाल्यानंतर बोलताना नगरसेवक रणवीर सिंग देशमुख म्हणाले, आज भोकरदन नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मी तालुक्यातील सर्व माजी सैनिकांच्या विनंतीला मान देऊन भोकरदन शहरात शहीद स्मारक व्हावे याकरिता या सभेत जागा मागणीचा ठराव मांडला. उपस्थित सर्व सदस्य, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा यांनी सर्व संमतीने ठराव मंजूर केला. अनुमोदक म्हणून कदीर बापू सह सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार. सभेच्या व्हिडिओमध्ये दिसते की, नगरसेवक रणवीर सिंग देशमुख कागदपत्र हातात घेऊन ठरावाचे वाचन करत आहेत. सभागृहात नगरसेवक पांढऱ्या वेशात बसलेले असून, अधिकारी वर्ग समोर टेबलवर उपस्थित आहे. ठराव मांडल्यानंतर सर्व सदस्यांनी हात वर करून एकमताने संमती दर्शवली हा ठराव मंजूर झाल्याने आता नगर परिषद प्रशासनाकडून शहीद स्मारकासाठी योग्य जागेची निवड, आराखडा व निधी मंजुरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. भोकरदन तालुक्यातून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृती जतन करण्यासाठी हे स्मारक प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास माजी सैनिक संघटना व नागरिकांनी व्यक्त केला आहे. तालुक्यात आतापर्यंत शहीद जवानांसाठी स्वतंत्र स्मारक नसल्याची खंत अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात होती. नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी उचललेल्या या पावलामुळे शहीद कुटुंबीयांच्या भावनांचा सन्मान झाला असून, येणाऱ्या पिढीला देशभक्तीची प्रेरणा मिळणार आहे. स्मारकाच्या कामास लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती नगर परिषद सूत्रांनी दिली.1
- मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे यांची प्रतिक्रिया मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे. यांची प्रतिक्रिया1
- कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त*....... * कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त* -------------------------- -:बदनापूर पोलिसांची कारवाई बदनापूर शहरातील SBI बँकेतून दिनांक 04/09/2026 रोजी फिर्यादी - नामे विष्णु कुंडलीकराव कोल्हे रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना यांनी 10 लाख रुपये काढून आपल्या कारमध्ये घेऊन जात असताना त्यावर चोरट्यांनी पाळत ठेवून फिर्यादीच्या कारचा पाठलाग करून धोपटेश्वर शिवरातील धोपटेश्वर ते देवगाव रोडवर आपली कार उभी करून शेतात जाऊन परत आले असता कारच्या मागील दरवाजाचे काच तुटलेले दिसले असता गाडीतील रक्कम दिसेनाशी झाली. त्यानंतर फिर्यादी विष्णु कुंडलीकराव कोल्हे वय 49 वर्ष रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना हे पोलिस स्टेशन बदनापूर येथे येऊन रिपोर्ट दिल्यावरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एम. टी. सुरवसे, पोलिस निरीक्षक बदनापूर यांनी तत्काळ सूत्र हाती घेऊन २ टीम तयार करून गुन्ह्याच्या तपासामध्ये CCTV फुटेज चेक केले तसेच तांत्रिक तपास केला असता एक मोटार सायकल वर दोन चोरट्यांनी कारचा पाठलाग करून कारची काच फोडून पैसे चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हे 1) गुंजी चालराजु जबराज 2) गुड्डेटी विनोत प्रभुदास दोन्ही रा. कपरला टिपा. ता. बिटरगुंटा जि. नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, या आरोपीस अटक करणे कामी तपास पथक यांना आंध्र प्रदेश येथे रवाना करून आरोपी चा शोध घेतला असता मिळून आला नाही, परंतु त्याच्या राहत्या घरातून चोरीस गेलेले 6 लाख रुपये जप्त करण्यास तपास पथक यांना यश प्राप्त झाले आहे. बाकी आरोपी व उर्वरीत रक्कम यांचा शोध घेणे कामी पथक रवाना करण्यात आले आहेत. सदरची कारवाई मा. श्री. तेघबिर सिंह संधु साहेब, पोलीस अधीक्षक जालना, मा. विक्रम साळी साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब जालना, मा. अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, जालना यांचे मार्गदर्शनाखाली १) एम. टी. सुरवसे, पोलिस स्टेशन पोलीस ठाणे बदनापूर, २) पोउपनि एस. आर.कुकलारे, ३) पोहेकॉ/671 ए.एस.दासर, ४) पोको/227 भडंगे, ५) पोको/342 पी. के. गोलवाल, ६) पोको/1699 एस. जे. तडवी यांनी केली आहे.1
- श्री.गणेश महासंघ भोकरदन आयोजित गणेश फेस्टिवल 2026 मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन... श्री.गणेश महासंघ भोकरदन आयोजित गणेश फेस्टिवल 2026 मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन...1
- दुष्काळ जाहीर करा, नाहीतर २८ पासून आमरण उपोषण!” जळगाव जामोद च्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; दुष्काळ जाहीर करा, नाहीतर २८ पासून आमरण उपोषण!” जळगाव जामोद च्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; जळगाव जामोद(प्रतिनिधी): अल्प व अनियमित पावसामुळे खरीप हंगाम अक्षरशः संकटात सापडला असून, पिकांची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर संपूर्ण जळगाव जामोद तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीसाठी निंभोरा बु. व खेर्डा खुर्द येथील शेतकऱ्यांनी मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन दिले.प्रशासनाने मागण्यांची तातडीने दखल घेऊन कार्यवाही न केल्यास २८ सप्टेंबर २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.त्यामुळे प्रशासनासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.यावेळी शेतकऱ्यांनी जळगाव जामोद तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून प्रस्ताव शासनाकडे पाठवावा.खरीप पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.दुष्काळी सवलती व विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा.पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या लक्षात घेऊन चारा व पाण्याची तातडीने व्यवस्था करावी.सन २०२५-२६ चा पीक विमा विनाविलंब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा अशा मागण्या केल्या आहेत.या निवेदनाची प्रत बुलढाणा जिल्हाधिकारी तसेच जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी यांनाही देण्यात आली आहे. अस्मानी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी अमोल बहादरे, ज्ञानेश्वर खंडारे, पांडुरंग उगले, रमेश देशमुख, आनंद सुरळकर, आनंद बुंदे, नारायण खंडारे, विठ्ठल दिघडे, विलास डवंगे, अनंता कोंडे, प्रज्वल देशमुख, ज्ञानेश्वर अंभोरे, गजानन बुंदे, दशरथ उगले, भीमराव वानखडे, सागर सपकाळ यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.1
- बुलढाण्यात महायुतीत मोठा स्फोट: खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप करत संजय गायकवाड आक्रमक; म्हणाले, "गरज पडल्यास मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार!"1