logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खुलताबाद येथील A.F.K.G. इंग्लिश हायस्कूलच्या वतीने आषाढी एकादशीच्या औचित्याने शनिवारी भव्य नगर दिंडीचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणातून सकाळी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात या दिंडीला प्रारंभ झाला. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि स्थानिक नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल"च्या अखंड नामगजराने संपूर्ण परिसर भक्तिमय केला. दिंडीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात अभंग, भजन व हरिनाम संकीर्तन सादर केले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज तसेच विठ्ठल-रुक्मिणी यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दिंडी मार्गावर नागरिकांनी फुलांची उधळण करत दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले. भद्रा मारुतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांनी सादर केलेले 'भक्त पुंडलिक' हे नाट्य सादरीकरण, भावपूर्ण आरती आणि नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व तसेच भक्ती, सेवा, समर्पण आणि संस्कार या मूल्यांची माहिती देण्यात आली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि सामाजिक मूल्यांविषयीची जाणीव अधिक दृढ होते, असे प्रतिपादन शाळेचे संस्थापक अध्यक्ष अजय चिमणे यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री चिमणे, शिक्षिका माधुरी घोडके, ज्योती केरे, उज्वला केरे, संगीता नागे, निकिता बारगळ, हर्षदा ठेंगडे यांच्यासह शिक्षकवृंद, पालक आणि स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. या नगर दिंडीमुळे संपूर्ण खुलताबाद शहर विठ्ठलमय झाले असून उपस्थितांनी शाळेच्या या संस्कारक्षम उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

6 hrs ago
user_Marathi News Point
Marathi News Point
Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
6 hrs ago

खुलताबाद येथील A.F.K.G. इंग्लिश हायस्कूलच्या वतीने आषाढी एकादशीच्या औचित्याने शनिवारी भव्य नगर दिंडीचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणातून सकाळी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात या दिंडीला प्रारंभ झाला. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि स्थानिक नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल"च्या अखंड नामगजराने संपूर्ण परिसर भक्तिमय केला. दिंडीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात अभंग, भजन व हरिनाम संकीर्तन सादर केले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज तसेच विठ्ठल-रुक्मिणी यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दिंडी मार्गावर नागरिकांनी फुलांची उधळण करत दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले. भद्रा मारुतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांनी सादर केलेले 'भक्त पुंडलिक' हे नाट्य सादरीकरण, भावपूर्ण आरती आणि नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व तसेच भक्ती, सेवा, समर्पण आणि संस्कार या मूल्यांची माहिती देण्यात आली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि सामाजिक मूल्यांविषयीची जाणीव अधिक दृढ होते, असे प्रतिपादन शाळेचे संस्थापक अध्यक्ष अजय चिमणे यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री चिमणे, शिक्षिका माधुरी घोडके, ज्योती केरे, उज्वला केरे, संगीता नागे, निकिता बारगळ, हर्षदा ठेंगडे यांच्यासह शिक्षकवृंद, पालक आणि स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. या नगर दिंडीमुळे संपूर्ण खुलताबाद शहर विठ्ठलमय झाले असून उपस्थितांनी शाळेच्या या संस्कारक्षम उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकातून रविवारी (26 जुलै) सकाळी 11 वाजता विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी भव्य तिरंगा मार्च काढण्यात येणार आहे. या मार्चमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा वापरला जाणार नसून, केवळ विद्यार्थ्यांच्या हक्कांचा मुद्दाच केंद्रस्थानी ठेवण्यात येणार असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानपरिषद आमदार अंबादास दानवे यांनी सर्व विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना या तिरंगा मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना सर्वांनी एकत्र येऊन पाठिंबा द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकातून रविवारी (26 जुलै) सकाळी 11 वाजता विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी भव्य तिरंगा मार्च काढण्यात येणार आहे. या मार्चमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा वापरला जाणार नसून, केवळ विद्यार्थ्यांच्या हक्कांचा मुद्दाच केंद्रस्थानी ठेवण्यात येणार असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानपरिषद आमदार अंबादास दानवे यांनी सर्व विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना या तिरंगा मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना सर्वांनी एकत्र येऊन पाठिंबा द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 min ago
  • फुलंब्री नगरपंचायतीकडून विनापरवाना करण्यात आलेल्या बांधकामांवर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. नगरपंचायतीची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता उभारण्यात आलेल्या अशा अनधिकृत बांधकामांवर नगरपंचायत प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
    1
    फुलंब्री नगरपंचायतीकडून विनापरवाना करण्यात आलेल्या बांधकामांवर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. नगरपंचायतीची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता उभारण्यात आलेल्या अशा अनधिकृत बांधकामांवर नगरपंचायत प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • छत्रपती संभाजीनगर येथे कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्या आई-वडिलांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार अभिजीत यांना टायफॉइड झाला आहे. यापूर्वी त्यांना कधीही असा त्रास झाला नसल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत कुटुंब चिंतेत आहे. अभिजीत हे सध्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देत असून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, आंदोलन मोडून काढण्यासाठी विद्यार्थ्यांवर चुकीच्या पद्धतीने मारहाण करण्यात आल्याचा आरोप करत पालकांनी दिल्ली पोलिसांवर अविश्वास दाखवला आहे. तसेच सरकारकडून अभिजीतच्या जीवाला धोका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सरकारने या आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक चर्चा करावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारने सकारात्मक चर्चा केल्यास हे आंदोलन संपुष्टात येईल आणि विद्यार्थी आपल्या घरी परततील, असे अभिजीत यांच्या आई-वडिलांनी सांगितले.
    2
    छत्रपती संभाजीनगर येथे कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्या आई-वडिलांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार अभिजीत यांना टायफॉइड झाला आहे. यापूर्वी त्यांना कधीही असा त्रास झाला नसल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत कुटुंब चिंतेत आहे. अभिजीत हे सध्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देत असून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.

दरम्यान, आंदोलन मोडून काढण्यासाठी विद्यार्थ्यांवर चुकीच्या पद्धतीने मारहाण करण्यात आल्याचा आरोप करत पालकांनी दिल्ली पोलिसांवर अविश्वास दाखवला आहे. तसेच सरकारकडून अभिजीतच्या जीवाला धोका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सरकारने या आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक चर्चा करावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारने सकारात्मक चर्चा केल्यास हे आंदोलन संपुष्टात येईल आणि विद्यार्थी आपल्या घरी परततील, असे अभिजीत यांच्या आई-वडिलांनी सांगितले.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज मंदिरात पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास भुमरे यांनी सपत्नीक उपस्थित राहून श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत विधिवत पूजा केली. या प्रसंगी त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धी, शांती, उत्तम आरोग्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. मंदिर परिसरात भाविकांशी संवाद साधत आमदार भुमरे यांनी उपस्थितांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या धार्मिक सोहळ्याप्रसंगी मंदिर संस्थानचे पदाधिकारी, स्थानिक मान्यवर, शिवसैनिक तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
    4
    आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज मंदिरात पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास भुमरे यांनी सपत्नीक उपस्थित राहून श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत विधिवत पूजा केली. या प्रसंगी त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धी, शांती, उत्तम आरोग्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली.

मंदिर परिसरात भाविकांशी संवाद साधत आमदार भुमरे यांनी उपस्थितांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या धार्मिक सोहळ्याप्रसंगी मंदिर संस्थानचे पदाधिकारी, स्थानिक मान्यवर, शिवसैनिक तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • दिल्लीतील जंतर-मंतरवरून सत्यपाल महाराज यांनी अत्यंत आक्रमक आणि तुफान भाषण करत थेट राजीनाम्याची मागणी केली आहे. आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी करताना त्यांनी रोखठोक विधान केले की, 'गुंडांना नेता बनवून ठेवले आहे. आम्ही निवडून दिले आहे, तू आमचा दिवाणजी आहेस, त्यामुळे तू राजीनामा दे.' जंतर-मंतरच्या व्यासपीठावरून सत्यपाल महाराजांनी तीव्र शब्दांत निशाणा साधत हा घणाघात केला आहे.
    1
    दिल्लीतील जंतर-मंतरवरून सत्यपाल महाराज यांनी अत्यंत आक्रमक आणि तुफान भाषण करत थेट राजीनाम्याची मागणी केली आहे. आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी करताना त्यांनी रोखठोक विधान केले की, 'गुंडांना नेता बनवून ठेवले आहे. आम्ही निवडून दिले आहे, तू आमचा दिवाणजी आहेस, त्यामुळे तू राजीनामा दे.' जंतर-मंतरच्या व्यासपीठावरून सत्यपाल महाराजांनी तीव्र शब्दांत निशाणा साधत हा घणाघात केला आहे.
    user_Sudam gadekar
    Sudam gadekar
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • केलेल्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली न गेल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तक्रारीवर कसलीही कारवाई न झाल्याने सुरू ॲप काहीच कामाचा उरलेला नाही, असा थेट आरोप करत संताप व्यक्त करण्यात आला आहे.
    1
    केलेल्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली न गेल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तक्रारीवर कसलीही कारवाई न झाल्याने सुरू ॲप काहीच कामाचा उरलेला नाही, असा थेट आरोप करत संताप व्यक्त करण्यात आला आहे.
    user_संतोष वामनराव दाभाडे
    संतोष वामनराव दाभाडे
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज औद्योगिक परिसरात आंदोलनकर्ते अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून पोलीस संपूर्ण परिसरावर बारकाईने नजर ठेवून आहेत. सध्या दिपके यांच्या घरासमोरील परिस्थिती शांत आहे. तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांकडून या परिसरात सातत्याने गस्त घातली जात आहे.
    1
    शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज औद्योगिक परिसरात आंदोलनकर्ते अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून पोलीस संपूर्ण परिसरावर बारकाईने नजर ठेवून आहेत.

सध्या दिपके यांच्या घरासमोरील परिस्थिती शांत आहे. तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांकडून या परिसरात सातत्याने गस्त घातली जात आहे.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • हजरत ख्वाजा शेख बुरहानोद्दीन गरीब (रह.) यांच्या 710 व्या उरूसानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद शहरातील दर्गा हजरत बाविस ख्वाजा (रह.) येथून पारंपरिक व धार्मिक उत्साहात भव्य संदल मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवत धार्मिक वातावरणाचा अनुभव घेतला. उरूसानिमित्त शहरात सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मिरवणुकीदरम्यान कव्वाली आणि बँडच्या गजराने संपूर्ण शहर भक्तिमय झाले होते. जिल्हाभरातील विविध भागांतून आलेल्या भाविकांनी दर्ग्यावर चादर व अकीदत अर्पण करून दुआ मागितली. संदल मिरवणुकीदरम्यान रिमझिम पावसाने हजेरी लावली, परंतु पावसाच्या सरी कोसळत असतानाही भाविकांचा उत्साह किंचितही कमी झाला नाही. "या खुदा"च्या जयघोषात भाविकांनी पावसातही मिरवणूक अखेरपर्यंत उत्साहाने पूर्ण केली. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, अत्यंत धार्मिक सलोखा आणि शांततेच्या वातावरणात ही भव्य संदल मिरवणूक उत्साहात पार पडली.
    3
    हजरत ख्वाजा शेख बुरहानोद्दीन गरीब (रह.) यांच्या 710 व्या उरूसानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद शहरातील दर्गा हजरत बाविस ख्वाजा (रह.) येथून पारंपरिक व धार्मिक उत्साहात भव्य संदल मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवत धार्मिक वातावरणाचा अनुभव घेतला. उरूसानिमित्त शहरात सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

मिरवणुकीदरम्यान कव्वाली आणि बँडच्या गजराने संपूर्ण शहर भक्तिमय झाले होते. जिल्हाभरातील विविध भागांतून आलेल्या भाविकांनी दर्ग्यावर चादर व अकीदत अर्पण करून दुआ मागितली. संदल मिरवणुकीदरम्यान रिमझिम पावसाने हजेरी लावली, परंतु पावसाच्या सरी कोसळत असतानाही भाविकांचा उत्साह किंचितही कमी झाला नाही. "या खुदा"च्या जयघोषात भाविकांनी पावसातही मिरवणूक अखेरपर्यंत उत्साहाने पूर्ण केली.

भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, अत्यंत धार्मिक सलोखा आणि शांततेच्या वातावरणात ही भव्य संदल मिरवणूक उत्साहात पार पडली.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    31 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.