हिंगोली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांची लातूरला बदली कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर येथे गौरव सोहळा संपन्न तोंडापूर (प्रतिनिधी): भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) आणि संत नामदेव सेवाभावी संस्था संचलित कृषि विज्ञान केंद्र (KVK), तोंडापूर येथे हिंगोलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. राजेंद्र कदम यांच्या बदलीनिमित्त निरोप समारंभ अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात पार पडला. प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन: कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत नामदेव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार ॲड. शिवाजीराव माने होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी श्री. कदम यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, "राजेंद्र कदम यांनी आपल्या कार्यकाळात शेतकरी हिताच्या योजनांची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी केली. त्यांच्या नियोजनामुळे जिल्ह्यात कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल पाहायला मिळाले." समन्वयाची भूमिका: केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. कदम यांच्या सहकार्यामुळे तंत्रज्ञान प्रसाराला जिल्ह्यात मोठी गती मिळाली, असे त्यांनी नमूद केले. यावेळी उगम ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष श्री. जयाजी पाईकराव यांनीही कदम यांच्या ग्रामीण भागातील कार्याचे कौतुक केले. अधिकारी व तज्ज्ञांच्या भावना: कार्यक्रमात विषय विशेषज्ञ श्री. राजेश भालेराव, श्री. साईनाथ खरात यांनी श्री. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या कृषी प्रात्यक्षिके, मोहिमा आणि मृदा आरोग्य अभियानातील अनुभवांना उजाळा दिला. कृतज्ञता व्यक्त: सत्काराला उत्तर देताना श्री. राजेंद्र कदम भावूक झाले. "हिंगोली जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच मी ही जबाबदारी पार पाडू शकलो. शेतकरी विकासासाठी सर्वांनी यापुढेही एकात्मिक प्रयत्न करावेत," असे आवाहन त्यांनी केले. आयोजन आणि आभार: या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केव्हीकेच्या सर्व विषय तज्ज्ञांनी (अनिल ओळंबे, अजय कुमार सुगावे, सौ. रोहिणी शिंदे, डॉ. अतुल मुराई) तसेच कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अतुल मुराई यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. विजय ठाकरे यांनी मानले.
हिंगोली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांची लातूरला बदली कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर येथे गौरव सोहळा संपन्न तोंडापूर (प्रतिनिधी): भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) आणि संत नामदेव सेवाभावी संस्था संचलित कृषि विज्ञान केंद्र (KVK), तोंडापूर येथे हिंगोलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. राजेंद्र कदम यांच्या बदलीनिमित्त निरोप समारंभ अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात पार पडला. प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन: कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत नामदेव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार ॲड. शिवाजीराव माने होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी श्री. कदम यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, "राजेंद्र कदम यांनी आपल्या कार्यकाळात शेतकरी हिताच्या योजनांची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी केली. त्यांच्या नियोजनामुळे जिल्ह्यात कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल पाहायला मिळाले." समन्वयाची भूमिका: केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. कदम यांच्या सहकार्यामुळे तंत्रज्ञान प्रसाराला जिल्ह्यात मोठी गती मिळाली, असे त्यांनी नमूद केले. यावेळी उगम ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष श्री. जयाजी पाईकराव यांनीही कदम यांच्या ग्रामीण भागातील कार्याचे कौतुक केले. अधिकारी व तज्ज्ञांच्या भावना: कार्यक्रमात विषय विशेषज्ञ श्री. राजेश भालेराव, श्री. साईनाथ खरात यांनी श्री. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या कृषी प्रात्यक्षिके, मोहिमा आणि मृदा आरोग्य अभियानातील अनुभवांना उजाळा दिला. कृतज्ञता व्यक्त: सत्काराला उत्तर देताना श्री. राजेंद्र कदम भावूक झाले. "हिंगोली जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच मी ही जबाबदारी पार पाडू शकलो. शेतकरी विकासासाठी सर्वांनी यापुढेही एकात्मिक प्रयत्न करावेत," असे आवाहन त्यांनी केले. आयोजन आणि आभार: या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केव्हीकेच्या सर्व विषय तज्ज्ञांनी (अनिल ओळंबे, अजय कुमार सुगावे, सौ. रोहिणी शिंदे, डॉ. अतुल मुराई) तसेच कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अतुल मुराई यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. विजय ठाकरे यांनी मानले.
- ऊस मजुराचा मुलगा मंगेश ढेपे झाला सी.ए. लातूर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील केवळ शे दीडशे लोकवस्तीच्या छोट्याशा 'आनंदवाडी' या गावाने अभिमानाने मान उंचावली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, एका ऊस मजुराच्या मुलाने, मंगेश व्यंकटराव ढेपे याने सी.ए. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. मंगेशच्या या यशाने संपूर्ण तालुक्यात त्याचे कौतुक होत असून गावात एखाद्या उत्सवा सारखा आनंद साजरा केला जात आहे. मजुरी करून वडिलांनी लेकाला शिकवलं मंगेशची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील व्यंकटराव ढेपे हे अल्पशिक्षित असून कोरडवाहू शेती आणि ऊसाच्या गुऱ्हाळावर मजुरी करून संसाराचा गाडा ओढतात. आई दुग्धव्यवसाय करून घरखर्चाला हातभार लावते. मंगेशने त्याचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केले, तर माध्यमिक शिक्षणासाठी त्याला दररोज ५ ते ६ किलोमीटरची पायपीट करावी लागली.लातूरच्या दयानंद कॉलेजमधून बी.कॉम पूर्ण केल्यानंतर, २०१५ मध्ये त्याने पुणे गाठले. अडीच हजारांच्या नोकरीपासून सी.ए. पर्यंतचा प्रवास सी.ए. चा अभ्यासक्रम अत्यंत खर्चिक आणि कठीण असताना मंगेश डगमगला नाही. पुण्यात सुरुवातीला त्याने अवघ्या अडीच हजार रुपये पगारावर खासगी नोकरी करत स्वतःच्या खर्चाला जोड दिली. वडिलांनी रात्रंदिवस कष्ट करून मंगेशच्या शिक्षणाची ओढ कायम ठेवली. २०१६ पासून सुरू झालेला हा खडतर प्रवास अखेर यशात परावर्तित झाला. मंगेशच्या या यशाने पूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. एखादा सण साजरा करावा त्या पद्धतीने गावकरी आनंद उत्सव साजरा करत आहेत. मंगेश ढेपे यांच्यावर अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव होतो आहे. मंगेश ढेपे यांचे आवाहन तरुणांनो जिद्द ठेवा, मी मदतीला तयार! "माझ्या यशाचे पूर्ण श्रेय माझ्या वडिलांच्या कष्टाला आहे. ग्रामीण भागातील तरुण पिढीने व्यसनांच्या आहारी न जाता मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. मनात जिद्द असेल तर यश नक्की मिळते. कोणत्याही गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मार्गदर्शनाची गरज असल्यास मी मदतीसाठी सदैव तत्पर असेन." — मंगेश ढेपे,1
- लातूर -लातूर मध्ये पुरणमल लाहोटी वस्तीगृहासमोरील किरकोळ वादातून तरुणाचा खून –चार आरोपींना तात्काळ अटक; न्यायालयाकडून पी.सी.आर.मंजूर शहर Dysp समीरसिंह साळवे याची पत्रकार परिषदेत माहिती2
- औसा रोड वरील खुनाच्या वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकाराला पोलिसांकडून आरोग्य भाषेत अपमान कारक वागणूक. लातूर आतील समस्त पत्रकार बांधवांकडून त्या मुजोर पोलीस अधिकाऱ्याचा जाहीर निषेध.1
- *शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्येला पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश* २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले शहीद संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला आज मोठा दिलासा मिळाला आहे. जगदाळे कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचे छत्र हरपल्याने निर्माण झालेल्या संकटाच्या काळात, त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवेत सामावून घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, त्यांना नियुक्ती देण्याचे आदेश निर्गमित होत आहेत. शहीद संतोष जगदाळे यांच्या निधनानंतर जगदाळे कुटुंब उघड्यावर पडले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २५ मे २०२५ रोजी जगदाळे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली होती. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आणि व्यथा जाणून घेतल्यानंतर, डॉ. गोऱ्हे यांनी २७ मे २०२५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांना पत्र लिहून आसावरी जगदाळे यांना विशेष बाब म्हणून शासकीय सेवेत सामावून घेण्याची विनंती केली होती. डॉ. गोऱ्हे यांच्या पत्राच्या अनुषंगाने १९ जून २०२५ रोजी नगरविकास विभागाने पुणे महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या प्रक्रियेत अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणींमुळे नियुक्ती लांबणीवर पडत असताना डॉ. गोऱ्हे यांनी खचून न जाता सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेतल्या आणि सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण केला. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी या प्रकरणात संवेदनशीलतेने लक्ष घातले. तांत्रिक अडचणी असूनही एका शहीद कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका त्यांनी घेतली. डॉ. गोऱ्हे यांच्या सततच्या पाठपुराव्याला आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या सकारात्मक निर्णयाला आज यश आले असून आसावरी यांना नोकरी प्राप्त होत आहे. "संतोष जगदाळे यांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांचे जाणे ही न भरून निघणारी हानी आहे. त्यांच्या बलिदानाची परतफेड आपण करू शकत नाही, मात्र त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणे ही आपली संस्कृती नाही. आसावरीला नोकरी मिळवून देण्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे थोडा विलंब झाला, त्याबद्दल आम्ही जगदाळे कुटुंबाच्या भावनेशी सहमत आहोत. मात्र, आज तिला नियुक्ती मिळत असल्याचा समाधान आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ते केवळ राज्याचे प्रमुख नसून खऱ्या अर्थाने 'लाडक्या बहिणीचे राखणदार' आहेत." या निर्णयामुळे जगदाळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभणार असून, एका वीरपुत्राच्या बलिदानाचा सन्मान शासनाकडून करण्यात आला आहे.1
- Post by EKMAT DIGITAL1
- मुखेड तालुक्यातील जाहूर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर जाहूर येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात मंगळवारी दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य कुस्त्यांच्या हंगाव्याचे आयोजन करण्यात आले होते दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या या जंगी कुस्त्यांमध्ये महाराष्ट्रभरातील नामांकित पैलवानांनी आपला इंगा दाखवला यावेळी माजी आमदार अविनाशजी घाटे यांच्या हस्ते ११,००० रुपये इनामाची मानाची कुस्ती लावण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रंजीतजी घाटे गोविंदराव पाटील रमाकांत पाटील हिवराळ कृष्णा पाटील ज्ञानेश्वर गोणगोपले देविदास पाटील बोडके मारोती पाटील वडजे उंद्रीकर परमेश्वर पाटील बोडके छत्रु पाटील बोडके यांची उपस्थिती होती7
- Post by Today One Live1
- लातुरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणा - भाजपाची निवेदनाद्वारे मागणी लातूर (एल पी उगीले) : लातूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्याच्या हत्त्येची घटना घडली आहे. या घटनेमुळे पालक, विद्यार्थी यांच्यासह नागरिकांमध्ये असुरक्षितते ची भावना निर्माण झाली आहे. याची दखल घेत लातूर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने लातुरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणून नागरिकां मध्ये विश्वास निर्माण करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे लातूर जिल्हा पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांच्याकडे करण्यात आली आहे. लातूर शहरात सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्याची दुर्देवी हत्या करण्यात आली आहे. ही घटना अतिशय गंभीर व संतापजनक आहे. गेल्या काही महिन्यापासून लातूर शहरात अनेक गुन्हेगारी घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. याची दखल घेवून लातूर शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वात भाजपाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन दिले आहे.या निवेदनाच्या माध्यमातून विद्यार्थी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कलमानुसार गुन्हे दाखल करावेत, या गुन्ह्याचा तपास जलदगतीने व पारदर्शक करून दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करावा, शहरातील संवेदनशिल भागांमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवून नियमित गस्त व प्रतिबंधक कारवाई करावी, गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी कोंबिग ऑपरेशन, शस्त्र तपासणी व संशयितांवर देखरेख वाढवावी. नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी कारवाईची अधिकृत माहिती वेळोवेळी जाहीर करावी, व गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन, शाळा, महाविद्यालय, पालक व सामाजिक संस्थांच्या सहभागातून जनजागृती व प्रतिबंधात्मक मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन देताना मनपाचे गटनेते अॅड. दीपक मठपती, माजी शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक देविदास काळे, जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक प्रविण कस्तुरे, नगरसेविका रागिणी यादव, मंडलाध्यक्ष सचिन सुरवसे, संतोष पांचाळ, संतोष तिवारी, मंदार कुलकर्णी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. गुन्हेगारीवर आळा बसवा तसेच अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र या सदर्भात पोलीस प्रशासनाकडून फक्त थातूरमातूर कारवाई केली जाते, असे चित्र दिसत आहेत. सत्ता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या हातात असताना आणि विशेषतः गृहमंत्रालय मुख्यमंत्र्याकडे असताना भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था राखा अशा पद्धतीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देणे म्हणजे आपले सरकार किती हतबल आहे. हे दाखवून दिल्यासारखे आहे.2