logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूरच्या रितेश देशमुख यांनी जनतेला केली विनंती. सोशल मीडियावर राजा शिवाजीचे व्हिडिओ अपलोड करू नका. लातूरच्या रितेश देशमुख यांनी जनतेला केली विनंती. सोशल मीडियावर राजा शिवाजीचे व्हिडिओ अपलोड करू नका. सुरू एप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 2 मे 2026. रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी हा मराठी चित्रपट सोमवार दिनांक 1 मे 2026 रोजी प्रदर्शित झाला असून हा चित्रपट मोठी गर्दी खेचत आहे. चित्रपट कलावंत, दिग्दर्शक रितेश देशमुख यांनी महाराष्ट्रातील जनतेला बोलताना विनंती केली की, हा चित्रपट प्रेक्षकांनी पाहायला गेल्यास रील शेअर करू शकता परंतु हा चित्रपट आपण सोशल मीडियावर टाकण्याचा प्रयत्न करू नका कारण जनतेला थिएटरमध्ये येऊन पिक्चर पाहण्याचा आनंद घेऊ द्या प्रेक्षकांनी प्रतिसाद चांगल्या दिल्याबद्दल धन्यवाद मानले व व्हिडिओ शेअर करू नका विनंती केली.

1 day ago
user_Nitin Chalak
Nitin Chalak
Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
1 day ago

लातूरच्या रितेश देशमुख यांनी जनतेला केली विनंती. सोशल मीडियावर राजा शिवाजीचे व्हिडिओ अपलोड करू नका. लातूरच्या रितेश देशमुख यांनी जनतेला केली विनंती. सोशल मीडियावर राजा शिवाजीचे व्हिडिओ अपलोड करू नका. सुरू एप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 2 मे 2026. रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी हा मराठी चित्रपट सोमवार दिनांक 1 मे 2026 रोजी प्रदर्शित झाला असून हा चित्रपट मोठी गर्दी खेचत आहे. चित्रपट कलावंत, दिग्दर्शक रितेश देशमुख यांनी महाराष्ट्रातील जनतेला बोलताना विनंती केली की, हा चित्रपट प्रेक्षकांनी पाहायला गेल्यास रील शेअर करू शकता परंतु हा चित्रपट आपण सोशल मीडियावर टाकण्याचा प्रयत्न करू नका कारण जनतेला थिएटरमध्ये येऊन पिक्चर पाहण्याचा आनंद घेऊ द्या प्रेक्षकांनी प्रतिसाद चांगल्या दिल्याबद्दल धन्यवाद मानले व व्हिडिओ शेअर करू नका विनंती केली.

  • user_User4301
    User4301
    Sakoli, Bhandara
    😤
    8 hrs ago
  • user_User10301
    User10301
    Bhandara, Maharashtra
    🙏
    11 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. चोरी करणाऱ्या सराईत आंतरजिल्हा आरोपींना अटक. सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल जप्त. सुरू ॲप इन मराठी न्यूज. रविवार दिनांक 3 मे 2026. लातूर जिल्ह्यातील मालमत्ता विषयक गुन्ह्यांवर प्रभावी आळा घालण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या अचूक नियोजन व धाडसी कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक करून विविध पोलीस ठाण्यांतील चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे. दि. 30 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालमत्ता विषयक गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी त्यांनी चोरी केलेले दागिने विक्री करण्याचा प्रयत्न करीत असताना कळंब रोड रेल्वे गेटजवळ हरंगुळ-वरवंटी शिवरस्त्यावर 11.00 वाजता सापळा लावून दोन आरोपींना काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलसह ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत – 1. सुमीत दगडू गरगेवाड (वय 27 वर्षे, रा. मळवटी रोड, लातूर) 2. आकाश ऊर्फ भावड्या बाबुराव कांबळे (वय 26 वर्षे, रा. सिद्धेश्वर नगर, लातूर) झडती घेतली असता आरोपींकडून 15 ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम, लोखंडी टामी तसेच गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल (क्र. MH-37 AC-4718) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपींनी सदर मुद्देमाल चोरीचा असल्याची कबुली दिली असून, मोटारसायकल पुणे येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपासात आरोपींनी लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी, अहमदपूर व शिवाजीनगर येथील प्रत्येकी एक गुन्हा असे एकूण तीन गुन्हे, तर बाहेर जिल्ह्यातील चाकण (पुणे), राहुरी (अहिल्यानगर), आंबेजोगाई शहर (बीड) येथील तीन गुन्हे असे एकूण 06 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सदर कारवाईमुळे पो.स्टे. एमआयडीसी, लातूर गु.र.नं. 187/2026 सह इतर अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला असून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह आरोपींना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलीस ठाणे एमआयडीसी यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांचे निर्देशन व अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पो.उपनि. राजेश घाडगे,सपोउपनि. सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार युवराज गिरी, राजेश कंचे,प्रदीप स्वामी,मोहन सुरवसे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, प्रदीप चोपणे यांनी केली आहे. लातूर जिल्हा पोलीस नागरिकांना आवाहन करीत आहेत की, कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. नागरिकांच्या सहकार्यामुळेच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
    2
    स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 
चोरी करणाऱ्या सराईत आंतरजिल्हा आरोपींना अटक.
सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल जप्त.
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
रविवार दिनांक 3 मे 2026. 
लातूर जिल्ह्यातील मालमत्ता विषयक गुन्ह्यांवर प्रभावी आळा घालण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या अचूक नियोजन व धाडसी कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक करून विविध पोलीस ठाण्यांतील चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे.
दि. 30 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालमत्ता विषयक गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी त्यांनी चोरी केलेले दागिने विक्री करण्याचा प्रयत्न करीत असताना कळंब रोड रेल्वे गेटजवळ हरंगुळ-वरवंटी शिवरस्त्यावर 11.00 वाजता सापळा लावून दोन आरोपींना काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलसह ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
1. सुमीत दगडू गरगेवाड (वय 27 वर्षे, रा. मळवटी रोड, लातूर)
2. आकाश ऊर्फ भावड्या बाबुराव कांबळे (वय 26 वर्षे, रा. सिद्धेश्वर नगर, लातूर)
झडती घेतली असता आरोपींकडून 15 ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम, लोखंडी टामी तसेच गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल (क्र. MH-37 AC-4718) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपींनी सदर मुद्देमाल चोरीचा असल्याची कबुली दिली असून, मोटारसायकल पुणे येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपासात आरोपींनी  लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी, अहमदपूर व शिवाजीनगर येथील प्रत्येकी एक गुन्हा असे एकूण तीन गुन्हे, तर बाहेर जिल्ह्यातील चाकण (पुणे), राहुरी (अहिल्यानगर), आंबेजोगाई शहर (बीड) येथील तीन गुन्हे असे एकूण 06 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. 
सदर कारवाईमुळे पो.स्टे. एमआयडीसी, लातूर गु.र.नं. 187/2026 सह इतर अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला असून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह आरोपींना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलीस ठाणे एमआयडीसी यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत. 
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांचे निर्देशन व अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पो.उपनि. राजेश घाडगे,सपोउपनि. सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार युवराज गिरी, राजेश कंचे,प्रदीप स्वामी,मोहन सुरवसे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, प्रदीप चोपणे यांनी केली आहे.
लातूर जिल्हा पोलीस नागरिकांना आवाहन करीत आहेत की, कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. नागरिकांच्या सहकार्यामुळेच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • . “तुझ्या मुलीवर असा अत्याचार झाला असता तर तू असाच लाठीचार्ज केला असतास का?” आरे मार रे....मार पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेली ही संतापजनक घटना संपूर्ण महाराष्ट्राच्या मनाला चिरून जाणारी ठरली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच जनतेत प्रचंड संताप उसळला आहे. ही घटना केवळ गुन्हा नाही, तर माणुसकीलाच काळिमा फासणारी क्रूरता असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. “अशा नराधमांना तात्काळ फाशी द्या” अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने परिस्थिती आणखी चिघळली. संतप्त नागरिकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. “तुझ्या मुलीवर असा अत्याचार झाला असता तर तू असाच लाठीचार्ज केला असतास का?” असा थेट सवाल पोलिसांना विचारत आंदोलकांनी संताप व्यक्त केला. या घटनेनंतर पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलांच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन किती गंभीर आहे, यावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर समाजाच्या विवेकबुद्धीला जागं करणारा इशारा आहे. आता तरी कठोर कायदे आणि जलद न्यायव्यवस्था राबवली नाही, तर अशा घटनांची पुनरावृत्ती थांबवणे कठीण होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. #नसरापूर_न्याय_मिळाला_पाहिजे #चिमुकलीसाठी_न्याय #महाराष्ट्र_संतापला #बलात्कार्यांना_फाशी #महिला_सुरक्षा_कुठे #न्याय_द्या #आक्रोश #StopCrimesAgainstChildren #JusticeForMinor #HangTheRapists #SaveOurChildren #MaharashtraShocked #WeWantJustice #ChildSafetyMatters #EndRapeCulture
    1
    . “तुझ्या मुलीवर असा अत्याचार झाला असता तर तू असाच लाठीचार्ज केला असतास का?”
आरे मार रे....मार
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेली ही संतापजनक घटना संपूर्ण महाराष्ट्राच्या मनाला चिरून जाणारी ठरली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच जनतेत प्रचंड संताप उसळला आहे.
ही घटना केवळ गुन्हा नाही, तर माणुसकीलाच काळिमा फासणारी क्रूरता असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. “अशा नराधमांना तात्काळ फाशी द्या” अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने परिस्थिती आणखी चिघळली. संतप्त नागरिकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. “तुझ्या मुलीवर असा अत्याचार झाला असता तर तू असाच लाठीचार्ज केला असतास का?” असा थेट सवाल पोलिसांना विचारत आंदोलकांनी संताप व्यक्त केला.
या घटनेनंतर पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलांच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन किती गंभीर आहे, यावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर समाजाच्या विवेकबुद्धीला जागं करणारा इशारा आहे. आता तरी कठोर कायदे आणि जलद न्यायव्यवस्था राबवली नाही, तर अशा घटनांची पुनरावृत्ती थांबवणे कठीण होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. #नसरापूर_न्याय_मिळाला_पाहिजे
#चिमुकलीसाठी_न्याय
#महाराष्ट्र_संतापला
#बलात्कार्यांना_फाशी
#महिला_सुरक्षा_कुठे
#न्याय_द्या
#आक्रोश
#StopCrimesAgainstChildren
#JusticeForMinor
#HangTheRapists
#SaveOurChildren
#MaharashtraShocked
#WeWantJustice
#ChildSafetyMatters
#EndRapeCulture
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    12 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • चोरी करणाऱ्या सराईत आंतरजिल्हा आरोपींना अटक; सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त. लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यातील मालमत्ता विषयक गुन्ह्यांवर प्रभावी आळा घालण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या अचूक नियोजन व धाडसी कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक करून विविध पोलीस ठाण्यांतील चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे. दि. 30 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालमत्ता विषयक गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी त्यांनी चोरी केलेले दागिने विक्री करण्याचा प्रयत्न करीत असताना कळंब रोड रेल्वे गेटजवळ हरंगुळ-वरवंटी शिवरस्त्यावर 11.00 वाजता सापळा लावून दोन आरोपींना काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलसह ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत,सुमीत दगडू गरगेवाड (वय 27 वर्षे, रा. मळवटी रोड, लातूर),आकाश ऊर्फ भावड्या बाबुराव कांबळे (वय 26 वर्षे, रा. सिद्धेश्वर नगर, लातूर) त्यांची झडती घेतली असता आरोपीं कडून 15 ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम, लोखंडी टामी तसेच गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल (क्र. MH-37 AC-4718) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान आरोपींनी सदर मुद्देमाल चोरीचा असल्याची कबुली दिली असून, मोटारसायकल पुणे येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपासात आरोपींनी लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी, अहमदपूर व शिवाजीनगर येथील प्रत्येकी एक गुन्हा असे एकूण तीन गुन्हे, तर बाहेर जिल्ह्यातील चाकण (पुणे), राहुरी (अहिल्यानगर), आंबेजोगाई शहर (बीड) येथील तीन गुन्हे असे एकूण 6 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सदर कारवाईमुळे पो.स्टे. एमआयडीसी, लातूर गु.र.नं. 187/26 सह इतर अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला असून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह आरोपींना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलीस ठाणे एमआयडीसी यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशन व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पो.उपनि. राजेश घाडगे, सपोउपनि. सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार युवराज गिरी, राजेश कंचे,प्रदीप स्वामी,मोहन सुरवसे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, प्रदीप चोपणे यांनी केली आहे. लातूर जिल्हा पोलीस नागरिकांना आवाहन करीत आहेत की, कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. नागरिकांच्या सहकार्यामुळेच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
    2
    चोरी करणाऱ्या सराईत आंतरजिल्हा आरोपींना अटक; सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त.
लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यातील मालमत्ता विषयक गुन्ह्यांवर प्रभावी आळा घालण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या अचूक नियोजन व धाडसी कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक करून विविध पोलीस ठाण्यांतील चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे.
दि. 30 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालमत्ता विषयक गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी त्यांनी चोरी केलेले दागिने विक्री करण्याचा प्रयत्न करीत असताना कळंब रोड रेल्वे गेटजवळ हरंगुळ-वरवंटी शिवरस्त्यावर 11.00 वाजता सापळा लावून दोन आरोपींना काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलसह ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत,सुमीत दगडू गरगेवाड (वय 27 वर्षे, रा. मळवटी रोड, लातूर),आकाश ऊर्फ भावड्या बाबुराव कांबळे (वय 26 वर्षे, रा. सिद्धेश्वर नगर, लातूर) त्यांची झडती घेतली असता आरोपीं कडून 15 ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम, लोखंडी टामी तसेच गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल (क्र. MH-37 AC-4718) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान आरोपींनी सदर मुद्देमाल चोरीचा असल्याची कबुली दिली असून, मोटारसायकल पुणे येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपासात आरोपींनी  लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी, अहमदपूर व शिवाजीनगर येथील प्रत्येकी एक गुन्हा असे एकूण तीन गुन्हे, तर बाहेर जिल्ह्यातील चाकण (पुणे), राहुरी (अहिल्यानगर), आंबेजोगाई शहर (बीड) येथील तीन गुन्हे असे एकूण 6 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. 
सदर कारवाईमुळे पो.स्टे. एमआयडीसी, लातूर गु.र.नं. 187/26 सह इतर अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला असून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह आरोपींना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलीस ठाणे एमआयडीसी यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत. 
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशन व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पो.उपनि. राजेश घाडगे, सपोउपनि. सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार युवराज गिरी, राजेश कंचे,प्रदीप स्वामी,मोहन सुरवसे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, प्रदीप चोपणे यांनी केली आहे. लातूर जिल्हा पोलीस नागरिकांना आवाहन करीत आहेत की, कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. नागरिकांच्या सहकार्यामुळेच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • चाकूर तालुक्यातील जगळपूर येथे अचानक जनावरांच्या गोठ्यात आग लागून त्र्यंबक डिगोळे यांचा जनावरांचा गोठा व ठेवलेले जनावराचे गुळी व कृषी साहित्य जळून खाक झाले आहे ही घटना 11:00 वाजता घडली आहे
    1
    चाकूर तालुक्यातील जगळपूर येथे अचानक जनावरांच्या गोठ्यात आग लागून त्र्यंबक डिगोळे यांचा जनावरांचा गोठा व ठेवलेले जनावराचे गुळी व कृषी साहित्य जळून खाक झाले आहे ही घटना 11:00 वाजता घडली आहे
    user_Janta police taims
    Janta police taims
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Rahul dhabale
    1
    Post by Rahul dhabale
    user_Rahul dhabale
    Rahul dhabale
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • मुखेड तालुक्यातील दापका राजा ग्रामपंचायतला टाळे — सरपंच व ग्रामसेवक ग्रामस्थांचा संताप उसळला! दापका राजा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणाला आता नाट्यमय वळण मिळाले असून, आजच्या तारखेला ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे असल्याची बाब समोर आली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही स्थानिक ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. ग्रामस्थांनी लेखी स्वरूपात आपल्या सह्या देत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, सरपंच व ग्रामसेवक यांनी विकासकामांच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार (घोटाळा) केला असून, गावाच्या विकासासाठी मंजूर झालेला निधी योग्य ठिकाणी वापरण्यात आलेला नाही. गावकऱ्यांनी ठामपणे सांगितले की, 👉 “आमच्या गावाच्या विकासाची पूर्णपणे दयना झाली आहे.” 👉 “रस्ते, पाणी, मूलभूत सुविधा यांचा पूर्ण अभाव आहे.” 👉 “संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.” ग्रामस्थांनी दिलेल्या लेखी निवेदनात प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, इतका मोठा प्रकार घडूनही अद्याप ठोस कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लागल्याने अनेक शासकीय कामे ठप्प झाली आहेत, ज्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.
    1
    मुखेड तालुक्यातील दापका राजा ग्रामपंचायतला टाळे — सरपंच व ग्रामसेवक  ग्रामस्थांचा संताप उसळला!
दापका राजा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणाला आता नाट्यमय वळण मिळाले असून, आजच्या तारखेला ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे असल्याची बाब समोर आली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आम्ही स्थानिक ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. ग्रामस्थांनी लेखी स्वरूपात आपल्या सह्या देत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, सरपंच व ग्रामसेवक यांनी विकासकामांच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार (घोटाळा) केला असून, गावाच्या विकासासाठी मंजूर झालेला निधी योग्य ठिकाणी वापरण्यात आलेला नाही.
गावकऱ्यांनी ठामपणे सांगितले की,
👉 “आमच्या गावाच्या विकासाची पूर्णपणे दयना झाली आहे.”
👉 “रस्ते, पाणी, मूलभूत सुविधा यांचा पूर्ण अभाव आहे.”
👉 “संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.”
ग्रामस्थांनी दिलेल्या लेखी निवेदनात प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, इतका मोठा प्रकार घडूनही अद्याप ठोस कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लागल्याने अनेक शासकीय कामे ठप्प झाली आहेत, ज्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • नीट परीक्षा केंद्रावर विद्यार्थी व पालकांचे बेहाल बारावी बोर्डात विद्यार्थ्यांचा घसरता निकाल. कडक उन्हामुळे पालकांनी घेतला वृक्षचा अश्रय. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. रविवार दिनांक 3 मे 2026. लातूर शहरात नीट (NEET) परीक्षेच्या काळात कडाक्याच्या उन्हामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाल्याचे समोर आले आहे. मे महिन्याच्या भीषण उकाड्यात, दुपारच्या सत्रात परीक्षा केंद्रावर पोहोचताना आणि परीक्षा देताना विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांचा सोबत आलेल्या पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आज रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी लातूर शहरातील विविध परीक्षा केंद्रावर नीट परीक्षेला आलेल्या विद्यार्थी व पालकांत पाहायला दिसून येत होते. आज लातूर शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर नीट परीक्षांचे अयोजन करण्यात आले होते. नीट ( NEET )परीक्षा केंद्रावर परीक्षा प्रत्यक्ष दुपारी 2 pm वाजता सुरू होणार होती पण विद्यार्थ्यांना सकाळी परीक्षा केंद्रावर 11 : 00 वाजता प्रवेश दिला जाणार असल्याने विद्यार्थ्यां सोबत लातूर शहरासह बाहेर गावच्या पालकांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाकडून परीक्षा केंद्र परिसरात विद्यार्थी व पालकांना थांबण्याकरिता उन्हाच्या झळा लागू नये म्हणून सावलीची व पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात बेहाल झाले असल्याचे चित्र पहायला दिसून येत होते. पालकांनी वृक्षांच्या सावलीचा सहारा घेत गर्दी केली होती. शिवाय पोलीस यंत्रणेकडून परिक्षा केंद्र परिसरातील दुकाने व थंड पेयाचे गाडे सक्तीने बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यां सोबत आलेल्या पालकांचे उन्हाच्या झळा लागून बेहाल झाले असल्याचे प्रत्यक्ष चित्र पाहायला दिसत होते. यात उन्हाच्या तीव्रतेच्या उष्माघाताच्या आजाराने बळी गेल्यास याची जबाबदारी प्रभारी जिल्हाधिकारी राहुल कुमार मीना घेणार का? मोठी शोकांतिका की, शहरातील विविध विद्यार्थी संघटना, पक्ष, विविध क्लासेस, सेवाभावी संस्था यांच्याकडून कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आल्याचे चीत्र दिसून आले नाही हाच का लातूर पॅटर्न? यामुळेच की काय? नावाला प्रवेश घेऊन नीट (NEET) सीईटी पूर्व परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा घसरता निकाल दिसून येतो आहे.
    1
    नीट परीक्षा केंद्रावर विद्यार्थी व पालकांचे बेहाल बारावी बोर्डात विद्यार्थ्यांचा घसरता निकाल.
कडक उन्हामुळे पालकांनी घेतला वृक्षचा अश्रय.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
रविवार दिनांक 3 मे 2026.
लातूर शहरात नीट (NEET) परीक्षेच्या काळात कडाक्याच्या उन्हामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाल्याचे समोर आले आहे. मे महिन्याच्या भीषण उकाड्यात, दुपारच्या सत्रात परीक्षा केंद्रावर पोहोचताना आणि परीक्षा देताना विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांचा सोबत आलेल्या पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
आज रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी लातूर शहरातील विविध परीक्षा केंद्रावर नीट परीक्षेला आलेल्या विद्यार्थी व पालकांत पाहायला दिसून येत होते.
आज लातूर शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर नीट परीक्षांचे अयोजन करण्यात आले होते.
नीट ( NEET )परीक्षा केंद्रावर परीक्षा प्रत्यक्ष दुपारी 2 pm वाजता सुरू होणार होती पण विद्यार्थ्यांना सकाळी परीक्षा केंद्रावर 11 : 00 वाजता प्रवेश दिला जाणार असल्याने विद्यार्थ्यां सोबत लातूर शहरासह बाहेर गावच्या पालकांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाकडून परीक्षा केंद्र परिसरात विद्यार्थी व पालकांना थांबण्याकरिता उन्हाच्या झळा लागू नये म्हणून सावलीची व  पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात बेहाल झाले असल्याचे चित्र पहायला दिसून येत होते. पालकांनी वृक्षांच्या सावलीचा सहारा घेत गर्दी केली होती. शिवाय पोलीस यंत्रणेकडून परिक्षा केंद्र परिसरातील दुकाने व थंड पेयाचे गाडे सक्तीने बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यां सोबत आलेल्या पालकांचे उन्हाच्या झळा लागून बेहाल झाले असल्याचे प्रत्यक्ष चित्र पाहायला दिसत होते. यात उन्हाच्या तीव्रतेच्या उष्माघाताच्या आजाराने बळी गेल्यास याची जबाबदारी प्रभारी जिल्हाधिकारी राहुल कुमार मीना घेणार का? मोठी शोकांतिका की, शहरातील विविध विद्यार्थी संघटना, पक्ष, विविध क्लासेस, सेवाभावी संस्था यांच्याकडून कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आल्याचे चीत्र दिसून आले नाही हाच का लातूर पॅटर्न? यामुळेच की काय? नावाला प्रवेश घेऊन नीट (NEET) सीईटी पूर्व परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा घसरता निकाल दिसून येतो आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.