यशवंत ग्रामपंचायत लवारी येथे शुद्ध पाण्यासाठी आरो प्लँटचे लोकार्पण * डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साकोली भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून यशवंत ग्रामपंचायत लवारी येथे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मंजूर झालेल्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वपूर्ण असलेल्या पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी आरो प्लँटचे लोकार्पण दि.१४ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आले. यात पिण्याचे साधे, थंड व गरम असे पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येईल. विशेष बाब म्हणजे गरम पाणी नागरिकांना मोफत मिळेल. तसेच १ एप्रिल ते ३० एप्रिल या दरम्यान संपूर्ण घर व पाणीपट्टी कराचा भरणा करणार्या नागरिकांना दररोज २० लिटर पाणी मोफत देण्यात येईल व याच दरम्यान कर भरणार्या नागरिकांंपैकी ईश्वरचिठ्ठीद्वारे भाग्यवान करदात्याला १५ आॅगष्ट रोजी ध्वजारोहणाचा अधिकार मिळेल अशी माहिती देखील सरपंच नरेश नगरीकर यांनी दिली. आरोच्या लोकार्पणप्रसंगी पं.स.सदस्य अनिल किरणापूरे, सरपंच नरेश नगरीकर, उपसरपंच हरिश नगरीकर, ग्रा.पं.अधिकारी होमेश्वर लंजे, पो.पा. विनोद किरणापूरे, तं.मु.स.अध्यक्ष खेमराज टेंभूर्णे, ग्रा.पं. सदस्य चंद्रशेखर कापगते, प्रदीपकुमार टेंभूर्णे, भोजराम निखारे, नाजूक वाघाडे, अर्चना वाळवे, ज्ञानेश्वरी नगरीकर, संगीता किरणापूरे, रेश्मा कटंकार, तृप्ती गहाणे, करिश्मा लांजेवार, तं. मु.स.सदस्य गजानन किरणापुरे, निलकंठ कापगते, घनश्याम टेंभूर्णे, शितल कापगते, पुष्पा कापगते, भोजराम निखारे व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. 
यशवंत ग्रामपंचायत लवारी येथे शुद्ध पाण्यासाठी आरो प्लँटचे लोकार्पण * डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साकोली भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून यशवंत ग्रामपंचायत लवारी येथे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मंजूर झालेल्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वपूर्ण असलेल्या पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी आरो प्लँटचे लोकार्पण दि.१४ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आले. यात पिण्याचे साधे, थंड व गरम असे पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येईल. विशेष बाब म्हणजे गरम पाणी नागरिकांना मोफत मिळेल. तसेच १ एप्रिल ते ३० एप्रिल या दरम्यान संपूर्ण घर व पाणीपट्टी कराचा भरणा करणार्या नागरिकांना दररोज २० लिटर पाणी मोफत देण्यात येईल व याच दरम्यान कर भरणार्या नागरिकांंपैकी ईश्वरचिठ्ठीद्वारे भाग्यवान करदात्याला १५ आॅगष्ट रोजी ध्वजारोहणाचा अधिकार मिळेल अशी माहिती देखील सरपंच नरेश नगरीकर यांनी दिली. आरोच्या लोकार्पणप्रसंगी पं.स.सदस्य अनिल किरणापूरे, सरपंच नरेश नगरीकर, उपसरपंच हरिश नगरीकर, ग्रा.पं.अधिकारी होमेश्वर लंजे, पो.पा. विनोद किरणापूरे, तं.मु.स.अध्यक्ष खेमराज टेंभूर्णे, ग्रा.पं. सदस्य चंद्रशेखर कापगते, प्रदीपकुमार टेंभूर्णे, भोजराम निखारे, नाजूक वाघाडे, अर्चना वाळवे, ज्ञानेश्वरी नगरीकर, संगीता किरणापूरे, रेश्मा कटंकार, तृप्ती गहाणे, करिश्मा लांजेवार, तं. मु.स.सदस्य गजानन किरणापुरे, निलकंठ कापगते, घनश्याम टेंभूर्णे, शितल कापगते, पुष्पा कापगते, भोजराम निखारे व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. 
- Post by मनिषा विजय काशीवार1
- 14 एप्रिल... बाबासाहेब यांची जयंती. तरुण वर्गात उत्साहाचे वातावरण.. DJ च्या भीम गीतावर बेधुंद होऊन नाचणारी आजची पिढी..1
- सौंदड : येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि. १४ एप्रिल २०२६ रोजी महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम संस्थेचे संस्थापक तथा संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथील रक्तकेंद्र विभागाच्या सहकार्याने आयोजित या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी डॉ. रिफत गजाला (रक्त संक्रमण अधिकारी), कुमारी सीमा निर्वाण (समुपदेशक), मिर्झा बेग (अधिपरीचारक), नवीन करोसिया (प्रयोगशाळा सहाय्यक) व हिमानी मेश्राम (प्रयोगशाळा सहाय्यक) यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अध्यक्षीय मार्गदर्शनात मा. जगदीश लोहिया यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता व बंधुतेच्या संदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी रक्तदान हे एक प्रभावी माध्यम आहे. या प्रसंगी सचिव पंकज लोहिया, उपाध्यक्ष आ. न. घाटबांधे, सरपंच हर्ष मोदी, प्राचार्या उमा बाच्छल, मुख्याध्यापक मनोज शिंदे तसेच उपसरपंच रोशन शिवणकर, प्राचार्य गुलाबचंद चिखलोंडे व इतर मान्यवर उपस्थित होते. शिबिरात रोशन शिवणकर, हेमराज लाडे, ज्ञानेश्वर दरवडे, समाधान बडोले, हर्षिद मांडरकर, सचिन लाडे, मोहन निंबेकर, महेश फुंडे, आरिफ शेख, बबन निंबेकर, मयूर चुटे, आशिष जनबंधु, मनीष कापगते, दिवेश ढोमने, तुषार शहारे, शुभम राऊत, गीता रहांगडाले, मंगेश शिवणकर, प्रकाश हटकर, हरिशकुमार मेश्राम, अजय कापगते आदींसह एकूण २२ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. वैद्यकीय पथकाने सर्व रक्तदात्यांची तपासणी करून सुरक्षित पद्धतीने रक्तसंकलन केले. संकलित रक्तसाठा गरजू रुग्णांच्या उपचारासाठी उपयोगी ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांनी सर्व रक्तदाते, स्वयंसेवक व सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे आभार मानले. समाजात जागरूकता निर्माण करून गरजूंचे प्राण वाचवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.2
- TOWN NEWS 24 📢गोंदिया जिले के नवेगांव-नागझिरा टाइगर रिजर्व के बफर जोन में एक बेहद दर्दनाक घटना सामने आई है। 11 अप्रैल 2026 को तिरोड़ा वनपरिक्षेत्र के कोडेलोहारा इलाके में एक टाइगर खुले, बिना सुरक्षा वाले कुएं में गिर गया… और तड़प-तड़प कर उसकी मौत हो गई। यह सिर्फ एक हादसा नहीं… यह सवाल है पूरे सिस्टम पर! 👉 क्या वन विभाग को इन खुले कुओं की जानकारी नहीं थी? 👉 क्यों नहीं हुआ पहले सर्वे? 👉 आखिर कब तक ऐसे ही मरते रहेंगे वन्यजीव? अब मांग उठ रही है कि ✔️ सभी खुले कुओं को तुरंत कवर किया जाए ✔️ जिम्मेदार अधिकारियों पर सख्त कार्रवाई हो ✔️ पूरे बफर जोन की जांच की जाए 👉 क्या हर बार एक जान जाने के बाद ही सिस्टम जागेगा? #Gondia #Nagzira #TigerDeath #SaveTiger #Wildlife #ForestDepartment #Negligence #BreakingNews #GroundReport #SystemFailure #ViralNews #MaharashtraNews #TigerReserve #AnimalRights #वनविभाग #लापरवाही #जंगलीजीव #बड़ीखबर ⚡1
- नहामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती रॅली काढुन स्वछता अभियान गावातील नागरीक तसेच उपासक तथा उपासिक् सरपंच भागेश्वरजी भुते, पोलीस पाटील गजाननजी जिभकाटे, तंटामुक्ती अधक्ष विकास वाघमारे, सदस्य विलास कावळे, विशाल मते, शांताराम कामठे, शिवम पंचबुधे, बंडु कामठे, विद्या तितरमारे, शहारे ताई, मेश्राम ताई , लक्ष्मण शहारे, वसंता कामठे, रुपचंद उके, हिरामण बोरकर, ज्ञानेश्वर उके उपासक तथा उपासीका मोठ्या संख्येने रॅलीत उपस्थीत होते2
- *९४*रक्तदात्यांनी केले रक्तदान* उमरेड (प्रतिनिधी ) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणुसकीने वागविण्याचा सल्ला दिला.अगदी तोच सल्ला शिरोधार्थ मानत त्यांच्या जयंती दिनी काही तरी सत्कर्म हातून घडावे म्हणून उमरेड शहरात १३५ व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिरात महिला पुरुष एकूण *९४* रक्तदात्यांनी रक्तदान करीत महामानवाला अभिवादन केले. स्थानिक साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळ भवन येथे उमरेड युथ फाउंडेशन, इंडिया पॉवर जिम, ओम साई स्पोर्टिंग क्लब, व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. उन्हाचा तडाखा असताना सुद्धा यामध्ये पुरुष व महिला रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासून राष्ट्रकार्यात सहभागी झाले.प्रसंगी डॉ.हर्षल रेवतकर, डॉ.जितेश चव्हाण,संस्थेचे संस्थापक अनिलकुमार गोविंदानी, संयोजक सचिन कुहीकर, संस्थापक अध्यक्ष प्रदीप चिंदमवार,अध्यक्ष मनीष बालपांडे ,पूर्वाध्यक्ष संजय मौदेकर,दीपक पटले,ओम साई स्पोर्टिंग क्लब चे रितेश राऊत, रिलायबल कोचिंग चे संचालक सुबोध धनविजय,नगरसेविका शालिनी गवळी,इंडिया पॉवर जिम चे किशोर आदमने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.रक्तपेढी लाईफ लाइन ब्लड बँक नागपूर चे डॉ.अविनाश बभारे,प्रवीण साठवणे यांचे विशेष सहकार्य लाभले त्यांनी संस्थेचे अध्यक्ष यांना स्मृती चिन्ह भेट अभिनंदन केले.कार्यक्रम संयोजक किशोर आदमने यांच्या उपस्थितीत शिबिर यशस्वीरीत्या पार पडला.यशस्वीतेसाठी आशिष वंजारी,विशाल बावणे,मुकेश गौतम,अक्षय श्रीखंडे,नरेंद्र बालपांडे,दिनेश ढेबूदास,प्रवीण लाडेकर,सतीश चकोले,समीर वैद्य,प्रांजल डहाके,रोशन पोकळे,उज्वल चिंदमवार,तोसिफ शेख,मुकेश गौतम,हितेश गडबोरीकर,शुभम सिर्सिकर,सतीश तांबेकर ,सचिन जोधे ,राजू चाचरकर,संदीप दांडेकर,आदींचे योगदान लाभले.1
- हिंगणा येथील मुख्य बाजार चौकात गुप्ताजी हॉटेलसमोर प्रचंड ट्रॅफिक जाम नागपूर :- हिंगणा येथील मुख्य बाजार चौकात मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. दररोज सकाळी व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहनांची लांबलचक रांग लागते, ज्यामुळे प्रवासाला उशीर होतो आणि अपघाताचा धोका देखील वाढला आहे. स्थानिकांच्या मते, रस्त्यावर अनियमित पार्किंग, फेरीवाले आणि वाहतूक नियंत्रणाचा अभाव ही मुख्य कारणे आहेत. अनेकदा आपत्कालीन वाहनांनाही मार्ग काढणे कठीण जाते, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली असून, वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करून ट्रॅफिक सुरळीत करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जर याकडे दुर्लक्ष झाले, तर येणाऱ्या काळात समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.1
- Post by मनिषा विजय काशीवार2