Shuru
Apke Nagar Ki App…
विद्यापीठाने लावला टाळा विद्यार्थ्यांना ठेवले बाहेर नामदेवराव जाधव सर गेले धावून पुढे काय झाले पहा?
Mahadev Shinde
विद्यापीठाने लावला टाळा विद्यार्थ्यांना ठेवले बाहेर नामदेवराव जाधव सर गेले धावून पुढे काय झाले पहा?
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Mahadev Shinde1
- *महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर.. कोणीच सुरक्षित नाही -आमदार अमित देशमुख by photocrimenews* https://youtube.com/live/kF4kuxSpXI4?feature=share1
- Post by अखंड भारत1
- भाजपा जिल्हा महामंत्री संजय गिरी यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर तात्काळ भाजप जिल्हा शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर दखल घेत संजय गिरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची केली मनधरणी, पक्ष मोठा आहे इच्छुकांची संख्या ही मोठी आहे, पण पक्ष आणि पक्षश्रेष्ठी कायम सच्चा कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे आहेत, येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठी नक्कीच संजय गिरी यांच्या बाबतीत विचार करतील आणि एक चांगली संधी येणाऱ्या काळात त्यांना मिळेल, असे यावेळी अजित पाटील कव्हेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. #CMOMaharashtra #abhimanyupawar #sambhajinagarkar #bavnkule #pankajmunde1
- माजी सैनिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या (AICC) माजी सैनिक विभागाच्या वतीने नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देशभरातील मोठ्या संख्येने माजी सैनिकांसह सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. या आंदोलनादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी माजी सैनिकांच्या विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. विशेषतः डिसएबिलिटी पेन्शन कायम ठेवणे, ECHS (एक्स-सर्व्हिसमेन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्कीम) अधिक प्रभावीपणे राबविणे, अग्निवीर योजना रद्द करणे तसेच सैनिकांवरील अन्यायकारक वागणूक थांबविणे या प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत माजी सैनिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी केली. देशाच्या सुरक्षेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सैनिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे योग्य नसून त्यांना न्याय मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. या धरणे आंदोलनात काँग्रेसचे विविध नेते, माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत माजी सैनिकांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.1
- सध्या संपूर्ण देशात रमजानच्या पवित्र महिना चालू आहे या महिन्यात मुस्लिम समुदायाने रोजे व नमाज पाटण करत आहेत याच म्हणजे सोलापुरात सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वांकडून इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वेष, आपसी वैमनस्य आणि तणाव निर्माण होतो, जे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. भारत हा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्म, मजहब किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही. यावेळी पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते1
- पुसरा येथील मेंढपाळ बांधव यांना मारहाण. वडवणी प्रतिनिधी- वडवणी तालुक्यातील पुसरा येथील मेंढपाळ बांधव लहू बीटे आणि बाबा बीटे यांना झालेली मारहाण ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. गाडीचे झालेले नुकसान भरून दिल्यानंतरही, केवळ सत्तेच्या किंवा पैशाच्या माजातून गरीब मेंढपाळांना ढोरासारखे मारणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. तातडीने गुन्हा दाखल: संबंधित मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या कठोर कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा. पोलीस अधीक्षक हस्तक्षेप: बीड जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी या घटनेची स्वतः दखल घेऊन पीडित मेंढपाळ बांधवांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.1
- माननीय मोहदय आमदार साहेब यांनी भूकंपग्रस्त विभाग याचे प्रश्न अधिवेशन मध्ये खूप चागल्या प्रकारे विषय घेऊन या गरीब 132 भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारकांना न्याय मिळवून देण्याचे सतत कर्यस्थ ब प्रयत्न करीत आहेत कारण आज भूकंप होऊन दुसरी पीडी चालू आहे प्रत्तेक घरात तीन चार वारस आहेत त्यांना घर नको का याचा पण या आमदार साहेबानो विचार करून मुद्दा अधिवेशन मध्ये उचलूम धरले आहेत या बद्दल मी महादेव शिंदे 132 भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारक याच्या वतीने आमदार साहेब याचे मनापासून आभार व्यक्त करीत आहे1