जुन्या पाणी टाकीच्या दुरुस्तीवरून ग्रामस्थ आक्रमक; तत्काळ काम थांबवले ग्रामपंचायत ब्राह्मणी / खडकीत पिण्याच्या पाण्यासाठी वाद पेटला ब्राह्मणी / खडकी, ता. सडक अर्जुनी : ब्राह्मणी / खडकी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, गावातील जुन्या पाणी टाकीच्या दुरुस्तीच्या कामावरून ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये वाद निर्माण झाला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मुख्य ब्राह्मणी गावातील जुन्या पाणी टाकीला प्लास्टर करण्याचे काम ग्रामपंचायतीमार्फत सुरू करण्यात आले होते. तसेच तात्पुरते कॉलम उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, या कामाची माहिती गावातील काही नागरिकांना मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी एकत्र येत डागडुगीचे काम थांबविले. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, जुन्या पाणी टाकीच्या सुरक्षिततेचा आणि भविष्यातील पाणीपुरवठ्याचा योग्य विचार न करता दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित कामाबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून ब्राह्मणी गावात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उन्हाळ्यातच नव्हे तर आता पावसाळ्यातही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावातील नागरिकांची मागणी आहे की, पाणीपुरवठ्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवावा, जुन्या पाणी टाकीची तांत्रिक तपासणी करूनच दुरुस्ती करावी किंवा नवीन टाकी उभारण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणामुळे ब्राह्मणी / खडकी गावात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून वातावरण तापले असून, ग्रामपंचायत प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
जुन्या पाणी टाकीच्या दुरुस्तीवरून ग्रामस्थ आक्रमक; तत्काळ काम थांबवले ग्रामपंचायत ब्राह्मणी / खडकीत पिण्याच्या पाण्यासाठी वाद पेटला ब्राह्मणी / खडकी, ता. सडक अर्जुनी : ब्राह्मणी / खडकी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, गावातील जुन्या पाणी टाकीच्या दुरुस्तीच्या कामावरून ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये वाद निर्माण झाला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार,
मुख्य ब्राह्मणी गावातील जुन्या पाणी टाकीला प्लास्टर करण्याचे काम ग्रामपंचायतीमार्फत सुरू करण्यात आले होते. तसेच तात्पुरते कॉलम उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, या कामाची माहिती गावातील काही नागरिकांना मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी एकत्र येत डागडुगीचे काम थांबविले. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, जुन्या पाणी टाकीच्या सुरक्षिततेचा आणि भविष्यातील पाणीपुरवठ्याचा
योग्य विचार न करता दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित कामाबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून ब्राह्मणी गावात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उन्हाळ्यातच नव्हे तर आता पावसाळ्यातही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावातील
नागरिकांची मागणी आहे की, पाणीपुरवठ्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवावा, जुन्या पाणी टाकीची तांत्रिक तपासणी करूनच दुरुस्ती करावी किंवा नवीन टाकी उभारण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणामुळे ब्राह्मणी / खडकी गावात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून वातावरण तापले असून, ग्रामपंचायत प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
- जुन्या पाणी टाकीच्या दुरुस्तीवरून ग्रामस्थ आक्रमक; तत्काळ काम थांबवले ग्रामपंचायत ब्राह्मणी / खडकीत पिण्याच्या पाण्यासाठी वाद पेटला ब्राह्मणी / खडकी, ता. सडक अर्जुनी : ब्राह्मणी / खडकी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, गावातील जुन्या पाणी टाकीच्या दुरुस्तीच्या कामावरून ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये वाद निर्माण झाला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मुख्य ब्राह्मणी गावातील जुन्या पाणी टाकीला प्लास्टर करण्याचे काम ग्रामपंचायतीमार्फत सुरू करण्यात आले होते. तसेच तात्पुरते कॉलम उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, या कामाची माहिती गावातील काही नागरिकांना मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी एकत्र येत डागडुगीचे काम थांबविले. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, जुन्या पाणी टाकीच्या सुरक्षिततेचा आणि भविष्यातील पाणीपुरवठ्याचा योग्य विचार न करता दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित कामाबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून ब्राह्मणी गावात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उन्हाळ्यातच नव्हे तर आता पावसाळ्यातही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावातील नागरिकांची मागणी आहे की, पाणीपुरवठ्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवावा, जुन्या पाणी टाकीची तांत्रिक तपासणी करूनच दुरुस्ती करावी किंवा नवीन टाकी उभारण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणामुळे ब्राह्मणी / खडकी गावात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून वातावरण तापले असून, ग्रामपंचायत प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.4
- *साकोली येथे आदिवासी जागतिक दिन* *मोठ्या उत्साहात साजरा* साकोली :- साकोली तालुक्याच्या ठिकाणी नॅशनल आदिवासी पिपल्स, महिला फेडरेशन, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन, ऑफ्रोट संघटना,आदिवासी हलबा/हलबी समाज कर्मचारी महासंघ व आदिवासी समाज बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगलमूर्ती सभागृह साकोली येथे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी जंगल कामगार सोसायटी येथून आदिवासी समाज बांधवांची भव्य दिव्य रॅली प्रगती काॅलोनी चौक ते एकडी रोड चौक ते मंगलमूर्ती सभागृह पर्यंत आदिवासीच्या पारंपारिक वेशभुषेत आदिवासी वाद्य व गोंडी गाण्यावर नाचत गाजत काढण्यात आली. रॅलीत सल्ला गागरा,पहांदी पारी कुपार लिंगो,पाटलियार हिरीसुखा व वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतीमा तसेच आदिवासी वारली चित्रकला विशेष आकर्षक दिसत होती. रॅलीनंतर मंगलमूर्ती सभागृहात समाजप्रबोधन मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनचे तालुका अध्यक्ष भानुदास खांडवाये तर उद्घाटक म्हणून तहसिल कार्यालय साकोली चे नायब तहसीलदार भुमेश्वर पेंदाम,सह उद्घाटक माजी क्रिडा अधिकारी अनिराम मरस्कोल्हे, दिपप्रज्वलन भंडारा जिल्हा जंगल कामगार सहकारी संस्थाचा संघाचे अध्यक्ष तथा बी डी सी सी बॅंकचे संचालक धर्मराज भलावी हे होते. विशेष अतिथी म्हणून पोलीस स्टेशन साकोली चे पी एस आय देवकन्याताई ईवनाते,नगर परिषद साकोली चे माजी उपाध्यक्ष जगन उईके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती साकोली चे से.नि. विस्तार अधिकारी नागोराव मेळे,माजी सरपंच हेमलताताई परसगडे, सामाजिक कार्यकर्त्या लिलाताई वलके, आदिवासी हलबा/हलबी समाज कर्मचारी महासंघचे तालुका अध्यक्ष प्रा.नवाजी घरत,नॅशनल आदिवासी महिला फेडरेशनच्या तालुका अध्यक्षा कुंदाताई कुंभरे,चांदोरी चे सरपंच विठ्ठलजी मसराम,जे एम पटेल काॅलेज भंडारा चे प्राध्यापक देविदास काटेंगे,शिवनीबांधच्या सरपंचा पुस्तकलाबाई उईके प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी मान्यवर मंडळीनी आदिवासी समाज बांधवांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विषयावर मार्गदर्शन केले तसेच मार्च २०२६ मध्ये वर्ग दहावी व बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले अश्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच नवोदय विद्यालय, एकलव्य विद्यालयात निवड झालेले व शिष्यवृत्ती परीक्षा पात्र विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हितेश उईके व दिलीप सयाम यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमेश मरस्कोल्हे व आभार प्रदर्शन केशव भलावी यांनी केले. कार्यक्रमासाठी हरिभाऊ येळणे, ओमप्रकाश कुंभरे, पवनकुमार टेकाम, नरेश कुंभरे,होमनाथ पुरामकर,तुळशिदास कुंभरे,राजु जुगनाहके, भिमराव वाडीवा अरविंद टेकाम, केशव उईके,राजु वलके,कमलसिंग कोडापे, चंद्रकुमार मरस्कोल्हे, सुरेश ताराम,गिरीधारी सराटे,तेजराम मलये,मेथिलाल नाईक, देवानंद कुरसुंगे,आनंदराव वलके, विनोद सयाम, गणेश तुमळे, संदेश सयाम तसेच संघटनेचे पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली. कार्यक्रमासाठी साकोली तालुक्यातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.2
- आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग नागरिकांना बॅटरी चालित ई-सायकलचे वितरण. तीन तालुक्यांत दिव्यांग बांधवांना ई-सायकल वाटप; लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य. आमगाव: लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना केवळ विकासाची कामेच नव्हे, तर समाजातील दुर्बल घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे, हे आमदार संजय पुराम यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी एक अत्यंत प्रेरणादायी सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत आमगाव, देवरी आणि सालेकसा या तीनही तालुक्यांतील दिव्यांग नागरिकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी बॅटरी चालित तीन चाकी ई-सायकलचे वितरण करण्यात आले आहे. ७ ऑगस्टला आमगाव, तर आज देवरी आणि सालेकसा तालुक्यात वाटप आमदार संजय पुराम यांचा वाढदिवस ७ ऑगस्टला उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सुरुवातीला आमगाव तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना ई-सायकल्स प्रदान करण्यात आल्या होत्या. या उपक्रमाचा विस्तार करत, आज देवरी आणि सालेकसा येथील दिव्यांग नागरिकांनाही या सायकल्सचे वाटप करण्यात आले. या तीनही तालुक्यांत मिळून एकूण ३० बॅटरी चालित सायकल्सचे वितरण करण्यात आले असून, यामुळे दिव्यांगांना दैनंदिन प्रवासासाठी मोठी मदत मिळणार आहे. आमदार संजय पुराम यांची भावना: "गरजूंना आधार देणे हेच खरे समाधान" या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देताना आमदार संजय पुराम म्हणाले की, "माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दरवर्षी नेत्र तपासणी शिबिरे, मोतियाबिंदू शस्त्रक्रिया आणि रक्तदान शिबिरे यांसारखे सामाजिक उपक्रम राबवत असतो. मात्र, दिव्यांगांच्या समस्या जवळून पाहिल्यानंतर, ज्यांना पायी चालणे शक्य नाही, त्यांच्या प्रवासातील अडचणी दूर करण्यासाठी त्यांना ई-सायकल देण्याचा आपण निर्णय घेतला. हे काम मला मनापासून समाधान देते". ते पुढे म्हणाले, "सध्या या उपक्रमासाठी सुमारे २०० जणांचे अर्ज आमच्याकडे प्राप्त झाले आहेत. एकाच वेळी सर्वांना सायकली देणे शक्य नसल्याने, आपण टप्प्याटप्प्याने हे वाटप करत आहोत. ज्या लाभार्थींची नावे आज वेटिंग लिस्टवर आहेत, त्यांनी काळजी करू नये; पुढील ५ ते ६ महिन्यांत आपण पुन्हा ३० जणांना सायकल्सवाटप करणार आहोत. टप्प्याटप्प्याने आपण सर्व पात्र दिव्यांगांना मदत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत". लाभार्थ्यांची प्रतिक्रिया: "संकटकाळात ठरला मोलाचा आधार" ई-सायकल मिळाल्यानंतर लाभार्थ्यांच्या मनातील कृतज्ञता स्पष्टपणे दिसून येत होती. सालेकसा तालुक्यातील निंबा येथील रहिवासी असलेले लाभार्थी सतीश भगत यांनी आपला अनुभव सांगताना सांगितले की, "तीन महिन्यांपूर्वी झालेल्या एका दुर्दैवी अपघातात मला माझे पाय गमवावे लागले. त्यानंतर माझ्यासाठी साध्या हालचाली करणेही कठीण झाले होते. अशा परिस्थितीत आमदार संजय पुराम यांच्याकडे मी मदतीची अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी माझी अडचण समजून मला ही ई-सायकल उपलब्ध करून दिली आहे. ही सायकल माझ्यासाठी केवळ एक वाहन नसून, जीवनात पुन्हा स्वतंत्रपणे फिरण्याचे एक नवीन साधन आहे". सतीश भगत यांच्यासह परिसरातील इतर अनेक लाभार्थ्यांनी आमदार पुराम यांच्या या संवेदनशील निर्णयाचे मनापासून कौतुक केले. आमदार संजय पुराम यांच्या या उपक्रमामुळे केवळ दिव्यांग बांधवांना प्रवासाचे साधनच मिळाले नाही, तर त्यांना सन्मानाने आणि स्वतंत्रपणे जगण्याचा आत्मविश्वासही प्राप्त झाला आहे. एका लोकप्रतिनिधीने वाढदिवसाच्या माध्यमातून समाजातील उपेक्षितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवल्याने संपूर्ण परिसरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.1
- वनशहीद श्री श्यामू माहागु शरणागत को भावपूर्ण श्रद्धांजलि | एक दिवसीय धरना आंदोलन | गोंदिया गोंदिया में वनरक्षक एवं पदोन्नत वनपाल संगठन, महाराष्ट्र राज्य तथा वनमजूर, वन कर्मचारी व वनक्षेत्रीय कर्मचारी संगठन की ओर से वनशहीद स्व. श्री श्यामू महाराज शरणागत को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित की गई। वनरक्षक (माजी सैनिक) रहे श्यामू महाराज शरणागत की स्मृति में आयोजित एक दिवसीय धरना आंदोलन के दौरान कर्मचारियों ने अपनी विभिन्न मांगों और न्याय मिळालाच पाहिजे की मांग को लेकर आवाज बुलंद की। इस दौरान उपस्थित कर्मचारियों ने वनशहीद को नमन करते हुए उनके योगदान को याद किया और न्याय की मांग की। 📍 स्थान: वनभवन, गोंदिया 📌 कार्यक्रम: एक दिवसीय धरना आंदोलन 🙏 वनशहीद श्री श्यामू महाराज शरणागत को भावपूर्ण श्रद्धांजलि। वीडियो पसंद आए तो Like 👍, Share 🔄 और Kohram News Gondia को Subscribe 🔔 जरूर करें। #Gondia #KohramNews #वनशहीद #श्यामूमहाराजशरणागत #वनविभाग #धरनाआंदोलन #श्रद्धांजलि #GondiaNews #BreakingNews1
- बहादुरा फाटा येथील 'शिवम फुड्स' या पारले बिस्कीट उत्पादक व्हेंडर कंपनीने बेकायदेशीरपणे काम बंद करून आम्हा 400 कामगारांना उपासमारीची वेळ आणली आहे. . बहादुरा फाटा येथील 'शिवम फुड्स' या पारले बिस्कीट उत्पादक व्हेंडर कंपनीने बेकायदेशीरपणे काम बंद करून आम्हा 400 कामगारांना उपासमारीची वेळ आणली आहे. "व्यवस्थापनाने अप्पर कामगार आयुक्त किशोर दहिफळकर यांच्या संघम मताने यांच्यात चिरी मिरी वेव्हार करून घेऊन कामगारांना व कामगारांच्या परिवारावर आत्म हत्या करण्याची परिस्थिती निर्माण करून व कंपनी मालकाला पोटाशी घेऊन पारले कंपनीकडून कच्चा माल मिळणे बंद झाल्याचे कारण पुढे करत कामगारांना काम देण्यास मनाई केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कामगार रोज वेळेवर कामावर जात असूनही व्यवस्थापन त्यांना कामावर घेण्यास तयार नाही. कामगार अप्पर आयुक्त किशोर दहिफळकर यांच्याकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा तक्रारी कडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे इतकेच नव्हे तर कामगार कायद्याच्या 'वेजेस ॲक्ट'चे उघड उघड उल्लंघन करत, आज १० ऑगस्ट उजाडली तरी कामगारांचे माहे जुलै महिन्याचे वेतन देण्यात आलेले नाही. यामुळे तब्बल ४०० कामगार कुटुंबांवर उपासमारीची भीषण वेळ आली आहे." याचा सर्व श्रेय अप्पर आयुक्त कामगार किशोर दहिफळकर यांना देण्यात येत असून हे कामगाराकडे दुर्लक्ष करत आहे या प्रकरणी कामगार प्रतिनिधी दिलीप देशमुख, मनोज अतकरी, विजय बांबळ, विजय ढोबळे आणि ज्ञानेश्वर मिले यांनी नागपूरच्या अप्पर कामगार आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला. मात्र, या विभागाकडून केवळ चालढकल सुरू असून कोणताही तोडगा निघालेला नाही." तरी अपर कामगार आयुक्त किशोर दहिफळकर हे या पदावर राहण्याच्या लायक नाही तरी यांना तात्काळ हकलपट्टी करून यांची सीबीआय कडून व यांच्या रिश्तेदारांची संपत्तीची चौकशी करण्यात यावी कामगार प्रचंड त्रस्त झाले असून, अशा परिस्थितीत जर कामगाराने टोकाचे पाऊल उचलल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी कंपनी व्यवस्थापन आणि अप्पर कामगार आयुक्त किशोर दहिफळकर यांची कार्यालयाची राहील, असा इशारा कामगारांनी दिला आहे. या अन्यायाविरोधात आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा आणि प्रशासनापर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी अम्मा कामगारांना मदत करा ही ही सर्व वरिष्ठ अधिकारी यांना विनंती करण्यात येत आहे आपला कामगार मनोज अतकरी नागपूर1
- खोटी व बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरपंच जिभकाटे यांचा गंभीर आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष (रामटेक )आनंदराव राऊत यांची कॉग्रेसचे गब्बर रेवतकर यांना साथ ! पत्रपरिषदेला , उपजिल्हा प्रमुख संदीप निंबार्ते, उमरेड विधानसभा प्रमुख दिलीप सोनटक्के, अविनाश चिमुरकर यांची उपस्थिती भिवापुर । उमरेड मांगरुड ग्राम पंचायत सरपंच मंजुषा जिभकाटे या २०२३ ला थेट जनते मधून निवडून आल्या होत्या.यांचे विरुद्ध अतिक्रमणचे खोटे प्रकरण उपसरपंच यांनी दाखल करून त्यांना अपात्र करण्यात आले होते. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त नागपूर यांचेकडे त्यांनी दाद मागितली होती. परंतु न्याय न मिळाल्याने त्यांनी अखेर उच्च न्यायालय येथे प्रकरण दाखल केले होते. याबाबत उच्च न्यायालयाने त्याच्या बाजूने निकाल देत न्याय दिल्याने सरपंच म्हणून मंजुषा जिभकाटे कायम असून आपल्या विरुद्ध खोटी बनावट कागदपत्रे व खोटा अहवाल तयार करणाऱ्या नायब तहसिलदार व पंचायत समिती विस्तार अधिकारी अधिकाऱ्या विरुद्ध वरिष्ट अधिकारी यांचेकडे तक्रार करणार असून वेळप्रसंगी अधिकारी यांना न्यायालयात खेचू असे शासकीय विश्रामगृह भिवापूर येथे आयोजित पत्रपरिषदेत बोलतांना आक्रमक भुमिका सरपंच मंजुषा जिभकाटे घेतली. मी भाजपाची सरपंच असतांना भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांनी कॉग्रेस पक्षाचे उपसरपंच गब्बर रेवतकर यांना साथ दिल्याचा खळबळजनक गंभीर आरोप सरपंच जिभकाटे यांनी केला. त्यामुळे भाजपा पक्ष सोडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत सरपंच मंजुषा जिभकाटे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया1
- हे ऑपरेशन टायगर आहे, देवेंद्र नाही: रामदास आठवले यांचे स्पष्टीकरण1
- लाखनी येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन आयोजन दि. 11 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा (आत्मा), भंडारा व आदिवासी विकास विभाग, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन 11 ऑगस्ट 2026 रोज मंगळवार ला दुपारी 12.00 ते सायंकाळी 5.00. पर्यंत तहसील कार्यालय परिसर लाखनी येथे करण्यात आला आहे. महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या, पारंपरिक खाद्यपदार्थ, आणि स्थानिक कृषी उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. शेतकरी गट, महिला गटांना रानभाज्यांच्या विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असून नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन पारंपरिक व पौष्टिक रानभाज्यांची माहिती जाणून घ्यावी व स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार शितल घावटे राहणार आहेत तर सभापतीअश्विनी मोहतुरे यांचे हस्ते उद्घाटन पार पडणार आहे. प्रमुख उपस्थितीत जि प सदस्य मनीषा निंबार्ते, नगराध्यक्ष त्रिवेणी पोहरकर, सरपंच शेषराव गिऱ्हेपुंजे, सचिन बागडे, प्रकल्प संचालक उर्मिला चिखले उपविभागीय कृषी अधिकारी किशोर पात्रीकर इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शेतकरी, महिला बचत गट व स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रानभाजी महोत्सवाचा लाभ घ्यावा. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी लाखनी यांनी केले आहे.1