नांदेडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिक घराबाहेर, काही काळ भीतीचे वातावरण,! नांदेड, दि. ११ एप्रिल : आज सकाळी नांदेड जिल्ह्यासह परिसरात भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक जमिनीला भुकंप जाणवल्याने अनेक नागरिकांनी तत्काळ घराबाहेर धाव घेत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात नोंदविण्यात आला असून रिश्टर स्केलवर तीव्रता ४.७ इतकी मोजण्यात आली आहे. सकाळी ८:४५ वाजून २३ सेकंदांनी हा भूकंप झाला. भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नांदेड शहरासह काही ग्रामीण भागातही धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी अथवा मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
नांदेडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिक घराबाहेर, काही काळ भीतीचे वातावरण,! नांदेड, दि. ११ एप्रिल : आज सकाळी नांदेड जिल्ह्यासह परिसरात भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक जमिनीला भुकंप जाणवल्याने अनेक नागरिकांनी तत्काळ घराबाहेर धाव घेत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात नोंदविण्यात आला असून रिश्टर स्केलवर तीव्रता ४.७ इतकी मोजण्यात आली आहे. सकाळी ८:४५ वाजून २३ सेकंदांनी हा भूकंप झाला. भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नांदेड शहरासह काही ग्रामीण भागातही धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी अथवा मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
- लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या वतीने मुंबईत महामोर्चा काढण्यात आला आहे. एड. दत्ताराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चातून विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात आले.1
- पुण्यात झालेल्या एका हत्येने खळबळ उडवून दिली आहे. ही आंदेकर हत्येचा बदला असल्याची जोरदार चर्चा आहे, ज्यामुळे पुन्हा टोळीयुद्धाची शक्यता निर्माण झाली आहे.1
- गंगाखेड येथील श्री रेणुका देवी संस्थानने भक्तांच्या वाहन पार्किंगसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता चार एकर जागेवर भव्य वाहन पार्किंग व्यवस्था उभारण्यात येणार असून, यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.1
- NEET पेपरफुटी प्रकरणात आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. अभियान प्रमुख संजय कुमार यांनी उदगीर येथून ही मागणी केली असून, यामुळे या गंभीर प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.1
- परभणी जिल्ह्यात गॅसनंतर आता डिझेल आणि पेट्रोलही मिळेनासे झाले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, राज्यभरात या समस्येवर चिंता व्यक्त केली जात आहे.1
- लातूर स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. युवकांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अवैध गांजा विक्री रॅकेटवर पोलिसांनी घणाघात करत त्याचा पर्दाफाश केला.1
- अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात लोकस्वराज्य आंदोलन संघटनेने मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी झाडावर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच खाली उतरवले.1
- परभणीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर नागरिकांनी संताप आंदोलन केले. विविध मागण्यांसाठी संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात आपला तीव्र रोष व्यक्त केला.1
- परभणी जिल्ह्यात आज मेडिकल असोसिएशनच्या वतीने सर्व औषध दुकाने बंद ठेवण्यात आली. याचसोबत असोसिएशनने एक मोर्चाही काढला.1