नांदेडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिक घराबाहेर, काही काळ भीतीचे वातावरण,! नांदेड, दि. ११ एप्रिल : आज सकाळी नांदेड जिल्ह्यासह परिसरात भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक जमिनीला भुकंप जाणवल्याने अनेक नागरिकांनी तत्काळ घराबाहेर धाव घेत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात नोंदविण्यात आला असून रिश्टर स्केलवर तीव्रता ४.७ इतकी मोजण्यात आली आहे. सकाळी ८:४५ वाजून २३ सेकंदांनी हा भूकंप झाला. भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नांदेड शहरासह काही ग्रामीण भागातही धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी अथवा मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
नांदेडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिक घराबाहेर, काही काळ भीतीचे वातावरण,! नांदेड, दि. ११ एप्रिल : आज सकाळी नांदेड जिल्ह्यासह परिसरात भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक जमिनीला भुकंप जाणवल्याने अनेक नागरिकांनी तत्काळ घराबाहेर धाव घेत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात नोंदविण्यात आला असून रिश्टर स्केलवर तीव्रता ४.७ इतकी मोजण्यात आली आहे. सकाळी ८:४५ वाजून २३ सेकंदांनी हा भूकंप झाला. भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नांदेड शहरासह काही ग्रामीण भागातही धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी अथवा मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
- लातूरमध्ये बैल खरेदी करून घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याने आवश्यक कागदपत्रे दाखवूनही त्याला थांबवण्यात आले आणि त्याचे बैल गोरक्षण केंद्रात पाठवण्यात आले. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणी कुलदीप सूर्यवंशी यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत “शेतकऱ्याला गुन्हेगार बनवणं थांबवा” असे म्हटले आहे. या प्रकरणामुळे परिसरात जोरदार चर्चा सुरू असून शेतकरी संघटनांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे.1
- नायगाव तालुक्यातील कारला गावाला अद्यापही पक्का रस्ता मिळालेला नाही, यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. गावकरी हा प्रश्न उपस्थित करत आहेत की, आमदार आणि खासदारांना मिळणारा निधी नेमका कुठे जातो. गावाला मूलभूत रस्ताच उपलब्ध नसेल तर या निधीचा उपयोग काय, असा थेट सवालही विचारण्यात आला आहे.1
- मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री (पदे) येथे १७ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून तीन कुटुंबांचे संसार पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. या घटनेनंतर बाधित कुटुंबांना शासनाने तातडीने प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्वाभीमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यच्या वतीने तहसीलदार मुखेड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही आग श्री नागोराव निवृत्ती वादे यांच्या घराला लागली आणि वेगाने शेजारील हणमंत निवृत्ती वादे व मारोती निवृत्ती वादे यांच्या घरांपर्यंत पसरली. काही क्षणांतच तिन्ही घरे जळून खाक झाली. या आगीत अन्नधान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य, पत्रे, घरातील लाकडी वासे, तसेच सर्व जीवनावश्यक वस्तू भस्मसात झाल्या. विशेषतः, श्री नागोराव वादे यांनी गावालगत प्लॉट खरेदीसाठी घरात ठेवलेले सुमारे चार लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीचे सोन्याचे दागिनेही या आगीत जळून गेले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या भीषण घटनेमुळे संबंधित कुटुंबांपुढे राहण्याचा आणि उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, त्यांना केवळ अंगावरील कपड्यांवरच समाधान मानावे लागत आहे. या घटनेचा पंचनामा उंद्री (पदे) येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी गावातील पंचांसमक्ष करून तहसील कार्यालयात सादर केला आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन बाधित तिन्ही कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पुन्हा निवेदनाद्वारे करण्यात आली. हेच निवेदन पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय दंडाधिकारी, मुखेड यांनाही सादर करण्यात आले आहे. यावेळी स्वाभीमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यचे मुख्य मार्गदर्शक श्री विश्वनाथरावजी कोलमकर, प्रदेशाध्यक्ष श्री विजयराव देवडे लहानकर, प्रदेश सचिव श्री शिवाजीराव पांगरेकर, युवा प्रदेशाध्यक्ष बालाजीराव घुमलवाड, जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव विभुते, मुख्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव शिरोळे, जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय राजरवार, सोशल मीडिया प्रमुख बालाजी माधवराव चक्रधर, लोहा तालुका अध्यक्ष कपिल कानगुलकर, मुखेड तालुका अध्यक्ष तुकाराम तेलंगे, केरुर येथील माजी सरपंच प्रभाकर पठाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच माजी सरपंच माधवराव तुकाराम पाटील वडजे, सरपंच प्रतिनिधी सुधाकर गन्लेवार, ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील सूर्यवंशी, रमेशराव आडबलवार, पत्रकार मारोती गणेशराव वडजे, पत्रकार बालाजी पाटील शिंदे, पत्रकार मनोज पाटील बिरादार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही बाधित कुटुंबांना न्याय मिळावा अशी तीव्र मागणी केली आहे.3
- परभणी शहरात तरुणांमध्ये नशा करण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. न्यू मराठीचे परभणी प्रतिनिधी मोहसीन खान यांनी दिलेल्या वृत्तानुसार, या गंभीर स्थितीवर सामाजिक कार्यकर्ते सय्यद फादर यांनी चिंता व्यक्त केली असून, त्यांनी पोलीस अधीक्षक यांना या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.1
- समर्पण प्रतिष्ठानने आमदार डॉक्टर राहुल पाटील यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे सेवानिवृत्त पोलिसांना महाराष्ट्र विधानसभेत प्रतिनिधित्व मिळावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.1
- परभणी जिल्ह्यात, दि. २५ रोजी परभणी-परळी रेल्वे दुहेरीकरण व बाह्य वळण प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गंगाखेड व सुरळवाडी शिवारातील शेतकरी, प्लॉटधारक आणि कुटुंबीयांच्या विविध मागण्यांसाठी दक्षिण मध्य रेल्वे, सिकंदराबाद येथील महाप्रबंधकांना एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. यावेळी किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. राजन क्षीरसागर यांनी आरोप केला की, गंगाखेड उपविभागीय कार्यालयाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करून जमीन संपादनाचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीन संपादन मान्य नसून, या प्रकल्पासाठी शेतकरी एक इंचही जमीन देणार नाहीत. सरकारने आपली अन्यायकारक भूमिका कायम ठेवल्यास असहकार आंदोलन छेडण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. निवेदनात बाधितांच्या अनेक प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये बाजारभावाच्या पाचपट मोबदला देणे, बाधित कुटुंबातील सदस्यांना भारतीय रेल्वेमध्ये नोकरी देणे, संयुक्त मोजणी अमान्य असल्याने करण्यात आलेले मोजमाप रद्द करणे, तसेच गुंठेवारी कायद्याअंतर्गत संपादित प्लॉटधारकांना ताबेदारीच्या आधारे योग्य मोबदला देण्याची मागणी समाविष्ट आहे. याशिवाय, वक्फ बोर्डाच्या जमिनी, झोपडपट्टीधारकांचे प्लॉट, बांधकाम पूर्ण झालेली घरे, अकृषक प्लॉट, महाराष्ट्र गुंठेवारी अधिनियम २००१ अंतर्गत बगर नोंदणी प्लॉट तसेच महाराष्ट्र इरिगेशन अॅक्ट १९७६ अंतर्गत कमांड क्षेत्रातील ओलीताच्या जमिनींसह सर्व प्रकारच्या प्रकल्पग्रस्तांना संपूर्ण मोबदला देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली. महाप्रबंधकांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान बाधितांच्या समस्या व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी किसान सभेचे अध्यक्ष कॉ. राजन क्षीरसागर, जिल्हा सचिव कॉ. ओंकार पवार, भाई गोपीनाथ भोसले यांच्यासह अनेक बाधित शेतकरी व प्लॉटधारक उपस्थित होते.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- कोयंबतूरमध्ये एका निष्पाप मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या हृदयद्रावक घटनेशी संबंधित पत्रकार परिषदेत पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी हसताना दिसल्याने, समाजमाध्यमांवर त्यांच्यावर सध्या तीव्र टीका केली जात आहे.1