संस्कारांचा वारसा आणि लोकसेवेची नवी दिशा....! संस्कारांचा वारसा आणि लोकसेवेची नवी दिशा....! एरंडोलच्या भूमीत अनेक साधी, परंतु प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे जन्माला आली आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे मयूर दिलीप महाजन लोकांच्या विश्वासावर निवडून आलेले एक तरुण नगरसेवक. साध्या कुटुंबात जन्मलेला हा तरुण आज समाजसेवेच्या मार्गावर ठामपणे वाटचाल करत आहे आणि त्यामागे आहे एका महान वारशाची प्रेरणा. एरंडोल येथील मध्यमवर्गीय कुटुंबात मयूर महाजन यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती जेमतेम असली, तरी घरात मिळालेल्या संस्कारांची श्रीमंती मात्र अपार होती. त्यांच्या घरात कायम आदराने उच्चारले जाणारे एक नाव होते.स्वर्गीय आत्माराम सयाजी महाजन. हे नाव केवळ कुटुंबापुरते मर्यादित नव्हते, तर एरंडोलच्या जनतेच्या मनातही अत्यंत सन्मानाने घेतले जात असे. स्व. आत्माराम सयाजी महाजन हे एरंडोल नगरपरिषदेचे आदर्श लोकप्रतिनिधी होते. त्यांनी सलग पाच पंचवार्षिक काळ बिनविरोध नगरसेवक म्हणून सेवा बजावली होती आणि उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारीही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली होती.साधेपणा,प्रामाणिकपणा आणि जनतेसाठी अखंड झटण्याची वृत्ती हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. त्यांच्या कार्यामुळे त्यांनी जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते. मयूर महाजन यांनी आपल्या आजोबांना कधीच पाहिले नव्हते.त्यांच्या जन्माआधीच आजोबांचे निधन झाले होते.परंतु घरात त्यांच्या कार्याच्या कथा नेहमी सांगितल्या जात.गावातील लोक आजही आदरपूर्वक त्यांचे नाव घेतात.जेव्हा जेव्हा घरात किंवा गावात आजोबांच्या कार्याचा उल्लेख होत असे,तेव्हा त्या गोष्टींचा लहानग्या मयूरच्या मनावर खोल परिणाम होत असे. हळूहळू त्यांच्या मनात एक स्वप्न आकार घेऊ लागले."आपणही एक दिवस आपल्या आजोबांसारखे लोकांसाठी काम करावे,समाजाची सेवा करावी." बालपणी मनात रुजलेले हे स्वप्न त्यांनी जपून ठेवले. परिस्थिती साधी होती, आयुष्यात अनेक अडचणीही आल्या; परंतु समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची जिद्द कधीच कमी झाली नाही. वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला.कोणत्याही मोठ्या राजकीय पाठबळाशिवाय त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि जनतेसमोर उभे राहिले.त्यांच्या पाठीशी मोठी सत्ता नव्हती, पैशांची ताकद नव्हती; पण होती ती लोकांची आपुलकी,विश्वास आणि घरातून मिळालेल्या संस्कारांची शक्ती. एरंडोलच्या जनतेनेही त्या विश्वासाची कदर केली. जनतेने त्यांना भरभरून पाठिंबा देत नगरसेवक म्हणून निवडून दिले.हा क्षण केवळ मयूर महाजन यांच्यासाठी नव्हता,तर त्यांच्या आजोबांच्या कार्याला मिळालेला खरा सन्मान होता.जणू काही आजोबांनी पेरलेली लोकसेवेची बीजे आता नातवाच्या रूपाने पुन्हा फुलू लागली होती. आज मयूर दिलीप महाजन हे शिवसेनेचे आमदार माननीय अमोलदादा पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांना ओळखले जाते.त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते एरंडोलच्या विकासासाठी तसेच जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. आजोबांचा वारसा,घरातून मिळालेले संस्कार आणि जनतेचा विश्वास या तीन गोष्टींना सोबत घेऊन मयूर महाजन यांचा लोकसेवेचा प्रवास पुढे सुरू आहे. त्यांनी आपल्या आजोबांना कधी पाहिले नसले,तरी त्यांच्या विचारांवर चालत लोकसेवेची परंपरा पुढे नेण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. खरंच, काही नाती रक्ताने जुळतात; तर काही नाती संस्कार, आदर्श आणि प्रेरणांनी जुळलेली असतात. स्वर्गीय आत्माराम सयाजी महाजन यांनी आयुष्यभर जपलेली लोकसेवेची परंपरा आज त्यांच्या नातवाच्या कार्यातून पुन्हा उजळून निघताना दिसत आहे. एरंडोलच्या इतिहासात ही गोष्ट कदाचित कायम स्मरणात राहील.एक नातू ज्याने कधी आपल्या आजोबांना पाहिले नव्हते, परंतु त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत लोकसेवेचा वारसा अभिमानाने पुढे चालू ठेवला. हीच खरी परंपरा…हीच खरी समाजसेवा…आणि हीच एका तरुण नगरसेवकाची प्रेरणादायी व हृदयस्पर्शी कथा. © दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
संस्कारांचा वारसा आणि लोकसेवेची नवी दिशा....! संस्कारांचा वारसा आणि लोकसेवेची नवी दिशा....! एरंडोलच्या भूमीत अनेक साधी, परंतु प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे जन्माला आली आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे मयूर दिलीप महाजन लोकांच्या विश्वासावर निवडून आलेले एक तरुण नगरसेवक. साध्या कुटुंबात जन्मलेला हा तरुण आज समाजसेवेच्या मार्गावर ठामपणे वाटचाल करत आहे आणि त्यामागे आहे एका महान वारशाची प्रेरणा. एरंडोल येथील मध्यमवर्गीय कुटुंबात मयूर महाजन यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती जेमतेम असली, तरी घरात मिळालेल्या संस्कारांची श्रीमंती मात्र अपार होती. त्यांच्या घरात कायम आदराने उच्चारले जाणारे एक नाव होते.स्वर्गीय आत्माराम सयाजी महाजन. हे नाव केवळ कुटुंबापुरते मर्यादित नव्हते, तर एरंडोलच्या जनतेच्या मनातही अत्यंत सन्मानाने घेतले जात असे. स्व. आत्माराम सयाजी महाजन हे एरंडोल नगरपरिषदेचे आदर्श लोकप्रतिनिधी होते. त्यांनी सलग पाच पंचवार्षिक काळ बिनविरोध नगरसेवक म्हणून सेवा बजावली होती आणि उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारीही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली होती.साधेपणा,प्रामाणिकपणा आणि जनतेसाठी अखंड झटण्याची वृत्ती हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. त्यांच्या कार्यामुळे त्यांनी जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते. मयूर
महाजन यांनी आपल्या आजोबांना कधीच पाहिले नव्हते.त्यांच्या जन्माआधीच आजोबांचे निधन झाले होते.परंतु घरात त्यांच्या कार्याच्या कथा नेहमी सांगितल्या जात.गावातील लोक आजही आदरपूर्वक त्यांचे नाव घेतात.जेव्हा जेव्हा घरात किंवा गावात आजोबांच्या कार्याचा उल्लेख होत असे,तेव्हा त्या गोष्टींचा लहानग्या मयूरच्या मनावर खोल परिणाम होत असे. हळूहळू त्यांच्या मनात एक स्वप्न आकार घेऊ लागले."आपणही एक दिवस आपल्या आजोबांसारखे लोकांसाठी काम करावे,समाजाची सेवा करावी." बालपणी मनात रुजलेले हे स्वप्न त्यांनी जपून ठेवले. परिस्थिती साधी होती, आयुष्यात अनेक अडचणीही आल्या; परंतु समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची जिद्द कधीच कमी झाली नाही. वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला.कोणत्याही मोठ्या राजकीय पाठबळाशिवाय त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि जनतेसमोर उभे राहिले.त्यांच्या पाठीशी मोठी सत्ता नव्हती, पैशांची ताकद नव्हती; पण होती ती लोकांची आपुलकी,विश्वास आणि घरातून मिळालेल्या संस्कारांची शक्ती. एरंडोलच्या जनतेनेही त्या विश्वासाची कदर केली. जनतेने त्यांना भरभरून पाठिंबा देत नगरसेवक म्हणून निवडून दिले.हा क्षण केवळ मयूर महाजन यांच्यासाठी नव्हता,तर त्यांच्या आजोबांच्या कार्याला मिळालेला खरा सन्मान होता.जणू काही
आजोबांनी पेरलेली लोकसेवेची बीजे आता नातवाच्या रूपाने पुन्हा फुलू लागली होती. आज मयूर दिलीप महाजन हे शिवसेनेचे आमदार माननीय अमोलदादा पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांना ओळखले जाते.त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते एरंडोलच्या विकासासाठी तसेच जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. आजोबांचा वारसा,घरातून मिळालेले संस्कार आणि जनतेचा विश्वास या तीन गोष्टींना सोबत घेऊन मयूर महाजन यांचा लोकसेवेचा प्रवास पुढे सुरू आहे. त्यांनी आपल्या आजोबांना कधी पाहिले नसले,तरी त्यांच्या विचारांवर चालत लोकसेवेची परंपरा पुढे नेण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. खरंच, काही नाती रक्ताने जुळतात; तर काही नाती संस्कार, आदर्श आणि प्रेरणांनी जुळलेली असतात. स्वर्गीय आत्माराम सयाजी महाजन यांनी आयुष्यभर जपलेली लोकसेवेची परंपरा आज त्यांच्या नातवाच्या कार्यातून पुन्हा उजळून निघताना दिसत आहे. एरंडोलच्या इतिहासात ही गोष्ट कदाचित कायम स्मरणात राहील.एक नातू ज्याने कधी आपल्या आजोबांना पाहिले नव्हते, परंतु त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत लोकसेवेचा वारसा अभिमानाने पुढे चालू ठेवला. हीच खरी परंपरा…हीच खरी समाजसेवा…आणि हीच एका तरुण नगरसेवकाची प्रेरणादायी व हृदयस्पर्शी कथा. © दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
- धरणगाव (प्रतिनिधी) – मौजे वंजारी ता. धरणगाव येथील शेतकरी श्री. पुरुषोत्तम शंकर चौधरी यांच्या गट क्रमांक 39/2 मधील शेतात आज दुपारी सुमारे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार, वीज वाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत सुमारे 80 आर क्षेत्रातील उभे मका पीक पूर्णतः जळून खाक झाले असून 100 टक्के नुकसान झाले आहे. घटनेनंतर तत्काळ पंचनामा करण्यात आला असून तलाठी इफ्तार देशमुख यांनी पाहणी करून अहवाल तयार केला. यावेळी एमएसईबीचे स्थानिक कर्मचारी तसेच गावातील नागरिक तुषार यशवंत चौधरी, ताराचंद अशोक महाजन, नामदेव पांडुरंग पाटील, शंकर भगवान पाटील व शांताराम जगन्नाथ महाजन उपस्थित होते. दरम्यान, अशा प्रकारच्या शॉर्ट सर्किटमुळे शेतीपिकांचे नुकसान होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे दिसून येते.शासनाने त्वरित काहीतरी आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.1
- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीत जल्लोष; आमदार किशोर आप्पा पाटील यांचा खांद्यावर घेत नृत्य, कार्यकर्त्यांत उत्साहाची लाट पाचोरा/भडगाव (प्रतिनिधी) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त पाचोरा व भडगाव तालुक्यात अभूतपूर्व उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ठिकठिकाणी मिरवणुका, अभिवादन कार्यक्रम, तसेच सांस्कृतिक उपक्रमांद्वारे नागरिकांनी मोठ्या जल्लोषात जयंती साजरी केली. या मिरवणुकीत पाचोरा-भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वातावरणात रंग भरला. विशेष म्हणजे ढोल-ताशांच्या गजरात व गाण्यांच्या तालावर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरत नृत्य केले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतल्यावरही त्यांनी आनंदाने डान्स करत जल्लोषात भर टाकली. त्यांचे सुपुत्र, नगरसेवक तसेच शिवसेना गटनेते यांनी देखील मिरवणुकीत सक्रिय सहभाग घेत कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला. या प्रसंगी युवकांमध्ये विशेष ऊर्जा दिसून आली असून, संपूर्ण परिसर आंबेडकरमय झाल्याचे चित्र होते. जयंतीनिमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन केले. सामाजिक एकात्मता, बंधुता आणि समतेचा संदेश देणाऱ्या या मिरवणुकीत सर्व समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. एकूणच, यंदाची आंबेडकर जयंती पाचोरा-भडगाव तालुक्यात उत्साह, एकजूट आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.1
- धुळे जिल्ह्यात तापमानाने 42 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तर थंड पेये आणि पाणीदार फळांची मागणी वाढली आहे.1
- जालना आरटीओ कार्यालयाशेजारी भीषण आग; गायरान जळून खाक जालना शहरातील आरटीओ कार्यालयाच्या शेजारील परिसरात आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. गायरान जमिनीवरील सुकलेल्या गवताने क्षणात पेट घेतल्याने आग वेगाने पसरली आणि मोठ्या प्रमाणात गवत जळून खाक झाले. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गायरान क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुकलेल्या गवतामुळे आग अधिक भडकली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.1
- Post by Harshal patil2
- बोरगांव बाजार येथे विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पूजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...2
- भोकरदनमध्ये जयंती उत्सव 2026मोठ्या उत्सहात साजरा, जयंती मिरवणुकीत वृद्धसह, तरुण तरुणीनी धरला तालावर ठेका1
- कोचिंग सेंटरपासून ब्लॅकमेलपर्यंत? अमरावती प्रकरण गाजतंय 🚨 अमरावती येथे समोर आलेल्या एका गंभीर प्रकरणाने सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, काही मुलींना कोचिंग सेंटरच्या माध्यमातून टार्गेट करून त्यानंतर ब्लॅकमेल केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह काही अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याची चर्चा असून, त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित मुलींचे व्हिडिओ आणि फोटो तयार करून त्यांचा गैरवापर केल्याचे आरोप समोर येत आहेत. या माध्यमातून पैसे उकळणे आणि दबाव टाकण्याचे प्रकार घडल्याचेही बोलले जात आहे. सुमारे 180 पेक्षा अधिक मुलींना लक्ष्य करण्यात आल्याची चर्चा असून, 350 पेक्षा अधिक फोटो आणि व्हिडिओ संदर्भात माहिती पुढे येत आहे. या आकडेवारीची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याला पोलिसांनी अटक केली असून, मोहम्मद जोयान हा सध्या फरार असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. पोलीस यंत्रणेकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, सत्य परिस्थिती काय आहे याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.1