Shuru
Apke Nagar Ki App…
धुळ्यात तापमान 42°C पार | उकाड्याने जनजीवन विस्कळीत | Heatwave Alert Dhule धुळे जिल्ह्यात तापमानाने 42 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तर थंड पेये आणि पाणीदार फळांची मागणी वाढली आहे.
Dhule News 24
धुळ्यात तापमान 42°C पार | उकाड्याने जनजीवन विस्कळीत | Heatwave Alert Dhule धुळे जिल्ह्यात तापमानाने 42 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तर थंड पेये आणि पाणीदार फळांची मागणी वाढली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- धुळे जिल्ह्यात तापमानाने 42 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तर थंड पेये आणि पाणीदार फळांची मागणी वाढली आहे.1
- Post by Harshal patil2
- धरणगाव (प्रतिनिधी) – मौजे वंजारी ता. धरणगाव येथील शेतकरी श्री. पुरुषोत्तम शंकर चौधरी यांच्या गट क्रमांक 39/2 मधील शेतात आज दुपारी सुमारे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार, वीज वाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत सुमारे 80 आर क्षेत्रातील उभे मका पीक पूर्णतः जळून खाक झाले असून 100 टक्के नुकसान झाले आहे. घटनेनंतर तत्काळ पंचनामा करण्यात आला असून तलाठी इफ्तार देशमुख यांनी पाहणी करून अहवाल तयार केला. यावेळी एमएसईबीचे स्थानिक कर्मचारी तसेच गावातील नागरिक तुषार यशवंत चौधरी, ताराचंद अशोक महाजन, नामदेव पांडुरंग पाटील, शंकर भगवान पाटील व शांताराम जगन्नाथ महाजन उपस्थित होते. दरम्यान, अशा प्रकारच्या शॉर्ट सर्किटमुळे शेतीपिकांचे नुकसान होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे दिसून येते.शासनाने त्वरित काहीतरी आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.1
- गॅससाठी जीवावर उदार! एजन्सीसमोरच व्यक्तीने फोडले डोके – प्रशासनावर प्रश्नचिन्ह छत्रपती संभाजीनगर : घरगुती गॅस सिलिंडर मिळत नसल्याच्या संतापातून एका ५० वर्षीयv व्यक्तीने स्वतःचे डोके फोडून घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१६ एप्रिल) दुपारी रांजणगाव शेणपुजी (ता. गंगापूर) येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बालचंद नेमाने (वय ५०, रा. रांजणगाव) हे गेल्या अनेक दिवसांपासून गॅस सिलिंडरसाठी कमल गॅस एजन्सीवर वारंवार चकरा मारत होते. मात्र, सततच्या प्रयत्नांनंतरही त्यांना सिलिंडर मिळाला नाही. शुक्रवारी दुपारी एजन्सीसमोर उभे राहून त्यांनी “घरी बायकोला काय तोंड दाखवू? मुलं उपाशी आहेत...” अशी व्यथा व्यक्त केली. संतापाच्या भरात त्यांनी स्वतःच्या डोक्यावर जोरात मारल्याने त्यांचे डोके फुटले आणि ते रक्तबंबाळ झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना मदत केली व उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, रांजणगाव-वालूज परिसरात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचा तुटवडा भासत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. एजन्सीवर मोठ्या रांगा लागत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी गॅस एजन्सींना घरपोच वितरण करण्याचे निर्देश दिले असले तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ग्राहकांसाठी आवाहन : गॅस संदर्भातील तक्रारींसाठी1
- येवला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत किरकोळ वादातून एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, पोलिसांनी अत्यंत तत्परतेने तपास चक्रे फिरवत अवघ्या काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. नेमकी घटना काय? दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास शनिपटांगण भागातील 'साई प्रेरणा मोबाईल' दुकानासमोर दोन व्यक्तींमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि एकाने दुसऱ्याच्या डोक्यात मोठा दगड घातला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तपास आणि अटक: मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तपासाअंती मृताचे नाव एकनाथ बाळचंद्र गायकवाड (वय ३७, रा. सुरेगाव रस्ते) असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक पुरावे आणि खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपी गौरव राजू घुसर (वय २१, रा. सुंदरनगर, येवला) याला ताब्यात घेतले. गौरव याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. न्यायालयाने आरोपीला २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 1
- घरगुती पद्धतीने बनवलेले आंबा लोनच1
- वडोद बाजार येथे गिरजा नदीत रात्रीचे दहा वाजून तर सकाळचे पाच वाजता दहा-बारा ट्रॅक्टर आणि टिप्पर लाख रुपयाची वाढू उपसा करत आहे पोलीस यांच्यावर कारवाई करायला पोलीस स्टेशनला फोन लावल्यावर ते सांगते आम्ही गाडी पाठवतो आणि कोणीच पाठवत नाही वाढू ट्रॅक्टरचे हप्ते चालू आहे म्हणून तर याच्यावर काय ॲक्शन नाही मी कंट्रोल रूमलाही फोन केला होता त्यांचाही काय ॲक्शन नाही मी तहसीलदार साहेबांना त्यांचाही काही ॲक्शन नाही असंच चालू राहिला तर सरकार असं लय मोठा नुकसान होईल प्रकृतीचा नुकसान होईल दररोजची लाख रुपाची वाळू उपसा होत आहे आणि प्रशासनाला याच्यावर काही लक्ष नाही1
- जालना आरटीओ कार्यालयाशेजारी भीषण आग; गायरान जळून खाक जालना शहरातील आरटीओ कार्यालयाच्या शेजारील परिसरात आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. गायरान जमिनीवरील सुकलेल्या गवताने क्षणात पेट घेतल्याने आग वेगाने पसरली आणि मोठ्या प्रमाणात गवत जळून खाक झाले. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गायरान क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुकलेल्या गवतामुळे आग अधिक भडकली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.1